सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
14 Jun 2022 - 11:04 pm | सौन्दर्य
आजी म्हणजे एक हळवा कोपरा.
15 Jun 2022 - 6:11 am | कर्नलतपस्वी
आज्जी आजोबा सगळ्यात जवळचे नाते. पेरू पासून ते मेरू पर्यंत सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर शेअर करू शकतो.
कवीता आवडली.
15 Jun 2022 - 8:47 am | धर्मराजमुटके
ओह ! शीर्षक वाचून मला मिपावरील आजी या आय डी ने मिसळपाव सोडले की काय अशी शंका आली.
15 Jun 2022 - 8:55 am | सस्नेह
का बॉ सोडले लैकराला एकट्यालाच आज्जीने ?
15 Jun 2022 - 10:01 am | ज्ञानोबाचे पैजार
कविता वाचून हाच प्रश्ण पडला होता. कोणती बरं अशी मजबुरी असेल आज्जीची की लेकराला असे सोडून दिले?
पैजारबुवा,
15 Jun 2022 - 10:02 am | गवि
आवडली.
कवितेचा आकार म्हणावा तर फार सुंदर आहे. हुरहूर लावणारा. पण अर्थ कळाला नाहीये. अर्थात अगदी टोकदार स्पष्ट अर्थ असलाच पाहिजे हे काही कविता या प्रकाराचं सौंदर्यस्थळ नव्हे.
कवीला नेहमीच्या उघड इंटरप्रिटेशनपेक्षा (आजी या नातेवाईकाची मरणोत्तर आठवण) यापेक्षा वेगळंच काहीतरी सुचवायचं आहे असं वाटतं. भावंडांच्या उल्लेखाने हे अधिकच वाटते. आजीला परलोकात आधीच गेलेली भावंडे भेटून विचारतील, किंवा सर्वजण आहेत आणि दादाच गेलाय असे काहीसे विचित्र वाटले अधेमधे.
पण हे न कळल्याने विचार चालू होतो. हेच कवितेचे यश.
15 Jun 2022 - 11:43 am | आंबट गोड
तर असे वाटतेय की हा दादा च परलोकात गेला..आजी आणि लहान भावंडांना सोडून!
15 Jun 2022 - 4:53 pm | चित्रगुप्त
तीन-चारदा कविता वाचली. अतिशय आवडली.
वाचकांनी वेगवेगळ्या कल्पना केल्या आहेत त्याही मननीय आहेत. कविता चुटपुट लावणारी आहे, हेच तिचे सौंदर्य, असेही म्हणता येईल.
ज्या आजीने आजवर काबाडकष्ट करून (ज्यांचे आई-वडील देवाघरी गेलेले आहेत अश्या -) आपल्या लहान लहान नातवंडांना पाळले -पोसलेले आहे, तिचा सर्वात मोठा नातू आता कमावण्यालायक झालेला आहे, म्हणुन त्याला शहरात नेऊन, कुठेतरी कामावर लावून , किंवा नुस्तेच गर्दीच्या गाडीत बसवून ती निघून गेलेली आहे .... अशा त्या मोठ्या नातवाचे मनोगत या कवितेत व्यक्त झालेले आहे, असे मला वाटते.
"मला सांगशील का ग ?" ... आणि पुन्हा भेटशील का ग ?" या दोन ठिकाणी "ग" वापरला आहे, पण "कुठे दादा आमुचा 'गे' ? हे वाचून भलतीच कल्पना मनाला शिवून गेली, आणि कवितेचा आणखीही 'तसला' एक अर्थ लावता येईल, असे वाटून गेले.
19 Jun 2022 - 11:41 am | गवि
हो की.. मान गये!!
जुन्या पिढीतल्या जुन्या विचारांत वाढलेल्या आजीला नसेल पटत हे. काढलंन घरातून बाहेर..
19 Jun 2022 - 11:33 am | कुमार१
आवडली.
19 Jun 2022 - 12:24 pm | राजेंद्र मेहेंदळे
हुरहुर लावणारी कविता!!
खाणारी तोंडे आणि कमाई यांचा मेळ बसत नसल्याने आजीने नातवाला कुठेतरी सोडुन दिले असेच प्रथम वाटले. पण ईतर प्रतिक्रिया बघुन असेही वेगवेगळे अर्थ निघु शकतात हे समजले.
25 Jun 2022 - 2:18 pm | गणेशा
हळवे लिखान..
----
उसवले मायधागे
फाटले आकाश माझे..
तू निघून गेल्यावर
विरले सुखाचे अस्तर
--- गणेशा