✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मासाहार की शाकाहार... आणि सरकार!

ज
ज्योति अळवणी यांनी
Sat, 09/12/2015 - 10:20  ·  लेख
लेख
मासाहार खाण्यावर बंदी नाही घातलेली सरकारने. केवळ 2 दिवस पशु हत्या न करण्याचे आदेश आहेत सरकारचे. ते ही केवळ सरकारी कत्तलखान्यामधे. देवनार येथे. त्याहुनही महत्वाची गोष्ट ही की हां निर्णय कॉंग्रेस सरकारने 2004 साली घेतला आहे. फडणवीस सरकारने नाही. बृहन्मुंबई महानगर पालिकेने मागिल वर्षी अजुन दोन दिवस पशु हत्या करू नये असा ठराव सर्व पक्षिय मंजुरिने केला होता. तो यावर्षी मागे घेतला आहे. याचा अर्थ हे केवळ मतांचे राजकारण होते आहे असे वाटते. 'अच्छे दिन' यासंकल्पनेची चर्चा देखिल खूप रंगली आहे. त्यामुळे नमूद करावेसे वाटते की मासाहार करणे किंवा न करणे यातुन अच्छे दिन ठरत नाहीत. झिरो बॅलेन्स अकाउंट उघडणे; 12 रूपयात मेडीक्लेम करता येणे या आणि अशा सारख्या सामान्यांसाठी सुरु केलेल्या योजनांमधुन आर्थिक दृष्टीने मागासलेल्या वर्गाला चांगले आयुष्य जगता येईल हा विचार करणे; बहुतेक याला अच्छे दिन म्हणतात. शेतकऱ्याला केवळ कर्जमाफ़ी देणे हा उपाय नसून; जलयुक्त शिवार सारख्या संकल्पनेतुन लहान गावे आणि खेड्यातुन कायम स्वरूपी पाण्याचे दुर्भिक्ष कमी व्हावे असे प्लॅनिंग करणे हे असतात अच्छे दिन. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक इमारतीला बंधनकारक आहे. ते कोणी केले आहे का? असा स्वतःलाच प्रश्न विचारला तर आपले सामाजिक देणे आपण किती देतो त्याचेदेखिल उत्तर मिळेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4827 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? ते समजले नाही....

मुक्त विहारि
Sat, 09/12/2015 - 10:32 नवीन
असो,
  • Log in or register to post comments

मासाहार ..शाकाहार ..सरकार..

जेपी
Sat, 09/12/2015 - 10:50 नवीन
मासाहार ..शाकाहार ..सरकार...अच्छे दिन..कर्जमाफी... (?)-जेपी
  • Log in or register to post comments

@मासाहार की शाकाहार... >> =

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/12/2015 - 11:34 नवीन
@मासाहार की शाकाहार... >> =)) पांडू................... =)) ये रे ये! =)) तुझा आवडता विषय आला बघ मि पावर ;)
  • Log in or register to post comments

भाऊ....

मुक्त विहारि
Sat, 09/12/2015 - 12:18 नवीन
तेव्हढा एकच विषय नाही आहे. इतर पण बरेच विषय ह्या एकाच धाग्यात आहेत. (पण पुणे विरुद्ध इतर गावे, असा विषय मात्र नाही. धागाकर्ता/धागाकर्ती बहूदा पुणेकर असावा/असावी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मग तुम्ही दोष मिडियाला द्या

याॅर्कर
Sat, 09/12/2015 - 12:41 नवीन
सारखं सारखं तोच विषय ढवळून काढायचा म्हणजे काय म्हणायचं ह्या मिडियाला? पूर्वी काॅग्रेस काळामध्ये का नाही उगळला हा विषय? तेव्हाही दोन दिवस बंदी होतीच ना? हा लोंकांच्या आवडीची विषय म्हणजे टीआरपी वाढणार,आणि सरकारविरोधी दुसरे कोणते मुद्दे शिल्लक नसावेत बहुधा? म्हणून सारे धंदे चाललेत. सरकारने आता मिडियाबंदी घालायला हवी.कारण हा वाद शाकाहारी विरूद्ध मांसाहारी असा नाही तर...... हिंदू(मांसाहारी),मुसलमान,ख्रिश्चन,बौद्ध,(दलित) Vs हिंदू(शाकाहारी),जैन,लिंगायत असा आहे. मज्जाच आहे बुवा, नवीन IPL आहे वाटतं?सगळे इकडेतिकडे मिक्स. जास्त बोली कोणाकोणाची लागते बघुया.
  • Log in or register to post comments

