जे न देखे रवी...
का न व्हावे मी स्वतःच सूर्य !!!
का न धरावे मी मनी धैर्य |
का न व्हावे मी स्वतःच सूर्य || धृ ||
अंधकार दाटला भोवती घोर अज्ञानाचा,
काय करावे, काही न समजे मार्ग प्रकाशाचा,
प्रज्ञाही ती कुंठित झाली या संग्रामात,
काळालाही अखेर केला साष्टांग प्रणिपात,
अशा समयी मनीमानसी बाळगावे स्थैर्य,
का न मी बाळगावे स्थैर्य || १ ||
।। मातृदशक ।।
आता वंदितो आईसी | जिने धरिले उरासी |
जेव्हा आलो जन्मासि | वात्सल्याने || १ ||
नवमांस गर्भ वाढविला | सोसूनि सर्व यातना-कळा |
न जाणो तूज किती वेळा | दुखावले मी || २ ||
हाती धरोनि चालविले | बोल बोबडे बोलविले |
शहाणपण शिकविले | जगण्याप्रती || ३ ||
कलागुणांचा वारसा | दिला आम्हां छानसा |
स्वयें दाखविला आरसा | योग्य वेळी || ४ ||
बायका...
काल ते म्हणाले,
सगळ्याच बायका
तशा असतात.
तशा म्हणजे नेमके कशा,
म्हणून शोधु लागलो,
बायका.
पुराणात, प्राचीन ग्रंथात,
ऑफिसात, समोर- मागे,
इथे तिथे.
गुगलवर.
अगदी मिपावरही.
असतात बायका,
हळव्या, खंबीर,धीट
आणि तितक्याच
कर्तबागरही.
बायका असतात,
पुरुषां प्रमाणेच.
सोशिक, शोषित
आणि बंडखोरही
चक्र
झुंजूमुंजू आभाळात
किती सांडले केशर
सोनसळत्या सकाळी
निळे झळाळे अंबर
तळपत्या माध्यान्हीची
वितळती काचधार
धूसरशा संध्याकाळी
अदृष्टाची हुरहूर
नि:शब्दाच्या चाहुलीने
जागे रात्र काळीशार
प्रहरांच्या रंगी रंगे
बिलोरी हे कालचक्र
चक्रनेमिक्रम त्याचा
अनादि नी निरंतर
आणि अश्या वेळी
आणि अश्या वेळी,
चंद्राने लपायला हवं ढगांआड...
अन लपेटून घ्यायला हवं आपण,
भोवतालचं गुलाबी धुकं...
एकमेकांच्या श्वासांमधून
उधळायला हवीत,
प्रितीची गंधफुले...
घट्ट मिटायला हवीत,
डोळ्यांची नक्षत्रं...
टेकवायला हवेत
गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे,
ओठ एकमेकांवर...
आणि मग पहावं,
श्वास रोखले जातात की;
आत्तापर्यंत काय केलं?
वेळ मिळालाच आहे अनायसे, तर संपवूया
कितीतरी वाचायची राहिलेली पुस्तकं,
अर्धवट लिहिलेल्या कविता, काही लेख.
असंच खूप काही, मनापासून ठरवलं.
धावपळीत रोजच्या, बरंच राहून गेलं.
डायरीच्या पानांनी मग हक्काने खडसावलं,
आत्तापर्यंत काय केलं?
यंत्र
आजचा आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात माणूस हा कसा या यंत्रणे मध्ये कसा गुरफटला गेला आहे या बादल मला कविता द्वारे सांगायचे होते. माझा या आधुनिकते बद्दल विरोध नाही पण आज काल माणूस माणसात राहिलेला नाही म्हणून मी आपले मनोगत व्यक्त करत आहे.
कोंकणची वेदना..
करोनाचा हा रोग, त्यावर अनेक प्रयोग!
काय भोग आहेत भाळी, याच काळी, काही कळेना !
हरेक समजतो इथं मीच अाहे बरोबर!
सैनिक तरी कोविडचे आहेत का सुरक्षित खरोखर ?
रेड आणि कंटेनमेंट झोनमधून
बाहेर जायलाही नाही परवानगी..
पण सरकारच्या चातुर्यामुळे
कोंकणात मात्र होऊ शकते रवानगी..
राहून गेले..
राहून गेले..
तुझ्यासवे अवखळ
बालपणीचे ते क्षण
पुन्हा एकदा
वेचायचे होते
ते क्षण वेचणे
राहून गेले
तुझे जीवनगीत
ऐकत तुझ्या
कुशीत रातभर
जागायचे होते
ते जागणे आता
राहून गेले
तु शिकवलेस
मज चालावयास
तुला आधारासाठी
हात देणे राहून गेले
पाऊसवेळा
अस्थीर घरांच्या ओळी
नदीच्या हिरव्या काठी.
