<<ज्योतिष>> आजं म टा (पुणे) मध्ये प्रसिद्ध झाले ला माझा लेख

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
13 Mar 2012 - 4:42 pm
गाभा: 

From 2012_03_13" alt="" />
टीप - ही जाहिरात नव्हे.

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

13 Mar 2012 - 4:59 pm | परिकथेतील राजकुमार

सपूर्ण लेख कसा काय दिला ?

मला वाटले अर्ध्या भागाचा फटु असेल आणि उरलेले वाचण्यासाठी मटाची लिंक असेल.

असो...

प्रकाश घाटपांडे's picture

13 Mar 2012 - 6:07 pm | प्रकाश घाटपांडे

हा लेख जालावरील आवृत्तीत नाही.

टवाळ कार्टा's picture

13 Mar 2012 - 5:16 pm | टवाळ कार्टा

पेपरवाले काय द्याल ते छापतात :)
आणि मटा तर.... ;)
असो....

तर्री's picture

13 Mar 2012 - 5:52 pm | तर्री

मग म. टा ने ज्योतिषाची ऊपयुक्त्तता पासली का ?
ही ऊपयुक्तता कशी तपासतात ? नाडी परीक्षा की पट्टी परीक्षा ?

सर्वसामान्यपणे मानवी मन आपल्याला आवडणारा अनुभव दीर्घ़काळ जपून ठेवते. भविष्य खरे ठरून विपरित घडले तरी भविष्यावरचा विश्वास वाढीस च लागतो. मग सुखपर्यावसायी भविष्याची बातच सोडा. असा अनुभव आला की आहारी जाणे आलेच. मग ती गरज होते मग परत आहारी
जाणे आलेच. पिणारे, जुगारी व भविष्याची नादी लागलेले याना कोणताही अनुभव येवो "उधर जानेका" बहाणा ते सहज उत्पन्न्न करतात.

सस्नेह's picture

15 Mar 2012 - 10:55 am | सस्नेह

१०० टक्के सहमत. पेपरातले भविष्य वाचताना माझे धोरण असे असते.वाईट असेल तर भविष्य हा खोटेपणा. चांगलं असेल तर ५ मि. एक सुखांत सिनेमा पहावा आणि विसरुन जावं.

अमोल केळकर's picture

13 Mar 2012 - 6:32 pm | अमोल केळकर

तिकडे अभिनंदन केलेच आहे, इथेही करतो. :)

अमोल केळकर

मृगनयनी's picture

13 Mar 2012 - 7:45 pm | मृगनयनी

युयुत्सु'जी.... आपण आहात तर "हे" राजीव उपाध्ये!!!..... :) आपल्या या लेखामुळे आज सकाळी सकाळी आपण आमचे आणि आमच्या कुटुम्बीयांचे कौतुक शिरोमणि बनलेले आहात!... :)

"वैफल्यग्रस्त लोक धैर्य कुठून मिळवणार? अंधश्रद्धा निर्मूलनसमितीच्या ठेल्यावरून की नारळीकरांच्या 'आयुका'मधून ? " ह्या वाक्यासाठी एकदा जोरदार टाळ्या...

अत्यंत सणसणीत लेख!!!! :) प्रचंड आवडला....

तर्री's picture

13 Mar 2012 - 7:55 pm | तर्री

आयुका ही वैफल्य ग्रस्तांना धैर्य देण्यासाठी आहे असे काही नाही. तसेच अनिस बाबतही म्हणता येते.

वैफल्य-ग्रस्तांनी आपल्या वैफल्याची कारणे शोधावी . कारणा नुसार ऊपाय योजना होते. मनोविज्ञान शास्त्र आता खूप प्रगत झाले आहे.

ज्योतिषामुळे वैफल्य जाणार की अधिक वैफल्य पदरी पडणार ? हा ही एक प्रश्न आहेच.

आयुका काय किन्वा अनिंस काय... कुणालाही धैर्य वगैरे देऊ शकत नाही... ज्योतिष मात्र कमीत कमी "आता सध्या जरी तुम्हाला त्रास असला तरी...पुढचा येणारा काळ मात्र फार चान्गला आहे.." अश्या किन्वा तत्सम गोष्टी / फ्यूचर सांगून एखाद्या वैफल्यग्रस्त माणसाला धीर देऊ शकतात...

"बुडत्याला काडीचा आधार" या म्हणीनुसार ज्योतिषशास्त्र किमान एखाद्याची काडीइतकी तरी मदत करू शकते... पण उठसूठ ज्योतिषाला नावे ठेवणार्‍या आयुका किन्वा अंनिस यांच्यामुळे लोकांचं असं काय मोठे कल्याण झाले?

कुठल्याही शास्त्रज्ञाच्या दिव्य शोधामुळे किन्वा प्रकाशझोतात लोकांसमोर अन्धश्रद्धानिर्मूलनाचे गोडवे गाणार्‍या आणि प्रत्यक्ष आयुष्यात मात्र धार्मिक कारणे देऊन नवग्रहांच्या अंगठ्या घालणार्‍या अनिस'च्या कार्यकर्त्यांमुळे कोणत्याही वैफल्यग्रस्त माणसाचे आयुष्य सुधारलेले नाही...

किन्वा ज्यांना आपले आयुष्य सुधरवायचे आहे अश्या कोणत्याही लोकांनी अनिस किन्वा नारळीकरांचे सल्ले घेतल्या गेल्याचे ऐकीवात नाही. :)

ज्योतिष हे शास्त्र असो.. किन्वा नसो.. पण त्याच्या अर्धवट ज्ञानामुळे कुणी आत्माहत्या करत असेल.. तर तो त्याचा मूर्खपणा आहे... पण हे मात्र सत्य की ज्योतिषामुळे अनेक जणांचे आयुष्य आणि संसार वाचलेले आहेत.. कदाचित यापुढेही वाचू शकतील... :)

<"बुडत्याला काडीचा आधार" या म्हणीनुसार ज्योतिषशास्त्र किमान एखाद्याची काडीइतकी तरी मदत करू शकत>
हे करण्याचे काम कोणीही सहृद करू शकेल. ज्योतिशीच कशाला पाहिजे. विफलता टाळण्याचे ऊपाय " मानसशास्रात" आहेत. तसे ते "ज्योतिषामध्ये नाहित.

अर्थात, मनाच्या आजारांसाठी , मानसोपचाराचा आधार घ्यायचा की ज्योतिषाचा ? हे ज्याचे त्यांनी ठरवायचे.

जट आली की शांपू वापरायचा की जोगतीण व्हायचे हा जसा वैयक्तिक प्रश्ण आहे तसाच तो आहे. एवढेच.शेवटचे.

मृगनयनी's picture

14 Mar 2012 - 1:00 pm | मृगनयनी

तर्री'जी... आजही समाजात बहुतांश लोक असे आहेत, की जे कितीही वैफल्यग्रस्त असले तरीही त्यांना स्वतःला मनोरुग्ण म्हणवून घ्यायला आवडत नाही. किम्बहुना ते तसे मानतच नाही.
किन्वा बर्‍याचदा असे होते.... की सायकॉलोजिस्टपेक्षा ज्योतिषाला द्यायची दक्षिणा जनसामान्यांना परवडणारी असते.

ज्योतिषातही बरेच प्रकार असतात.. जसे कुडमुडे ज्योतिषी, ६५-७० % भविष्य खरे ठरणारे ज्योतिषी (पक्षी: शिकाऊ ज्योतिषी ), नाडीज्योतिषी, सिद्धीप्राप्त ज्योतिषी.......

काही ज्योतिषांना म्हणे वाचासिद्धी असते.. उदाह्रणार्थ :- "आदिनाथ साळवी"... साळवी'जींकडे गेलेल्या एखाद्या मनुष्याला त्यांनी त्याच्या दोषपरिहारार्थ एखादा उपाय सांगितला.. तर त्या मनुष्याने तो "केलाच्च्च्च" पाहिजे... नाहीतर त्या मनुष्याच्या आयुष्यात घडणार्‍या वाईट घटनेची शक्यत जवळजवळ ६० % नी वाढते. अर्थात असे खरोखरच अनुभव साळवी'जींकडे जाऊन आलेल्या लोकांना आलेले आहेत. काही लोकांच्या आयुष्यात आदिनाथ साळवींनी पत्रिकेनुसार कथन केलेल्या --घडू शकणार्‍या चांगल्या घटनादेखील तंतोतंत घडत आहेत. आणि हे सगळं ओपनली घडत आहे.. किन्वा यापूर्वीही घडून गेलेलं आहे.

त्यामुळे लोकांना आदिनाथ'जींच्या सल्ल्यानुसार आलेल्या अनुभवांमुळे साहजिकच त्यांचा ज्योतिषावर असलेला विश्वास वाढलेला आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकान्त देसाई यांना बालगंधर्व'च्या वेळेस "आदिनाथ साळवीं"चा आणि त्यांनी सांगितलेल्या उपायांचा प्रचंड फायदा झालेला आहे.

आदिनाथ साळवींनी स्वतःच्या पत्नीच्या बाबतीत सांगितलेले भविष्य देखील खरे ठरले... इतकेच कशाला त्यांच्या मुलीच्या जन्माच्या आधीच आदिनाथ'जींनी स्वतःची मुलगी कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला किती वाजून किती मिनिटांनी जन्माला येणार... हे देखील लिहून ठेवले होते.. व सर्व नातेवाईकांना सान्गितलेले होते...

दरवर्षी आदिनाथ साळवी विश्वकल्याणाच्या उदात्त हेतूने पवित्र वैदिक ब्राह्मणांच्या कडून "नवचंडी होम" करवून घेतात. अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आदिनाथ'जी स्वतः सपत्नीक पूजा करतात. यज्ञ, होमहवन, मन्त्रोच्चाराच्या योगेकरून देवीची, आदिशक्तीची भक्तिभावाने पूजा केली जाते. व यज्ञ आणि पूजा पूर्ण झाल्यानन्तर दोन तासाच्या आत हलकाचा पाऊस पडतो. आदिनाथ'जींच्याच म्हणण्यानुसार अर्थात हा "पाऊस" म्हणजे नवचंडीहोम त्या त्या देवतांपर्यन्त पोचल्याची व सफल झाल्याची खूण असते. आणि दरवर्षी या पवित्र नवचन्डीहोमानन्तर असा पाऊस पडतो.

आणि तरीही ज्योतिषावर तथाकथित अन्धश्रद्धानिर्मूलन वाल्यांचा विश्वास नसेल.. तर मग हे अनिस वाले व्यक्तिशः "आदिनाथ साळवीं"ना का बरे चॅलेन्ज करत नाहीत? ;) .... की त्यांना कशाची भीती वाटते? की त्यांच्या तथाकथित तत्वांचा पायाच कच्चा आहे?

