जे न देखे रवी...
ओठात दाटलेले...
ओठात दाटलेले ते भाव ओळखीचे
सांगू नकोस आता ते गाव ओळखीचे
हातात गोठलेल्या स्पर्षास वाव नाही
घेवू नकोस आता ते नाव ओळखीचे
सोडून तू दिलेली ती वेळ पाळतो मी
दावू नकोस आता ते घाव ओळखीचे
गावात बांधलेला वाडा उजाड आहे
पाहू नकोस आता ते ठाव ओळखीचे
सोडून तू दिलेल्या डावात अर्थ नाही
खेळू नकोस आता ते डाव ओळखीचे
प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी
प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी
प्रिये , मी श्वान झालो तुझ्यासाठी
भुंकत राही अवती भवती
रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली
तुच वाहिली अन हाणली काठी
तरी भुंकत राही अवती भवती
प्रिये मी श्वान झालो तुझ्यासाठी
मोर होवुनी काय जाहले
होते नव्हते धुळीस मिळाले
श्वान होवुनी काय जाहले
होत ते पण मन पोळले
काण्याला सुंदरी मिळाली देवाघरी
त्याच्याबद्दल फक्त ऐकून होतो
वाटलं एकदा परखून पाहावं
म्हणूनच गेलो त्याच्या दारी
तो शांत उभा होता पाषाणात
मागितली एक सुंदरी , कुणालाही न पटणारी
थेट सांगितलं त्याला निक्षून
खरा असशील तर हीच गळ्यात दे बांधून
पूर्ण दिवस मंदिरात, उभा राहीन मी काणा बनून
लगेच तिथे घंटा वाजली
अर्थात , धोक्याची होती ते नंतर समजली
शोक कुणाला? खंत कुणाला?
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी
धडधड धडधड रान पेटते......
शोक कुणाला? खंत कुणाला?
चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती
लपलप लपलप ज्वाला उठती......
शोक कुणाला?खंत कुणाला?
पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे
भडभड भडभड पाने रडती....
शोक कुणाला? खंत कुणाला?
जन्माष्टमी२.*
कृष्णाच्या नांवे जो होतो आजकाल दहीहंडीचा खेळ
तो खेळण्या, पाहण्या सगळ्यांनाच असतो अमाप वेळ
पुन्हा पुन्हा जे कष्टतात, गोविंदांचे थर रचण्या
अनेक पाठीराखे, सम्राट असतात हजर त्यांचे प्रयत्न पाहण्या
कृष्णजन्म
कान्हा !
कुठून रे अक्षरं आणू?
कसे शब्द बांधू?
कश्या भावना गुंफू?
हजार नावं घेऊ?
का शब्दब्रह्म गाऊ?
तुळशींनी सजवू?
मनमखरात बसवू?
का पंचप्राणंच अर्पू?
सगळंच उष्टावलयंस तू ?
कशाचा नैवेद्य दाखवू?
निळाईसंग उत्तुंग आभाळी,
सावळदंग अभंग सावली,
मिस्कीलढंग अनंग माऊली,
मयूरपंखी रंग तुझ्या कपाळी ।।
महापूर
महापूर
वरुणराजाच्या अंतरी आले |
काळे मेघ जमा केले |
अचानक बरसु लागले |
भूमीवरी ||1||
पाऊस पडला मुसळधार |
तंव नद्यांना आला पूर |
बुडाली खेडी आणि शहरं |
तयांमध्ये ||2||
सांगली आणि कोल्हापूर |
तेथे आला महापूर |
कित्येकांचे घर संसार |
वाहून गेले ||3||
स्वरराधा
भैरव वा भटियार
पहाट फुलवत येती,
स्पर्श जणू कान्ह्याचे
राधेला उठवुन जाती.
ठाऊक तिला सारंग
माध्यान्ही झुलवत येतो,
"गंध" न त्यास स्वत:चा
तरि वृंदावनी घमघमतो.
यमन असा कान्ह्याचा
यमुनेचे श्यामल पाणी.
निनाद गोघंटांचा
सांज करी कल्याणी.
श्रावणसरी
।। श्रावणसरी ।।
भिजून गेल्या फांद्यांवरती, बसूनी सहजच गाती पक्षी,
अलगद जाई वाऱ्यावरती, सप्तसुरांची मोहक नक्षी ।
सुईसारख्या चोचींमधुनी, दशदिशांना निरोप जाती
साद घालती कोणा कळेना, दूरदूरची ओवून नाती ।
फुलांफुलांचे श्वास टिपुनी, दूरदूर हे वायू वाहती,
परागमोहित किटक येऊनी, मकरंदाची गाणी गाती ।
देवघर
देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला
पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला
दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला
बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला
देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते
त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते
अश्वत्थामा
।। अश्वत्थामा ।।
क्षितिजावर थबके रवि,
पोर्णिमेत रेंगाळे शशि,
एक न जाई ओटी,
दुजा रातीच्या कंठी,
एक तेजोमय गर्भ,
दुजा शांतीतच गर्क,
पूर्वेस वाजता शंख,
पृथ्वीस वाटते दुःख,
अवचित संध्याकाळी,
अवनीही होई हळवी,
कधी उजळें प्रकाशहाती,
कधी निथळें चांदणराती,
विधाताही निष्ठुर होई,
मग निर्णय कोण घेई?