कुणी धरून बसते ओंजळ
पाऊस पडण्यासाठी.
पाऊस प्राचीन इथला
आकांत केवढा करतो.
नदीच्या पैलतीरावर
काळ जसा गहीवरतो.
काळ उभारून गेला
घरांच्या उदिग्न भिंती.
अशात पाऊसवेळा
आधार कुणाचा स्मरती?
-कौस्तुभ
पहिलीच माझी कविता...
प्रेरणा: पोहे मात्र सुरेख झाले https://misalpav.com/node/46836
आहेत शब्द साधे, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
उसने घेतले शब्द, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
वाचले नाही कोणी, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
नाही केली वाहवा, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
मागे वळुन पाहताना..
मागे वळून पाहताना..
मागे वळुन पाहताना
एक निरागस चेहरा
दिसतो मज मनसोक्त
खळखळुन हसताना
मागे वळुन पाहताना
तोच चेहरा दिसतो मज
भेदरलेल्या डोळ्यांनी
आसपास पाहताना
मागे वळुन पाहताना
लोकांचे चेहेरे न्याहाळताना
तो चेहरा दिसे मज
ओंगळवाण्या नजरा सहन करताना
प्राक्तनवेळा
क्षितिजाच्या पुसती रेषा
अंधार जसा दरवळतो.
काळीज कुणाचे रडते
चंद्र कुणाचा विव्हळतो.
काळाकडे घ्याव्या मागून
त्या हळव्या प्राक्तनवेळा.
विस्मृतीस कराव्या अर्पण
सुगंधी दुःखांच्या माळा.
रंगीत करावे डोळे
श्वासांना यावी भरती.
उगवून पुन्हा जन्मावे
पाऊस पडल्यावरती.
-कौस्तुभ
हसण्या उसंत नाही
हसण्या उसंत नाही
रडण्यास अंत नाही.
निळे सावळे जगणे
मजला पसंत नाही.
बहरली जरी झाडे
हा तो वसंत नाही.
दिले टाकुन जरी तू
मी नाशवंत नाही.
सांगुन थकलो मी, पण
दुनिया ज्वलंत नाही.
-कौस्तुभ
शुद्धसती मात्रावृत्त
उप्पीट मात्र बरे झाले
प्रेरणा:
https://www.misalpav.com/node/46836
रवा होता खमंग भाजला
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
फोडणीत मोहरी तडतडली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
उडीद डाळ त्यातच परतली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
आधणातल्या रव्याला दणकून वाफ आणली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
कोरोना
कसा काय देवराया, हा कहर झाला कोरोनाचा
न भूतो न भविष्यती,असा खेळ पाहिला आयुष्याचा
किड्यामुंग्यांसारखी माणसं मरू लागली जिकडेतिकडे
यातून लवकर सुटका कर देवा, एवढ़े कळकळीचे साकडे
कधी नव्हे ती आता,सर्वांना नाती कळू लागली आयुष्यभराची देवा, अद्दल घडवलीस चांगली
माझ्यासारखं कुणीच नाही, असं "माणूस" मिरवीत होता
फुकटच्या "हुशारया" आणि नुसता "गुर्मीत" होता
ती अन् पाऊस..
ती अन् पाऊस..
खूप दिवस झाले
आता पावसात
चिंब चिंब भिजून
भरलेलं सावळ ते आभाळ
नजरेत सामावणारी ती
भिजावं का थोडतरी?
ह्या येत्या पावसात
चिंब चिंब घेऊ न्हाऊन
असा विचार करणारी ती
गेले कित्येक दिवस
दिवस? छे! कित्येक वर्ष
छत्रीबाहेर हात काढुन
भिजण्याचा प्रयत्न करतीये
कोण जमूरा कोण मदारी..
कोण जमूरा कोण मदारी
तीन पायांची शर्यत न्यारी
कोण जमूरा कोण मदारी
बुद्धिबळाच्या या पटावर
इथे नांदते घराणेशाही
लोकशाही टांगून खुंटीवर
प्रजेस बोलायची चोरी
लोण्यावरती ठेवूनि डोळा
इमानाच्या खोट्या शपथा
सरड्यासंही वाटावा हेवा
वजीराची तर बातचं न्यारी
पाऊस सांजवेळी डोळ्यांत दाटलेला (आनंदकंद वृत्त)
पाऊस सांजवेळी, डोळ्यांत दाटलेला,
वाराच काळजाच्या, ओघात साठलेला.
पाळीव हस्तकांनी, मागून वार केले,
त्यांच्या मनातलाही, विश्वास बाटलेला.
माझे खरे प्रबंधी, माझेच प्राण झाले,
त्यांचाच फार वेळा, आधार वाटलेला.
प्रारब्ध ग्रासलेले, कोऱ्याच सावल्यांनी,
रंगांध भावनांचा, हा खेळ थाटलेला.
- ‹ previous
- 42 of 468
- next ›