मिस्त्री-मेहतां नी उधळलेली मुक्ताफ़ळे आणि ती चोखण्यातच धन्यता मानणारे मराठी महाभाग !

कुमारकौस्तुभ's picture
कुमारकौस्तुभ in काथ्याकूट
6 Nov 2013 - 2:17 pm
गाभा: 

सुकेतु मेहता नावाच्या या माणसाने त्याच्या MAXIMUM CITY ( BOMBAY LOST AND FOUND) या पुस्तकात THE 1992-1993 RIOTS या नावाच्या प्रकरणात खालील मुक्ताफ़ळे मराठी माणसांच्या नावाने उधळलेली आहेत. त्यातील काही भाग हा मुळ व अनुवादा सहीत खालील प्रमाणे आहे. या संपुर्ण पुस्तकात या माणसाचा मराठी माणसांविषयी असाच विकृत दृष्टीकोण भरलेला आढळतो.

The Shiv Sena is made up mostly of Maharashtrian Hindus, who call themselves “sons of the soil.” The Maharashtrians were people who had been born here and were not consumed by immigrant striving:a race of clerks. Their ambitions were modest, practical: a not-too-long workday; a good lunch from the
tiffin sent from home at midday; one or two trips to the cinema a week; and, for their children, a secure government job and a good marriage. They did not crave designer clothes. They did not want to eat expensive foreign food at the Taj.

शिवसेना ही मुख्यत्वेकरुन अशा महाराष्ट्रियन हिंदुं चा भरणा असलेली संघटना आहे जे स्वत:ला “भुमिपुत्र” म्हणबुन घेतात. महाराष्ट्रियन हे असे लोक आहेत जे येथेच (मुंबई) त जन्मले आणि जे कधीही स्थलांतरा च्या संघर्षात उतरले नाहीत ही एक कारकुनांची जमात आहे. यांच्या (मराठी लोकांच्या) महत्वाकांक्षा म्हणजे अगदी मर्यादीत, व्यावहारीक, यांना कामाचे तास जास्त नकोत, एक घरुन आलेला डब्बा दुपारी चेपायचा, आठवड्यातुन एक-दोन दा सिनेमा ला गेले, मुलांसाठी एक चांगली सरकारी नोकरी आणि लग्न उरकल की झाल.यांनी कधीही डिझायनर कपड्यांची इच्छा नाही बाळगली. यांना कधी महागडे विदेशी फ़ुड ताज मध्ये जाउन खावे असे नाही वाटले.

I did not know many Maharashtrians when I was growing up. There was the world I lived in on Nepean Sea Road, and there was another world whose people came to wash our clothes, look at our electric meters, drive our cars, inhabit our nightmares. We lived in Bombay and never had much to do with Mumbai. Maharashtra to us was our servants, the banana lady downstairs, the textbooks we were forcefed in school. We had a term for them: ghatis—literally, the people from the ghats, or hills. It was also the word we used, generically, for “servant.” I was in the fourth standard when Marathi became compulsory.How we groaned! It was a servants’ language, we said. We told each other a story about its genesis. All
the peoples of India had their languages, except the Maharashtrians. They went to Shiva and asked to be given a language. The god looked around, saw some pebbles, threw them in his brass pot, and shook it around. “Here’s your language,” he said. What did we know of the language that contains the poetry of
Namdeo, Tukaram, Dilip Chitre, Namdeo Dhasal?

