(पण कुलुपबंद हुंकाराचे केवळ थरारणे पहिल्या तीन कडव्यांमधल्या धीट सीमोल्लंघनापुढे... तीन पायर्या वरती-वरती चढल्यानंतर चौथी पायरी खाली असून पाऊल चुकते तसे भासले. त्या थरार्यातही मोठे धैर्य आहे - मान्य आहे. पण तसे सांगणारा कुठलातरी सशक्त शब्द हवा होता, असे राहूनराहून वाटते.)
पहिल्या तीन कडव्यांनी उभ्या केलेल्या प्रतिमांनंतर चौथे कडवे कवितेच्या धैर्याच्या सुरात जराशी हतबलता आणते.
>>'त्या थरार्यातही मोठे धैर्य आहे - मान्य आहे. पण तसे सांगणारा कुठलातरी सशक्त शब्द हवा होता, असे राहूनराहून वाटते'
या धनंजयांच्या मताशी सहमत. जेणेकरून कवितेच्या प्रवाहाचा आलेख पडल्यासारखा वाटणार नाही.
आत्म्याला (जीवाला) हंसाची उपमा देतात- जसे उड जायेगा हंस अकेला या सारख्या काव्यात. तो अर्थ घेतला तर पहिल्या तीन कडव्यात वातावरण आणि इच्छ्आ प्रबळ होताना दिसते आणि चौथ्या कडव्यात उडून जाण्यासाठी योग्य परिस्थितीची वाट पाहत बसलेला हंस दिसतो.
कविता आवडली.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
असं समजून घेता आलं. त्यानुसार कविता चांगली, कारण वाचायलाही एक लय मिळते आहेच. शिवाय 'लावले कुलूप, बंद केली दारे; आतला हुंकार तरीही थरारे' यातून ती एक अर्थ कन्व्हे करते (बिपिनने हे नेमके टिपले आहे).
प्रतिमेचे योजन तसेच आहे का, हे मात्र कवयित्रीनेच सांगावे.
नी....
एकदम महत्वाचं बोललीयस....
एकदा कविता लिहून झाल्यावर ती वाचकांची...... उलगडून सांगू नये.
कुसुमाग्रजांनी त्यांच्या 'अहि-नकुल' कवितेबद्दल असंच म्हटलंय की रूपकात्मक कवितेचा अर्थ वाचकाने त्याच्या परीने लावायचा असतो... शोधायचा असतो.
जो अर्थ मिळेल तो त्या वाचकापुरता खरा असतो.
--------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
पहिल्यांदा वाचल्यावर नाही समजली. पण पुन्हा वाचल्यावर भरारी घेण्याच्या इच्छाशक्ती किती प्रबळ आहे हे जाणवले.
दार बंद आहे तरीही जो हुंकार आहे त्यात एक थर थर आहे.. उडून, पळून जाण्याची. मस्तच.
व्वा! निरजा.... जियो.
- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
आवडली 13 Jan 2009 - 5:36 am | सर्किट (not verified)
देशभक्तीपर कविता आवडली. सत्यमने केलेल्या घोटाळ्यानंतरही भारतीय समभाग बाजारात विश्वास कायम ठेवायला कवितेचा उपयोग झाला. पण,
लावले कुलुप, बंद केली दारे
आतला हुंकार तरीही थरारे
>>तुम्हाला देशभक्ती, सत्यम आणि कसाब हे नसलेले शब्द आठवले म्हणजे कविता फसली असं जाहीर करायला हवं नाही का?
अहो, उलट आपली कविता वाचकांना वेगवेगळा अनुभव देत आहे असे म्हणायचे.
काही वाचकांना ( सर्किटला उद्देशून नव्हे ) अद्भूत, अलौकिक, नसलेला अर्थ शोधायची लै हौस असते :) असो,
कविता वाचणार्याची झाली असे खुद्द कवयत्रीनेच म्हण्टले आहे. "जिसका जितना आँचल था उतनी सौगा़त उसे मिली" , नाही का ? सर्कीटरावांना जे पिंडी नाही ते ब्रह्मांडी दिसले. शेवटी
चित्तैक्यास्तव सर्वथा फुकट का हेका धरावा मग ?
