जे न देखे रवी...
(किती काळ तुडवायचे)
पेरणा किती काळ झुलवायचे
http://misalpav.com/node/50291
किती काळ तुडवायचे
खरे सांग केव्हा तुझ्या बंद ओठी साथीदारांचे नाव केव्हा उमटायचे
किती घालायचे तुला टायरी अन किती वेळ पाण्यात बुडवायचे
किती काळ झुलवायचे
खरे सांग आता तुझ्या बंद ओठी कितीदा नाव माझे उमटायचे
किती यायच्या सरी या उरी अन किती अश्रू पाण्यात सिमटायचे
तुझी नक्षत्रे बिलगली घराला पुढे चांदण्यांना कसे रेटायचे
मळभ ढगांचे पुन्हा पांघरोनी माझ्या नभाने किती दाटायचे
उरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती पिसारे फूलवायचे
भेटीतही तू भेटसी मुक्याने उत्तराला किती काळ झुलवायचे
डासांचे विजय गीत
(दर वर्षी आम्ही 2 लाखाहून जास्त माणसांचे बळी भारतात घेतो. )
शूर वीर डास आम्ही
बांधुनि कफन डोक्यावरी
तुटून पडतो शत्रुंवरती
त्यांचे रक्त पिऊनी
देतो विजयी आरोळी.
डेंगू मलेरियाच्या दिव्यास्त्रांनी
करतो हल्ला माणसांवरती
पाठवतो त्यांना यमसदनी.
ब्लिडींग हार्ट....
खुप दिवस मनात होते की "रक्तस्त्राव हृदय फुले" दिसावीत. अंतरजालावर एका राजकुमाराची प्रेमकहाणी वाचली म्हणूनच कुतूहल वाढले होते.सकाळची फिरण्याची सवय आज कामाला आली.ज्या झुडूपवर्गीय वनस्पतीला रक्तस्त्राव हृदया फुले येतात ते झुडूप एके ठिकाणी दिसले. जवळच "रडणार्या चेरी चे झाड (विपींग चेरी)",बघुन काय वाटले ते लिहीण्याचा प्रयत्न.
इंद्रजाल
शतकातुनी एखादा रचितो
कवि, शब्दांचा जमवुनी मेळ,
कविता- जी करुनिया अचंबित
विलक्षणाचा मांडी खेळ
जेथ पोचुनी तर्क कुंठतो
तीच वाट पकडे कवि तो
इंद्रजाल शब्दांचे विणी -जे
रसिक कधी भेदू न शकतो
नित्य बदलते दृष्य दिसावे
स्फटिक लोलकातून जसे
वाचत असता ऐसी कविता
पुन्हा नवी का भासतसे?
कातरवेळ
*कातरवेळा*
सांजरंग केशराचे पसरले आकाशात
पाखरांची लगबग परतण्या घरट्यात !
चिवचिवाट त्यांचा मधुर, सुखवि कानाला,
संधिकाल चा धुंद गारवा, मोहवि मनाला !!
मावळतीला रविबिंब, क्षितीजावरती झुकले,
लाल केशरी रंग नभाचे, लाटांवरी उमटले!
सागरा पल्याड बुडता, सुर्याचा तांबूस तो गोळा,
नीशा हळूच दाटताना, हुरहुर लावती कातरवेळा !!
ओल्या खुणा
हळव्या झाल्या काळजातल्या ओल्या खुणा
हृदयातला रेशमी घाव दाखवू कुणा
फुले शोधता लागला जिव्हारी काटा
डोळ्यातल्या दर्यात उसळती अश्रूंच्या लाटा
नभाच्या वेशीवर उदास रंग उतरे
उरी लागलेला बाण घेऊन रावा फिरे
हरवून दूर गेली ओळखीची वाट
मोरपीशी स्वप्नांचा कोसळू लागे तट
मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून गेले
प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून गेले
वसंतात मृगजळ खास
काठावरचे गुपित झेलता
अनु'मतीची महत्ता विशेष
वसंताचे मृगजळ खास
कटी बंधात उष्म निश्वास
नभी नाभी ताम्र गोल
चा'लते जातो तोल
आर्त कुंजन
आस पास
पर्ण विरहीत पुष्प तटी दाट
दिंगबर सुरेख मदन पाझरतो
.