मी जेव्हा मोठा होत होतो तेव्हा मला फ़ारसे महाराष्ट्रियन लोक माहीत नव्हते, मि नेपियन सी रोड वरील एका वेगळ्या च विश्वात राहत होतो. आणि या मराठी लोकांचे एक दुसरे च विश्व होते आणि या दुसर्याा विश्वातील लोक हे मराठी लोक आमचे कपडे धुण्यासाठी येत असत, आमचे इलेक्ट्रीक मीटर्स तपासत, आमच्या गाड्या चालवित असत ( ड्रायव्हर्स), आणि हे (मराठी) आमच्या भितीदायक दु:स्व्प्नांचा एक भाग होते.आम्ही कायम “बॉंम्बे”मध्ये राहत होतो आणि या “मुंबई” शी आमचा काहीही संबंध नव्हता महाराष्ट्र म्हणजे आमच्यासाठी काय होता तर आमचे नोकर. जिन्याखाली केळे विकणारी बाई, शाळेत आमच्या वर लादण्यात आलेली मराठी ची क्रमिक पुस्तके हा होता. आमच्या कडे या लोकांसाठी (मराठी) एक शब्द होता तो म्हणजे “घाटी” याचा शब्दश: अर्थ म्हणजे घाट कींवा डोंगरावरची लोकं. हा घाटी शब्द आम्ही आमच्या नोकरांसाठी पर्यायवाची म्हणुन वापरीत असु. मी चौथी त असतांना आम्हाला शाळेत मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आणि काय संताप झाला होता आमचा. आम्ही म्हणालो अरे ही (मराठी) तर आपल्या नोकरांची भाषा आहे. मग आम्ही मराठी चा जन्म कसा झाला याची एक गोष्ट एकमेकांना सांगत असु. ती अशी की भारतातल्या प्रत्येक लोकांकडे स्वत:ची एक भाषा होती फ़क्त मराठी लोक सोडुन मग काय झाल ते सर्व ( मराठी लोक) भगवान शंकरा कडे गेले आणि त्यांनी स्वत:साठी एक भाषा मागितली. मग देवाने काय केलं आजुबाजुला बघितल, त्याला काही दगड दिसली त्यांन ती एका पितळाच्या भांड्यात टाकली आणि जोरजोरात हलविली आणि म्हणाला हं ही घ्या तुमची भाषा !.आम्हाला कुठे माहीत होत की ही ती भाषा आहे की ज्यात नामदेव, तुकाराम ,दिलीप चित्रे ,नामदेव ढसाळ यांनी कविता लिहील्या आहेत ?

But all the time there was a Maharashtrian underclass, emerging, building itself. And now it had gained political power, strength, and a desperate confidence. It was advancing closer and closer to the world I grew up in, the world of the rich and the named. Many of the people on Nepean Sea Road were aghast not so much that the mobs were hunting out Muslims from the tall buildings but that they had dared to come to Nepean Sea Road at all. The arrogance of ghatis demanding to see the building directories! The other Bombay now sneaks in through our streets, lives among us, doesn’t like us being rude to it, occasionally beats us up. The riots of 1992 and 1993 were a milestone in the psychic life of the city, because its different worlds came together with an explosion. The monster came out of the slums.

पण सतत हा खालचा निन्मवर्गीय मराठी लोकांचा वर्ग उदयाला येत होता स्वत:ला घडवीत होता.आणि आता तर यांनी (मराठींनी) राजकीय ताकद ,शक्ती,आणि तीव्र आत्मविश्वास ही कमावला होता.हे मराठी हळुहळु आमच्या श्रीमंतांच्या आणि प्रतिष्ठीत लोकांच्या जगा कडे चाल करुन येत होते होते. बहुसंख्य नेपियन सी रोड वासियांना या गोष्टीची खंत नव्हती की या मराठी लोकांच्या झुंडी मुस्लिमांना शोधत आमच्या उंच इमारतींमध्ये फ़िरत होत्या पण सर्वात मोठि खंत-वेदना ही होती की हे मराठी (घाटी) नी अखेर आमच्या नेपियन सी रोड वर येण्याची /पाय ठेवण्याची हिंमत केली होती. या घाटींचा उद्दामपणा चा कळस म्हणजे हे घाटी आम्हाला आमच्या बिल्डींग च्या डीरेक्टरी ज बघण्याची मागणी करीत होते.ही दुसरी मुंबई आता चोर पावलाने जी आमच्या बरोबर राहत असे ,जी क्वचित प्रसंगी आम्हाला बदडत असे,जीला आमची मिजास खपत नसे, तीने आता आमच्या रस्त्यांत परीसरात घुसखोरी केलेली होती.१९९२ आणि १९९३ चे दंगे हा या शहराच्या मानसविश्वा तील एक मैलाचा दगड होता.कारण की या दंग्यांनी दोन वेगवेगळ्या जगां ना एका स्फ़ोटा ने जवळ जवळ आणलं होतं. आता ( मराठी )राक्षस झोपडपट्ट्यांतुन बाहेर पडला होता.

सु (?) केतु मेहता च्या वल्गनां ना माझे उत्तर

१-भुमिपुत्र आहोतच आणि अभिमानाने म्हणवुन घेणारच आता ज्यांना भुमिच नाही अशा भटक्या कुत्र्यांनी जे भटकत भटकत अन्नाच्या शोधार्थ दाही दिशां ना भटकत असतात अशा भ.कु.नी यावर भुंकुन आपल नैराश्य व्यक्त केल तर आम्ही याला त्यांच्या च भाषेतील एक म्हण शिकवु की “ हाथी चले बाजार तो कुत्ते भौके हजार “.