(रगेल पावट्याचे मनोगत)
मूळ कवीता आशयसंपन्न आहे,हा फक्त साचा तिथून उचलला आहे...
*******
नेहमीच मुदलातून वाचण्याची नाही हौस
अफवा मूळ शोधण्याचा मज नाही सोस
मूळ बातमी शोधण्यात कसली आलीय (?) मौज
भरपेट मीठ मसाला सुद्धा मिळत नाही रोज
सोसायटीत (मला)ओळखीत कुणीच नाही
जालात तर नाव सुद्धा घ्यायचे नाही
विधायक पाहण्यात तर मला रस नाही
दिप पणती भेटण्याचा मला आनंद नाही
राखी.
ओळखीतल्या सगळ्या मुलांना राखी बांधणारी छोट्टीशी बाला,
काॅलेजमध्ये ज्याला टाळायचं त्यांनाच राखी बांधणारी मुग्धा.
रक्षाबंधनाचे मेसेज फक्त कझिन्स ग्रुपमध्ये टाकणारी प्रगल्भा..
आणि तो सरसकट सगळ्यांनाच फाॅरवर्ड करणारी प्रौढा..
"तिच्या" या चारही रुपांना एकत्र ओवणारी तरीही अलगद विलगणारी पण खुलवणारी,
ती राखी!
आसिंधू
स्वार्थापायी त्यांनी देशाचे केले तुकडे
नशिबी भूमातेच्या लिहिले केवळ दुखडे
मानाचा तो भगवा.... नि हक्काची भूमाता
आसिंधू अखंड आमुचा, आरक्त जाहला होता
काळ्या मातीच्या पायी लाली रक्ताची होती....
ते दृष्य शवांचे होते, ती जमीन केशरी होती....
ना धीर सोडला आम्ही, ना त्यांनी केली पर्वा
कष्ट उपसले कोणी, कोणाची झाली चर्चा!
कविता: बिबट्याचे मनोगत
सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस
भरपूर पर्यटनाची मज नाही सोस
माणसा सोबत संघर्षात नाही मौज
भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज
सोसायटीत ओळखीचे कुणीच नाही
म्हाडात तर घर सुद्धा घ्यायचे नाही
नाशिक पाहण्यात तर मला रस नाही
माणसं भेटण्याचा मला आनंद नाही
३३ कोटींची मुक्ती
मित्रांबरोबर हॉटेलात मनसोक्त हादडंपट्टी करताना, रस्त्यात उभी अतिशय कृश अशी सवत्स धेनु, आमच्याकडे, आमच्या खाण्याकडे बघताना दिसली. मग पुढे ती मनात बोलली अन् मी थोडं, तो हा सगळा शब्दपसारा .
" मुक्ती "
लज्जत न्यारी, पदार्थांची जत्रा,
सुटला ताबा, विचार न करता,
सळसळे जिव्हा, भुरके मारता,
रसा रसांना, वदनी स्मरता,
हसता खेळता, ब्रह्म जाणता,
धुरंधर
पेटता पेटता विझलो कधी
माझे मलाच कळले नाही
दिला होता शब्द खरा
पण काय ते नीट आठवलेच नाही
या स्मृतीला कोण जाणे
कुणाचा विखारी दंश झाला
जो तो ओळखीचा असूनही
इथे मलाच परका झाला
कोणता हात धरू मी ?
कोणता सोडून देऊ ?
या हातांच्या विळख्यातच
माझा नक्की कोणता ? तोच कळेनासा झाला
समजत होतो धुरंधर स्वतःला
वाळूचे विरहगीत
।। वाळूचे विरहगीत ।।
उन्हात चमके साज रुपेरी,
खेचत नेई ओढ ना टळे।
पसरुनी चमचम धरतीवरती,
पाहुनी रात्री चांदही चळे।
उधाण घेऊनी नायक येई,
भिजवुनी जाई अंगही बळे।
राग न यावा यात तिलाही,
सरसर लाटेमागुनी पळे ।
अर्ध्यामुर्ध्या खुणांत रुतवी,
निरोपांचे शंखशिंपले ।
जीव मोहरे येता भरती,
युगायुगांचा नवस फळे।
सुंदरसा तो पाऊस यावा
सुंदरसा तो पाऊस यावा
--------------------------
सुंदरसा तो पाऊस यावा
भिजून जावी सारी धरती
या मातीचा दरवळ व्हावा
इंद्रधनु उमटावे वरती
अशा धुंद त्या वातावरणी
तुझी नि माझी भेट व्हावी
त्या समयाची होऊन करणी
नजर हृद्गते थेट व्हावी
गुपित काही नच उरावे
पण ते दोघांनाच कळावे
मिटवून मग सारे पुरावे
जगापासून दूर पळावे
चार थेंब
चार थेंबांत संपेल
मग पाऊस तो काय,
चार शब्दांत मावेल,
मग माणसाचं मन ते काय,
संपलाही असता तो,
जर
प्रत्येक थेंबाला आभाळ मिळालं असतं,
मावलेही असते ते,
जर
प्रत्येक शब्दाला आयुष्य लाभलं असतं,
पण मग उरल्या थेंबांचं आणि शब्दांचं काय ?
-अभिजीत
- ‹ previous
- 52 of 468
- next ›