निवडणूका जवळ आल्या आहेत. अनेक जण यंव होईल तंव होईल असं भविष्य वर्तवून टाकतात.
काही जण ग्रह तारे पाहून सांगतात. काही जण मागील निकाल पाहून सांगतात. काही जण आलेलं पाकीट पाहून सांगतात.
सगळ्यांच ऐकावं आणि गंमत पहावी. कसं?
ह्या दारुवालाच भविष्य चुकलंल टिव्हीवर पाहिलेल आहे... उगाच गणपती बाप्पाचं नाव घेउन काही-बाही कथन करत असतो.
थोडक्यात सांगायच झालं तर दारुवालाच्या भविष्य वर्तवण्यात जान नाही,नावा प्रमाणेच ते बे-जान असतं !
मी मिपावरील प्रख्यात, प्रसिध्द आणी गाढा अभ्यास असणारा ज्योतिषशास्त्रज्ञ व अर्थपृथ्थकरणशास्त्रज्ञ आहे.
तुम्ही विचारलेल्या कुट प्रश्नावर मी स्वःताच इतका काथ्या कुटलाय की अख्खा दोरखंड सध्या गुजरातमधे मांजा बनवायला रॉ मटेरिअल म्हणुन वापरावा असा ठराव पास करत आहेत. असो
तो बेजान दारुवाला आधी बे जान वर त्यात दारुवाला आहे मग तुम्ही अश्या माणसावर विश्वासच कसा ठेवु शकता.
माझं ऐका (थोडा चहा घ्या च्या चालीवर)
१. नरु विनर आहे आणी तो विनर रहाणारच आहे. भले गुजरात मधे की भारतात नायतर अखिल अमेरिका गुज्जु वाण सामान ने-आण कार्यकर्ता, आणी मोटेल चालक मंडळाचा कार्यकारी संचालक म्हणुन. म्हणजे झाला ना विनर (तुम्ही हे पण लक्षात घ्या त्यांची आतली वस्त्रेही कदाचित "विनर" ची असतील. जसे लक्स, डिक्सी इ.इ.)
२. रुपया हा अजुनही खाली येइल. जसे १ डॉलर = ५५/५६/५७/५८ त्यात चुकीचे काही नाही.( मी सुध्धा चालाकीने इथे तारीख देत नाही. नाय तर याल उगाच सनी ....सॉरी सन्नी देओल सारखे....तारीख पे तारीख करत)
मला एक तक्रार आहे मी शब्दांचे रंग बदलु शकत नाही कुठे गेली ति सुविधा, इतक्या तज्ञ माणसाची ही हेटाळणी.....
प्रेडीक्षण म्हणजे एक भविष्याबद्दल तर्क असतो, जो एका विशिष्ट पद्धतीने,ठराविक प्रकारच्या अभ्यासानुसार (हवे तर ठोकटाल्यानुसार म्हणा)वर्तवला जात असतो. त्याला काही गोष्टी पायाभूत (base)असतात तर काही मर्यादाही.
तुम्ही त्याला एक तर्क म्हणूनच बघितले पाहिजे, न की प्रत्यक्ष भविष्य.
अटलबिहारी २००४ ला पुन्हा सत्तेवर आलेही असते, पण काही बेवडे अजूनही फुकटची दारू ज्याकडून मिळते त्यालाच मते देतात व तुमच्या-आमच्यासारखे महाभाग सुट्टी समजून बाहेर फिरायला जातात.
अटलबिहारी २००४ ला पुन्हा सत्तेवर आलेही असते, पण काही बेवडे अजूनही फुकटची दारू ज्याकडून मिळते त्यालाच मते देतात व तुमच्या-आमच्यासारखे महाभाग सुट्टी समजून बाहेर फिरायला जातात.>>>>>>> हा तुमचा गैरसमज आहे भाजपा जिंकला कि जनतेचा विजय नि कॉंग्रेस जिंकले तर फुकटची दारू . अटलबिहारी सत्तेवर आले नाही कारण त्या सरकारच्या काळात देशाची सुरक्षा धोक्यात आली होती.देशाचा मानबिंदू संसद ह्यावर हल्ला झाला होता प्रधानमंत्री नि संरक्षण मंत्री ह्यांना लपवावे लागले होते.जनतेला ते खटकले त्या शिवाय शव पेट्यांचा घोटाळा, तहलका अशी अनेक प्रकरणे राम मंदिरावर ठोस भूमिका न घेणे हि कारणे भाजपच्या दारूण पराभवामागे होती.राम मंदिर प्रश्न न सोडवणे भाजपला महागात पडले.
प्रतिक्रिया
6 Jan 2014 - 1:12 pm | मारकुटे
निवडणूका जवळ आल्या आहेत. अनेक जण यंव होईल तंव होईल असं भविष्य वर्तवून टाकतात.