२-म्हणे आम्ही कारकुनांची जमात , अरे बोइंग चे व्हाइस प्रेसीडेंट दिनेश केसकर, जयंत नारळीकर, किर्लोस्कर , गरवारे हे कारकुन आहेत का ? मग मेहता ज्यांच्या नावावरुन “ मेहता खोलु क्या तेरा खाता ? “ ही अश्लिल म्हण तुमच्याच लोकांमध्ये प्रचलित आहे ते कारकुंडे नाही त तर कोण आहेत? कुठल्याही मा.गु. च्या दुकानावर जो कुबड काढुन, मान मोडुन, वह्यामध्ये डोके खुपसुन बसलेला ढापण्या असतो त्याचे आडनाव १० पैकी ९ वेळा मेहता च कसे काय हो असते.? कारण मेहता ही जमात च मुनीमांची (कारकुंड्याची) आहे.

३-म्हणे महागडे फ़ुड ताज मध्ये ? अरे एक च सांग तुझी विठ्ठल कामतांच्या ऑर्कीड या सप्ततारांकीत हॉटेल मध्ये जाउन एक वेळ च जेवण जेवण्याची आणि बिल देण्याची ( भांडे घासावे न लागता बिल देण्याची ) लायकी आहे का ? अरे हो पण तिथे तर भटक्या कुत्र्यांना प्रवेश च नसतो.

४-म्हणे कामाचे तास ? अरे बरोबर च आहे ना हे बघ दोन प्रकारची कामे असतात एक जे करायला मुळात अफ़ाट जातिवंत प्रतिभा लागते जी सर्वात महत्वाची कामे असतात आणि एक ज्याला साध्या मराठीत हमाली कामे म्हणतात. जीचे उत्तम उदाहरण म्हणजे जी मेहता लोक मान मोडुन दिवसभर करतात ती चोपड्यांची कामे. आता हमाला ला काय न की तासांच च महत्व फ़ार असतं कारण बिगारी जो असतो ना त्याला तासांवर रोजा वर च पैसे मिळतात. कामगाराच कस असत २ तास एक्स्ट्रा काम २ तास ओव्हर टाइम मिला फ़िर मै मस्त दारु पिया इ. तर तुझ म्हणण आणि तास मोजण तुला शोभत.

५-म्हणे मी एका वेगळ्याच विश्वात राहत होतो अगदी खरय तुझ म्हणण सिझ्रोफ़्रेनीक लोकांच ना एक वेगळच विश्व असत. वेगळेच भास होतात हो या लोकांना आणि काहीबाही आवाज ही ऎकु येत असतात बर का. आणि आता जर का तुला स्वप्नांत परत मराठी लोक दिसु लागले ना तर मला सांग तुला ठाण्याला आनंद नाडकर्णिंच्या आय़.पी.एच. मध्ये माझ्या खर्चाने घेउन जातो.

६- खर च माझ च चुकल बाबा तुझी मेंटल कंडीशन लक्षात यायला अंमळ उशिरच झाला हो. आता तुला मी काही काही बोलत नाही रे मोत्या आता तुझा इलाज करण हाच एक योग्य मार्ग आहे. तुझ्या तोंडी लागुन माझी चुक च झाली.

या लेखाची मुळ प्रेरणा

मिसळ पाव वर एका सदस्याने रोहींग्तन मिस्त्री च्या एका पुस्तकावरील शिवसेने ने आणलेल्या बंदीच्या विरोधात एक लेख लिहीलेला आहे. याच रोहींग्तन मिस्त्रि ने वरील सुकेतु मेहता च्या या पुस्तकाची जी प्रशंसा केलेली आहे ती याच पुस्तकात सुरुवातीला दिलेली आहे ती या शब्दात जशी च्या तशी देत आहे.

