जे न देखे रवी...
अश्रूंचे झरे
स्वप्न सारे आज पेटले
अश्रूंचे झरे डोळ्यांत आटले
हृदयात माझ्या गहिरी वेदना
जळतो हा प्राण सांगू कुणा
पाश अंतरीचे कसे सुटले
येते रोज आठवणींचे वादळ
थकलेल्या जीवास राहिले ना बळ
डोईवरले आभाळ विस्कटून गेले
दैव माझे झाले खोटे
हातातल्या फुलांचे झाले काटे
जुलूम नियतीचे सारे मी झेलले
पहिलं वहिलं प्रेम माझं
कवितेचा नायक ..गावातील बँक अधिकार्राचा मुलगा
काॅॅलेजमद्ये नायक व नायिका एकत्र शिकतात
पहिलं वहिलं प्रेम माझं
मुकंच राहुन गेलं .
आयुष्याचं इंद्रधनु फिकंच राहुन गेलं .
कुणीच कुणाला काही नाही बोललेलं
पण डोळ्यातलं प्रेम डोळ्यांना समजलेलं.
एक दिवशी मी लवकर येउन
त्याच्या बाकावर लाल गुलाब ठेवलेले.
सगळ्या वर्गाने त्याला चिडव चिडव चिडवलेले .
सकाळ कोवळी
सकाळ कोवळी रात्रीनंतर हासत येई
हिरव्या गवताचा गर्द गंध घेवून येई
धुक्यातून दव फुलले उतरे अलगद पानांवर
शिखरावर झाडांच्या उन्ह सोनेरी हळूच येई
झुळू़क हवेची थंडगार वाहते चुकार अल्लड
सरत्या पावसाची सर ठिबठिबणारी सोबत येई
रान फुलले रानफुलांचे रंग लेवून ताजे सुंदर
वार्यावरती हालती डूलती नजरेला सुखवीत जाई
उत्तर दे पण...
इंदिरा संतांची एक नितांत सुंदर कविता "पत्र लिही पण नको पाठवू". पण आजकाल पत्र तर सोडाच, हातानं लिहिणंसुद्धा दुर्मिळ झालंय. संवाद होतो तो मेसेज आणि इमोजीमधून.
इंदिरा संतांच्या त्या कवितेवर आधारित ही कविता.
* शेवटचं कडवं मूळ कवितेतील तसंच ठेवलंय.
उत्तर दे पण संदेशातुन
नको पाठवू बदाम रक्तिम,
रुक्ष कोरड्या जगण्यामध्ये
कसा साठवू पाउस रिमझिम?
चांदणी अन प्रियकर
कुणी एक चांदणी नवथर
खाली आली धरणीवर
काय कसले तिला ना ठावे
इकडे तिकडे कोठे जावे
भूकेलेली रडवेली
रडून कोमेजलेली
तशात भेटला तिजला प्रियकर
अशाच चांदणीसाठी होता आतूर
कोण कुठली तू आलीस कशी
आपूलकीने त्याने केली चौकशी
लांब असते दूरदेशी येथे परदेशी
कोण मज पाठवील पुन्हा मजदेशी
प्रियकर उदार उमदा चांदणीस आवडला
लपाछपीचा डाव
निळ्या जांभळ्या ढगांआडूनी कोण बरे बोलावतो?
इकडे आहे मी इकडे तिकडे देखील मीच आहे असे बोलतो.
लपाछपीचा डाव असा हा राज्य माझ्यावर यावेळी
शोधण्यासाठी त्याला निघालो वेळ अवेळी
शोधता शोधता मी दमतो थकतो
त्यानंतर हळूच कधी तो चाहूल देतो.
दडूनी पुन्हा तो ढागांआड मला पुकारी
शोध घेण्या पुढे जातसे कानोसा घेऊनी
वस्त्र विणताना..
वस्त्र विणताना, मन धागा गुंफताना..हवा
रंगांचा कोमल बाज, गहिवर स्पर्श साज!
रेशीम पाण्याची धार, त्यात चंद्राची साद..
अलगद सांडलेले, प्राजक्त देठ सहवास..
चोचीत धरलेले, आकाश मोतियाचे भास!
वाऱ्याची मंगल गुज, हिरवळ मखमल पाऊल वाट..
सागराची तुफान गाज, मातीवर रेंगाळलेली वेडी लाट!
-भक्ती
कदाचित...
... हे षडयंत्र असेल कदाचित???
तेव्हा धर्म अफुची गोळी आहे अस म्हणणारा मार्क्स नव्हता ...
कदाचित धर्मभोळी माणसं होती.
उत्तर वैदिक काळापासून चालत आलेली जाती पातीची उतरंड होती.
...आणि नंतर त्या उतरंडीत घातलेला हैदोस माफीला पण लज्जित करेल असा होता.
...पण राम सगळ्या स्तरात जिवंत होता.
... आणि मग आलं इस्लाम नावाच्या शांततेचे वारं???
... चक्रिवादळ.
हाच क्षण
चाल चाल चालत गेलास
वणवण भटकून थकून गेलास
हाच क्षण मोलाचा
रोवून पाय
थांबायचा
दार दार ठोठवत गेलास
उंबरा उंबरा झिजवत राह्यलास
हाच क्षण मोलाचा
तोडून दार
घुसायचा
वाच वाच वाचत गेलास
वाचून वाचून साचत गेलास
हाच क्षण मोलाचा
फोडून बांध
लिहायचा
खुळावलो ग सखये मी खुळावलो
जादु अशी , कळेना मला , काय केली
नयनांनी या , ओठांनी या , मी खुळावलो.