काही जण ग्रह तारे पाहून सांगतात. काही जण मागील निकाल पाहून सांगतात. काही जण आलेलं पाकीट पाहून सांगतात.
सगळ्यांच ऐकावं आणि गंमत पहावी. कसं?
6 Jan 2014 - 1:22 pm | सुहास..
कांता ...
कस आणि का म्हणुन प्रोत्साहन द्यायचे नवोदित लेखकांना ?
एक वेळ एखाद्याने लेखनाचा किमान प्रयत्न केला तर मान्य ! उगाच काड्यांच कस करायचे ?
शिकण्यास उत्सुक असलेला !!
6 Jan 2014 - 1:24 pm | एम.जी.
नाही जिंकला नरू आणि नाही झाला डॉलर ५५ रुपयाचा तर काय फासावर चढवणार आहेत का...
मग चालतंय की.
माझा अंदाज डॉलर ५६ रुपये होईल...
6 Jan 2014 - 1:30 pm | अत्रुप्त आत्मा
6 Jan 2014 - 1:40 pm | सुनील
पेप्रात भविष्य येतं - आजार संभवतो.
आता ह्यांच्या आजाराच्या व्याखेत एखाद्या शिंकेपासून ते कॅन्सरपर्यंत सगळं समाविष्ट असतं. त्यामुळे भविष्य नेहेमीच खरं ठरतं ;)
आता इथेच बघा -
अत्यंत मोघम वाक्य! अगदी पिएम नाही झाले तरी मोदी स्वतःच्या मतदारसंघात विजयी होणारच!
कधी तो कालावधी दिलेलाच नाही ;)
थोडक्यात, बेजान दारुवाला विल बी ऑल्वेज द विनर :)
6 Jan 2014 - 1:44 pm | मदनबाण
ह्या दारुवालाच भविष्य चुकलंल टिव्हीवर पाहिलेल आहे... उगाच गणपती बाप्पाचं नाव घेउन काही-बाही कथन करत असतो.
थोडक्यात सांगायच झालं तर दारुवालाच्या भविष्य वर्तवण्यात जान नाही,नावा प्रमाणेच ते बे-जान असतं !
6 Jan 2014 - 2:28 pm | संचित
+१
6 Jan 2014 - 2:43 pm | बर्फाळलांडगा
कोंग्रेसही चालेल म्हणायची वेळ आहे. अन ते जोतिश्याच्या नव्हे आपल्या हातात आहे.
6 Jan 2014 - 2:44 pm | इरसाल
मी मिपावरील प्रख्यात, प्रसिध्द आणी गाढा अभ्यास असणारा ज्योतिषशास्त्रज्ञ व अर्थपृथ्थकरणशास्त्रज्ञ आहे.
तुम्ही विचारलेल्या कुट प्रश्नावर मी स्वःताच इतका काथ्या कुटलाय की अख्खा दोरखंड सध्या गुजरातमधे मांजा बनवायला रॉ मटेरिअल म्हणुन वापरावा असा ठराव पास करत आहेत. असो
तो बेजान दारुवाला आधी बे जान वर त्यात दारुवाला आहे मग तुम्ही अश्या माणसावर विश्वासच कसा ठेवु शकता.
माझं ऐका (थोडा चहा घ्या च्या चालीवर)
१. नरु विनर आहे आणी तो विनर रहाणारच आहे. भले गुजरात मधे की भारतात नायतर अखिल अमेरिका गुज्जु वाण सामान ने-आण कार्यकर्ता, आणी मोटेल चालक मंडळाचा कार्यकारी संचालक म्हणुन. म्हणजे झाला ना विनर (तुम्ही हे पण लक्षात घ्या त्यांची आतली वस्त्रेही कदाचित "विनर" ची असतील. जसे लक्स, डिक्सी इ.इ.)
२. रुपया हा अजुनही खाली येइल. जसे १ डॉलर = ५५/५६/५७/५८ त्यात चुकीचे काही नाही.( मी सुध्धा चालाकीने इथे तारीख देत नाही. नाय तर याल उगाच सनी ....सॉरी सन्नी देओल सारखे....तारीख पे तारीख करत)
मला एक तक्रार आहे मी शब्दांचे रंग बदलु शकत नाही कुठे गेली ति सुविधा, इतक्या तज्ञ माणसाची ही हेटाळणी.....
7 Jan 2014 - 12:43 am | आयुर्हित
श्री गणेशाय नम:
राहुल इज गुड बॉय. बट नरेंद्र मोदी इज कॅप्याबल टू डीलीवर. अरविंद ह्याव पोटेन्शिअल.
बेजान दारूवाला says
Good times is for investment in tata motors, Research in pharma, Genes, chemicals,
फ्युचर ईज ब्राईट. इंडिया वील डू इट.