“A brilliant book. [Mehta] writes fearlessly about the horror and wonder that is Bombay. One by one, he reveals its multiple personalities: maleficent Bombay, bountiful Bombay, beckoning temptress of hope, manufacturer of despair—city of dreams and nightmare city. Best of all, reading this book helps one understand why Bombay can be an addiction.” —Rohinton Mistry, author of Family Matters and A Fine Balance

आता याचा अनुवाद टंकण्याचा उत्साह माझ्यात शिल्लक नाही. तर खंत एकाच गोष्टीची वाटते की जो रोहींग्त्न मिस्त्री स्वत: अशी विचारसरणी मराठी माणसांविषयी बाळगतो आणि मराठी माणसांचा इतका मोठा अपमान जो सुकेतु मेहता ज्या पुस्तकांत करतो त्याची अशा शब्दात प्रशंसा करतो त्या रोहींग्तन मिस्त्री चा विरोध करण्याऐवजी त्याचे समर्थन एक मराठी माणुस च करतो याहुन मोठे दुर्देव ते काय असेल ?

एक महत्वाचा खुलासा आणि माफिनामा

आणि सर्वात शेवटी एक जाहीर करतो की मि शिवसैनिक नाही. आणि त्याचप्रमाणे कुठल्याही पक्षाचा अथवा विचारसरणी चा इझम चा झेंडा कधीही घेउन फ़िरत नाही. जे जेव्हा जसे योग्य वाटते ते तसे कोणाला कीतीही चुकीचे वाटले तरी त्याची तमा न बाळगता इमानदारीने व्यक्त करीत असतो. आणि या लेखातील विचार हे माझ प्रामाणिक वैयक्तीक विचार प्रकटन आहे.आणि हा लेख लिहीतांना माझा जिभेचा संयम सुटलेला आहे आणि त्यामुळे सभ्यतेचे ,भाषेचे संकेत मा़झ्या कडुन नक्कीच मोडले गेलेले आहेत यावीषयी सध्या माझ्या मनात खिन्नता दाटुन येत आहे...यासाठी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो पण शब्द मागे घेण्याची इच्छा ही नाही हे देखील सांगतो.

प्रतिक्रिया

पुस्तक वाचलेले नाही पण वर जे उतारे उद्धृत केले आहेत ते वाचून असं वाटतंय की पूर्ण लिखाणाच्या संदर्भात हे तुकडे न पाहता केवळ सुरुवातीचा / मधला असे भाग घेतले आहेत असं भासतंय. (आउट ऑफ कॉन्टेक्स्ट)

लेखकाने आपल्या नेपीयन सी रोड छाप धारणा स्पष्ट केल्या आहेत आणि नंतर काही इतरच रियलायझेशन होणार असल्याची झलक इथे दिसतेय. (उदा. आम्हाला कल्पनाच नव्हती की..ढसाळ .. वगैरे.. )

म्हणजेच यात असलेले तुच्छतेचे शब्द वाचताना सिलेक्टिव पॅरेग्राफ रीडिंगचा प्रकार झाला असावा असं वाटतं.

मला या लिखाणाच्या दिलेल्या परिच्छेदात तरी मराठी माणसाला शिव्या द्यायच्या नसून आपल्या आधीच्या धारणा स्पष्ट करणे आणि उपरोधिक रित्या मांडणे असा रोख दिसतो आहे. उपरोध तर स्पष्टच दिसतो आहे.

अर्थात बाकी संपूर्ण लेखन अथ ते इति हे एकसंध संपूर्ण संदर्भाच्या चौकटीत वाचूनच शुद्ध मराठीद्वेष आहे की उलट प्रकार आहे की बरेवाईट बॅलन्स केले आहे ते सांगता येईल.

टवाळ कार्टा's picture

6 Nov 2013 - 2:56 pm | टवाळ कार्टा

+१११११११

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Nov 2013 - 4:07 pm | अनिरुद्ध.वैद्य

+१११

प्रभाकर पेठकर's picture

6 Nov 2013 - 4:28 pm | प्रभाकर पेठकर

गविंशी १००% सहमत.

लेखकाने आपल्या नेपीयन सी रोड छाप धारणा स्पष्ट केल्या आहेत आणि नंतर काही इतरच रियलायझेशन होणार असल्याची झलक इथे दिसतेय. (उदा. आम्हाला कल्पनाच नव्हती की..ढसाळ .. वगैरे.. )

ह्या विधानात तरी आपल्या धारणा चुकीच्या होत्या अशी कबुली दिसते आहे. संपूर्ण पुस्तक वाचावे लागेल.

ते, 'मडक्यात दगड घालून हलविल्यावर जो आवाज निघतो तशी तुमची भाषा' असे तर आम्हीही आमच्या कन्नड मित्राला म्हणायचो. त्या लहानपणीच्या गोष्टी होत्या. अशा अनेक चुकीच्या गोष्टी आपण लहानपणी करीतच असतो. असो.

