फुकटचा सल्ला

सदानंद ठाकूर's picture
सदानंद ठाकूर in काथ्याकूट
16 Sep 2010 - 12:40 pm
गाभा: 

फुकटचा सल्ला

खर पहाता असे म्हणतात कि कोणी विचारल्याशीवाय आपला सल्ला देऊ नये तर समर्थ म्हणतात आपणासी जे जे ठावे ते दुस-यासी सांगावे, शहाणे करोनी सोडावे सकळ जना! असो जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आपले काम फुकटात सल्ला देण्याचे मग तो कोणी मानो अथवा न मानो, शेवटी मर्जी ज्याची त्याची.

जून २०१० चे एम् आर पी नुसार (तेव्हा सेंसेक्सची एम् आर पी १९२९५ होती व सध्या बाजार १९५०० पेक्षा जास्त आहे, म्हणजेच सध्या शेअर बाजारातील बहुतांशी कंपन्यांचे समभाग बरेच प्रमाणात महागात उपलब्ध आहेत. म्हणजेच त्यांच्या किंमती खरे पहाता अवास्तवच आहेत. जय परदेशी अर्थसंस्था! ज्या अक्षरश: सध्या भारतीय शेअर बाजारात पैसे ओतत आहेत. २००९ च्या संपूर्ण वर्षात परदेशी अर्थसंस्थानी २४१३२ कोटी रुपये भारतीया शेअर बाजारात गुंतवले. पण जून २०१० ते १३ सप्टे २०१० या काळात परदेशी अर्थसंस्थानी २६२१६ कोटी रुपये गुंतवणूक केली आहे, म्हणूनच प्रतीदिन शेअर बाजार वधारत आहे आणि म्हणून सर्व सामान्य गुंतवकदाराने शेअरबाजारात व्यवहार करताना अत्यंत सावध पवित्रा घेणे गरजेचे आहे. कारण वाढणारा शेअर बाजार फंडामेंटल्समुळे वाढतो आहे काय? नाही हे तर निव्वळ स्पेक्युलेशनच आहे असे वाटते आहे. जेव्हा परदेशी अर्थसंस्था पैसे काढू लागतील तेव्हा बाजार कोसळणार हे सांगावयास कोण्या ज्योतिषाची गरज नाही. आणि म्हणूनच ज्या लोकाना सध्याचे वधारलेल्या बाजारामुळे अपेक्षीत अथवा अपेक्षेपेक्षा जास्त नफा झालेला आहे त्यानी बाजारातून नफा वसूल करुन बाजूला होणेच इष्ट होईल. पैसे रोखीत ठेवावेत व परत बाजार कोसळला कि परत गुंतवणूक करावी. अधिक नफा मिळेल.

सद्य स्थितीत ज्याना गुंतवणूकच करावयाची असेल त्यानी ती म्युच्युअल फंडाचे डेट योजनेत गुंतवावेत व तेथून क्ष/२४० (क्ष = गुंतवावयाची रक्कम, वर्षात बाजाराचे चालू दिवस साधारणपणे २४० असतात) अशा सुत्राने रोज रक्कम म्युच्युअल फंडाचे समभाग योजनेत वर्ग करण्याची सुचना द्यावी. उदा. जर तुमच्याकडे रु.२४००००/- आज गुंतवण्यासाठी आहेत तर ते कर्ज रोखे योजनेत एकरकमी गुंतवावेत व त्यातून रोज रु.१००० समभाग योजनेत वर्ग करावेत. मग बाजार कसा का चालेना, तुम्हला फायदा होण्याचीच शक्यता अधिक आहे. या मधे बाजाराची जोखिम कमी होईल व बाजार वर जात राहीला तरी अथवा बाजार वर खाली होत राहिला तरीसुध्दा नफाच होईल आणि जर बाजार सतत खालीच जात राहिला तरीसुध्दा निदान नुकसान झालेच तर ते मर्यादित असेल, आणि तो जेव्हा परत वर जाऊ लागेल तेव्हा घसघशीत नफाच होईल.

सध्या अनेक म्युच्युअल फंड कंपन्यानी या प्रकारच्या योजना बाजारात आणलेल्या आहेत. मला विचाराल तर आपण रिलायन्स म्युच्युअल फंडाचे लिक्वीड फंडात गुंतवणूक करुन रोज ठरावीक रक्कम रिलायन्स ग्रोथ फंड अथवा रेग्युलर सेव्हिंग्स फंड (इक्वीटी) मध्ये वर्ग करावी. किंवा एचडिएफसी कँश मँनेजमेंट फंडात गुंतवणूक करुन एडिएफसी टॉप२०० फंडात रोज वर्ग करावेत.

मार्च २००९ मध्ये शेअर बाजार ८३०० पर्यंत कोसळलेला होता तव्हा मी सर्वाना सांगत होतो कि हिच वेळ आहे २ ते ३ वर्षासाठी गुंतवणूक करण्याची ज्यानी तेव्हा ऐकले त्यांचे गुंतवणूक मुल्य किमान दुप्पट व जास्तीत जास्त ७ पटी पर्यंत गेल्या दिड वर्षातच झाले आहे.

आता मानावयाचे कि नाही सर्वस्वी तुमचे निर्णयावर!

आपणास म्युच्युअल फंड व गुंतवणूकीसंबधी विस्तृतपणे जाणून घ्यावयाचे असल्यास येथे टिचकी मारा.

प्रतिक्रिया

दुव्या पर्यन्त पोहोचता येत नाहिए.

सदानंद ठाकूर's picture

17 Sep 2010 - 11:32 am | सदानंद ठाकूर