ज्यांचा देव, ज्योतिष वगैरे गोष्टींवर विश्वास नाही.. त्यांनी भले ठेवू नये. पण ज्योतिषामुळे लोक वैफल्यग्रस्त होतात.. अशी विधाने तरी करू नये. किन्वा मग अशी विधाने करताना आधी आजपर्यन्त आपण लोकांचे काय कल्याण केले आहे.. किन्वा समाजाच्या उत्कर्षासाठी मिडीयापासून लाम्ब राहून आणि प्रसिद्धीचा हव्यास न धरता ...स्वतःच्या पोटाला चिमटा आणि खिशाला कात्री लावून काय काय कार्य केले आहे... याचा विचार करावा!

शशिकांत ओक's picture

18 Mar 2012 - 12:38 pm | शशिकांत ओक

मृगनयनीजी,
आपण दिलेल्या तडफदार प्रतिक्रिया वाचून खालील एक मुलाखत जोडावी असे वाटून देत आहे.
......
विविध नाडीग्रंथ केंद्रवाचकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या बद्दलची सामान्य माहिती गोळा करण्याचे काम कार्यशाळा 2011 मधे केले गेले. त्यातील एक मुलाखत भाग ३... उजव्या कोपऱ्यात पहावी.

पी बाबुस्वामीचे नाशिकला द्वारका भागात नाडी केंद्र गेले 7-8 वर्षे सुरू आहे. आपल्या कुटुंबासह ते नाशिकात राहतात. अनेक लोकांनी त्यांच्या नाडीकथनातून लाभ घेतला आहे. नाडी वाचक महर्षींच्या कथनातून लोकांच्या समस्या सोडवायला मानसिक आधार देण्याचे काम आनंदाने करतात. श्री श्री रविशंकरांनी आपले स्वतःचे कथन त्यांच्याकडून ऐकले आहे. त्यांच्यासारख्या जगप्रसिद्ध व्यक्तीपासून ते सामान्य लोकांना त्यांच्या कथनाने समस्यापुर्तीचे समाधान लाभले आहे.
मी नुसता नाडीग्रंथ वाचक आहे असे न मानता, ज्याअपेक्षेने लोक नाडी महर्षींकडे पहातात त्यामुळे आम्हाला या व्यवसायाचा बाजार करणे मान्य नाही. इतर काय करतात यापेक्षा मी या व्यवसायातील साधन शुचितेचे भान राखतो का याचा सतत विचार करून, ग्राहकाला परतताना आपल्याला समस्येवर काही नविन विचारदिशा मिळाल्याचे समाधान नक्की करून देतो असे त्यांचे म्हणणे आहे. पैकी काही विचार त्यांच्या पुढील भागाच्या टेप मधे आहेत. या टेप मधे त्यांचे बालपण व ते नाडी वाचक कसे झालेचे ही कथन आहे.
सत्यनिष्ठ हरिष्चंद्राला ही जीवनात इतक्या यातना का सहन कराव्या लागल्या आदि कथांतून सध्याचे जीवन कितीही निर्मळ असले तरी पुर्वजन्म कृत्ये आपल्याला त्रास देतात. नाडी ग्रंथ तयार करायला या मुळे प्रेरणा मिळाली असावी असे, याचे कथन आहे. पत्नी व बहिण अधुन मधून बोलताना आढळतात.

नाडीपट्टीतील मजकूर एका वहीत श्लोकात कसा नोंदला जातो त्याला उद्धेशून ते एके ठिकाणी त्या श्लोकाच्या चार ओळींवर भाष्य करताना अंतादी असे त्या काव्यप्रकाराचे वर्णन करतात.

तुटक हिंदीतून जरा लांबलेले असले तरी त्यांचे कथन रसाळ व भावनिक आहे, असे त्यांच्या कथनातून जाणवते.

चौकटराजा's picture

14 Mar 2012 - 4:59 pm | चौकटराजा

"बुडत्याला काडीचा आधार" या म्हणीनुसार ज्योतिषशास्त्र किमान एखाद्याची काडीइतकी तरी मदत करू शकत>
हे करण्याचे काम कोणीही सहृद करू शकेल. ज्योतिशीच कशाला पाहिजे. विफलता टाळण्याचे ऊपाय " मानसशास्रात" आहेत. तसे ते "ज्योतिषामध्ये नाहित.

आत्महत्या करायला गेलेल्या कामताना विसाव्या मजल्याच्या सेंटरिंग वर उभे राहून काम करणार्‍या रंगार्‍याने परावृत्त केले. तो काय आदिनाथ
साळवी होता की अजंता जैन ? खरे तर त्याने काहीच केले नाही. बरा होतो माणूस. वैद्य फक्त औषध देण्याचा धनी. याचे श्रेय कामतानाच. त्यांच्या
तील विवेकाच्या एका कोपर्‍याला ! म्हणून म्हणतो मंडळी आत्मारामा सारखा गुरू नाही ... बोला पुंडलिक वरदा .........

चौकटराजा's picture

14 Mar 2012 - 9:35 am | चौकटराजा

अनिस काय , नारळीकर काय नि अजंता जैन काय हे काय जगन्नियंते लागून गेलेत काय? मी पक्का अनिस वाला आहे. माझ्या आयुष्यात अनेक
वाईट माणसानी उच्छाद मांडला , मनस्ताप दिला. पण मी फक्त स्वता: च्या सद्विवेकाला शरण गेलो. ना गुरू ना अनुग्रह ना संप्रदाय , ना शनिवारी माळ , ना उपास तापास , ना प्रार्थना .म्हणून आपणच आपल्याला गुरू म्हणून लाभणे हे अलौकिक भाग्य मला प्राप्त झाले. ब्राह्मणाला जानवे जानवे
असले तरी ईसाईच्या नजरेत तो एक फक्त दोरा असतो. म्हणून आत्मारामासारखा गुरू नाही रे जगात , वरून देइ कानशिलात आतून आधाराचा हात !

चौकटराजा's picture

14 Mar 2012 - 9:38 am | चौकटराजा

अनिस काय , नारळीकर काय नि अजंता जैन काय हे काय जगन्नियंते लागून गेलेत काय? मी पक्का अनिस वाला आहे. माझ्या आयुष्यात अनेक
वाईट माणसानी उच्छाद मांडला , मनस्ताप दिला. पण मी फक्त स्वता: च्या सद्विवेकाला शरण गेलो. ना गुरू ना अनुग्रह ना संप्रदाय , ना शनिवारी माळ , ना उपास तापास , ना प्रार्थना .म्हणून आपणच आपल्याला गुरू म्हणून लाभणे हे अलौकिक भाग्य मला प्राप्त झाले. ब्राह्मणाला जानवे जानवे
असले तरी ईसाईच्या नजरेत तो एक फक्त दोरा असतो. म्हणून आत्मारामासारखा गुरू नाही रे जगात , वरून देइ कानशिलात आतून आधाराचा हात !

रणजित चितळे's picture

14 Mar 2012 - 1:21 pm | रणजित चितळे

+१

पण हे मात्र सत्य की ज्योतिषामुळे अनेक जणांचे आयुष्य आणि संसार वाचलेले आहेत.. कदाचित यापुढेही वाचू शकतील...

सहमत आहे. कोणी जर डिप्रेशन मध्ये लोकांना आशेचा किरण देऊन जरा मनाला आधार देतात. मला वाटते ज्योतिषशास्त्र हे मनोस्वास्थ्य सांभाळणारे एक मॅनेजमेन्ट टेकनिक आहे.

मूकवाचक's picture

14 Mar 2012 - 1:55 pm | मूकवाचक

पण हे मात्र सत्य की ज्योतिषामुळे अनेक जणांचे आयुष्य आणि संसार वाचलेले आहेत.. कदाचित यापुढेही वाचू शकतील...
सहमत.

शैलेन्द्र's picture

14 Mar 2012 - 3:11 pm | शैलेन्द्र

-१

दुबळ्या मनाच्या लोकांना जोतीष जसा आधार देत, तसच घाबरवतही.. अनेक उदाहरण पाहीलीत अशी..

खरा मुद्दा हा आहे की मनाचा दुबळेपणा दुर करायचा की त्याला गोंजारत बसायच? आणी आशेचा किरण म्हणाल तर तो दाखवणारे जोतीषापेक्षा खुप चांगले मार्ग उपल्ब्ध आहेत.

रणजित चितळे's picture

14 Mar 2012 - 4:36 pm | रणजित चितळे

एकाच प्रकारचे उपाय करुन चालत नाहित. माणसाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणी आहेत. त्या त्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत, माणूस त्याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टींचे आकलन करून विचार करतो, निष्कर्ष काढतो. समोर येणाऱ्या प्रश्नांना उत्तरं शोधतो. संकटाला तोंड देतो. प्रत्येक मानसिक प्रगतीच्या श्रेणीत त्याचे स्वतःचे मानसिक स्वास्थ्य वाढवायचे ध्येय असते. प्रत्येक श्रेणीत त्याची विचार करण्याची कक्षा ठरलेली असते. तितकीच तो करू शकतो. कधी कधी माणूस कोणत्या लेव्हलला आहे त्यावर उपाय अवलंबून असतात.

चौकटराजा's picture

14 Mar 2012 - 4:52 pm | चौकटराजा

माणसाच्या "आजाराची" लेव्हलच त्यावरील उपाय ठरवीत असते. एरवी सेल्फ मेडीसिन घातक असले तरी अध्यात्मिक जीवनात ते अमृत आहे. सबब स्वतः चा गुरू विवेकात शोधावा. राम राम अवघे जन म्हणती कोणी न जाणीती आत्माराम !

मूकवाचक's picture

14 Mar 2012 - 5:55 pm | मूकवाचक

आत्मारामासारखा गुरू नाही ही ज्याने त्याने स्वानुभवाने जाणण्याची गोष्ट आहे.

आतल्या गुरूशी परिचय होण्यासाठी एखादा बाह्य गुरूची मदत घेत असेल, तर त्याला खजिल करणे, आणि त्यासाठी आत्माराम आत्माराम असा धोशा लावणे पूर्णपणे व्यर्थ आहे. आत्मारामालाच गुरू मान अशी उठसूठ सक्ती करता येत नाही. तसे केल्यास काही उपयोग होणार नाही, कारण आत्मारामालाच गुरू मानण्यासाठीदेखील एक 'लेव्हल' यावी लागते. गुरूतत्व फक्त आतच आहे, आणि ते बाहेर असूच शकत नाही असा आग्रह धरणे देखील पूर्णपणे निराधार आहे.

'अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुज ज्ञान कळो आले, तुझा तुची देव तुझा तूचि भाव, मिटला संदेह अन्यतत्वी' हे अनुभवलेल्या ज्ञानदेवांचेही 'बाह्य गुरू' (निवृत्तीनाथ) होतेच. तेव्हा वैद्य, औषध या सगळ्यांना कवडीमोल ठरवत माझा मीच बरा झालो असे म्हणणार्यानेच सारासार विचार करायला हवा. असो.

चौकटराजा's picture

15 Mar 2012 - 8:45 am | चौकटराजा

तसे अवघे विश्वच ज्ञानदेवानी गुरू मानले होते. हे त्यांचा दृष्टांताचा आवाका पाहिला की लक्षात येते. आपणही ज्ञानाच्या पातळीवर असे गुरू करीतच
असतो. बालादपि सुभाषितं ग्राह्यम.पण परिशीलनाची वेळ आली ही आत्माराम हाच बेस्ट असा माझा तरी अनुभव आहे. बाह्य अध्यात्मिक गुरू वाचून माझे काही अडलेले नाही. माझ्याकडे सुखी माणसाचा सदरा आहे. विपत्ति वाट्याला येउनही ! महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध अध्यात्म गुरू स्वामी
स्वरूपानंद नात्याने माझेआते मामा होते. ज्याला दैवदत्त प्रतिकार शक्ती आहे त्याला बाह्य औषधी कमी लागतात .तसेच अध्यात्माचे असेल कदाचित.

कवितानागेश's picture

15 Mar 2012 - 10:22 am | कवितानागेश

ज्याला दैवदत्त प्रतिकार शक्ती आहे>>
दैवदत्त म्हंजे काय हो आजोबा?????
नाई, इथे दैववादावरच ( पक्षी= ज्योतिषावर) चर्चा सुरु आहे ना, म्हणून म्हटल, नक्की विचारुन घ्यावे.. :)

- ( ठार गोंधळलेली) माउ

शैलेन्द्र's picture

15 Mar 2012 - 11:15 am | शैलेन्द्र

त्यांना, "निसर्ग्दत्त" म्हणायचय..

कवितानागेश's picture

15 Mar 2012 - 12:22 pm | कवितानागेश

अस्सं क्काय! :D

शैलेन्द्र's picture

15 Mar 2012 - 6:45 pm | शैलेन्द्र

:)

चौकटराजा's picture

15 Mar 2012 - 3:15 pm | चौकटराजा

माझा रूढार्थाने देवावर विश्वास नाही पण दैवावर आहे. दैव ही संकल्पना व भविष्य या दोन वेगळ्या आहेत. दैवाचा संबंध भूत, वर्तमान व भविष्य काळ या तिंघांशी ही आहे. दैव या बाबतीत दासबोधातील अधिदैविक हे प्रकरण वाचल्यास बरे. पण ते जाउन द्या. दैव म्हणजे आपण हेतुपूर्वक व अहेतुकपणे जी कर्मे करतो ती सोडून इतरांनी केलेल्या अशाच हेतुपूर्वक वा अहेतुक कर्मांच्या परिणामाचा रिझल्टंट. जन्मतः च सुंदर रूप , आवाज लाभणे यात आपले कर्म काहीच नाही. म्हणून त्याला दैवदत्त म्हणायचे.
व्यावहारिक भाषेत सांगायचे तर मी जो दहावीचा अभ्यास करतो ते माझे कर्म व इतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा आवाका हे माझे दैव . तो त्यांचा आवाका कमी पडला तर माझा क्रमांक पहिला नाहीतर दुसरा तिसरा ...... पार शेवटून पाहिला.

दैव म्हणजे आपण हेतुपूर्वक व अहेतुकपणे जी कर्मे करतो ती सोडून इतरांनी केलेल्या अशाच हेतुपूर्वक वा अहेतुक कर्मांच्या परिणामाचा रिझल्टंट.

भन्नाट व्याख्या. थोडक्यात मी ओवाळले दिवे म्हणजे कर्म, मी ओवाळलेल्या दिव्यांचा पडलेला उजेड म्हणजे कर्माची फलश्रुती आणि दुसर्‍यांनी ओवाळलेल्या दिव्यांचा माझ्यावर पडलेला उजेड म्हणजे दैव.

तुमची आधुनिक थेअरी ऑफ कर्मा आवडली बरं. :)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Mar 2012 - 6:21 pm | अत्रुप्त आत्मा

और ये लगा धनाजीराव का कडकसित सिक्सर.... ह्हे..ह्हे..ह्हे..ह्हे..!

चौकटराजा's picture

15 Mar 2012 - 7:32 pm | चौकटराजा

टेकनिकल भाषेत तुम्ही ओमनी लाईट व " तो " अन्य अ‍ॅम्बीयंट लाईट.

डॉ.जॉन ड्वायर यांचे इम्युनॉलॉजी वर एक पुस्तक आहे. त्याची अर्पण पत्रिका खालील प्रमाणे त्याचे रुपांतर मराठीत

पटकन उढून तो म्हणाला
देवा , मी एक चांगले आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी काय करू ?
देव हसला व म्हणाला
"आपल्या आईवडिलांची निवड काळ्जी पूर्वक कर म्हन्जे झालं "
"दैवदत्त "चा अर्थ असा आहे.

शैलेन्द्र's picture

14 Mar 2012 - 7:23 pm | शैलेन्द्र

एकाच प्रकारचे उपाय करा असे मी म्हणत नाही, जोतीष जर कुणाला धीर द्यायच काम करत असेल तर त्यालाही माझा विरोध नाही, पण माझा रोख जोतिषाच्या दुसर्‍या बाजुवर आहे, आज त्रास आहे पण अमुक तारखेनंतर दिवस चांगले येतील हे म्हणण ठीक, पण पुढच्या वर्षी साडेसाती सुरु होतीय, त्रास होइल, अस होइल हे सांगुन दुबळ्या लोकांना घाबरवणे कोणत्या उपायात बसते?

थोडक्यात, जोतीष हा लोकांना *त्या बनवायचा धंदा आहे हे माझ वैयक्तीक मत आहे.

शैलेन्द्र's picture

14 Mar 2012 - 7:23 pm | शैलेन्द्र

एकाच प्रकारचे उपाय करा असे मी म्हणत नाही, जोतीष जर कुणाला धीर द्यायच काम करत असेल तर त्यालाही माझा विरोध नाही, पण माझा रोख जोतिषाच्या दुसर्‍या बाजुवर आहे, आज त्रास आहे पण अमुक तारखेनंतर दिवस चांगले येतील हे म्हणण ठीक, पण पुढच्या वर्षी साडेसाती सुरु होतीय, त्रास होइल, अस होइल हे सांगुन दुबळ्या लोकांना घाबरवणे कोणत्या उपायात बसते?

थोडक्यात, जोतीष हा लोकांना *त्या बनवायचा धंदा आहे हे माझ वैयक्तीक मत आहे.

गोंधळी's picture

13 Mar 2012 - 6:59 pm | गोंधळी

ज्योतिष शास्रा वर माझा विश्वास आहे.
कारण एका ज्योतिष्याने सांगितलेल्या घटना माझ्या आयुष्यात घडल्या आहेत.

आपल्याला अनुभव आला. की अनेक आले ? मी वरच सांगितले आहे . अनुभव विपरित परिणामी येवो वा सुखद . एकदा घडले की पुढच्या वेळी
कावळा बसला की फांदी मोडणारच हा जनरल रूल बनविणे फार सोपे असते. जादूगार रघुवीर म्हणत . मी हे नाणे आता माझ्या उजव्या हातात
घेतो की हजारातील किंवा लाखातील एखादाच म्हणतो " ते अजूनही डाव्या हातातच असण्याची ही शक्यता आहे ना !"
मानवी मन समांतर विचारधारेचा विचार करण्यात आळशी असते हाच जादुगाराचा फायदा ! "

अत्रुप्त आत्मा's picture

14 Mar 2012 - 1:01 am | अत्रुप्त आत्मा

@ज्योतिष शास्रा वर माझा विश्वास आहे.
कारण एका ज्योतिष्याने सांगितलेल्या घटना माझ्या आयुष्यात घडल्या आहेत.>>> अहो...आपल्या आयुष्यात घडणार्‍याच घटना ज्योतिष शास्त्री सांगत असतात... मी टवाळी करित नाही,पण तुंम्ही एक अनुभव घेऊन पहा..तुंम्ही हात/पत्रिका पाहु शकता-असा थोडासा तुमच्या मित्रमंडळींमध्ये बोलबाला करुन पहा... आणी येणार्‍यांचे भविष्य त्यांचं ''इनपुट'' ऐकुन घेऊन सांगायचा प्रयत्न करा ( तत्पुर्वी ज्योतिष सांगायची भाषा/शैली पाहुन शिकुन घ्या..) तुमची दुसर्‍याला सल्ला देण्याची मदत करण्याची तळमळ जितकी अधिक असेल...तेव्हढं तुम्ही सांगितलेलं भविष्यकथन प्रभावी होइल... अहो...अशी मदत आपणच आपल्या कामधामाच्या क्षेत्रातल्या लोकांना करत असतो... तीच ज्योतिषशास्त्रीय भाषेत केली की भविष्यकथन... एखाद्या व्यक्तिच्या आयुष्याचा अंदाज घेऊन त्याला सल्ला देणे,सावध करणे,,,हे हुषारीचे काम आहे...त्यात ज्योतिष-शास्त्राची म्हणुन विशेष अशी कर्तब काहिही नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2012 - 7:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन.....! लेख कै वाचता नै आला पण मिपावरील लेखक मंडळी आपलं मत हिरिरीने मांडत असतात.
आणि लेखन दैनिकात छापूनही येतं. सालं आपल्याला मिपाकरांचं लै कौतुक वाटतं.

-दिलीप बिरुटे

सहज's picture

14 Mar 2012 - 7:10 am | सहज

अभिनंदन!

चेतनकुलकर्णी_85's picture

13 Mar 2012 - 8:31 pm | चेतनकुलकर्णी_85

ज्योतिष शास्त्राला खरे कि खोटे ठरविणार्यांनी आधी स्वताचे लग्न ठरविताना कुंडली पहिली आहे कि नाही हे जरूर आठवावे... ;) ;-) :wink:
बाकी युयुत्सु मंजे काय?