आता लेखक महोदय सुकेतु मेहता हे वयाने मोठे झालेले आहेत सज्ञान आहे असे म्हणण्यास जागा आहे. यांचा जन्म १९६३ चा आहे आणि ते आता १९९५ मधील घटने विषयी बोलत आहेत. यांचे यावेळेस चे वय कीमान ३२ आहे ( १९९५ मधिल गोष्टींबद्द्ल लिहीतांना) आता बालपणीच्या रम्य आठवणीं विषयी देखील बोलत नाहीयेत. तर एका गंभीर महत्वाच्या समकालीन विषयावर चर्चा करीत आहेत तो म्हणजे बॉंम्बे चे मुंबई हे नाव बदलणे योग्य आहे का नाही वगैरे असे. तर सर्व चर्चा झाल्यावर कृपया परीच्छेदाच्या शेवट च्या तीन ओळींवर अवधान द्यावे. या अवलोकनार्थ ठळक केलेल्या आहेत. येथे ते अगदी निसंदीग्ध शब्दांमध्ये आपले घाटी बांधवा विषयीचे प्रांजल मत व्यक्त करीत आहेत. याहुन अधिक स्वच्छ मत प्रदर्शन काय असते ?
असे तर नाही या तीन ओळीत केलेला हा मराठींचा गौरव आहे आणि मला लक्षात येत नाही आहे ? पण घाटींनी अशा तर्हेीने आम्हा लोकांवर सुड उगवला त्यांनी अखेर शहराचे नाव ही बदलले आणि आमच्या रस्त्यांवर राहण परवडण तर यांना शक्य नव्हत तर घाटींनी ही नाव बदलुन आमच्या रोड साइनचा ताबा घेतला ही वाक्ये मला तरी गौरवपुर्ण वाटत नाही.ही मराठी माणसां विषयीचा द्वेष उघडपणे व्यक्त करतात. लेखक आपली मानसिकता “यांनी आमचा सुड घेतला” इतक्या स्वच्छ शब्दांत व्यक्त करतो.
या नंतरचा परीच्छेद आणि या पुर्वीचा परीच्छेद ही सोबत जोडलेला आहे ( खरे तर त्याची काहीच आवश्यकता नाही मात्र सिलेक्टीव्ह रीडींग या आरोपाला वाव नको म्हणुन हा जोडलेला आहे आणि इतक्यात जो मुद्दा आहे तो पुरेसा कव्हर झाला आहे असे मला वाटते आणि मुद्दाम अनुवाद ही केला नाही कारण मग अनुवाद्काची मानसिकताही मध्ये येण्याचा संभव असतो.)

पुर्वीचा परीच्छेद

A name is such that if you grow up with it you get attached to it, whatever its origins. I grew up on Nepean Sea Road, which is now Lady Laxmibai Jagmohandas Marg. I have no idea who Sir Ernest Nepean was nor do I know who Lady Laxmibai Jagmohandas was, but I am attached to the original name
and see no reason why it should change. The name has acquired a resonance, over time, distinct from its origin; as rue Pascal or West 4th Street or Maiden Lane might have for someone who has grown up in those cities. I got used to the sound of it. It is incorporated into my address, into my dream life. I can come back to Nepean Sea Road; if some municipal functionary bent on exacting revenge onhistory changes it to Lady Laxmibai Jagmohandas Marg, he is doing a disservice to my memory.
घाटी विषयी मत नोंदवलेला परीच्छेद ( see last 3 lines )
Name-changing is in vogue all over India nowadays: Madras has been renamed Chennai; Calcutta, that British-made city, has changed its name to Kolkata. A BJP member of parliament has demanded that India’s name be changed to Bharat. This is a process not just of decolonization but of de-Islamicization. The idea is to go back not just to a past but to an idealized past, in all cases a Hindu past. But to change a name, for a person or a road or a city, there had better be a very good reason. And there was no good reason to change the name of Bombay. It is nonsense to say that Mumbai was the original name. Bombay was created by the Portuguese and the British from a cluster of malarial islands, and to them should go the baptismal rights. The Gujaratis and Maharashtrians always called it Mumbai when speaking Gujarati or Marathi, and Bombay when speaking English. There was no need to choose. In 1995, the Sena demanded that we choose, in all our languages, Mumbai. This is how the ghatis took revenge on us. They renamed everything after their politicians, and finally they renamed even the city.If they couldn’t afford
to live on our roads, they could at least occupy the road signs.

