जे न देखे रवी...
(सकाळी सकाळी)
पेरणा अर्थात मनोज यांची सकाळी सकाळी
घाण उग्र भपकारा
लांबूनच आला
क्वार्टर टाकून आला
सकाळी सकाळी
फेसाळत्या सोड्यात
बर्फाचा मनोरा
लिंबू जाउन बसले
जरासे बुडाशी
पाय जड झाले
दृष्टी नाही डोळी
अवस्था ही झाली
सकाळी सकाळी
सकाळी सकाळी
कभिन्न काळा
मेघ भरून आला
बरसून गेला
सकाळी सकाळी
चहाच्या कपावर
वाफेचा मनोरा
तरी थंड आहे
जरासा बुडाशी
किती गर्द वाटे
धुके दाटलेले
दिसते न काही
सकाळी सकाळी
जरी खोल जावे
मनाच्या तळाशी
तरी आठवांचा
न सुटे येरझारा
एकांत निष्ठुर
अश्या दूरदेशी
उभा खिडकीपाशी
सकाळी सकाळी
शब्द
बोलणं जे जिवंत
कागदावर त्याचं प्रेत
बोलणं जे भाबडं मुक्त
कागदावर तेच अडचणीचं
बोलणं अधीर ओथंबलेलं कोवळं
कागदावर विचारपूर्वक शुष्क निबर
बोलणं गरमागरम लालबुंद
कागदावर डीप्लोमसीटाईप गुळमुळीत
बोलणं, वार्यावर विरून जाणारं
कागदावरचं, आयुष्यभर पायगुंता होऊन बसणारं
चुकलेली वारी..
आषाढ महिना लागला की आठवतात काळे मेघ ; त्या मेघांनाच दूत बनवणारे महाकवि कालिदास आणि मग वेध लागतात आषाढी एकादशीचे ,टाळ मृदंगाच्या जयघोषाचे ,विठ्ठलाच्या नामाचे, पंढरीच्या वारीचे.
अनादी .....अनंत.....
आयुष्याच्या वाटेवर एखादा अजाणता क्षण ज्यावेळी कठोरपणे थांबलेला असतो..
आणि काही प्रारब्धातील प्रश्नांची उत्तर शोधायला ही पर्याय नसतो..
त्यावेळी अचानक एखादा पर्याय उभा दिसतो..
त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..
जेव्हा, सगळं जग सोबत असतानाही आम्ही एकटे असतो..
आणि संसारिक दुःखात आम्ही पराजित होत असतो..
जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,
जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,
आणि तुला माझी खूप खूप आठवण येईल ना,
आणि तेव्हा जेव्हा आपण भेटू ना,
तू म्हणशील, "नमस्कार मॅडम!"
मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग तुझ्या बाजूला गाडीत बसेन.
"अगं, बेल्ट!"
मी मग चिडून बेल्ट लावेन.
"बोला!", तू म्हणशील.
मग मात्र मला रहावणार नाही.
मी तुझा गीअरवरचा हात हातात घेईन.
गालापाशी नेईन.
वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!
पावसाची सर जशी बरसून गेली
वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!
गुणगुणत होतीस का तू गझल माझी?
एक कोकीळा इथे गावून गेली!
नभ-नभाला देत होते आज टाळी
वीज अवकाशातुनी चमकून गेली!
आज पदरावर तुझ्या सजवू म्हणालो,
रात सारे चांदणे उचलून गेली!
गारव्याने भाव रोमांचीत झाले,
आठवांची गोधडी उसवून गेली!
—सत्यजित
माैन
शब्दांचा प्रवास
काहीच फर्लांग
माैनाचा थांग
निरंतर...॥
शब्दांचा अर्थ
कळे यथामती
माैनाची महती
कोणा कळे ॥
शब्दांचे शस्त्र
जिव्हारी घाव
अंतरीचा ठाव
माैन घेई ॥
शब्दांचे धन
उजळली आभा
माैनाचा गाभा
अंधारात ॥
असा भास होतो
आभास होतो कसा त्रास होतो
तू येत आहे असा भास होतो
स्मरतो गजरा केसात माळलेला
माझा कसा मोगरा श्वास होतो
डोळ्यात जादू तिच्या पेरलेली
जो पाहतो तो तिचा दास होतो
कळायचे मला ती न बोलताही
साथी कधी तोच मी खास होतो
असे कुणी का इतके आवडावे
जो जीवनाचा खरा ध्यास होतो
रूटीनाच्या रेट्यातही
रूटीनाच्या रेट्यातही
कधी थोडं वेडं व्हावं
दवबिंदूत इवल्या
ओलं ओलंचिंब व्हावं
कानठळी कोलाहली
अंतर्नादी गाणं गावं
प्रमेयाच्या पंखाखाली
व्यत्यासांना विसरावं
चारोळीनं महाकाव्य
पचवून ढेकरावं
धीट शून्यानं शतदा
अनंताला हाकारावं
अंतर
तुझं माझं हे दूर असणं
जसे नकाशावरचे दोन ठिपके.