प्रचेतस's picture

13 Mar 2012 - 10:03 pm | प्रचेतस

युयुत्सु हे महाभारतातील एक पात्र, धृतराष्ट्राचा दासीपुत्र. जो महाभारत युद्धाच्या सुरुवातीला पांडवांच्या गोटात सामील झाला.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Mar 2012 - 1:30 am | विश्वनाथ मेहेंदळे

ते नाव झाले हो अर्थ नाही.
युयुत्सु म्हणजे लढण्यास तयार/उत्सुक असलेला :-)

मन१'s picture

13 Mar 2012 - 11:17 pm | मन१

एखाद्याला नसेल बघायची हो, पण पसंत पडलेल्या जोडिदाराकडचे कुनीतरी हटकून "नै नै बघाच", "आमचा विश्वास, आमचा अनुभव" वगैरे इत्कए काही त्रस्त करुन सोडतात , आणि पुन्हा "त्या" पक्षाकडील वजनदारही असतात की झक मारुन इच्छा नसतानाही कित्येकांना, अनेकानेक लोकांना बघावी लागते.
आणि त्यांनी असा थेट गंभीर गुन्हा केला की टोचून टोचून बोलत पुन्हा आपल्या प्रतिक्रियांनी ज्योतिषांकडेच ढकलायला लोक तयारच असतात.
धाग्यावर प्रतिसाद द्यायचा नव्हता, पण प्रतिसादास उत्तर देणे आवश्यक वाटले.

चेतनकुलकर्णी_85's picture

13 Mar 2012 - 11:30 pm | चेतनकुलकर्णी_85

म्हणजे जर तुम्हाला एखादी पसंद पडली आणि पत्रिका जुळली नाही तर टाटा बाय बाय ?? :O :-O :shock:
काय राव असे असते का कुठे?
धाग्यावर प्रतिसाद द्यायचा नव्हता, पण प्रतिसादास उत्तर देणे आवश्यक वाटले.

मन१'s picture

13 Mar 2012 - 11:41 pm | मन१

काय ते ठाउक नाही. पण "मला पहायची नव्हती पण त्यांच्याकदे कुनीतरी उपताले म्हणून म्हणून पोअहावी लागली", "तशीही जमत होतीच" असे डायलॉग सातत्याने कानावर पडतात.
ही के क्याटेगरी.
टाटा बाय बाय वाली पण आहे.(तुमच्या प्रतिसादातून फक्त टाटा बाय बाय वालीच आहे असे वाटत होते, म्हणून लिहिण्यास डोकावलो.)

म्हणजे जर तुम्हाला एखादी पसंद पडली आणि पत्रिका जुळली नाही तर टाटा बाय बाय ??

अद्याप तुमचे कांदे -पोहे सुरु झालेले दिसत नाहीत. एकदा कांदे पोहे संपले की या आणि अशा इतरही अनेक शंकांचे निरसन होईल. आता ज्योतिषावर विश्वास नसला तरीही हरकत नाही. लग्न जमेपर्यंत तुम्ही पत्रिका कशी पाहावी, गुणमेलन कोष्टक कसे पाहावे, कुंडली ही संगणक प्रणाली कशी वापरावी या विषयांत पारंगत व्हाल. ;)

हुप्प्या's picture

13 Mar 2012 - 11:28 pm | हुप्प्या

समजा एखाद्याला हृदयविकारासारखा जीवघेणा रोग आहे. त्याला लांबच्या प्रवासाला जायचे आहे. अशा वेळी तो डॉक्टरकडे तपासणीला न जाता ज्योतिषाकडे हात वा कुंडली दाखवायला गेला. ज्योतिषाने त्याची आकडेमोड करुन सांगितले की खुशाल जा. तुमच्या आयुष्याची रेषा भक्कम आहे. आणि मग प्रवासातील शीणाने तो माणूस मेला तर ज्योतिष ह्या मृत्युची जबाबदारी घेते का? तो ज्योतिषी निष्काळजीपणाची भरपाई देईल का?

जर डॉक्टरने त्याला माहीत असलेल्या सर्व तपासण्याकरुन प्रवासाला जायला सांगीतले आणी तो माणुस मेला तर डॉक्टर जबाबदारी घेईल? भरपाई देईल?

मी ज्योतीषाची बाजु घेल नाही पण तुलना कसताना अपेक्षा सुद्धा दोघांकडुन सारखीच ठेवावी.

Nile's picture

14 Mar 2012 - 12:33 pm | Nile

डॉक्टर जबाबदारी घेईल? भरपाई देईल?

डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद असते. (कलमं आपली आपण तपासावीत) पुढे?

नेत्रेश's picture

14 Mar 2012 - 12:39 pm | नेत्रेश

डॉक्टरचे निदान चुकले या कारणासाठी डॉक्टरवर कोणत्याही कमानुसार कोणतीही कारवाई करता येत नाही.
(अक्षम्य निष्काळजीपणा, जाणुन बुजुन चुकीचे औषध देणे, ईत्यादीसाठी खटला दाखल करता येतो. )

तसेच ज्योतीष चुकले म्हणुन ज्योतीषावरही काही कारवाई करता येणार नाही.

अहो... हे सर्व ठीक समजले तरी डॉक्टरने "खुशाल प्रवासाला जा" म्हणण्यापूर्वी केलेल्या तपासण्या / परीक्षण यांची गुणवत्ता / ऑब्जेक्टिव्हिटी / रीप्रोड्युसिबिलिटी , आणि ज्योतिषाने "खुशाल प्रवासाला जा" म्हणण्यापूर्वी केलेला पडताळा यांची गुणवत्ता / ऑब्जेक्टिव्हिटी /रीप्रोड्युसिबिलिटीयात ढळढळीत फरक वाटत नाही का?

कार्डिओग्रामवर प्रत्यक्ष त्या प्रवासेच्छुक व्यक्तीच्या हृदयाचा आलेख आणि कुठेही पुन्हापुन्हा पडताळून पाहता येणारे क्लिनिकल कोरिलेशन (मराठी शब्द येत नाहीये आत्तातरी) याविरुद्ध.. त्या व्यक्तीपासून लाखो मैल दूरचे आणि त्या व्यक्तीवरचा स्पेसिफिक परिणाम मोजता न येणारे ग्रहतारे वगैरे यात काहीच फरक नाही?

तात्विक दृष्ट्या सगळंच शक्य आहे हो.. पण आयुष्यात जगताना "सारासार" विवेक म्हणून काही ठेवायचाच नाही का? की तांत्रिक वकिली मुद्दे काढत रहायचे?

नेत्रेश's picture

14 Mar 2012 - 2:08 pm | नेत्रेश

अ‍ॅपल आणी ऑरेंज ची तुलना केल्यावर दुसरे काय होणार.

मुळात डॉक्टर आणी ज्योतीशाची तुलना करणेच चुकीचे नाही काय?

आँ.. ? मीही तेच म्हणतोय.. पण इथे तुलना दिसली म्हणून म्हटलं...

डॉक्टरचे निदान चुकले या कारणासाठी डॉक्टरवर कोणत्याही कमानुसार कोणतीही कारवाई करता येत नाही.
(अक्षम्य निष्काळजीपणा, जाणुन बुजुन चुकीचे औषध देणे, ईत्यादीसाठी खटला दाखल करता येतो. )

तसेच ज्योतीष चुकले म्हणुन ज्योतीषावरही काही कारवाई करता येणार नाही.

तुलना केली गेलेली नाही म्हणत असाल तर बरंय मग.

जयंत कुलकर्णी's picture

14 Mar 2012 - 7:08 am | जयंत कुलकर्णी

आपण ज्योतिषशास्त्राचे काही फायदे आहेत हे क्षणभर मान्य करू. ते तसे प्रत्यक्ष नाहीत हे सहज सिद्ध करता येईल. एक उदा. घेऊ. हे शास्त्र (असेल तर) आपल्याला पांगळे बनवते. सारासार विचार करायची क्षमता नष्ट करते. अडचणींवरचे यांचे उपाय भयंकर असतात. ते माणसाला दुर्बल बनवतात. त्याचे उदाहरण आपण वर कोणीतरी दिलेले आपण बघितलेच. माणूस एकच असतो पण वेगवेगळ्या पद्धतींनी ते सांगितले की आपले भविष्य बदलते हे मला न उलगडणारे कोडे आहे.

या शास्त्राचा समाजावर झालेला सगळ्यात घाणेरडा परिणाम आपल्याला पत्रिकेतील मंगळ या ग्रहाने दिसून येतो. या ग्रहाने किती मुलींची लग्ने राहिली हा संशोधनाचा विषय आहे. हा सगळा तद्दन मूर्खपणा आहे यावर आता लोक विश्वास ठेवू लागले आहेत आणि शेवटी आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात हे त्यांना पटू लागले आहे. या शास्त्राचे नैसर्गिक मरण फार दूर नाही.

पत्रिका पाहून जर सैन्य हालचाली करू लागले, बंदूका चालवू लागले तर जे भविष्य सांगतात त्यांच्या पोरीबाळी त्यांच्या घरात राहतील का ?

लोकांच्या काहीवेळा असणार्‍या मनाच्या कमकुवतपणाचा गैरफायदा घेण्याचे हे एक धंदेवाईक शास्त्र आहे. तुमच्या खिशातील पैसे अलगद तुमच्याच संमतीने काढून घ्यायचे हे एक अत्यंत प्रगल्भ शास्त्र आहे.

मी स्वतः एकदाही पत्रिका बघितली नाही, माझ्या मुलानेही नाही, व माझ्या मुलीनेही नाही. काहीही बिघडले नाही. जी संकटे आली ती तशीही आलीच असती.

आज जगातील सगळ्यात जास्त अनुयायी असणारा धर्म मुसलमान धर्म आहे. यांच्या धर्मात भविष्य पहायला बंदी आहे. कुठे त्यांचे काय बिघडले ? जगावर राज्य केले ते काय पत्रिका बघून ? उलट आपले राजे मुहूर्त/पत्रिका पाहून सैन्य हालवायचे त्याचा परिणाम आपण बाघितलाच आहे. खरे तर आपल्या सगळ्या शंकराचार्यांनी एक सामाजिक कार्य म्हणून हे सगळे थोतांड आहे असे जाहीर करायला पाहिजे.

माझी तरूण मित्रांना कळकळीची विन्ंती आहे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. लाथ मारू तेथे पाणी काढू अशी वृत्ती ठेवावी. कष्ट उपसावेत, बुद्धी चालवावी, कोणाचे वाईट चिंतू नये, कोणाला त्रास होईल असे वागू नये. मग कशाची भिती आणि कशाला चिंता भविष्याची आणि त्या पत्रिकेत काय लिहिले आहे त्याची .......