एका जगी शून्य दिसे , तर दिसे , शून्यात अन्या जग ! :-)
>>चित्तैक्यास्तव सर्वथा फुकट का हेका धरावा मग ?<<
असं काही म्हणणं नाही हो. माझी कविता कमी पडली एवढंच माझं म्हणणं.
- नी http://saaneedhapa.googlepages.com/home
प्रतिक्रिया
12 Jan 2009 - 10:48 pm | बिपिन कार्यकर्ते
सध्या एका विशिष्ट मनःस्थितीत आहे. हे शब्द खूपच जवळचे वाटले.
बिपिन कार्यकर्ते
12 Jan 2009 - 10:53 pm | बट्टू
कविता वाचायला मस्त वाटली पण पहिल्या दोन कडव्यांचा संबंध पुडच्या दोन कडव्यांशी नाही लागला. हसं उडून गेला असावा.
12 Jan 2009 - 11:12 pm | कोलबेर
मलाही फारशी कळली नाही. मागच्या कवितेप्रमाणे शॄंगारीक वगैरे आहे की काय अशी एक शंका आली.
12 Jan 2009 - 11:25 pm | धनंजय
जाण्याबद्दलच्या वेगवेगळ्या उपमा प्रभावी आहेत.
(पण कुलुपबंद हुंकाराचे केवळ थरारणे पहिल्या तीन कडव्यांमधल्या धीट सीमोल्लंघनापुढे... तीन पायर्या वरती-वरती चढल्यानंतर चौथी पायरी खाली असून पाऊल चुकते तसे भासले. त्या थरार्यातही मोठे धैर्य आहे - मान्य आहे. पण तसे सांगणारा कुठलातरी सशक्त शब्द हवा होता, असे राहूनराहून वाटते.)
12 Jan 2009 - 11:46 pm | घाटावरचे भट
पहिल्या तीन कडव्यांनी उभ्या केलेल्या प्रतिमांनंतर चौथे कडवे कवितेच्या धैर्याच्या सुरात जराशी हतबलता आणते.
>>'त्या थरार्यातही मोठे धैर्य आहे - मान्य आहे. पण तसे सांगणारा कुठलातरी सशक्त शब्द हवा होता, असे राहूनराहून वाटते'
या धनंजयांच्या मताशी सहमत. जेणेकरून कवितेच्या प्रवाहाचा आलेख पडल्यासारखा वाटणार नाही.
12 Jan 2009 - 11:58 pm | लिखाळ
धनंजयशी सहमत.
आत्म्याला (जीवाला) हंसाची उपमा देतात- जसे उड जायेगा हंस अकेला या सारख्या काव्यात. तो अर्थ घेतला तर पहिल्या तीन कडव्यात वातावरण आणि इच्छ्आ प्रबळ होताना दिसते आणि चौथ्या कडव्यात उडून जाण्यासाठी योग्य परिस्थितीची वाट पाहत बसलेला हंस दिसतो.
कविता आवडली.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
13 Jan 2009 - 9:03 am | नीधप
विचार करीन.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
12 Jan 2009 - 11:37 pm | श्रावण मोडक
असं समजून घेता आलं. त्यानुसार कविता चांगली, कारण वाचायलाही एक लय मिळते आहेच. शिवाय 'लावले कुलूप, बंद केली दारे; आतला हुंकार तरीही थरारे' यातून ती एक अर्थ कन्व्हे करते (बिपिनने हे नेमके टिपले आहे).
प्रतिमेचे योजन तसेच आहे का, हे मात्र कवयित्रीनेच सांगावे.
13 Jan 2009 - 12:35 am | नीधप
मी काय सांगू? माझं लिहून झालं आता वाचणार्याची कविता..
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Jan 2009 - 9:57 pm | संदीप चित्रे
नी....
एकदम महत्वाचं बोललीयस....
एकदा कविता लिहून झाल्यावर ती वाचकांची...... उलगडून सांगू नये.