आठवण करून द्यायला जणू,
की कितीही म्हटलं तरी झालोय परके.
तुझ्या माझ्या ठिपक्यांना, जोडणारी ती रेषा
नकाशात ती दोघांमधलं अंतर दाखवते.
पण सरळसोट नाहीच ती,
नात्यांसारखी तीसुद्धा नागमोडी वळते.
मला त्यात नात्याची एक उसवलेली वीण दिसते...
डॉ. माधुरी ठाकूर
भावंडं
'निसर्ग' वादळाचे तांडव आणि झाडं यांच्यातलं युद्ध मांडायचा एक छोटासा प्रयत्न...
।। भावंडं ।।
उन्हातान्हात राबायची
त्यांच्यासमोर वाकायची
घामावर पोसतापोसता
गडीमाणसं रापायची
तुकडा तुकडा ऊन खायची
घोट घोट सावली प्यायची
सुखदुःख कष्टात मिसळून
मजुरीही तरतरुन यायची
दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो.
दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो.
चंद्रास वाहिलेल्या रात्रीस मी मिळालो.
काळीज फाटले तेव्हा आसवे गळाली.
हा काळ त्या स्मृतींचा सोडून मी पळालो.
पाऊस वाजताना पाण्यात मी भिजावे.
तेव्हाच वाटलेले वाहून दु:ख जावे.
अस्तित्व सांधताना अंधारली निळाई.
विश्रब्ध वेदनांच्या ओघात मी जळालो.
कळ्या..
जपल्या होत्या
ओंजळ भरून कळ्या
परसातील वेलीवर
तुला फुले देण्यासाठी
दंवाचे माळून मोती
लेऊन वसने अंगभर
सोनेरी किरणांची
सजल्या होत्या कळ्या
पाकळ्या पाकळ्यांत
भरून गडद रंग
करून साठवण सुगंधाची
कळ्यांचे फुले झाली
भरली ओंजळ रिते अंगण
आणि दारावर मोठे कुलूप
गाव सोडून गेलेली तू
आत्ताच कळले मला
ती कळ्या देऊन गेली..
ती कळ्या देऊन गेली, चांदणे घेऊन गेली...
कवडसे तिरपे उन्हाचे सांडलेले
गणित वेळेचे प्रयत्ने मांडलेले
छेद त्या देऊन गेली, चांदणे घेऊन गेली..
शब्द होते, सूर होते भोवताली
गीत जुळले अन् अचानक सांज झाली
गझल ती ठेवून गेली, चांदणे घेऊन गेली..
क्षण जरी गेले उडोनी कापुराचे
दरवळे पण दार अजुनी गोपुराचे
कोपरा उजळून गेली, चांदणे घेऊन गेली..
तू गेल्यावर
नाही वेलीवर फुल उमलले तू गेल्यावर
कुंडी मधले रोपही सुकले तू गेल्यावर
पाणी नाही रखरख आपले शिवार झाले
मेघ गरजले नाही बरसले तू गेल्यावर
तुळशी वाचून उदास नुसते अंगण दिसते
कुठे रांगोळी नाही सजले तू गेल्यावर
ओळख माझी तुझ्या मुळेच ही जगास झाली
माझे असणे मागे हरवले तू गेल्यावर
अस्पर्शिता..
अस्पर्शिता एक राधा मानसीं दडून आहे..
रिक्त रुक्ष ओंजळीच्या रसतळीं भरुन वाहे..
वठला जरी तरु तो वैशाख अग्निदाहे..
नि:शब्द भावनांचे तृण-अंकुर गर्भि वाहे..
वनवास वाटचाल पायातळीं निखारे..
अंतरी परि चित्ताच्या श्रीहरी नित्य पाहे..
होरपळे तनु विरहाचा वैशाख-दाह साहे...
हृदयी परि गोविंद मीलनाची आस आहे..
आमंत्रण
ओथंबल्या आभाळाला
स्वप्न हिरवं पडलं
त्याच्या दिठीत मावेना
तेव्हा धरतीला दिलं
वीज झेलण्या झुरतो
माथा बेलाग कड्याचा
कुरणांच्या पटावर
आज डाव पावसाचा
रिमझिमत्या ढगाच्या
पैंजणांची रुणझुण
सृजनाच्या सोहळ्याचे
ओलेचिंब आमंत्रण
पाऊस
! पाऊस !
नभ आलं अंधारुन
वाराही झाला बेभान
टप टप टपोर्यांची
झाली भुमीवर पखरण,
जाणुनी भेटी लागी आस
भुमी कुशीत घेई त्यास
मृदगंध तो दरवळे
लागे एकमेका सहवास,
थेंब कुशीत हो निजला
रोपें अंकुर हो धरला
नवथर अवनीने
शेला हिरवाईचा हो ल्याला,
- ‹ previous
- 40 of 468
- next ›