जे न देखे रवी...
उर्दू शायरीमधील "हर्फ गिराना" आणि हिन्दी चित्रपट संगीतावर त्याचा परिणाम
मराठी वृत्तबद्ध कवितेत एखादे अक्षर लघु आहे का गुरु यामध्ये संदिग्धता नसते, पण त्याचा कधीकधी जाचही होऊ शकतो. उर्दूमध्ये "हर्फ गिराना" या सवलतीमुळे त्यात लवचिकता, कधी कधी संदिग्धता आणि म्हणूनच रोचकता आली आहे.
.
या लघुलेखात आपण २ गोष्टी पाहणार आहोत
१. हर्फ गिराना काय प्रकार आहे
२. तो कधी कधी नीट न समजल्यामुळे चित्रपट संगीतात कसा घोटाळा होतो
तुझ्या घरातले अनारसे
तुझ्या घरातले अनारसे
कधी खायला मिळतील?
माझ्या घरातले लाडू
आता कधीही फुटतील!!
तुझ्या त्या गोड शंकरपाळ्या
मला चहा बरोबर चालतील
आमच्या चिवड्यांचे डबे
आता रिकामेच राहतील
तुझे ते चिरोटे (२)
कायम लक्षात राहतील
माझ्या त्या कडबोळ्या
वातड होऊन जातील
तुझ्या या फराळाला
घरातले ही 'दात' देतील
अवचित गवसावे काही जे...
प्रश्न पडावा असा की
ज्याच्या उत्तरातुनी नवा
प्रश्न मला चिडवीत नव्या
उत्तरास
शोधत यावा
वाट दिसावी अशी की
अद्भुत प्रदेशी जाताना
विरून जाव्या पुसून जाव्या
सार्या
हळव्या खुणा
सूत्र सुचावे असे की
ज्याने यच्चयावतास
सहज गुंफुनी जरा उरावे
अधिक
गुंफण्यास
कोकणी आणि मराठी कवितांचा आस्वाद
कवी बा भा बोरकर यांचं कविता म्हणजे नैसर्गिक सौदर्य आणि स्त्री सौदर्य यांचे एक शालीन मिश्रण ... त्यात त्यांचे बालपण आणि निवृत्ती गोव्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी गेलं मग तर काय मेजवानीच
त्यांचं कोकणी आणि मराठी कवितांचा आस्वाद देणारा घेणारा एक कार्यक्रम (त्यांचे पुतणे डॉक्टर घनश्याम बोरकर ) बघण्यात आला त्याकाह हा धागा जरूर बघा
उतरत्या संध्याकाळी....
उतरत्या संध्याकाळी खिडकीत बसू नये.
हरवल्या नजरेला काही काही दिसू नये.
चुलीपाशी दुधावर साय दाटे आठवांची,
धुरकट कंदिलाची काच तेव्हा पुसू नये.
उतरत्या संध्याकाळी नको ओवी गुणगुणू,
उतू उतू जाईल गं काळजाचा मेघ जणू.
सरेलही सांज बघ, नको भिजवूस वाणी.
हूरहूर अंतरीची नको बघायला कुणी.
खंत
बोलणं होतंय, कळणं नाही.
पाहणं होतंय, रमणं नाही.
ऐकणं होतंय, समजणं नाही.
धावणं होतंय, थांबणं नाही.
भेटणं होतंय, मिसळणं नाही.
फिरणं होतंय, शोधणं नाही.
आठवणं होतंय, विसरणं नाही.
वाचणं होतंय, उमगणं नाही.
किनखापी आभाळाने
किनखापी आभाळाने
लपविले निळे नक्षत्र
मृगजळात बुडून गेले
काळाचे घटिकापात्र
थोपवल्या आवेगांच्या
डोहात दफनली रात्र
रिक्तता नसे ज्या ठावी
ते फुटले अक्षयपात्र
जागवूनी पिशाच्च शमतो
का कधी अघोरी मंत्र ?
जीव कोरा
गंध साऱ्या पाकळ्यांना
जागवे जो जाणीवांना,
मोगऱ्याचे उमलणे,
सोसते का नकारांना ?
मोहण्याची हौस नाही
त्याविना जीणेच नाही
जगे कसा जीव कोरा
रंग ज्यात उरलेच नाही ?
विरहगीत हाय रे !
सुमन कसे सावरे
मधुप का स्तब्ध होई
पंख रोखून बावरे ?
हा उत्सव नित असे
दैवयोग मग हसे
गळून गेल्या आसवांना
प्रणय कोणाचा पुसे ?
(मेरा कुछ सामान... (भावा...(बघ)..अनुवाद.))
सगळे कंस पूर्ण केलेले आहेत उगाच मोजत बसू नका...
पेरणा, प्राची ताईची ही कविता
http://www.misalpav.com/node/49553
प्राचीताईने केलेला भावानुवाद करायचा प्रयत्न चांगला होता, पण तिला बिचारीला त्या गाण्याचा खरा अर्थ समजलाच नाही ( हा उगाच खोटे कशाला बोलायचे?)
मेरा कुछ सामान... भावानुवाद.
तुझ्यापाशी ठेवलेले
काही जपून अजून.
चिंब चिंब भिजलेले
श्रावणाचे काही दिन..