प्रतिसाद आवडला आणि पटलाही

अत्रुप्त आत्मा's picture

14 Mar 2012 - 7:30 am | अत्रुप्त आत्मा

@माझी तरूण मित्रांना कळकळीची विन्ंती आहे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. लाथ मारू तेथे पाणी काढू अशी वृत्ती ठेवावी. कष्ट उपसावेत, बुद्धी चालवावी, कोणाचे वाईट चिंतू नये, कोणाला त्रास होईल असे वागू नये. मग कशाची भिती आणि कशाला चिंता भविष्याची आणि त्या पत्रिकेत काय लिहिले आहे त्याची ...>>> अ‍ॅक्सेप्ट सर,,आणी संपुर्ण प्रतिसादास पूर्ण अनुमोदन

संपत's picture

14 Mar 2012 - 12:18 pm | संपत

कुणाचे वाईट चिंतले नाही तर आपलेही वाईट होणार नाही ही अंधश्रद्धाच नव्हे काय?

जयंत कुलकर्णी's picture

14 Mar 2012 - 1:47 pm | जयंत कुलकर्णी

नाही... यात चांगले आणि वाईट याच्यातला फरक जो जाणतो त्याने वाईट चिंतू नये व वाईट करू नये एवधाच अर्थ निघतो. मी तसे केले तर माझे ही वाईट होईल असा नाही. असे वाटले की भिती आली मग भविष्य/पत्रिका आल्या.....

चौकटराजा's picture

15 Mar 2012 - 5:57 pm | चौकटराजा

चिंतणे व करणे यात काही फरक आहे की नाही. समोरून सुंदर स्त्री आली तर मुका घ्यावा असे वाटणे व तो घेणे यात फरक असतो. पाहिल्यात तोटा तसा काहीच नाही. दुसर्‍यात फायदा इतकाच की ७ सालकी सजा झाल्यावर चिंतना साठी भरपूर वेळ. वाईट करू नये. चिंतण्याने जग चालत
नाही त्याचे कृतीत पर्यावसान व्हावेच लागते. धरणात साठलेले पाणी व वहाते पाणी यात हाच फरक आहे. ईच्छा जर घोडा असती तर भिकार्‍यांची
त्यावर वस्ती !

जयंत कुलकर्णी's picture

15 Mar 2012 - 7:20 pm | जयंत कुलकर्णी

म्हणून पहिले चिंतायचे नाही. जर थोबाडीत बसणार असेल तर ते वाईटच. ते चिंतले नाही तर मग दुसर्‍याचा प्रश्न येत नाही. आपल्या argument मधे contradiction आहे का ? बहुतेक नसेल..

चौकटराजा's picture

15 Mar 2012 - 7:47 pm | चौकटराजा

कितीही गप्पा आदर्शाच्या केल्या तरी आपल्या मनाशीच संवाद करावा . आपले काळेपण आपल्याला द्रुग्गोचर होते. आपले मन आपले वैरी.
त्याला वैरी हा शब्द वापरला आहे. आजपर्यंत कधीच वाईट मनात आले नाही असे खरेच आपणा आहोत का ? याचा विचार अत्यंतिक निष्ठेने
करावयास हवा. माणसाच्या स्खलनशीलतेवर खूप संशोधन झाले आहे. "मनाचा शोधाची सुरस कथा " ही माझी आठवण धोका देत नसेल तर
द.पा> खाम्बेटे यानी दीर्घ मालिका लिहिली होती.

श्रीराम लागू म्हणतात " इतक्या वर्षांच्या उत्क्रांतीने हे चार पायाचे जनावर आता दोन पायावर चालू लागले आहे "

गवि's picture

16 Mar 2012 - 10:54 am | गवि

बाडीस..

आपण आपल्या मनाशी संवाद करणं किंवा त्यालाच "चिंतणं" म्हणू.. हे आपल्या अस्तित्वाचा एक भाग आहे. तेव्हा अमुक काही "न चिंतणे" ही अशक्य किंवा स्वतःलाच फशीवगंडीव करणारी कल्पना वाटते.

संयम फक्त कृतीबाबत असू शकतो.. मनात काय येईल याबाबत नाही.. आणि नसावा.. किंवा आपल्याला तो पर्याय उपलब्ध नाही.

थोतांड किंवा खोट्या गोष्टी जास्त काळ टीकत नाहीत. खोटेपणा लक्षात येताच लोक स्वतःहुनच अशा गोष्टी नाकारतात.

मेडीकल हे शास्त्र असुनही सर्व डॉक्टरांचे निदान समान येत नाही. हा अनुभव जवळ जवळ प्रत्येकाने घेतलेला असतो. काही बाबतीत डॉक्टर स्वतःच सेकंड ओपिनीयन घ्यायला सांगतात, तरी सुद्धा आपण मेडीकल हे शास्त्र आहे यावर शंका घेत नाही. जास्तीत जास्त चुकीचे निदान करणार्‍या डॉक्टरला खराब डॉक्टर म्हणुन मोकळे होतो.

पण ज्योतीषाच्या बाबतीत मात्र प्रत्येक ज्योतीशाचे प्रत्येक प्रेडीक्शन बरोबर आले पाहीजे अन्यथा ते थोतांड असे ठरउन मोकळे होतो.

माणूस १२वी सायन्स नंतर चाचणी परीक्षा पास झाल्यावर ६ वर्षे निश्णात प्राध्यापकांकडे कठीण शीक्षण, प्रात्यक्षीक, रेसीडंसी करुन, युनिव्हरसीटीचे सर्टीफिकेट घेउन मग प्रक्टीस चालु करतात. येवढे असुनही अनेक अर्धशीक्षीत / अशीक्षीत वैदु / बोगस डॉक्टर सर्वत्र आपले दवाखाने टाकुन बसलेले आपण ऐकतो.

ज्योतीषी व्हायला ना अशी काही पात्रता लागत, ना कुणाचे सर्टीफीकेट लागत. अशावेळी १ चांगल्या ज्योतीषामागे १०० अर्धशिक्षीत ज्योतीशी असु शकतात. मग ज्योतीषाला बदनाम व्हायला कीती वेळ लागणार?

सध्या ज्योतीशाचे प्रशीक्षाण व सर्टीफीकेट कोणतीही युनिव्हर्सीटी देत नसताना चांगले ज्ञानी ज्योतीषी कसे शोधणार?

---------------------------

मी स्वतः ज्योतीषी / ज्योतीषाचा समर्थक वगैरे काही नाही. फक्त एखाद्या गोष्टीला सिद्ध व्हायचा / करायचा अवसर न देता थोतांड म्हणणे चुकीचे आहे.

येथे कुणी स्वतः १० ते १२ वर्षे पुर्ण वेळ ज्योतीषाचा अभ्यास करुन थोतांड आहे असे सप्रमाण सिद्ध केले आहे का?

भारता बाहेरही अनेक देशांत / संस्कृतीत ज्योतीष पाहीले / वर्तवले जाते. प्रगत देशातील बर्‍याच युनिव्हरसीटी मध्ये या (सो कॉल्ड) शास्त्रांचा अभ्यासही होतो. तेथे आपले संपुर्ण जीवन या गोष्टींचा अभ्यास करणारे प्रोफेसर्सही आहेत. आधुनीक शास्त्र / संशोधनात आपल्यापेक्षा २५ ते ५० वर्षे पुढे असलेल्या देशांनीही या पुरातन (सो कॉल्ड) शास्त्रांना अद्याप झिडकारलेले नाही .

Nile's picture

14 Mar 2012 - 12:41 pm | Nile

काहीही!!

पण ज्योतीषाच्या बाबतीत मात्र प्रत्येक ज्योतीशाचे प्रत्येक प्रेडीक्शन बरोबर आले पाहीजे अन्यथा ते थोतांड असे ठरउन मोकळे होतो.

कोणत्याही एका जोतिष्याने प्रेडिक्शनचे चॅलेंज सिद्ध करून दाखवाले तरी चालेल. आहे का कोणी?

सध्या ज्योतीशाचे प्रशीक्षाण व सर्टीफीकेट कोणतीही युनिव्हर्सीटी देत नसताना चांगले ज्ञानी ज्योतीषी कसे शोधणार?

=)) =))

मालक जरा झोप वगैरे घेऊन येत जा आधी. युनिवर्सीटीत प्रशिक्षण देण्याकरता "शास्त्राचा" सांगोपांग अभ्यास करावा लागतो म्हणलं. कार्यकारणभाव, मुलभुत तत्वं वगैरे सिद्ध करावी लागतात. आलेत मोठे विज्ञान अन जोतिषाची तुलना करायला.

प्रगत देशातील बर्‍याच युनिव्हरसीटी मध्ये या (सो कॉल्ड) शास्त्रांचा अभ्यासही होतो. तेथे आपले संपुर्ण जीवन या गोष्टींचा अभ्यास करणारे प्रोफेसर्सही आहेत

कोणत्या युनिवर्सीटीतले कोणते प्रोफेसर आहेत हो हे? युगांडात का सोमालियात?

येथे कुणी स्वतः १० ते १२ वर्षे पुर्ण वेळ ज्योतीषाचा अभ्यास करुन थोतांड आहे असे सप्रमाण सिद्ध केले आहे का?

तिच्यायला हे काय नविन? १०-१२ वर्षं अभ्यास केल्यावर काय तपोविद्या मिळते का? काय एकेक तत्तज्ञान असतंय पब्लिकचं!
थोतांड आहे हे कळायला दोन तीन तर्क सुद्धा अनेकदा पुरतात. ते सोडा जोतिषामागचं विज्ञान देऊ तर देत कोणाला. मत ते थोतांड आहे का नाही ते सिद्ध कसं करायचं ते पाहू. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी ते शास्त्र आहे हे दाखवावं, कारण जबाबदारी त्यांची आहे.

अभ्यासाची गोष्ट काढली की पळपुटेपणा करणे हे ज्योतीषावर विना अभ्यास पिंका टाकणार्‍यांचे आणखी एक लक्षण.
फिजीक्समधील स्ट्रींग थीयरी, अ‍ॅस्ट्रो फिजीक्समधी ब्लॅकहोल थेअरी २ /३ तर्कात प्रमाण किंवा अप्रमाण करा पाहु.

थोडे गुगलुन पाहीलेत तर युरोप / अमेरीकेतील युनिव्हरसीटीतील अशा शास्त्रांचा अभ्यास करणारी डिपार्टमेंटस मिळतील. पण तुमच्या साठी सोमालिया आणी युगाण्डा पुढारलेले / प्रगत देश असतील तर मग बोलणेच खुंटले.