.
.
.
.
.
.
वैशाखाची ऊन्हं ..
वैशाखाची ऊन्हं जेव्हा नको नको झाली,
वळीवाची आठवण उमलून आली.
बहाव्याने केली रिती फुलांची पखाल,
पंगा-याच्या अंगावर खुळावली लाली..
सावरीच्या म्हातारीला पंख पंख फुटे,
वयासंगे उडुनिया गेले तिचे काटे.
चाफ्याचा बहर जणू बैराग्याची झोळी,
धरू धरू म्हणताना काहीतरी सुटे.
(थू)
पेर्णा पाभे सरांची तू
http://misalpav.com/node/50075
थू -१
तू चालते अशी वटवृक्षाचे जणू खोड ग
अंगावरती भले दांडगे ओंडके जणू ल्याले ग
तू हसते अशी छाती माझी धडधडे ग
गडगडाटाने त्या माझ हासणं सारें लोपते ग
तू
तू चालते अशी झाडावरची वेल ग
अंगावरती पानं फुलं ल्यायते ग
तू हसते अशी झरा वाहतो ग
खळखळाटानं हासणं पिकतं ग
तुझ्या येण्यानं वारा वाहतो ग
येता येता सुगंघ आणतो ग
तू बघते तेव्हा अंगावर रोमांच येतो ग
बघून तुला मीच लाजल्यागत होतो ग
तू चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता ग
तुझ्या ठाई प्रगती हर्ष आनंद वसतो ग
- पाषाणभेद
२९/०४/२०२२
उष्णकटिबंधीय वसंत
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना
माहितीची पाटी नसलेले झाड पाहून
साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले
हे झाड कोणते?
त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला
उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल!
(राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले)
रोज किती पाणी प्यावे?
रोज किती पाणी प्यावे?
शरीराची गरज असेल एवढे
आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य
डॉक्टर सुचवतील तेवढे
रोज किती पाणी प्यावे?
अन्न पिकविण्यासाठी
शेतीसाठी
शिल्लक राहील एवढे
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळेंना म्हणाली
मराठी साहित्य संमेलनाला
नाही गेलात कसे ते?
वाङळें आङळेंना म्हणाला
तुमच्या आङळीकेचे साहित्याने
अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला
जागा आता उरलीच कुठे ?
आठवतो आज पुन्हा...
आठवतो आज पुन्हा
माझा गाव माझी माती
सारं काही सोडले मी
वितभर पोटासाठी.
बरसून येती मेघ
भिजूनिया जावे चिंब
ओंजळीत पावसाचे
झेलूनिया घ्यावे थेंब
घेवूनिया हाती काठी
जात होतो पोरं पोरं
माळावरी चरावया
घेऊनिया गुरं ढोरं.
रानपाखरांच्या जैसे
रानिवणी हिंडण्यात
किती आठवू ते दिस
मौज होती जगण्यात.
कविता वसंत ऋतु
-
*वसंत ऋतु*
टपो-या कळीचे होई फुल,
दरवळे सुंगध मोग-याचा,
जाई, जुई, चाफा ही फुलतो,
शिडकावा होई प्रसन्नतेचा !!
अत्तराच्या कुप्या जणू का
फुलांमधी लपल्या असती,
सुगंध तयांचा वा-यासवे ,
वाहत राहे सभोवती !!
मरीआई बारागाड्या यात्रा
भुसावळात बारागाड्या ओढताना भीषण दुर्घटना; एक भाविकाचा मृत्यू, चौघे जखमी
https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/one-devotee-was-lo...
कळले मला न काही.
कळले मला न काही हा रुसवा कशास सजणी
डोळ्यात दाटले का हे आता तुझ्या ग पाणी.
कसला म्हणू अबोला तू गुमसुम कशास असशी
सांगून टाक आता जे सलते मनात राणी.
येता धुके असे हे बघ दाटून प्राक्तनाचे
जवळी असून सारे ते अपुले असे न कोणी.
ही रात चांदण्याची बघ भिजली दवात सारी
या चांदण्या क्षणात कुणी गाते उदास गाणी.
- ‹ previous
- 19 of 467
- next ›