नंतरचा परीच्छेद

Number Two After Scotland Yard AJAY LAL IS A COP with a dream. It is a dream of the last gesture he will make as a police officer. It is not about arresting the godfather Dawood Ibrahim, or accepting a medal, or setting his troops on fire with an inspiring speech. It is a dream of micturition. “I would go to police headquarters and stand in front of it and abuse all my corrupt seniors, reveal everything. Then I would pee in their direction and turn around and leave the force.”

लेख बहुधा "सरकॅसिझम" मोड मधे लिहीलाय.
यात मराठी लोकाम्पेक्षा इतर लोकांच्या विचारसरणीबद्दल सरकॅस्टीक ( वक्रोक्ती) भाषेत लिहीलाय.तुम्हाला बहुतेक अशी भाषा उमजत नसावी. अन्यथा तुही लिहीलेले सर्व मुद्दे लेखकाने अगोदरच मांडलेले दिसताहेत.

ऋषिकेश's picture

6 Nov 2013 - 2:32 pm | ऋषिकेश

सदर पुस्तक अललित/माहितीसाठी आहे की आत्मचरित्र आहे किंवा कसे?
म्हणजे सदर लेखन हे लेखकाचे (तो ज्या समाजात/परिसरात वाढला त्यांचे) तत्कालीन वैयक्तीक/प्रातिनिधिक मत आहे की त्याचे हे मत अजूनही आहे हे कसे समजावे?

अख्खे/बरेचसे पुस्तक वाचल्याशिवाय या वेच्यांवर कोणतेही मत देणे आततायी ठरावे.

ग्रेटथिन्कर's picture

6 Nov 2013 - 2:52 pm | ग्रेटथिन्कर

असे म्हणतात,हे मारवाडी लोक दिवसरात्र धंद्यात मग्न असतात याचा फायदा सर्वाधिक कोणाला होत असेल तर यांच्या 'नोकरांना'...

उद्दाम's picture

6 Nov 2013 - 3:36 pm | उद्दाम

छान लेख.

आम्हाला कुठे माहीत होत की ही ती भाषा आहे की ज्यात नामदेव, तुकाराम ,दिलीप चित्रे ,नामदेव ढसाळ यांनी कविता लिहील्या आहेत ?

ह्या उल्लेखा वरुन स्पष्ट आहे ही बाकीचा लेख समाजापासुन तोडुन वेगळ्या रहाणार्‍या लोकांबद्दल उपरोधानी लिहीला आहे.
मिपा संपादकांनी असा दिशाभुल करणारा लेख काढुन टाकावा.

झंम्प्या's picture

6 Nov 2013 - 4:32 pm | झंम्प्या

+११११११

प्रभाकर पेठकर's picture

6 Nov 2013 - 4:39 pm | प्रभाकर पेठकर

मिपा संपादकांनी असा दिशाभुल करणारा लेख काढुन टाकावा.

का काढून टाकावा? काढून टाकण्यासारखे इतरही कांही लेख आहेत (असं मला वाटतं). ह्या लेखामुळे निदान कांही जणं ते पुस्तक वाचण्यास प्रवृत्त होतील आणि आपले काय बरे-वाईट विचार इथे मांडतील. तेच ह्या लेखाचे फलीत.

अनुप ढेरे's picture

6 Nov 2013 - 4:25 pm | अनुप ढेरे

कैच्याकै लेख

या लेखाच्या लेखकाला लिखाणातला उपरोध समजला नाही हे लेखन उडवण्याचे कारण ठरू शकत नाही

शैलेन्द्र's picture

6 Nov 2013 - 5:57 pm | शैलेन्द्र

ह्म्म्म..
(आम्हाला काही सुचलं नाही की आम्ही हंबरतो.)

मला तर बुवा हे पुस्तक आवडलं. "हे लेखन हा या लेखकाचा पर्स्पेक्टिव" असा दृष्टिकोन ठेवून हे पुस्तक वाचलं तर आवडेल.

फारएन्ड's picture

8 Nov 2013 - 9:30 am | फारएन्ड

मी वाचले आहे हे पुस्तक. अत्यंत वाचनीय आहे. वरच्या लेखातील उद्गार हे सेल्फ-डेप्रकेटिंग - स्वतःवरच उपरोधिक टीका करणारे आहेत असेच वाटले होते पुस्तक वाचताना. त्यातून लेखकाचा पर्स्पेक्टिव्ह बद्दल आदुबाळ शी सहमत.