एक रात्र थांबलेली
पत्र माझे पांघरून,
रात्रीला त्या विझवून
दे ना सारे पाठवून..
ऐकतोस ना रे तूही
पाचोळा हा वाळलेला?
नाद त्याचा एकदाच
कानांमध्ये माळलेला..
शिशिराची एक फांदी
हलताहे रे अजून,
तीच डहाळी मोडून
दे ना सारे पाठवून..
तेजस्विनी दिवाळी
प्रकाशमान प्रसन्न सकाळी...
लक्ष लक्ष दिव्यांच्या ओळी...
आसमंत सारा लख्ख उजळी!
घेऊनी सौभाग्य मानवजातीच्या कपाळी...
दूर सारूनी संकटाची छाया कभिन्न काळी!
हटवूनी निराशेची भेसूर काजळी...
मनासी देई आकांक्षेची झळाळी!
गाथा
तुकारामाच्या गाथेने
जेव्हा पछाडले मला
तेव्हा ज्ञानोबा नावाचा
एक मांत्रिक शोधला
भ्रम रिंगण तोडून
ज्ञानोबाने केली शर्थ
कानामध्ये सांगितला
गहनाचा गूढ अर्थ
त्याची बहीण मुक्ताई
सार्या मांत्रिकांची माय
सूर्य गिळण्या ही मुंगी
नभ उल्लंघून जाय
वाडा
जुनाट वाडा, उजाड मंदीर, पडकी कौले ,पडक्या भिंती
शिसवी तुळया वाळवीसही सांगत असतील गतश्रीमंती ||
इथे जाहल्या कित्येक मुंजी कित्येक लग्ने किती सोहळे
वाड्यानेही मनसोक्त भोगीले सुखदु:खांचे हे हिंदोळे ||
कित्येक घरटी इथेच वसली, इथेच फुलली, इथे बहरली
कित्येक पाखरांचीही किलबिल ह्या वाड्याने इथे पाहिली ||
मी एकटी
तांबडा का तो चंद्र नभीचा
का न असे नेहमीचा चंदेरी
ओळख असूनी अनोळखी
प्रित लपवीत रागावली स्वारी
फुले कळ्या घेवून पाने
मी एकटी उभी कधीची
वाट पाहूनी रात्र संपली
पहाट उजाडली नभाची
- पाषाणभेद
२४/१०/२०२१
सांजरंग
किरणांची पाऊले मिटून
हळूच गेली उन्हे परतून
पाखरांचा सूर
सांजपंखी हुरहुर
राहिली उरी रेंगाळून
निळ्या नभी
ढगांची रांग उभी
तांबूस रंग गेला त्यात भरून
घरट्यात किलबिल
पडे काजळी भूल
दिशा साऱ्या गेला हरवून
रातराणीचा गंध
झाल्या वाटा धुंद
पसरले माथ्यावर चांदण्याचे रान
अवकाळी आला पाऊस
अवकाळी आला पाऊस त्यानं सारं रानं धुतलं
हाती आलेलं पीक गेलं ते डोळ्यासमूर घडलं
काय सांगावी दैना चहूबाजूनी तो आला
ढगफुटी झाली जणू एकाजागी बरसला
किती निगूतीनं केलं व्हतं शेत आवंदा
बैलं नव्हते मदतीला औताला लावी खांदा
खतं बियाणं आणूनीया येळेवर केला पेरा
पाण्यासारखा पैसा पाण्यातच वाया गेला
आसतेस.... नसतेस....
आसतेस घरी तू जेव्हा
कोंड्याचे होती मांडे
कळत नाही कसे ते
भरती दुधा दह्यांचे हांडे
नसतेस घरी तू जेव्हा
वाहती दुधाचे पाट
अवतार घराचा होतो
जसा आठवडी बाजार हाट
आसतेस घरी तू जेव्हा
कधी रणभूमी सम घर वाटे
दामिनी कडाडे वाजे
हतप्रभ होती सारी शस्त्रे
जेव्हां ब्रह्मास्त्र जलंधारांचे गाजे
रानफुले
करू कशाला तमा जगाची
मागू कशाला उगा क्षमा
प्रमाद माझा एकच झाला
शोधत गेलो मानवतेच्या पाऊलखुणा
ढळलो नाही वळलो नाही
वेचत गेलो काटे कुटे
शोधत होतो जळ मृगजळी अन
गर्द सावली फड्या (निवडुंगा) खाली
तमा न केली उगा कशाची
फुटलो मी जरी उरी
प्रमाद माझा एकच झाला
कधी न केले क्रंदन
कितीही शीणलो मी तरी
आभाळाच्या फळ्यावर
धूमकेतूच्या खडूने
आभाळाच्या फळ्यावर
काहीबाही लिहीण्याची
होता ऊर्मी अनावर
चांदण्यांच्या ठिणग्यांची
घेतो मदत जराशी
चित्रलिपी सजविण्या
लिहीतो मी जी आकाशी
रात्र होते जशी दाट
तशा काही अनवट
मिथ्यकथा नक्षत्रांच्या
उजळती नवी वाट
झळाळते तेजोमेघ
गूढ कृष्णविवरांशी
बोलताना, जोडतो मी
नाळ आकाशगंगेशी
- ‹ previous
- 25 of 468
- next ›