Nile's picture

14 Mar 2012 - 1:02 pm | Nile

फिजीक्समधील स्ट्रींग थीयरी, अ‍ॅस्ट्रो फिजीक्समधी ब्लॅकहोल थेअरी २ /३ तर्कात प्रमाण किंवा अप्रमाण करा पाहु.

अं?

तुमच्या साठी सोमालिया आणी युगाण्डा पुढारलेले / प्रगत देश असतील तर मग बोलणेच खुंटले.

जयंत कुलकर्णी's picture

14 Mar 2012 - 1:43 pm | जयंत कुलकर्णी

या धाग्याच्या लेखकाने अशाच एका चॅलेंजमधून माघार घेतलेली आहे.... कशाला चॅलेंजच्या गप्पा करायच्या आपण .....

नेत्रेश's picture

14 Mar 2012 - 2:04 pm | नेत्रेश

माझे म्हणणे एवढेच की उगीच कुणाचाही दोन तीन तर्कांचा आधारावर आजवर हाजारों / लाखों लोकांनी या क्षेत्रात गेली कित्येक शतके जे काम केले आहे ते निव्वळ थोतांड आहे असे म्हणणे पटत नाही.

जर कुणी लायक व्यक्तीने परीश्रमपुर्वक या तथाकथीत शास्त्राचा सखोल अभ्यासकरुन त्यातील थोतांड सिद्ध केले असेल तर मानता येईल. तसेच ते थोतांड का आहे हे सुद्धा समजुन घेता येईल.

आणी धागा कर्त्याने कधी कुठल्या चॅलेंजमधुन माघार घेतली होती या वरुन जास्तीत जास्त त्या व्यक्तीचा पळपुटेपणा किंवा त्याचा कच्चा अभ्यास सिद्ध करता येईल. पण ज्योतीष हे थोतांड आहे हे सिद्ध होत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Mar 2012 - 4:48 pm | अत्रुप्त आत्मा

@जर कुणी लायक व्यक्तीने परीश्रमपुर्वक या तथाकथीत शास्त्राचा सखोल अभ्यासकरुन त्यातील थोतांड सिद्ध केले असेल तर मानता येईल. तसेच ते थोतांड का आहे हे सुद्धा समजुन घेता येईल.>>> हो ना..? ही भुमिका तुंम्हाला पटते ना..? मग येथिलच एक सदस्य श्री.प्रकाश घाटपांडे(वर/खाली १/२ प्रतिसाद आले आहेत ते..) यांनी आपण म्हणता त्या प्रमाणे अभ्यास करुनच या कथित शास्त्राची निरर्थकता सिद्ध केली आहे... वाचा बर तुंम्ही त्यांच सगळं लेखन...आणी इथेच पुन्हा सांगा बरं... बघु तुंम्हाला तरी हे जमतं का ते..?

http://faljyotishachikitsa.blogspot.in/

त्यांच्या सहितही या लिंक्स आहेतच... इथुन जा किंवा तिथुन जा... फक्त समंजसपणाने वाचा म्हणजे झालं.... :-)

चौकटराजा's picture

15 Mar 2012 - 3:27 pm | चौकटराजा

कोणाला त्रास होईल असे वागू नये. मग कशाची भिती आणि कशाला चिंता भविष्याची आणि त्या पत्रिकेत काय लिहिले आहे त्याची .......
मन सुद्ध तुझं गोस्ट हाये पृथ्वी मोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भिति कुनाची पर्वा बी कुनाची

मन१'s picture

15 Mar 2012 - 4:00 pm | मन१

या शास्त्राचे नैसर्गिक मरण फार दूर नाही.
हा भाबडा आशावाद वाटला.

माझी तरूण मित्रांना कळकळीची विन्ंती आहे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. लाथ मारू तेथे पाणी काढू अशी वृत्ती ठेवावी. कष्ट उपसावेत, बुद्धी चालवावी, कोणाचे वाईट चिंतू नये, कोणाला त्रास होईल असे वागू नये. मग कशाची भिती आणि कशाला चिंता भविष्याची आणि त्या पत्रिकेत काय लिहिले आहे त्याची .......
तुमचा तरुण* मित्र** म्हणून सहमत.

*डोक्यावरचे सगळे केस जायच्या मार्गावर असले तरी मी स्वतःला तरुण समज्तो.
** मी तुम्हाला मित्र मानतो.

अप्पा जोगळेकर's picture

18 Mar 2012 - 12:52 pm | अप्पा जोगळेकर

प्रतिसाद आवडला.
बाकी वरचे काही अफाट प्रतिसाद वाचून हैराण झालो.
अर्थात ज्योतिष हा ज्यांनी व्यवसाय म्हणून स्वीकारलेला आहे त्यांना ज्योतिषाच्या बाजूने बोलणे भाग आहे. घोड अगर घाससे दोस्ती करेगा तो खाएगा क्या ? हेदेखील खरेच.
इथे बरेच व्यावसायिक ज्योतिषी असावेत असे वाटते.

नगरीनिरंजन's picture

14 Mar 2012 - 9:03 am | नगरीनिरंजन

कन्सिट (Conceit) या शब्दाचा अर्थ सोदाहरण समजावून सांगितल्याबद्दल तुमचे आभार!

प्रकाश घाटपांडे's picture

14 Mar 2012 - 10:22 am | प्रकाश घाटपांडे

"वैफल्यग्रस्त लोक धैर्य कुठून मिळवणार? अंधश्रद्धा निर्मूलनसमितीच्या ठेल्यावरून की नारळीकरांच्या 'आयुका'मधून ? "

म्हणजे हे धैर्य ज्योतिषाकडून मिळू शकेल असा अर्थ गृहीत धरतो.

अशा वाक्याने ज्योतिष हे "प्लासेबो"सारखे उपयोगी आहे असा अर्थ ध्वनित होतो. म्हणजे याची मर्यादा प्लासेबो इफेक्टइतकीच (गोड किंवा कडू, पण कोणतेही औषधी तत्व नसलेली प्लेन गोळी मानसिक परिणामासाठी / उभारीसाठी देणे.) आहे हे नकळत का होईना, स्पष्ट केल्याबद्दल आनंद वाटला.

सांजसंध्या's picture

14 Mar 2012 - 11:34 am | सांजसंध्या

लेखाबद्दल आपले आणि प्रकाश घाटपांडे यांचे त्यांच्या पत्राबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2012 - 11:57 am | परिकथेतील राजकुमार

साला आपण तर दोन क्वार्टर नंतर जगाचे भविष्य घडवायला तयार असतो. माणसाचे काय घेऊन बसलात ?

दोन-चार पेग होत नाहीत तोवर तुमचे ते शनी, राहू, चंद्र वैग्रे असे आमच्या आजूबाजूच्या खुर्च्यांवरती येउन बसायला लागतात.

बाकी भविष्यावर विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारे दोघेही कायम हाताला चूना लावून का तयार असतात हे न सुटणारे कोडे आहे.

गोंधळी's picture

14 Mar 2012 - 12:47 pm | गोंधळी

बहुदा तुमच्या कु ण्डली मध्ये १ ल्या घरात राहु असणार (विपरित विचार येतात़ -ज्यो. शा.)
त्यामुळे तुम्हि असे बोलत आहात.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2012 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार

आम्हाला तर वाटले होते आमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात डान्या आणि चौथ्या घरात धम्या वेटोळे मारुन बसला आहे म्हणून. ११/१३ आणि १५ ला अनुक्रमे मकी, अदिती आणि प्रिमो असाव्यात. सप्तम स्थानी नालायक निळ्या असणार. गेला बाजार सोत्रि सध्या वक्री असणार.

माताय सध्या मिपावरच्या चर्चा / धागे वाचुन माझा पार बेंबट्या झाला आहे.
दोन्ही बाजुचे मुद्दे १००% पटातायत. :(

इरसाल's picture

14 Mar 2012 - 2:18 pm | इरसाल

कोणतीही एकच सैड धरा.
नायतर आमीबी डैलमात पडतो.

मूकवाचक's picture

14 Mar 2012 - 2:26 pm | मूकवाचक

दोन्ही बाजू पटल्या तरी 'बेंबट्या' होणे टाळता येईल असे वाटते.

('असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी' हा खुळचटपणा आहे. 'लाथ मारीन तिथे पाणि काढीन' हा अभिनिवेशही अनाठायी आणि अवास्तव आहे. या दोन्ही गोष्टी सहज अनुभवता येतात. त्यामुळे प्रारब्ध/ नशीब/ नियती आहे हे मान्य करत कर्मस्वातंत्र्याचा सदुपयोग करण्यासाठी प्रयत्नशील राहणे हा सुवर्णमध्य आहे असे काहींच्या लक्षात येते. हा सुवर्णमध्य साधत असताना ज्योतिष्यशास्त्राचा 'गाईडलाईन'सारखा उपयोग करणारे/ मला अशा गाईडलाईनची फारशी गरज नाही असा निष्कर्ष काढलेले विवेकी लोकही बरेच असतात. कुठलाच अभिनिवेश नसल्याने हे लोक या विषयावर फारसे मतप्रदर्शन करत नाहीत आणि एकांगी मते वाचून फारसे भारावून जात नाहीत/ विचलीत होत नाहीत. त्यांचा बेंबट्या होत नाही. असो.)

यकु's picture

14 Mar 2012 - 3:19 pm | यकु

क्या कही! व्वा:

तुमचही म्हणणं पुर्ण पणे पटलं. ;)

पैसा's picture

14 Mar 2012 - 6:56 pm | पैसा

तुला दोन्ही बाजू पटतायत, मला तर शेवटच्या प्रतिसादापर्यंत पोचेपर्यंत मूळ चर्चेचा विषय काय हेच विसरायला होतंय. ;)

स्वातीविशु's picture

14 Mar 2012 - 3:59 pm | स्वातीविशु

स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. लाथ मारू तेथे पाणी काढू अशी वृत्ती ठेवावी. कष्ट उपसावेत, बुद्धी चालवावी, कोणाचे वाईट चिंतू नये, कोणाला त्रास होईल असे वागू नये.

जयंत कुलकर्णी काकांचे म्हणणे १००% आवडले आणि पटले. :)

बाकी काही बाबतीत गणपा म्हणतायत अगदी तेच होत आहे. दोन्ही बाजुचे मुद्दे पटतायत.