प्लीज रेफर डीस्क्लोजर .....(बेसड ओन वेस्टर्न अस्त्रोलोजी)
कळावे, लोभ असावा.
आपला लाडका : आयुर्हीत
7 Jan 2014 - 11:24 pm | आयुर्हित
कालच्या वक्तव्यात आल्याप्रमाणे वीमेन पॉवर चा प्रत्यय:
प्रियांका गांधी यांची राजकारणात एन्ट्री
आणि
युवराजांची प्रतिमा चमकविण्यासाठी 500 कोटी
कळावे, लोभ असावा.
आपला लाडका : आयुर्हीत
8 Jan 2014 - 10:31 am | सचीन
प्रियांका गांधी राजकारणात आल्यास देशातील जनतेला आनंदच होईल.
8 Jan 2014 - 10:40 am | इरसाल
आणी मग अनिल कपुर्ची २४ ही सिरीयल प्रत्यक्षात येईल.
8 Jan 2014 - 3:07 pm | चिरोटा
गाडीतून उतरून तरातरा चालणे,अच्छा/टाटा करून परत गाडीत बसायचे दिवस आता नाहीत्.इंदिरा गांधींची ती स्टाईल लोकांनी चालवून घेतली व मतेही दिली.
जग बदलले आहे.
8 Jan 2014 - 3:09 pm | सचीन
drinks* *DRINK* :drink:
8 Jan 2014 - 3:23 pm | सचीन
drinks* *DRINK* :drink:
8 Jan 2014 - 3:29 pm | गब्रिएल
सचीन्भौ, जन्तेच सोडा वो. तुमाला अजुन एक चरन्कमलाची जोडी मिळाली धुवायला ! व्हवून जावंद्या येक जिल्बी... आपलं लेख. चार दिस झालत खो खो हसुन :)
11 Jan 2014 - 1:37 am | विद्युत् बालक
कोणत्या देशातील जनते बद्दल बोलताय तुम्ही ?
10 Jan 2014 - 11:19 pm | आशु जोग
अटलबिहारी २००४ ला पुन्हा सत्तेवर येतील असं भविष्य या बेवड्याने वर्तवले होते
11 Jan 2014 - 12:22 am | आयुर्हित
प्रेडीक्षण म्हणजे एक भविष्याबद्दल तर्क असतो, जो एका विशिष्ट पद्धतीने,ठराविक प्रकारच्या अभ्यासानुसार (हवे तर ठोकटाल्यानुसार म्हणा)वर्तवला जात असतो. त्याला काही गोष्टी पायाभूत (base)असतात तर काही मर्यादाही.
तुम्ही त्याला एक तर्क म्हणूनच बघितले पाहिजे, न की प्रत्यक्ष भविष्य.
अटलबिहारी २००४ ला पुन्हा सत्तेवर आलेही असते, पण काही बेवडे अजूनही फुकटची दारू ज्याकडून मिळते त्यालाच मते देतात व तुमच्या-आमच्यासारखे महाभाग सुट्टी समजून बाहेर फिरायला जातात.
आपला लाडका: आयुर्हीत
11 Jan 2014 - 9:49 pm | सचीन
अटलबिहारी २००४ ला पुन्हा सत्तेवर आलेही असते, पण काही बेवडे अजूनही फुकटची दारू ज्याकडून मिळते त्यालाच मते देतात व तुमच्या-आमच्यासारखे महाभाग सुट्टी समजून बाहेर फिरायला जातात.>>>>>>> हा तुमचा गैरसमज आहे भाजपा जिंकला कि जनतेचा विजय नि कॉंग्रेस जिंकले तर फुकटची दारू . अटलबिहारी सत्तेवर आले नाही कारण त्या सरकारच्या काळात देशाची सुरक्षा धोक्यात आली होती.देशाचा मानबिंदू संसद ह्यावर हल्ला झाला होता प्रधानमंत्री नि संरक्षण मंत्री ह्यांना लपवावे लागले होते.जनतेला ते खटकले त्या शिवाय शव पेट्यांचा घोटाळा, तहलका अशी अनेक प्रकरणे राम मंदिरावर ठोस भूमिका न घेणे हि कारणे भाजपच्या दारूण पराभवामागे होती.राम मंदिर प्रश्न न सोडवणे भाजपला महागात पडले.
11 Jan 2014 - 10:52 pm | आयुर्हित
असे काही नव्हते........!
राममंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे.तिथे जोपर्यंत निर्णय होत नाही, कोणीच काही करू शकत नाही!!!
कोण जिंकले/हारले या पेक्षा कोण कोणाला काय घेऊन(?)मतदान करतात हेच महत्त्वाचे आहे.
सर्व सुज्ञ लोकांनी काळजी घेऊन मतदान करणे हीच काळाची गरज आहे, हेच खरे.
आपला लाडका: आयुर्हीत