मासाहार की शाकाहार... आणि सरकार!
मासाहार खाण्यावर बंदी नाही घातलेली सरकारने. केवळ 2 दिवस पशु हत्या न करण्याचे आदेश आहेत सरकारचे. ते ही केवळ सरकारी कत्तलखान्यामधे. देवनार येथे. त्याहुनही महत्वाची गोष्ट ही की हां निर्णय कॉंग्रेस सरकारने 2004 साली घेतला आहे. फडणवीस सरकारने नाही.
बृहन्मुंबई महानगर पालिकेने मागिल वर्षी अजुन दोन दिवस पशु हत्या करू नये असा ठराव सर्व पक्षिय मंजुरिने केला होता. तो यावर्षी मागे घेतला आहे.
याचा अर्थ हे केवळ मतांचे राजकारण होते आहे असे वाटते.
'अच्छे दिन' यासंकल्पनेची चर्चा देखिल खूप रंगली आहे. त्यामुळे नमूद करावेसे वाटते की मासाहार करणे किंवा न करणे यातुन अच्छे दिन ठरत नाहीत. झिरो बॅलेन्स अकाउंट उघडणे; 12 रूपयात मेडीक्लेम करता येणे या आणि अशा सारख्या सामान्यांसाठी सुरु केलेल्या योजनांमधुन आर्थिक दृष्टीने मागासलेल्या वर्गाला चांगले आयुष्य जगता येईल हा विचार करणे; बहुतेक याला अच्छे दिन म्हणतात.
शेतकऱ्याला केवळ कर्जमाफ़ी देणे हा उपाय नसून; जलयुक्त शिवार सारख्या संकल्पनेतुन लहान गावे आणि खेड्यातुन कायम स्वरूपी पाण्याचे दुर्भिक्ष कमी व्हावे असे प्लॅनिंग करणे हे असतात अच्छे दिन.
रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक इमारतीला बंधनकारक आहे. ते कोणी केले आहे का? असा स्वतःलाच प्रश्न विचारला तर आपले सामाजिक देणे आपण किती देतो त्याचेदेखिल उत्तर मिळेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? ते समजले नाही....
मासाहार ..शाकाहार ..सरकार..
@मासाहार की शाकाहार... >> =
भाऊ....
मग तुम्ही दोष मिडियाला द्या
मुद्दा तोडून मोडून चलाखीने
रेन वॉटर हार्वेस्टिंग बाजूला
१० हजार? हॅ हॅ हॅ. २२०० रुपये
मी आपला एक जास्तीत जास्त
खूप ठिकाणी टाक्या ओवर फ्लो
अभिजित - १http://www
धन्यवाद . पण मला मुंबई आणि
आधीच सांगतो हे धागाकर्त्याला
संपूर्ण सहमत