मुद्दा तोडून मोडून चलाखीने

दुश्यन्त
Sat, 09/12/2015 - 20:12 नवीन
मुद्दा तोडून मोडून चलाखीने मांडला आहे हे दिसतेय. याआधी २ दिवस बंदी असायची तेव्हा कधी वादंग झाला नाही. मीरा भायंदर मध्ये भाजपच्या महापौरांनी ८ दिवसांची बंदी घातली , पाठोपाठ मुंबई- नवी मुंबइत प्रशासनाकडून ४ दिवस बंदी घालण्यात आली म्हणून हा वाद झाला आहे. भाजप हा संधिसाधू पक्ष आहे. काड्या टाकून वाद निर्माण करायचे आणि मज बघायची हा भाजपचा खेळ नेहमीचा झाला आहे. या वादाला भाजपेयी कारणीभूत आहेत. ८ -८ दिवसांची बंदी चुकीची आहे. सगळीकडून टीका झाली , कोर्टाने झापले तेव्हा परत २ दिवसांवर येवून थांबले.
  • Log in or register to post comments

रेन वॉटर हार्वेस्टिंग बाजूला

अभिजित - १
Sat, 09/12/2015 - 20:59 नवीन
रेन वॉटर हार्वेस्टिंग बाजूला राहू दे. आत्ता पण चिकार ठिकाणी पाणी वाया जात असते. त्याच्यावर municipality काय करते ? १०० वर्ष जुन्या पाईप लाईन बदलण्य ऐवजी इतर चमको गिरी काम फक्त करते. जेव्हा कधी लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जाते तेव्हा हे लोक तिकडे हात लावणार. आज पेपर मध्ये बातमी आहे कि लुइस वाडी ठाणे येथे लाईन फुटली आहे पण वाहतूक बंद करू शकत नाही म्हणून पाणी वाया जात आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग तर बाजू ला राहू दे. खूप ठिकाणी टाक्या ओवर फ्लो होऊन पाणी वाया जाते . त्या लोकांना सांगायचा प्रयत्न केला. ऐकत नाहीत. त्यांना वरूनच मार बसला पाहिजे तर जागे होतील. muncipality याच्यावर काही करू इच्छिते का ? मला निनावी तक्रार करायची आहे. कशी करू ? काही मार्ग आहे का ? email id / फोन नंबर ? १० हजार रु मध्ये ऑटो सेन्सोर बसवून मिळतात टाकीला. पाणी अजिबात वाया जाणार नाही. जनता अडाणी असेल आणि हे करत नसेल तर तो मार्ग तिला दाखवा कि. काही incentive द्या. लोक करतील.
  • Log in or register to post comments

१० हजार? हॅ हॅ हॅ. २२०० रुपये

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 09/13/2015 - 18:25 नवीन
१० हजार? हॅ हॅ हॅ. २२०० रुपये विथ ३ वर्षांची सेन्सर गॅरंटी आणि ६ महिन्याची फ्लोट वॉरंटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १

मी आपला एक जास्तीत जास्त

अभिजित - १
Tue, 09/15/2015 - 20:38 नवीन
मी आपला एक जास्तीत जास्त म्हणून आकडा टाकला होता. नुसत्या गणपती किवा सत्य नारायण पूजेचे ( विथ जेवण ) १००० रु वर्गणी काढतात. पण टाकीला सेन्सोर बसवायला पैसे नाहीत. आणि याबाबत काही जन जागृती करावी आणि ऐकत नसतील तर लोकांना बांबू लावावा असे मायबाप सरकारला पण वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

खूप ठिकाणी टाक्या ओवर फ्लो

काळा पहाड
Tue, 09/15/2015 - 20:07 नवीन
खूप ठिकाणी टाक्या ओवर फ्लो होऊन पाणी वाया जाते . त्या लोकांना सांगायचा प्रयत्न केला. ऐकत नाहीत.
हा रक्तातला प्रॉब्लेम आहे. त्यावर उपाय नाही. एखाद्या हुकूमशहा ने बंदुकीच्या दस्त्याने अशा लोकांचं डोकं फोडणे हा एकमेव उपाय आहे यांच्यासाठी. आणि बहुसंख्य भारतीय असेच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १

अभिजित - १http://www

तुडतुडी
Tue, 09/15/2015 - 12:43 नवीन
अभिजित - १ http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx इथे complaint देवू शकता . 25508171 हा फोन नंबर दिलाय .
  • Log in or register to post comments

धन्यवाद . पण मला मुंबई आणि

अभिजित - १
Tue, 09/15/2015 - 19:29 नवीन
धन्यवाद . पण मला मुंबई आणि ठाणे येथील हवा आहे. बाकी इथल्या muncipal बाबुना पाण्याची फार फिकीर नाहीये. बेफाम पाणी सगळी कडे वेस्ट होत असते. त्यांना काही करायचेच नाहीये. याच्या करता स्पेशल सेल स्थापन करता येईल. पण इथे मलई नाही. होऊ दे खर्च प्रवृत्ती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

आधीच सांगतो हे धागाकर्त्याला

वेल्लाभट
Tue, 09/15/2015 - 12:59 नवीन
आधीच सांगतो हे धागाकर्त्याला उद्देशून नाही तर एक जेनेरिक स्टेटमेंट आहे. भारतात लोकांना काम धंदे नाहीयेत. शाकाहार-मांसाहार उगाळत बसलेत.
  • Log in or register to post comments

संपूर्ण सहमत

ज्योति अळवणी
Tue, 09/15/2015 - 19:24 नवीन
संपूर्ण सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा