९९ वर्ष्यानंतर

आंद्रे वडापाव's picture
आंद्रे वडापाव in जनातलं, मनातलं
17 May 2023 - 10:27 am

माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु'
दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु.
हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते.
'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार)
'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे. (सरकारी मोजमापानुसार)

आणि दोन्ही CAGR कमी होत आहेत (सरकारी मोजमापानुसार)..

तरीही असे समजूयात , हे आजघडीला जे CAGR आहेत ते पुढील ९९ वर्षे स्थिर राहतील, (आहे त्या लेव्हललाच राहतील) ('हिं' CAGR = १.९%, 'मु' CAGR = २.४%)
तर ऑनलाईन कॅलक्युलेटर वापरून, गणित केले असता खालील उत्तरे मिळाली.

९९ वर्ष्यानंतर
ऍसेट् हिं = ५७० रु
ऍसेट्स मु = १५७ रु

ऍसेट् हिं ९९ वर्ष्यानंतरसुद्धा, माझ्या पोर्टफोलिओमधील , ऍसेट्स मु च्या साडे तीन पट पेक्षा जास्त राहील.

बाकी तुमचं चालू द्यात...

National Family Health Survey, India
##http://rchiips.org/nfhs/index.shtml

##http://easy-calc.com/financial-calculators/CAGR/Calculate-Final-Amount

धोरणमांडणीवावरप्रकटन

प्रतिक्रिया

हा धागा आणि काही प्रतिसादांचा मुळ पायाच गंडलेला आहे. त्यामुळे निष्कर्षही वांझोटा आणि व्यवहाराला धरुन नाही.

मुळातच हा विषय 'मु' यांचे उपद्रवमुल्यामुळे सुरु झाला आहे.
१. प्रत्येक समाज, माणुस आणि त्याची मुल्ये वेगळी असतात. त्यामुळे १ 'हि' घेतला आणि १ 'मु' घेतला त्यांची बरोबरी करुन उत्तराची बेरीज शुन्य केला असा प्रकार दाखवण्याचा उद्योग आहे. व्यवहारात असे होत नसते.

२. मालमत्ता (असेट्स) सजीव नसतात, ती स्वत:हुन काही निर्णय घेत नाही. माझ्या माहितीत कोणत्याही मालमत्तेची हानी झाली म्हणुन मानवी हक्काची ओरड होत नाही.

३. 'मु' यांचे उपद्रवमुल्य भरपुर आहे. १० टक्के 'मु' ९० टक्के सभ्य समाजाला भारी पडु शकतात. कारण गुन्हेगाराला फक्त गुन्हा करायचा असतो. संरक्षकांना तो थांबवायचा असतो. ते कुत्र्यांचे शेपुट कितीही वेळ नळीत ठेवले तरी सरळ होत नाही. हे दंगलीच्या वेळी चांगले जाणवता

४. घटना ही भारतीय समाजाने तयार केली आहे. ती जेव्हा भारतीय समाजाला गरज पडेल तेव्हा बदलता येऊ शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे घटनेच्या मुळ पायाला धक्का लावता येऊ शकत नाही ह्या युक्तीवादाला फारसा अर्थ नाही.
जेव्हा जेव्हा सनदशीर मार्ग बंद होतात तेव्हा त्याची जनतेमध्ये खुप दुरोगामी आणि अनपेक्षित परिणाम होऊ शकतात.

५. जेव्हा फाळणी झाली तेव्हाच जर लोकसंख्येची अदलाबदल झाली असती तर भारतीय समाजाचा कितीतरी वेळ, साधनसामुग्री वाचली असती. भारताने एक सुवर्णसंधी गमावली.

६. जर फाळणी ही मालमत्तेचा खटला आणि निकाल म्हणुन पाहीला तर 'मु' समाजाचा भारतावर कोणताही हक्क उरत नाही. त्यामुळे त्यांचे इतर हक्क आणि अधिकार न्याय्य नाहीत.

७. माझ्या अनुभवानुसार 'मु' हा फक्त अल्पसंख्याक असे पर्यंत धर्मनिरपक्ष / पंथनिरपेक्ष असतो. धागाकर्त्याचे जर या विषयी मतभेद असेल तर त्यांचा विदा द्यावा. अगदी मनमिळावु 'मु' त्याच्या पंथावर टिका करत नाही, त्यांचे सहपंथी सोडुन इतरांना साथ देत नाही. जास्तीत जास्त तो गप्प राहतो.

८. काही शहामृगी शाकाहारी माणसांना वाटते की मी शाकाहारी आहे त्यामुळे मी जंगलात गेलो तरी मला कोणी खाणार नाही. पण तसे नसते. खाणारा / मारणारा शाकाहरी किंवा मांसाहरी असा भेद करत नसतो.

चौकस२१२'s picture

22 May 2023 - 4:55 am | चौकस२१२

७. ८. लै भारि बोललात

चौकस२१२'s picture

2 May 2024 - 4:08 pm | चौकस२१२

६,७,८ सहि रे सहि
जगात मु या "आस" ए ट" चे सगळ्यांशी भांडंन "ज्यू" म्हणू नका "खी" म्हणू नका "बु" म्हणू नका ...

डँबिस००७'s picture

21 May 2023 - 3:27 pm | डँबिस००७

वाळुत डोक खूपसुन बसणार्याची काय वाट लागते हे वेळोवेळी ऊदाहरणाने मू समाजाने दाखवून दिलेल आहे.
काश्मिरमध्ये पंडीतांचा नरसंहार करणार्या अतिरेक्यांना पंडीत लोकांचा ठाव ठिकाणा त्यांच्यांच शेजार्यांनी /ओळखीच्या लोकांनी दिला होता. अनेक वर्षे हिंदु पंडीतांकडुन ह्या मू शेजार्यांनी पैश्याची मदतही स्विकारलेली होती, पण वेळ येताच पंडीतांच्या मानेवर सुरी फिरवताना त्या सर्व उपकाराची आठवण सुद्धा आली नाही. पगार तयार आहे अस खोट सांगुन गिरीजा टिक्कुला कॉलेज मध्ये बोलावणारी तीची मू मैत्रीणच होती. पुढे गिरीजा टिक्कुचा गँग रेप केला गेला व तिला लाकडाच्या वखारीत नेउन तिचे सॉ मशिनवर जिवंत असताना दोन तूकडे केले !! अशी अनेक उदा आहेत. सर्वच ईथे सांगत बसत नाही.

तामिळनाडुतल्या आलाथूर तालूक्यात मू समाजाने आपली लोकसंख्या ६५% पेक्षा जास्त होताच, नारायणमंगलम गावातील मंदिराच्या सर्व कार्यक्रमावर बंदी आणली.
ताना सरकारला काहीही फरक पडला नाही, शेवटी न्यायालयाने दखल घेउन बंदी परतवली.

९९ वर्षांची वाट बघत हिंदु समाजाची दिशाभुल करत रहा. एखाद्या गिरीजाचा श्राप आपल्या डोक्यावर घ्या !!

डँबिस००७'s picture

24 May 2023 - 5:30 pm | डँबिस००७

कर्नाटकात कॉंग्रेस सरकार येताच, भारतातुन आपले चंबुगबाळे आवरलेल्या "अँन्मेस्टी ईंडीया" ने कर्नाटक कॉंग्रेस सरकारला पत्र लिहुन तीन गोष्टींची मागणी केलेली आहे.
१. भारतीय न्यायलयाने संमत केलेली
शाळा कॉलेजातली हिजाब बँदी उठवावी.
२. गो मांसावरची बंदी मागे घ्यावी.
३. मु दुकानांवर बहीष्कार घालणार्या हिंदुवर कारवाई करण्यात यावी.

भाजपाला मत न दिल्यामूळे हिं समाजावर होणारे परीणाम ईतक्या लवकर दिसु लागतील असे वाटले नव्हते.

डँबिस००७'s picture

24 May 2023 - 5:30 pm | डँबिस००७

एक विचारवंतांची विचारपूर्वक मुलाखत ..
शेठ द्वेषींना पचणार नाही म्हणा

https://www.youtube.com/watch?v=sVtqY3XLd9Q

इपित्तर इतिहासकार's picture

23 Jun 2023 - 9:12 am | इपित्तर इतिहासकार

धागा काढणाऱ्याला शेअर मार्केटची अलंकारिक भाषा काढून

"NFHS सर्व्हे नुसार पाहता मुसलमान लोकसंख्या वाढणार नाही, अन् तशी भीती निराधार आहे"

इतका सोपा दोनोळी विषय क्लिष्ट जडजांबल का करावा वाटला ते कळत नाही.

Keep it simple silly, हे तत्व काथ्याकुट सदरात कम्पल्सरी करून टाकावे चालक मालकांनी.

अन् इतकं सिंपल म्हणणं उगाच द्राविडी प्राणायाम करून मांडल्यामुळे नेहमीच्या यशस्वी खेळाडूंना फुल टॉस दिल्यासारखे झाले हे....

बाकी काय आपापले एजेंडा धरून सगळेच "चालू" आहेत.

चांगभले.

जाहीर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होणार याची उत्सुकता होतीच. कारण विकिपीडिया सारखे मिपा काही नियंत्रित माध्यम नाही. माहितीची खातरजमा करणं, माहितीची सत्यता जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत तिला स्वतःच्या तर्काच्या आधारे खरं खोटं समजावं अशी सूचना देणं, खोटी माहिती स्वतःहून काढून टाकणं आणि संबंधित सदस्यांवर लक्ष ठेवणं अशा सुविधांचा अभाव असतांना राजकीय चर्चा होणार नाही हे धोरण सदस्यांच्या सद्सदविवेकबद्धीवर सोडल्यासारखे दिसले. परंतु संपादक मंडळाच्या धोरणाची चिकित्सा करण्याचं कुठलं धागारूपी व्यासपीठ नव्हतं. या राजकीय सदृश्य धाग्यावरील चर्चा सुरु झाल्यामुळे या संधीचा फायदा उठवावा असं ठरविलं.

सर्व प्रथम माझा आय डी धारातीर्थी पडण्याचा संभव आहे. परंतु आपण कोणी लोकोत्तर आत्मा आहोत असा काही समज नसल्यामुळे हा प्रतिसाद देत आहे.

संपादक मंडळाच्या आक्षेपांमध्ये दोन मुद्दे आहेत. त्यामध्ये इतर मिपा सदस्यांचा मान ठेवला जात नाही असा पहिला मुद्दा. हा मुद्दा खूपच धूसर आहे आणि संपादक मंडळाच्या निष्पक्ष असण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. सदस्य एकमेकांचा मान ठेवत नाही असं म्हटलं असतं तर वाद घालणाऱ्या दोन्ही सदस्यांना सारखं वागवलं जातंय असं वाटलं असतं. पण नाही. संपादक मंडळाला एक विशिष्ठ विचारसरणी आणि त्या विचारसरणीची माणसं जवळची वाटतात हे त्यांच्याच वाक्याने स्पष्ट झाले. कदाचित तोच संपादक मंडळाचा उद्देश असावा.

दुसरा मुद्दा आहे तो राजकीय मंडळींचा मान ठेवण्याचा. खरं तर गेल्या काही वर्षात नोटबंदी आणि लॉकडाऊनचा अतिरेक वगैरे गोष्टी बघितल्या तर सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ खेळणारे हे निर्णय होते. माणूस करवादून अगदी देवाला देखील शाप देतो आणि इथे राजकीय नेत्यांचा मान राखण्याचा मुद्दा अधोरेखित करावा हे जरा जास्तच झाले. त्यातही महात्मा गांधी, नेहरू, राजीव गांधी, आणि मनमोहन सिंग यांच्यावरील गाळीव रत्ने अजूनही मिपाच्या खजिन्यात असतील. तेव्हा पहिल्या मुद्द्यासारखाच हाही मुद्दा ते ”आदरणीय” नेते कोणते हे न सांगताही समजण्यासारखे आहे.

मिपा प्रशासन आजही सरंजामी मानसिकतेत आहे आणि मिपा सदस्य उपकृत असण्याच्या अंमलाखाली. हे दोन्ही जोखड जातील तो सुदिन.

इतर मिपा सदस्यांचा मान ठेवला जात नाही असा पहिला मुद्दा.

चर्चा करणारा सदस्य (कधी कधी) इतर (बाकीच्या काही) सदस्यांचा न ठेवता वैयक्तिक आक्रमण किंवा ताशेरे लिहितात असा अर्थ मला तरी जाणवला. त्यात परस्परांना किंवा अन्य काही रचनेने फार फरक पडला असता असे कल्पूनही वाटत नाहीये.

नीलकांत आणि प्रशांत यांना मी अत्यंत दीर्घकाळ जाणत असल्याने ते कोणत्याही बाजूने दूरान्वयानेही बायस्ड नाहीत हे निश्चित माहिती आहे. सरंजामशाही मानसिकता वगैरे फार दूरची गोष्ट. इतका मोठा प्लॅटफॉर्म सांभाळणे ही मोठी जबाबदारी आहे. बहुतांश सर्व सदस्य अनामिक असताना आणि हे व्यवस्थापक मात्र उघड असताना अनेक निर्णय घेण्यामागे जी विचार प्रक्रिया असते ती आपल्याला, म्हणजे इतर सदस्यांना दिसणे अशक्य आहे. त्यामुळे अनेक आरोप होऊ शकतात, होत असतातच. त्याचे प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देणे म्हणजे अधिकच गुंतागुंत होऊ शकते. काही बाबतीत सर्व बाजूंनी सम्यक मोजून मापून समान कारवाई होत नसेलही. पण तसा कोणताही प्लॅन किंवा हेतू असण्याची मला त्या लोकांबाबत काडीचीही शंका नाही. समाजात जे आणि ज्या प्रमाणात (पर्सेंट) आहे ते तत्सम प्रमाणात इथे प्रतिबिंबित होते. त्यात जाणून बुजून घडवलेला बायस नसतो हे नक्की जाणवले आहे.

तेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणे अधिक योग्य ठरेल अशा विचाराने आजवर इथे वावर ठेवला आहे.

धागालेखक नेहमीप्रमाणे तोच विषय काढुन पळुन गेला आहे.

अगम्य's picture

25 Jun 2023 - 5:22 am | अगम्य

आंद्रे वडापाव साहेब, तुमची गृहीतके आणि गणित चुकले आहेत.
STATISTA चा आलेख "live births per woman " देतोय - म्हणजे प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्यभरात किती अपत्ये जन्माला घालते ती संख्या. हे % नाही. ही संख्या विविध धर्मांत १.४ ते २. आहे.
UN World Population Prospects चा आलेख दर १००० व्यक्ती (ह्यात जवळपास ५०० स्त्रिया असतील) दर वर्षी किती अपत्ये जन्माला घालतात ती संख्या देतोय. भारतासाठी ही संख्या जवळपास १४ आहे. हे सुद्धा % नाही. ह्या संख्या विविध धर्मांसाठी वेगवेगळ्या दिलेल्या नाहीत.
आता हिंदू आणि मुसलमान ह्यांची तुलना करूया.
आज जन्मलेला एक मुसलमान मुलगा आणि एक मुसलमान मुलगी मिळून २५ वर्षांनी २.४ मुले जन्माला घालतील.मुलग्याला ० मुले होतील. मुलीला २.४ मुले होतील. त्यानंतर २५ वर्षांनी ती २.४ मुले त्यांच्या २.४ जोडीदाराबरोबर प्रत्येक जोडप्यामागे २.४ म्हणजे एकूण ५.७६ मुले जन्माला घालतील. म्हणजे दर २.४ व्यक्तींमागे ५.७६/२ = २. ८८ मुले जन्माला घालतील अशा प्रकारे
जर १०० वर्ष कुणी मेलंच नाही तर
२५ वर्षांनी २ + २.४
५० वर्षांनी २ + २.४ + २. ८८
७५ वर्षांनी २ + २.४ + २. ८८ + २. ८८ x २.४/२
१०० वर्षांनी २ + २.४ + २. ८८ + २. ८८ x २.४/२ + २. ८८ x २.४/२ x २.४ /२ = १४.८८ इतक्या मुसलमान व्यक्ती असतील (आत्ताच्या दर दोन मुसलमान नवजातांमागे ) म्हणजेच १४.८८/२ = ७. ४४ पट
आता हिंदूंचा हिशोब करू
आज जन्मलेला एक हिंदू मुलगा आणि एक हिंदू मुलगी मिळून २५ वर्षांनी १.९ मुले जन्माला घालतील.मुलग्याला ० मुले होतील. मुलीला १.९ मुले होतील.
जर १०० वर्ष कुणी मेलंच नाही तर
२५ वर्षांनी २ + १.९
५० वर्षांनी २ + १.९+ १.८०५
७५ वर्षांनी २ + १.९+ १.८०५ + १.८०५ x १.९ /२
१०० वर्षांनी २ + १.९+ १.८०५ + १.८०५ x १.९ /२ + १.८०५ x १.९/२ x १.९ /२ = ९.०५ इतक्या हिंदू व्यक्ती असतील (आत्ताच्या दर दोन हिंदू नवजातांमागे ) म्हणजेच ९.०५ /२ = ४.५३ पट

आज जर १५ मुसलमान जन्मले तर १०० वर्षांनी त्यांचे १५ x ७. ४४ = १११.६ होतील
आज जर ८० हिंदू जन्मले तर १०० वर्षांनी त्यांचे ८० x ४.५३ = ३६२. ४ होतील
तसेच १०० व्यावर्षी १.८०५ x १.९/२ x १.९ /२ x ८०/२ = ६५.१६ हिंदू मुले जन्मतील आणि २. ८८ x २.४/२ x २.४ /२ x १५/२ = ३१.१ (हिंदूंच्या जवळपास निम्मी) मुसलमान मुले जन्मतील

ह्या गणितात अर्थातच अति सुलभीकरण आहे, काही गृहीतके आहेत. एक पुरुष आणि एक स्त्री मिळून अपत्ये जन्माला घालतात असे गृहीत धरले आहे. मुसलमानांमध्ये बहुपत्नीत्व कायदेशीर आहे. जर एक पुरुष आणि दोन बायका असे धरले तर तीन व्यक्ती मिळून ४.८ मुले जन्माला घालतात असा हिशोब होईल . त्या हिशोबाने मुसलमानांची संख्या अधिक वाढलेली दिसेल. आता नैसर्गिकरीत्या पुरुष आणि स्त्रिया सारख्याच प्रमाणात जन्माला येतात. तर दर एका मुसलमान पुरुषामागे दोन स्त्रिया कोठून येतील हे विचारू नका. तो गणिताचा प्रांत नाही. ही प्रतिक्रिया फक्त गणित समजावून सांगण्यासाठी दिली आहे. जर कुणाच्या भावना दुखावत असतील तर हिंदू मुसलमानांच्या जागी वाघ , सिंह, पांडा , शहामृग वगैरे आपापल्या आवडीप्रमाणे वाचावे.

आंद्रे वडापाव's picture

25 Jun 2023 - 7:24 am | आंद्रे वडापाव

"NFHS सर्व्हे नुसार पाहता मुसलमान लोकसंख्या वाढणार नाही, अन् तशी भीती निराधार आहे"

(इपित्तर इतिहासकार यांच्या सौजन्याने)

इपित्तर इतिहासकार's picture

25 Jun 2023 - 7:43 am | इपित्तर इतिहासकार

१०/१०, पाल्हाळ न लावता म्हणणे मांडण्याची कला लवकर आत्मसात केल्या बद्दल. LoL.

अगम्य's picture

25 Jun 2023 - 11:21 am | अगम्य

मग सरळ तेवढंच म्हणायचं. एक बातमी म्हणून त्या सर्वेची माहिती द्यायची. सर्वे विश्वासार्ह की अविश्वासार्ह हे लोक त्या सर्वेबद्दल बघून घेतील.
तुम्ही Data दिला आणि त्याचे चुकीचे interpretation केले. birth rate आणि CAGR ह्यांची गल्लत करून चुकीचा निष्कर्ष काढला म्हणून मी तुमच्या गणिताबद्दल प्रतिक्रिया दिली. तुम्ही दिलेल्या data नुसार गणिताप्रमाणे काय ट्रेंड दिसेल ह्याचे back of the envelope calculation मी दिले आहे .
इथे लोकांची मते बदलणे शक्य नाही. ह्या गणिताचे उत्तर तुम्हाला आवडत नसल्यास इतर कुठलाही सर्वे, गप्पा, रिपोर्ट , भाषण ह्यांचा आधार घेऊन तुमच्या मनातला निष्कर्ष जो आहे त्याला चिकटून राहण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. फक्त चुकीचे गणित करून त्याचे समर्थन करायची गरज नाही.

अगम्य's picture

25 Jun 2023 - 11:41 am | अगम्य

किंवा तुम्ही तुमच्या समजुतीनुसार गणित केले तेही ठीक. स्वतः विचार करून निष्कर्ष काढणे चांगली गोष्ट आहे. फक्त त्यात जर काही चूक/उणीव असेल तर ती जाणून घ्यायची इच्छा आणि मान्य करण्याचा मोकळेपणा बऱ्याच जणांकडे असतो. तुमच्या बाबतीत तुम्ही स्वतंत्र आहात. चर्चा वाचणाऱ्या इतर कुणाला प्रतिक्रियेतल्या गणितात रस वाटला तर आनंद आहे.

कॉमी's picture

25 Jun 2023 - 11:31 am | कॉमी

१. Fertility rate मुसलमानांचा सर्वात वेगाने कमी झाला आहे गेल्या सर्व्हे नुसार. हिंदू व मुस्लिम रेट मधली दरी कमी होत आहे, सातत्याने, प्रत्येक सर्व्हे मध्ये. जर प्रोजेक्षन करायचे असल्यास ह्या पडणाऱ्या दरीचे पण करा. मनाप्रमाणे ट्रेण्ड निवडून तितकेच प्रोजेक्ट करणे कसे योग्य आहे ?

२. बहूविवाह हिंदू मुस्लिमांचा जवळपास सारख्या प्रमाणात होतो.

अगम्य's picture

25 Jun 2023 - 12:27 pm | अगम्य

हे back of the envelope calculation आहे. Fertility rates सध्या आहेत तसेच स्थिर राहिले तर काय होईल हे प्रोजेक्ट केले आहे. बदलणाऱ्या rates ची आकडेमोड जास्त गुंतागुंतीची होईल. त्याही पुढे जाऊन फर्टिलिटी रेट कमी होण्याचा रेट हा ही अंतर्भूत करू शकता येईल. ह्याला एक प्रकारचा bound म्हणून बघता येईल.
बहुपत्नीत्व ह्या बाबतीत हिंदू आणि मुसलमानात कायदेशीर फरक आहे.ह्या बाबतीतला प्रत्यक्ष डेटा मला माहित नाही. त्यामुळे ह्या फॅक्टरमुळे फरक पडू शकतो हे फक्त नमूद केले आहे. पण प्रत्यक्ष आकडेमोडीत बहुपत्नीत्व धरले नाही.
मुळात वडापाव ह्यांनी दिलेला डेटा interpret करण्यातच इतका गोंधळ होता की तो डेटा कसा interpret करून calculation मध्ये वापरता येईल हे दाखवणे हा मुख्य उद्देश होता. ह्यात जितके अधिक parameters घालाल, आणि डेटा जितका अचूक असेल, आणि अधिकाधिक गुंतागुंतीचे calculation कराल तसा अधिक चांगला निष्कर्ष निघेल.

तुम्ही चांगला मुद्दा मांडला आहे म्हणून पुन्हा डेटा पाहिला . शेवटच्या तीन डेटा पॉईंट्स मध्ये मुसलमानांचा फर्टिलिटी रेट ३. ४ वरून २. ४ वर आला आहे म्हणजे २९% घट. हिंदूंचा २. ६ वरून १.९ वर आला आहे म्हणजे २७% घट . त्यात फारसा फरक नाही.
त्याही पुढे जाऊन, शेवटच्या दोन डेटा पॉईंट्स मध्ये मुसलमानांचा फर्टिलिटी रेट २. ६ वरून २. ४ वर आला आहे म्हणजे ८% घट. हिंदूंचा २. १ वरून १.९ वर आला आहे म्हणजे ९.५ % घट . म्हणजे हिंदूंचा रेट किंचित जास्त वेगाने घसरतोय.
म्हणजे मुसलमानांचा फर्टिलिटी रेट हिंदूंच्या तुलनेत बराच वेगाने घसरत आहे किंवा राहील असे निदान हा डेटा तरी दाखवत नाही.

बहूविवाह हिंदू मुस्लिमांचा जवळपास सारख्या प्रमाणात होतो.

हा मुद्दा नाही कळला. तुम्हाला असे म्हणायचे आहे का की एकाहून अधिक लग्न करण्याचे हिंदू आणि मुसलमानांचे प्रमाण सारखे आहे? असे असेल तर धक्कादायक आहे. मला वाटायचे की हिंदूंसाठी एकाहून अधिक लग्न ही कायद्याविरोधत आहे. तुमचे म्हणणे बरोबर असेल तर कायद्याचा काहीच परिणाम झाला नाही असा अर्थ होतो.

तुम्हाला असे म्हणायचे आहे का की एकाहून अधिक लग्न करण्याचे हिंदू आणि मुसलमानांचे प्रमाण सारखे आहे?

हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजामध्ये भारतात अत्यंत कमी प्रमाणात बहुविवाह होतात. मुसलमान समाजात हिंदुंपेक्षा किंचित जास्त प्रमाणात बहुविवाह होतात, पण एकूण बहुविवाह अत्यंत विरळ आहे आणि दोन्ही समाजातला फरक खूप कमी आहे. इथे वाचा.

कायद्याचा परिणाम फक्त आत्ता काय परिस्थिती आहे पाहून कसे समजणार ? कायद्याआधी काय होते आणि आता काय आहे हे पाहावे लागेल. आज हिंदू समाजात फक्त १.३% लोक बहुविवाहीत आहेत. इतकी कमी संख्या असताना कायदा अयशस्वी म्हणणे योग्य आहे काय ? त्यासाठी कायद्याआधी किती संख्येत बहुविवाह होते हेच पहावे लागेल.

इपित्तर इतिहासकार's picture

26 Jun 2023 - 11:28 am | इपित्तर इतिहासकार

इंस्टाग्राम वर हा एक मॅप मिळाला. Polygamy मॅप ऑफ इंडिया... भौगोलिक अँगलने.

Screenshot-20230614-080302-Instagram

सुबोध खरे's picture

26 Jun 2023 - 12:14 pm | सुबोध खरे

The latest NFHS data from 2019-20 shows the prevalence of polygyny was 1.9% among Muslims, 1.3% among Hindus and 1.6% among other religious groups.

सुबोध खरे's picture

26 Jun 2023 - 12:17 pm | सुबोध खरे

Polygamy in India "down" in 45 yrs: Muslims' from 5.7 to 2.55%, Hindus' 5.8 to 1.77%, "common" in SCs, STs

According to the NFHS-5 data, only about 1.9 per cent of Muslim women said their husbands had more than one wife, compared to 1.3 per cent of Hindu women who admitted to being in a polygynous marriage in 2019-21.

सुबोध खरे's picture

26 Jun 2023 - 12:18 pm | सुबोध खरे

For instance, Assam — where Chief Minister Himanta Biswa Sarma reportedly said in May last year that a Uniform Civil Code would act as “protection” for “Muslim daughters” — had the widest gap between Hindu and Muslim women who admitted to being in a polygynous relationship in 2019-21. The rate of polygamy among Hindu women in Assam was about 1.8 per cent, according to NFHS-5 data, as against 3.6 per cent among Muslim women.

प्रकांड बुद्धिमत्ता, अलौकिक तेज, गहन गंभीर विचार, सखोल उदार दृष्टी दर्शवणारा विचार आणि धागा.

नोबेल, बुकर, गेला बाजार मॅगेसेसे यांचे कसे लक्ष गेले नाही अजून या महान विचारवंताकडे... आश्चर्यच आहे !

पण काय करणार कावळ्यांच्या कलकलाटात राजहंसाचे गाणे कोण ऐकतो !!!

कदर नाही लोकांना !!

चौकस२१२'s picture

2 May 2024 - 4:16 pm | चौकस२१२

हा लेख म्हणजे टूल किट चा भाग
जगात "खी" आणि "मु" या "फंड मॅनेजर" ना सगळे "मार्केट" काबीज करायाचे ( मर्जर अँड अक्विझिशन )आहे त्या मध्ये भारतातील "हि" , इतर देशातील "बु" हे
लक्ष आहेत
"मु" हे काम आक्रमक पद्धतीने करतात ( होसटाईल टेकओव्हर )
"खी" हे काम कधी सौम्य तर कधी आक्रमक पद्धतीने करतात ( फ्रेंडली फसाड )
आपण षंढ ( रिटेल ट्रेडर ) ९९ वर्षाची वाट पाहत बसणारे

अहिरावण's picture

2 May 2024 - 7:04 pm | अहिरावण

इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला.
====

सहमत आहे.

आज काल "ऑ" वैगरे देशात "हि" बसून इतरांना त्यांच्या देशावर राष्ट्रभक्ती कशी करायची ह्याचे सल्ले देतात. बरे हा "ऑ" देश सुद्धा हे ज्या "खी" बद्दल बडबड करतात त्यांनी वसवलेला देश आहे. तिथे राहणे ह्यांना आवडते पण ते कसे दुष्ट हे सतत सांगत राहायचे असे प्रकार काही लोकं हल्ली करतात.

चौकस२१२'s picture

3 May 2024 - 4:55 am | चौकस२१२
चौकस२१२'s picture

3 May 2024 - 4:55 am | चौकस२१२
चौकस२१२'s picture

6 May 2024 - 2:07 pm | चौकस२१२

मुद्दा नाही सापडला कि लिहणारा कुठे राहतो हे बोलायचे मी कधीही तुम्ही भारतावर राष्ट्रभक्ती कशी करा कि करू नका सांगितलंय ?
उलट बहुतेक करता तसे भारताचे कौतुकच केलय
जागतिक हिंदू म्हणून जेवहा भारत किंवा भारताबाहेर हिंदू आणि इतर हा विषय येतो तेवहा मत मांडले तर का टोचतंय