महामानव
सूर्य तो अन काजवा मी, जाणुनी होतो जरी
धावलो धुंदीत एका, थुंकण्या त्याच्यावरी
मत्त तो गजराज, मी तर श्वान श्रीमंताघरी
लागता चाहूल उठलो, भुंकण्या त्याच्यावरी
भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी
माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करी
सूर्य तो अन काजवा मी, जाणुनी होतो जरी
धावलो धुंदीत एका, थुंकण्या त्याच्यावरी
मत्त तो गजराज, मी तर श्वान श्रीमंताघरी
लागता चाहूल उठलो, भुंकण्या त्याच्यावरी
भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी
माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करी
एक पक्षी अंधारात
बरसणाऱ्या जलधारात
घरट्यात एकटाच . . . .
झाडावरचं एक फूल
उमलून कोमेजलेलं
झाडाच्याच पायाशी ......
पाहतो शून्यात मी
आजकाल नेहमी
विश्व निर्मिती तिथूनच !
जुळवले शब्द काही
अर्थ उमगलाच नाही
तरीही अर्थपूर्ण !
सूर श्वासांच्या लयीवर स्वार झाला पाहिजे
काळजाच्या 'कोपऱ्यावर',वार झाला पाहिजे!
दुःखसुद्धा एवढे तालात आले पाहिजे
की सुखांचा,'उंबरा' तय्यार झाला पाहिजे!
जाणिवांची ओल इतकी खोल रुजली पाहिजे
जीवनाचा बाग हिरवागार झाला पाहिजे!
कागदावरच्या फुलांना रंग दे,मधु-गंध दे
शब्द-शब्दाचा तुझ्या 'गुलज़ार' झाला पाहिजे!
शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर
चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे!
—सत्यजित
"रित"
````````````````````````````
रित ह्या घराण्याची जुनी
दुःख पंचविण्याची
उगता किरणें सुर्याची
भिज पुन्हां नव्याने उभी राहण्याची,
रित ह्या घराण्याची जुनी ..
मध्यन्हांच्या उष्मा
तरीही त्यांचा गार माथा
तिन्हीसांजेच्या वेळा
सदा चेहऱ्यावर दिसें शीथलता,
रित ह्या घराण्याची जुनी ..
घालून विळखा दोन्ही धृवांना
दाबून शेपटीत हिमालयाला
दहाफणांनी ओकीत विषारी आग
निघालाआहे शिकारीला
कालीयानाग.
अदृश्य या दैत्य पुढे, व्यर्थ आहे
मानवी अस्त्र, शस्त्र, क्षेपास्त्र सारे.
कारण
दशेंद्रीयांच्या रथावर स्वार होऊनच
निघाला आहे शिकारीला
कालीयानाग.
*पापणी*
लवलवती पापणी...
अश्रूंना घेऊन लपली, मिटल्याने झाली ओली
आतल्या अंधारात तरी, पहा चमचमली
...लवलवती पापणी
थरथरती पापणी...
अश्रूंच्या लाटांनी, बेभान जराशी झाली
सोडण्या तयांना खाली, पहा तयार झाली
...थरथरती पापणी
झरझरती पापणी...
अविश्रांत असा, झरा वाहता झाली,
पुन्हा भरण्यासाठी, वेडी, रिक्त झाली
...झरझरती पापणी
- संदीप चांदणे
चाललो शहराकडे मी..गाव सांभाळून घे
मांडतो आहे नव्याने..डाव सांभाळून घे!
सवय झाली एकदा की क्षीण होते वेदना
लागतो जो जो जिव्हारी..घाव सांभाळून घे!
जीव तुटतो त्या क्षणीही याद मी येईल पण
तू उखाणे घेत असता,नाव सांभाळून घे!
वेगळ्या वाटा तुझ्या अन् वेगळ्या माझ्या सही
टाळ तू प्रत्येक काटा..धाव सांभाळून घे!
काजळाची रेघसुद्धा वाटते आहे गझल
तू तुझ्या नजरेत माझे भाव सांभाळून घे!
—सत्यजित
मान्य आहे ते सत्तेत होते
मान्य आहे त्यांनी स्वप्नं दाखवली
मान्य आहे ते तुमचे 'आदर्श' होते
त्यांच्यातले बरेच जण
खरे असतील
हेतूही स्वच्छ असतील बहुतांशी
आणि काही जण त्यांनीच घेतलेल्या निर्णयाच्या
विरोधातही असतील
पण कदाचित
निर्णायक क्षणी समोर आलेली
त्यांची काही अपरिहार्यता असेल
किंवा त्यांना, तुम्हाला सगळ्यांना
घाईसुद्धा झाली असू शकते...
ईतकी वर्षं लढा दिल्यावर
समोर विजय दिसत असतानाची घाई
ह्या कवितेत मी पावसाच्या थेंबांनी मन कसे बहरते ते सांगितलं आहे .
☔ पहिला पाऊस ☔
पहील्या पावसात भीजतांना
आठवण तुझी होते
पावसाच्या त्या सरीमधे
मन माझे उमलते
☔☔☔☔☔
हाती तुझा हात घेऊन
भीजावेसे वाटते
दाटलेल्या त्या धुक्यांमधे
रमावेसे वाटते
☔☔☔☔☔
पावसाच्या सरीने
दरवळतो सुगंध मातीचा
भीजतांना त्या सरीमधे
विसर पडतो स्वतःचा
माझा कुठला धर्म, माझा कुठला पंथ
मी कुठल्या तळ्यातला, माझा कोण संत
माझी कुठली जात, कुठली उपजात
नेमकी कुठल्या समईतली, मी वात
निळे अंबर, हिरवा निसर्ग
भगवा सुर्योदय, कोणाचा कुठला रंग
हा संप्रदाय, तो संप्रदाय
ज्याचा त्याचा आपआपुला समुदाय
अनादी मी, अनंत मी
आत्ममग्न, निसंग मी
सुधीर देशमुख