जे न देखे रवी...
काहीतरी सलत असतं...
काहीतरी सलत असतं
आपणास मात्र कळत नसतं
कुणाच्यातरी आठवणीने मन
आतल्याआत जळत असतं
होवून कधी बेभान
झुलत असतो
फुलासारखं आपण सुध्दा
फुलत असतो
कुठल्याश्या भासापाठी मन सारखं पळत असतं.
अशीच एक धुंद, सोनेरी सायंकाळ - (आणि अंतिम वगैरे सत्य)
अशाच एका धुंद, सोनेरी संध्याकाळी
सहज फिरायला निघालो होतो
सहज मंजे मुद्दामच …
– मला स्वतःशीच मोठ्याने बोलण्याची खोड आहे
– घरात उगाच तमाशा नको म्हणून बाहेर पडलो.
नकळत पाय तळ्याकाठच्या शांत रस्त्यावर वळले
– मनात तात्त्विक वगैरे विचार घोळत होते.
कोs हं ? … मी कोण आहे ?
मै कौन हूँ ? व्हू आयाम ?
आणि बाकी शून्य...
तुझा फोन आला ना की,
चेह-यावर molar to molar हसू उमटतं..
हातातलं काम तिथंच थांबवत मी तव्याखालचा विस्तव विझवते.
केसांची बट मागे सारत स्वतःला उगा आरशात निरखते.
मग फोन घेऊन मी कोलाहलापासून दूर बाल्कनीच्या कोप-यात जाते.
आणि रिंग थांबायच्या जssस्ट आधी हॅलो म्हणते.
सुरवातीची औपचारिक चौकशी आटपून तू पटकन कामाकडे वळतोस.
माझं हसू तीन चतुर्थांश होतं..
लिही रे कधीतरी...
लिही रे कधीतरी.
काहीही, अगदी काहीssही चालेल.
पत्र, कविता, दोनोळीची चिठ्ठी पण पळेल.
पण कागदावरच्या शाईला हुंगता आलं पाहिजे.
शब्दांवर बोट अस्संss फिरवता आलं पाहिजे.
मग कान्याच्या मागे खांब खांब खेळेन,
वेलांटीच्या तळ्यात डुबकी मारेन.
अनुस्वाराच्या डोक्यावर हलकी थाप..
मात्रेवर चढताना लागेल धाप..
खोडलेलं अक्षर पाहून विचारात पडेन,
विसरु नकोस नाते
नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही
स्वप्नातले गाव इतके व्यापू नकोस बाई.
सुगंध वाऱ्यावरती पोचला कधीचा
श्वासास दोष इतका देवू नकोस बाई.
वाटेल जगावेगळे वागणे जेव्हा माझे
विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई.
मिसळून रंग तुझा मी रंगलो कधीचा
विसरुन स्वप्न कोवळे जावू नकोस बाई.
---- अभय बापट
हा उन्हाचा गाव आहे.
हा उन्हाचा गाव आहे, रापलेली माणसे
का अशी ही श्रावणाने शापलेली माणसे?
पाहतो तो हर घडीला चेहरा वाटे नवा
चेहऱ्याला रंग फसवे फासलेली माणसे.
शेत कसवी तोच येथे, का उपाशी राहतो?
का इथे ही भाकरीने ग्रासलेली माणसे?
जात धर्माच्या इथेही पेटता या दंगली
पाहिली मी माणसाने छाटलेली माणसे.
लाच घेऊनी अता विकती इमान आपुले
विसरून जाऊ सारे.....
गुलाबी थंडी
हवेत गारवा
अंगावर रग
शेकोटीची धग
संक्रातीचा सण
सुगडाचं वाण
सवाष्णी सोळा
काळी चंद्रकळा
तीळाचा हलवा
हलव्याचे दागिने
तीळाचं दान
बाळाचं बोरन्हाण
बाजरीची भाकरी
तीळाची पेरणी
लोण्याचा गोळा
खिचडीचा मान
गुळाची पोळी
तीळाची वडी
हलव्याचा काटा
वाढवतो गोडी
पूर्वसंचित
होत खळाळता प्रवाह
नदीच्या अंगा खांद्यावर
इवलेसे मुलं होऊन खेळावं
होत चमचमता प्रकाश
रात्रीच्या नभ अंगणात
शुभ्र टिपूर चांदणं व्हावं
घेत मखमल अंगावर
घुटमळत मनाच्या पायरी
लाडकी मांजर व्हावं
मांडावं, पुसावे कागदावर
पुढच्या वळण वाटेचे
जुळवत हिशोब राहावं
मावळतीची दिशा....
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
निसटल्या क्षणांना पुन्हा धरावे
पारंब्या वरती झुलता झुलता
पदराखाली पुन्हा लपावे
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे
आठवणीतले विस्मृत चेहरे पुन्हा एकदा तरी दिसावे
डोळ्या मधले दवबिंदू अन् चेहर्यावरले धुके पुसावे
मनात माझ्या
तुझ्या बटांतून अवखळ वारा
छेदित जातो सळसळ पाने
मनात माझ्या तुझ्या ओठीचे
अल्लड आणिक अचपळ गाणे
नदी वळावी कटी पाहूनी
ओठांवरती लाली नभाची
मनात माझ्या कवेत घ्यावी
मोहक मूर्ती तुझ्या तनाची
फिकेच पडती सागर येथे
इतुके चंचल नयनी पाणी
मनात माझ्या खोल आतवर
तुझ्या प्रीतीची अबोल वाणी
खजिना
होतात निरुत्तर प्रश्न
त्या तिथे अचानक जावे
शब्दांचा मांडुनी खेळ
तर्कास जरा डिवचावे
तर्काचे पडतील मोडून
मग सुघड, नेटके इमले
पडझडीत येईल हाती
शब्दांच्याही पलिकडले
तो अनवट खजिना येता
हातात क्षणार्धापुरता
मागणे अधिक ना उरते
चांदण्यात सचैल भिजता
काय होते अंतरी...
पाहुनी हसताच तू काय होते अंतरी
बावरा हा जीव माझा भिरभिरे कोठेतरी.
चांदण्यांचे तेज गाली
या फुलांची ओठी लाली
तू बटांना कुरवाळता
बघ हवेची झुळूक आली
वादळे तू कुंतलाना सोडता वाऱ्यावरी.
चाहुलीनं या तुझ्या
बघ पान पान बहरतं
दव भिजले गवत
तव पावलानं बिलगतं
गंध लेवूनी तनूचा बघ फुले ही बावरी.
बँक आफ दरोडा !
चोरांनी बॅंकेत बसूनच चर्चा केली अन् नंतर २० रुपयांचे लाखभर चिल्लर; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - https://maharashtratimes.com/maharashtra/raigad/a-robbery-took-place-at-...
नववर्ष नवहर्ष
नववर्ष
नवहर्ष
नवदर्श
मनी
नवा भास
नव आस
नवा श्वास
मनी
नव शब्द
नव लुब्ध
नवप्रारब्ध
मनी
नव वक्त
नव शक्त
नव मुक्त
मनी
नव दिसणं
नव असणं
नवा जश्न
मनी
नव पर्व
नव सर्व
नवा सूर्य
मनी
नव सव्य
नव भव्य
नव काव्य
मनी
दिस सरतो असा...
दिस सरतो असा, आठवांचा ठसा, मिटून चालला
दिस सरतो असा, पाखरांचा थवा, उडून चालला.
दिस मेघापरी झरुन चालले
दिस वाळूपरी सुटून चालले
दिस सरतो असा, स्वप्नांचा दिवा, विझून चालला.
दिस गंधापरी विरून चालले
दिस रंगापरी पुसून चालले
दिस सरतो असा, या फुलांचा पसा, लुटून चालला.
कोलाहल !
कोलाहल !
सायकलची बेल, दुचाकी चारचाकी चे हॉर्नस
ट्रक चे कर्कशः ब्रेक, वेगाचे आवाज
ट्रामच्या दाराची उघड झाक , हेलिकॉप्टरची झार झार
ट्रेन च्या प्लॅटफॉर्म वरची अनाउन्समेंट ,
मधेच ऍम्ब्युलन्स चा सायरन ,
सगळीकडे गडबड, धांदल, गोंगाट,किलबिलाट !
(झाली किती रात सजणी...)
मुळ कवी दिपक पवारांची क्षमा मागून....
(आली जरी रात सजणी...)
झाली किती रात सजणी, नावडे मजला "थांब जरा येते", सांगणे.
अधिरला जीव माझा, असे कसे तुझे हे वागणे.
खडबड, खडबड आवाजास, ताल देती तुझी काकणे.
आली जरी रात सजणी...
आली जरी रात सजणी पण नभी हे चांदणे
तुझिया मनातील गुज मज सांगती तव कंकणे.
हा गार वारा बिलगता झाकता तू लोचने
हे मेघ ही बरसले तव पाहता ते लाजणे.
का डोलती या लता? ही वाट झाली धुंद का?
तू चालता छेडताती सुर तुझी ती पैंजणे.
डोळ्यात डोळे मिसळुनी तू मला गे पाहता
नाही जरी बोललो हृदयात या झंकारणे.
पुन्हा
कालचक्र उलटे फिरले अन्
पुन्हा जन्मलो
जुन्या चुका विसरून नव्याने
करून बसलो
काचपात्र भंगले तरीही
जोडत बसलो
मुखवट्यांस समजलो चेहरे
तिथेच फसलो
अढळपदी उल्का बघताना
जरी कोसळलो
डोळे कितिदा आले भरूनी
तरीही हसलो
बेचिराख होता होता मग
पुनश्च रुजलो
- ‹ previous
- 14 of 467
- next ›