कुसुमाग्रजांनी त्यांच्या 'अहि-नकुल' कवितेबद्दल असंच म्हटलंय की रूपकात्मक कवितेचा अर्थ वाचकाने त्याच्या परीने लावायचा असतो... शोधायचा असतो.
जो अर्थ मिळेल तो त्या वाचकापुरता खरा असतो.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
13 Jan 2009 - 12:42 am | प्राजु
पहिल्यांदा वाचल्यावर नाही समजली. पण पुन्हा वाचल्यावर भरारी घेण्याच्या इच्छाशक्ती किती प्रबळ आहे हे जाणवले.
दार बंद आहे तरीही जो हुंकार आहे त्यात एक थर थर आहे.. उडून, पळून जाण्याची. मस्तच.
व्वा! निरजा.... जियो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Jan 2009 - 5:36 am | सर्किट (not verified)
देशभक्तीपर कविता आवडली. सत्यमने केलेल्या घोटाळ्यानंतरही भारतीय समभाग बाजारात विश्वास कायम ठेवायला कवितेचा उपयोग झाला. पण,
लावले कुलुप, बंद केली दारे
आतला हुंकार तरीही थरारे
ह्यात कसाब चा हुंकार असा उल्लेख खटकला.
-- सर्किट
13 Jan 2009 - 9:05 am | नीधप
तुम्हाला देशभक्ती, सत्यम आणि कसाब हे नसलेले शब्द आठवले म्हणजे कविता फसली असं जाहीर करायला हवं नाही का?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Jan 2009 - 9:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>तुम्हाला देशभक्ती, सत्यम आणि कसाब हे नसलेले शब्द आठवले म्हणजे कविता फसली असं जाहीर करायला हवं नाही का?
अहो, उलट आपली कविता वाचकांना वेगवेगळा अनुभव देत आहे असे म्हणायचे.
काही वाचकांना ( सर्किटला उद्देशून नव्हे ) अद्भूत, अलौकिक, नसलेला अर्थ शोधायची लै हौस असते :) असो,
आपली कविता आवडली !!!
13 Jan 2009 - 9:13 am | मुक्तसुनीत
कविता वाचणार्याची झाली असे खुद्द कवयत्रीनेच म्हण्टले आहे. "जिसका जितना आँचल था उतनी सौगा़त उसे मिली" , नाही का ? सर्कीटरावांना जे पिंडी नाही ते ब्रह्मांडी दिसले. शेवटी
चित्तैक्यास्तव सर्वथा फुकट का हेका धरावा मग ?
एका जगी शून्य दिसे , तर दिसे , शून्यात अन्या जग ! :-)
13 Jan 2009 - 9:49 am | नीधप
>>चित्तैक्यास्तव सर्वथा फुकट का हेका धरावा मग ?<<
असं काही म्हणणं नाही हो. माझी कविता कमी पडली एवढंच माझं म्हणणं.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Jan 2009 - 6:06 am | झुमाक्ष (not verified)
आम्ही आपले 'शिंगे रंगवीली, बाशिंगे (?) बांधीली, चढवील्या झूली, ऐनेदार' या बाळबोध कवितेच्या चालीवर म्हणून पाहिले. काही कडवी जमली, काही जमली नाहीत. असो.
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
13 Jan 2009 - 9:06 am | विसोबा खेचर
चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे
हंस उडू पाही अवघड इरादे
वा! क्या बात है..
एक वेगळीच कविता..!
तात्या.
13 Jan 2009 - 1:58 pm | नीधप
धन्यवाद तात्या!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Jan 2009 - 7:10 pm | राघव
भरपूर वेगवेगळे अर्थ लागलेत इथे!!
बाकी, कविता मस्त झालीये!! शुभेच्छा! :)
मुमुक्षु
13 Jan 2009 - 8:37 pm | चतुरंग
कविता समजायला अंमळ अवघड गेली!
वरील बर्याच समीक्षकांच्या मताशी सहमत झाल्यासारखे वाटते आहे.
चतुरंग