खुळावलो ग सखये मी खुळावलो.
सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो.
आठवते का ...
आठवते का तुला साजणा ...?
तुझी माझी प्रीत कशी जुळली
हृदयी प्रेम धारा कधी वाहीली
न तुला कळली न मला कळली
बोलता बोलता एकमेकांसोबत
आपण किती दूर चालत गेलो
परतीच्या या वाटा
नकळत साय्रा विसरत गेलो
भान न राहीले वास्तवाचे
प्रेम पाखरे कशी सीमा
ओलांडुन उडाली ..?
आठवते का तुला साजणा ...?
शहाणी मुलगी ... 2 (#तूम्हणालास)
तू म्हणालास, संस्कारी असणंच असतं एकदम best.
नाहीतर आयुष्यं बनतं न सुटणारं total mess.
यावर मी बिचारी उलटं काय बोलणार?
"तसं नसतं रे" म्हणून झाकली मूठ खोलणार??
( माहीत आहे मराठीत "खोलणार" म्हणत नाहीत
आणि संस्कारी लोक याला लेखनच गणन नाहीत.)
पण ते असूदेच.
थोडं यमक जुळू देच.
हां तर, तुझं म्हणणं मला फारसं नाही पटलं,
सांज फुले
सांज फुलांनी भरू दे
काळोखा रंग सावल्यांत उतरू दे
धूसर झाली मावळतीची वाट
मोहरला लाल केशरी क्षितिजाचा तट
पंखात घेऊन भोवतीची वारे
परतू लागली चुकार पाखरे
सूर्य मिटून राने अंधारली
प्रकाशज्योत अलगद विजून गेली
अंबरी आकार घेई अर्धी चंद्रकोर
रात्र पावलाने पुढे येई हळुवार
सखी मी ....पावसाची
सखी मी ...पावसाची
घनदाट काळ्या मेघाची
लख्ख कडकडणाय्रा दामीनीची
आतुरतेने वाट पाहणाय्रा चकोराची
सखी मी ... उनाड वाय्राची
दणकट रांगड्या डोंगराची
वेलीवरल्या फुलांची पानांची
अंगणात नाचणाय्रा चिमण्यांची
सखी मी...टिपुर चांदण्याची
शीतल साजय्रा चंद्राची
काळोखात भिजलेल्या रजनीची
सखी मी ...माझ्या सजणाची
आरोग्य पाठ भाग दोन
हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा
सुर्या सम जीणे
उदयास्त पाळणे
गजर न वाजणे
राम प्रहरी
दोन भाकरी
चारी ठाव करी
पंढरीची वारी ( morning walk)
नेम धर्म
चंद्रोदया माजी
अस्तासं पावणे
निद्रा समाधिस्त
नित्य होय
नको ते दिक्षीतं
नको जुवेकरी
का उगा छळशी
जठराग्नी
आरोग्य पाठ भाग दोन
हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा
सुर्या सम जीणे
उदयास्त पाळणे
गजर न वाजणे
राम प्रहरी
दोन भाकरी
चारी ठाव करी
पंढरीची वारी ( morning walk)
नेम धर्म
चंद्रोदया माजी
अस्तासं पावणे
निद्रा समाधिस्त
नित्य होय
नको ते दिक्षीतं
नको जुवेकरी
का उगा छळशी
जठराग्नी
शब्दांची कर्णफुले
शब्दांची कर्णफुले
प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी
प्रेम बरसले अवचीत अवकाळी
नाहत्या ओलेत्या भोर केशांतून
थेंब तयाचे अवतरले भाळी
ओठी शब्द फुलून आले
शब्दांचे मग मोती झाले
तु ते हळूवार उचलूनी घेत
कर्णफुलांसम कानी ल्याले
पंचतत्व
पंचतत्व
अनंत आकाश पाहता
मन माझे मोठे झाले
तेच आकाश मनात कोंबले
क्षणात सुक्ष्म अती लघू झाले ||१||
विस्तीर्ण जलाशय तो सागर
त्यापुढती मी यकश्चित केवळ
नाव घडवली फळकुट घेवून
लिलया पार कराया मिळे बळ ||२||
डोंगरांचे पर्वत जाहले
लंघून जाण्या उर धपापले
विमानात मात्र बसता
गिरिशिखर भव्य भासले ||३||
संभाव्याच्या अब्ज छटांतून
संभाव्याच्या अब्ज छटांतून
वर्तमान उजळतो कशाने?
कोण ठरविते? किंवा सारे,
यदृच्छयाच घडून जाते?
भूतभविष्यातील भासांचे
इंद्रजाल मायावी छेदून
काल-प्रवाहा स्तब्ध करोनी
ऐलपैल वर्तमान उरते
कालौघाची गाज अनाहत
चराचराला व्यापुनी उरते
"क्षण आत्ताचा क्षणजीवी नच"
क्षणोक्षणी वर्तमान म्हणते
मर्कट वंश
कपिकुळाला सांगणारा तोच माझा वंश आहे,
माझ्यातही थोडासा त्या मर्कटाचा अंश आहे
संथ पाण्या पाहूनि, मोहुनि जाई कुणी,
खडे त्यात फेकण्याची का मला ही खोड आहे?
विचित्र या शब्दातही , चिवित्र काही शोधतो मी,
शोधल्यावरी सापडे काही , हे मात्र गूढ आहे
माणसे ठेवती जपूनी धीर वा गंभीर चेहरे
मुखवटयांच्या खालती त्या एक मंद स्मित आहे
- ‹ previous
- 26 of 468
- next ›