शेवटी, कोणती गोष्ट कुठपर्यंत खेचायची हे ज्याने त्याने कुवतीनुसार ठरवावे. उठसुट भविष्ये, भाकिते बघून अंदाज बांधून जगणे माणसाला निष्क्रीय आणि विचारहीन बनवते, हे शहाण्याला सांगणे न लगे. :)

आणि विज्ञानाच्या अति आहारी जाउन कोणी स्वतः आत्महत्या करुन कुटुंब संपवलेले कुठे वाचण्यात आले नाहीये अजुन...... :)

शशिकांत ओक's picture

14 Mar 2012 - 5:39 pm | शशिकांत ओक

नावडतीचे मीठ अळणी!

‘नावडतीचे मीठ ‘अळणी’ म्हण सहज आठवली...
पुरुषांना एक आवडती तर दुसरी नावडती असे असते. निदान खाण्याच्या बाबतीत तरी. एक आई व दुसरी पत्नी. पैकी कोणीतरी आवडते असेल तर दुसरे नावडते ठरते.
एकीचा स्वैपाक मिळमिळीत तर दुसरीचा चवदार वाटतो. नावडतीने कितीही मनलाऊन पदार्थ बनवला तरी त्यात काहीतरी उणे काढले जाते असे म्हण सुचवते. असो.
तीच गोष्ट अन्य ठिकाणीही लागू होते असे व्यवहारात दिसते. एखाद्या गोष्टीचा तिटकारा निर्माण झाला की त्याला नावे ठेवण्यासाठी मनात कल्पना विस्तार सुरू होतो. नाडी ग्रंथांना असेच नावडतेपण सहन करावे लागते.
नावडतीच्या स्वयंपाकातील मीठासारखा पदार्थ, जो तयार होण्यात नावडतीचा अजिबात संबंध नसतो, तरीही तिला बोल लावायला ते कारण सोईचे जाते म्हणून वापरले जाते. म्हणीत निदान पदार्थाची चव घेऊन म्हटले जाते असे सूचित होते. नाडी ग्रंथाबाबत (नावडतीच्या) कथनांची (चव) अनुभव घ्यायची तसदी न घेता नाडीतील संकल्पनांचे ‘मीठ अळणी’ म्हणून संभावना करताना पाहून ती म्हण अन्य कारणांना देखील कशी चपखल लागू पडते याचा प्रत्यय येतो.
नाडीग्रंथावर एक कार्यशाळा पुणे मुक्कामी झाली. इच्छुकांनी त्यात काय घडले हे समजून व्हायला काय हरकत आहे. निदान नाडीग्रंथांचे मीठ अळणी आहे का नाही याचा अनुभव येईल.

धन्या's picture

14 Mar 2012 - 6:29 pm | धन्या

धन्य झालो. :)

तु एकटाच का आख्खा धागाच धन्य झाला, अर्थात तुम्हाला कानमंत्र आधीच मिळालेला आहे, त्यामुळे अशाच प्रतिसादाची अपेक्षा होती.

रणजित चितळे's picture

15 Mar 2012 - 1:15 pm | रणजित चितळे

दोनदा चुकून छापले गेले होते म्हणून संपादन करुन काढून टाकले.

रणजित चितळे's picture

15 Mar 2012 - 1:12 pm | रणजित चितळे

माझा अनुभव येथे देऊ इच्छीतो,

मी २००५ साली एकदा बंगळुरला आलो होतो, तेव्हा होसुरला (२० किमी दुर) कोण्या परिचीतांकडे गेलो होतो (ते तमिळ आहेत). त्यांच्या बरोबर जाता जाता मला नाडी ज्योतीषाची पाटी दिसली. काय आहे ते बघावे म्हणून मी त्याच्या कडे गेलो. त्याने आंगठ्याचा ठसा घेतला व काही वेळात काही पट्ट्या घेऊन आला. त्याने मला फक्त हो - नाही हे म्हणायला सांगीतले विचारलेल्या प्रश्नांना. (तो तमिळ मधून बोलत होता व इंग्लीश मधून माझे स्नेही भाषांतर करत होते). पट्ट्यांवर काही तरी कोरलेले मला दिसत होते.

त्याने पहीली पट्टी काढली - म्हणाला - आपली आई आपल्या लहानपणीच वारली.
मी - हो.
तो - आईचे नाव अमुक होते.
मी - नाही.

त्याने ती पट्टी ठेवून दुसरी काढली.

तो - वडील सरकारी खात्यातून निवृत्त झाले.
मी - नाही.

त्याते ती पट्टी ठेवून तिसरी काढली.

वडीलांचे नाव अमुक आहे.
मी - हो.

भाऊ सरकारी नोकरीत आहे.
मी - हो.

बायको अमुक अमुक नावाची आहे.
मी - हो.

आता तो म्हणाला की पट्टी मीळाली. पुढे त्याने ती तामीळ मधुन वाचली व त्याचा माझ्या स्नेह्याने भाषांतर केले. तिथल्या तिथे.

माझ्या बद्दलचे सगळे आराखडे बरोबर होते. माझे व्यक्ती चित्र ते बरोबर निघाले.

काही गोष्टी आता (६ वर्षाने) कळते बरोबर पण झाल्या आहेत. आता पुढे बघू.

मला कोणी तरी सांगीतले की ती लोकं आपले मन वाचू शकतात बाकी काही नाही - हे जरी बरोबर मानले तरी कोणी तरी आपले मन ओळखतो हा चमत्कार नव्हे का.

कवितानागेश's picture

15 Mar 2012 - 1:48 pm | कवितानागेश

मी देखिल साधारण २ वर्षांपुर्वी माझा अनुभव इथे लिहिला होता.
आणि अत्तादेखिल सांगू शकते, की त्यावेळेस त्यांनी ( नाडीपट्टीवाल्यांनी) 'काही गोष्टी अत्ता सांगता येणार नाहीत', असे सांगून माझेच भले केले होते; फक्त ते मला तेंव्हा कळत नव्हते. मी जाम वैतागले होते..
असो. वैयक्तिक अनुभवांची चर्चा इथे नको.
आपले अनुभव आपल्याजवळ ठेवावेत. ज्याला गरज असेल त्यालाच सांगावेत, हा शहाणपणा आता माझ्याकडे आहे.

रणजित चितळे's picture

15 Mar 2012 - 2:46 pm | रणजित चितळे

पूर्वीचा प्रतिसाद वाचला. अनूभव माझ्या सारखाच आहे.

मूकवाचक's picture

15 Mar 2012 - 2:48 pm | मूकवाचक

वाचासिद्धी प्राप्त असलेल्या सत्पुरूषांची भाकिते तंतोतंत खरी झाल्याचे काही विलक्षण अनुभव माझ्या काही परिचितांना आणि मलाही आलेले आहेत.

(सगळे योगायोग असतात असे म्हणणार्यांशी वाद घालणे/ कुठली आव्हाने वगैरे स्वीकारणे/ संख्याशास्त्रीय पुरावे गोळा करणे इ. मधे स्वारस्य नाही.)

चौकटराजा's picture

15 Mar 2012 - 7:53 pm | चौकटराजा

तुमच्या सारखाच अनुभव मला १९६६ साली आला आहे. मी पक्का चिकित्सक माणूस आहे. त्याने सांगितलेले भविष्य नव्हते पण जो भूतकाळ त्याने आमचा आम्हाला पट्ट्यावरून सांगितला तुआत १९४६ सालच्या घटनेचा उल्ल्लेख होता . ते कोडे मला अजून उलगडलेले नाही. मी चिकित्सक असूनही इमानदारीत कबूल करतो.

रणजित चितळे's picture

16 Mar 2012 - 9:14 am | रणजित चितळे

मजा म्हणजे - त्याने सांगितलेले बरोबर येत आहे.

it requires considerable knowledge, to know that we dont know.

शिल्पा ब's picture

14 Mar 2012 - 9:57 pm | शिल्पा ब

येड्याचा बाजार नुसता!!
बाकी ज्योतिष हे शास्त्र आहे वगैरे वाचुन अंमळ करमणुक झाली तेवढीच.

आबा's picture

15 Mar 2012 - 12:01 am | आबा

च्यायला !
ज्याला त्याला आपलं दुकान चालायची काळजी.

गोंधळी's picture

15 Mar 2012 - 12:17 am | गोंधळी

तुम्ही मी माराठी वरील भविष्यावर बोलु काहि का बघत नाही.

सोनी टि.वी. किंवा तसल्यास कोठ्ल्यातरी च्यनेलवर निर्मल बाबा का दरबार नावाचा कार्यक्रम असतो . तो कोणी पहाते का ?

मी तर त्याचा फॅन आहे.
एवढा ऊत्तम " विनोदी रिअ‍ॅलिटी शो " कोणताही नाही.

प्यारे१'s picture

15 Mar 2012 - 11:46 am | प्यारे१

म्या पगतू! :)

लय धम्माल कारेक्रम हाय. येवडा जगात भारी क्वामेडी कारेक्रम आपन दुसर्या कुडं बगला न्हाई. ;)
'किर्पा' कुडनं कुडनं आन कशी कशी सुरु हुईल आन कशी बंद हुईल त्येजी काय बी ग्यारन्टी नाय! ;)

त्वा बनेल कुडनं घ्येटलास? रस्त्यावनं का घ्येटल्यास? शोरुम मदनं घ्ये 'किर्पा आयेगी'
त्वा समोशे कवा खाल्लास? घी वाला पंजाबी समोसा घरात बनवून गनपतीला ३०१ वाहा 'किर्पा आयेगी'
पुर्‍या कन्च्या त्येलात केल्त्यास? सफोला मदी करु नगंस. 'किर्पा आयेगी'

अस्लं भारी भारी निर्मल बाबा सांगत आसतंय. लय आडौतय.

>>>>त्वा बनेल कुडनं घ्येटलास? रस्त्यावनं का घ्येटल्यास? शोरुम मदनं >>>>घ्ये 'किर्पा आयेगी'
>>>>त्वा समोशे कवा खाल्लास? घी वाला पंजाबी समोसा घरात बनवून >>>>गनपतीला ३०१ वाहा 'किर्पा आयेगी'
>>>>पुर्‍या कन्च्या त्येलात केल्त्यास? सफोला मदी करु नगंस. 'किर्पा >>>>आयेगी'

---- मेलो ! मेलो! मेलो!

=)) =)) =)) =)) =))

तर्री's picture

15 Mar 2012 - 12:09 pm | तर्री

धीर धरा हो . अशी मरण्याची भीती कशापायी ? किर्पा होनी बाकी है !

प्यारे १ / यश्वतंराव : १-२ सम-विचारी सापडले ...किर्पा झालीच.

बाबां वर एक वेगळा धागा काढु या का ?

