थीम चांगली असूनही फसलेलं पुस्तक
परवाच एक पुस्तक वाचलं : द अवेकनिंग. ले. : संजय सोनवणी.
कथेची नायिका शिबा राणी.. प्रचंड सुंदर.... आणी तेवढीच सामर्थ्यशाली, तिच्यासाठी समस्त सम्राट लोकं झुरतात.. पण ती कुणालाही भीक घालत नाही.
दररोज रात्री एका गुलामाबरोबर रत होणारी, आणी सकाळी त्याच्याच रक्ताने स्नान करणारी शिबा राणी... तिचा हा दिनक्रम (की रात्रक्रम) काही वर्षे सतत चालू अस्तो.
एका रात्री एका टोळीचा भूतपूर्व राजा शिबाच्या प्रेमापोटी तिच्याकडे गुलाम म्हणून येतो.... त्याचा तिच्याकडून अपेक्षाभंग होतो व तो तिला हे जीवन कसं भंगूर आहे हे आणि असं बरंच काही सांगून सकाळी शांतपणे मॄत्यूला सामोरं जातो.
हे शिबासाठी प्रचंड धक्कादायक ठरतं, कारण तिच्याकडे आलेला प्रत्येक गुलाम मरताना रडत-भेकत, प्राणाची भीक मागत मेलेला असतो..... आणि या गुलामाचे शांतपणे मॄत्यूला सामोरे जाणे तिला हबकवून टाकते.....
आणी येथून चालू होतो शिबाचे आत्मसंशोधन...
खरं तर थीम खूपच चांगली आहे. पण ती मॄत्यूला कसे जिंकायचे असा शोध घेते, त्यामुळे एन्ड पण काहीतरी विचित्र झालाय... असे मला वाटते.
खरं तर तिच्या अध्यात्मिक शोधाचा प्रवास रंगवला असता, तर बरे झाले असते....
पण, जरीही तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर उभे राहिलात, तरी तुमच्याकडे योग्य प्रश्न असणे अत्यावश्यक आहे, असा माझ्या दॄष्टीने सोयीस्कर धडा घेवून मी पुस्तक मिटले..............
बर्याचदा असा अनुभव येतो, की पुस्तकाची थीम (मराठी शब्द?) चांगली असली तरी मांडताना काही चूक किंवा त्रुटी राहिल्यामुळे ते पुस्तक फसलेलं आहे.
आपणही अशी उदाहरणे सांगू शकाल काय?
-सूर्यपुत्र.
प्रतिक्रिया
थीम = मध्यवर्ती
ओळख त्रोटक वाटते आहे राव!
अजून थोडे सविस्तर लिहिले
'बिका'सेठ आणि प्राजूशी सहमत!
"कथा/कादंबर्या" यांच्या
"बाकी शून्य" स्तक बर्याच
-१
केवळ एक गूलाम मरायला घाबरला नाही म्हणून एव्हडे बीथरली/बदलली ?
असं होणं स्वाभाविकच नाही का?
आणि बोलताना काय बोलतो, तर तिचे सौंदर्य किती भंगुर आहे
व्हॅम्पायर
छान परीचय
असाच प्रकार मध्य प्रदेश/
शिबाच्या बाबतीत
आभार!
मनस्थिती महत्त्वाची.