गोंधळी's picture

15 Mar 2012 - 12:13 pm | गोंधळी

जगात चांगले डॉक्टर आहेत तसेच खोट्या पदव्या असणाय्रा डॉक्टरांची ही क्लिनीक आहेत.
आता कोणाकडे जायचे, काय बघायचे हे तुम्हीच ठरवा.

शैलेन्द्र's picture

15 Mar 2012 - 12:24 pm | शैलेन्द्र

जगातले सगळेच जोतिषी, तथाकथीत चांगले व वाईट, हे खोटी पदवी असलेले, व खोट्या शास्त्राचा आधार घेणारे आहेत, असे आमचे आजचे मत आहे.

तुमच्या मताचा मी आदर करतो,पण हे विधान तुम्ही कश्याच्या आधारे केले आहे.

या साठी तुम्हि जगभर फिरुन आला आहात काय?

शैलेन्द्र's picture

15 Mar 2012 - 5:58 pm | शैलेन्द्र

जगात फिरुन यायची गरज काय :) ?

मुळात जोतिष किंवा तत्सम शास्त्र हे एखाद्या खेळासारखे आहेत, जिथे नियम, आडाखे, गृहीतक सगळे आपणच ठरवायचे, आणी वेड्यासारख खेळात रहायच. राहु-केतु वाईट, मंगळ अमुक गुणधर्माचा, शुक्र असे परीणाम दाखवणार.. हातावरची अमुक रेषा अशी असेल तर तस होणार..ही सगळी गृहीतक, त्याला शेंडा बुडखा काहीच नाही.

कोणत्याही नैसर्गीक शास्त्राच तस नाही, तिथले नियम सनातन असतात, आल्याचा रस चाखल्याने सर्दी झालेल्या एस्कीमोपासुन ते विदर्भातल्या गोंडापर्यंत, सगळ्या मानवांवर सर्वसाधारण सारखा परीणाम होतो. आज एखादा मोलेक्युल औषध म्हणुन बाजारात आणायचा तर चार ते पाच टप्प्यात, हजारो लोकांवर व प्राण्यांवर चाचण्या कराव्या लागतात. त्यातही जे त्या उपचारांना प्रतीसाद देत नाहीत, त्यांनी तो का दीला नाही याचे कारण द्यावे लागते. एखाद्या गोष्टीला शास्त्र म्हणतात तेंव्हा अत्यंत वस्तुनिष्ठपणे त्याची परीक्षा घेतली जाते, अगदी आयुर्वेदातल्या कफ्/पीत्त्/वात या त्रीदोषांचे गृहीतक आता वस्तुनीष्ठ कसोटीवर तपासुन पाहील जातय.

आता या शास्त्राचा वापर करणारे काही जण अचुक वापर करतात काही चुका करतात, त्यामुळे ते शास्त्र म्हणुन कोठेही कमी ठरत नाही.

ज्या दिवशी जोतीषशास्त्र अशा परीक्षा द्यायला तयार होइल तेंव्हा चांगल्या किंवा वाईट जोतीषाची चांगल्या किंवा वाईट डॉक्टरशी तुलना करता येइल, तोवर ही सगळी कपोल्कल्पीत बनवाबनवी आहे अस मला वाटतं.

युयुत्सु's picture

15 Mar 2012 - 9:03 am | युयुत्सु

माझ्या धाग्यावर "पुन्हा प्रतिसाद देणार नाही" अशी भीष्म-प्रतिज्ञा करणारे परत आलेले बघून खूप गंमत वाटली.

जयंत कुलकर्णी's picture

15 Mar 2012 - 11:53 am | जयंत कुलकर्णी

क्षमा करा ! मला वाटले मी ते त्या धाग्यासंबधीत बोललो होतो. आणि समजा ही प्रतिज्ञा मोडली असे आपण म्हटले तरी जनहितासाठी हरकत नाही. नाहीतरी बर्‍याचजणांना ही सगळी गंमतच वाटते...:-)

शैलेन्द्र's picture

15 Mar 2012 - 12:12 pm | शैलेन्द्र

+१

पिलीयन रायडर's picture

15 Mar 2012 - 1:50 pm | पिलीयन रायडर

या निमिताने (दुसर्‍याच्या डोळ्यातलें कुसळ दाखवायला) स्वतःच्या धाग्यावर येउन चक्क प्रतिक्रिया दिलीत तुम्ही ..... हे बघून खूप गंमत वाटली.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Mar 2012 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार

युयुत्सु आणि ज्योतीष शास्त्राची टिंगल उडवणार्‍या सगळ्यांवरती शनीची वक्र दॄष्टी पडो आणि त्यांना साडेसाती चालू होवो.

जयंत कुलकर्णी's picture

15 Mar 2012 - 1:16 pm | जयंत कुलकर्णी

त्यांच्या आयुष्यात अनिश्चतता येवो. त्यानंतर ते या दैवी शास्त्राचा आधार घेओत. त्यानंतर शनीच्या दगडावर तेल ओतून ओतून कंगाल झाल्यामुळे, आता साडेसातीपुढे कोण काय करू शकतो असा विचार करून फासाला स्वतःला लटकवून आत्म्हत्या करोत.... चांगला शाप आहे हो ................:-)

झालेच तर ते ग्रहांच्यामधे चिरडून मरोत.
.....................
...................

युयुत्सु's picture

15 Mar 2012 - 3:23 pm | युयुत्सु

झालेच तर ते ग्रहांच्यामधे चिरडून मरोत.

आपल्या बुद्धीवादी आणि विज्ञाननिष्ठ सदिच्छा पोचल्या...

जयंत कुलकर्णी's picture

15 Mar 2012 - 4:55 pm | जयंत कुलकर्णी

मी फक्त भोंदूगिरीच्या विरूद्ध आहे.....
आणि शुभेच्छा आहेतच....

JAGOMOHANPYARE's picture

15 Mar 2012 - 9:19 pm | JAGOMOHANPYARE

मी गेल्या वर्षी एका ज्योतिष्याला पत्रिका दाखवली... तुझे सगळे भले होईल बेटा, असे म्हणून त्याने ताईत दिला आणि एका पुस्तकाचा १४ वा अध्याय वाचायला सांगितला.. त्यानंतर पंधरा दिवसातच मला अ‍ॅक्सिडेंत झाला आणि पाय मोडला..

JAGOMOHANPYARE's picture

15 Mar 2012 - 9:33 pm | JAGOMOHANPYARE

लपे करमाची रेखा
माझ्या कुंकवाच्या खाली
पुशीसनी गेलं कुकू
रेखा उघडी पडली

देवा, तुझ्याबी घरचा
झरा धनाचा अटला
धन-रेखाच्या चरहानं
तयहात रे फाटला

बापा, नाको मारू थापा
असो खरया असो खोट्या
नही नशीब नशीब
तयहाताच्या रेघोटया

अरे, नशीब नशीब
लागे चक्कर पायाले
नशिबाचे नऊ गिरहे
ते भी फिरत रह्याले

राहो दोन लाल सुखी
हेच देवाले मांगनं
त्यात आलं रे नशीब
काय सांगे पंचागन

नको नको रे जोतिषा
नको हात माझा पाहू
माझं दैव माले कये
माझ्या दारी नको येऊ

-बहिणाबाई चौधरी

पैसा's picture

15 Mar 2012 - 9:39 pm | पैसा

जामोप्या, धन्यवाद! अशिक्षित बहिणाबाई लिहून गेली ते मोठ्या मोठ्या लोकाना आयुष्यभर पढत पंडितगिरी करून कळालं नाही!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Mar 2012 - 4:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे

क ड क !!!!

मला अजून एक शेर आठवला होता. नीट नाही आठवत पण असा काहीसा होता...

अपनी हाथोंकी लकीरों पर इतना गुमान ना करो.
नसीब तो उनके भी होते है जिनके हाथ नही होते.

गवि's picture

16 Mar 2012 - 5:53 pm | गवि

पैरोंके बल उसने खुदी कर ली बुलंद..
वर्ना वो बुरी बला जीत जाती..
नसीब उसका अच्छा के हाथ नही थे..
वर्ना किस्मत आजमाते जिंदगी बीत जाती..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Mar 2012 - 7:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे

लई भारी !!!

गवि's picture

16 Mar 2012 - 7:50 pm | गवि

धन्यवाद...

प्रकाश घाटपांडे's picture

16 Mar 2012 - 12:43 pm | प्रकाश घाटपांडे

धाग्यातील प्रतिसादात लेखातील मुद्यांविषयी कुणीच भाष्य केले नाही.
<<'विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही' ज्यांना या विधानाची सत्यता पटेल त्यांनाच ज्योतिषाची उपयुक्तता पटेल. >>
श्रद्धा ही माणसाला जगण्याचे बळ देते हे आम्ही मान्य करतो. दाभोलकर देखील मान्य करतात. ज्योतिष हा देखील श्रद्धेचाच भाग आहे. अनिश्चिततेला तोंड देण्याची प्रत्येकाची क्षमता वेगळी असते हा नेहमीचा आपला मुद्दा या ठिकाणी थेट मांडला नाही. पण पुढे अप्रत्यक्षरित्या तो मांडलेला दिसतो. पण वैज्ञानिक दृष्टीकोण हा अनिश्चितता पचवायला मदत करतो. तो अंगी बाळगणे तेवढे सोपे नाही हे मात्र मान्य. बुद्धीप्रामाण्यवाद हा एक कठीण वसा आहे असे तर्कतीथ लक्ष्मणशास्त्री सांगत. हल्ली श्रीराम लागू पण तेच सांगतात. वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा म्हणजे भावनांना थाराच देउ नका असे असु शकत नाही.
<< हा बुद्धीवाद शाश्वत समाधानाची हमी प्रयत्नवादी व्यक्तीला देईल, याची खात्री कोणीच देत नाही>>
शाश्वत समाधानाची हमी श्रद्धा देते काय? खर तर शाश्वत असे काहीच नाही.

शाश्वत समाधानाची हमी श्रद्धा देते काय?

अधिकृत पुरावा मजजवळ नाही. पण श्रद्धेच्या जोरावर मनुष्याने अनेक अविश्वसनीय गोष्टी पार पाडलेल्या दिसतात. असे लोक त्यांच्या श्रद्धास्थानांना याचे श्रेय देतात. (उदा विशिष्ट मूल्यांवरची श्रद्धा) त्यावरून श्रद्धा शाश्वत किंवा दीर्घ समाधान देत असावी.

आजच्या म.टा त दाभोळ्करांच उत्तर आलय बघा युयुस्तु राव! नक्की वाचा.