थोडी प्रस्तावना: पाऊस येणार असला तर त्याला एक घटनाक्रम असतो. प्रथम दाटून येते, मग हळूहळू गारठा जाणवायला लागतो, त्यानंतर पाऊस सुरू होऊन सगळं जलमय होत जाते, वाहायला लागते आणि वाहता वाहता विरघळायला लागते. या सर्व घटनाक्रमात क्रमाक्रमाने विरहात झुरणार्या नायकाच्या मनाची अवस्था आणि त्याचे विचार या रचनेत मांडायचा प्रयत्न आहे.
======================================
परत एकदा स्व:तास केले स्वप्नांच्या आधीन |
.......... काल रात्री ||
परत एकदा जीवास केले सखेच्या स्वाधीन |
.......... काल रात्री ||
या रिकाम्या घरात धडपडतांना |
सैरभैर तुझ्या शोधात फिरतांना |
खिडकीत बसून तुझी वाट पाहतांना |
कळले कि सारे सारे मेघ दाटून आले .......... काल रात्री ||
नुरली कुठलीही भानाची वस्त्रे |
थरारली शहारली देहाची गात्रे |
चालवली सांजवेळी वेदनेची सत्रे |
वाटले कि सारे सारे गारठून गेले .......... काल रात्री ||
खिडक्यांचे गज मजबूत काळे |
समोरील चाफ्याचे नाजूक फुल कोवळे |
अन् इथे माझे थकलेले हताश डोळे |
बघ सखे कसे सारे सारे जलमय झाले .......... काल रात्री ||
जळावर आरुढलेली, जमीन सोडलेली माती |
खिडकीबाहेर पडलेली सर्दून विझलेली पणती |
कठड्यावर उगवलेली काही आगंतुक गवताची पाती |
पाहिलेस कसे सारे सारे वाहून गेले .......... काल रात्री ||
या घराचे जीर्ण गळके छत |
पोपडे उडालेल्या भिंतींच्या रंगाचे पोत |
त्या पणतीची पोरकी झालेली वात |
समजलेच नाही कधी हे सारे सारे विरघळून गेले .......... काल रात्री ||
खूप आतून जाणवले सखे तुझ्या असण्याचे महत्व |
मी मात्र उगाच मिरवत होतो प्राक्तनावरचे स्वामित्व |
शेवटी विरघळलेल्या वातीत जाणवतेच ना कापसाचे अस्तित्व |
हेच ते हेच.... जे मला सारे सारे कळून गेले .......... काल रात्री ||
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२७/०४/२०११)
प्रतिक्रिया
27 Apr 2011 - 1:25 pm | प्रकाश१११
या घराचे जीर्ण गळके छत |
पोपडे उडालेल्या भिंतींच्या रंगाचे पोत |
त्या पणतीची पोरकी झालेली वात |
समजलेच नाही कधी हे सारे सारे विरघळून गेले .......... काल रात्री ||
छान आणि मत लिहिलेय !!
27 Apr 2011 - 3:59 pm | गणेशा
खुप आवडली कविता .. पाउस आनि विरहवीराची मनाची स्थीती अप्रतिम विनली आहे तुम्ही ..
शब्द न शब्द आवडला ..
वाचनखुण साठवुन ठेवली आहे ..
27 Apr 2011 - 5:13 pm | प्राजक्ता पवार
छान लिहिले आहे .
27 Apr 2011 - 5:15 pm | गवि
स्तुत्य..
एवढेच म्हणतो.
27 Apr 2011 - 5:15 pm | गवि
स्तुत्य..
एवढेच म्हणतो.
27 Apr 2011 - 5:26 pm | निनाद
वा चांगली जमली आहे ही कविता. मुक्त म्हणायचा का छंदही?
पण ते टिंब कमी करण्याचे मनावर घ्या बॉ जरा. 'म्हण्जे ...........रात्री' ऐवजी विदाउट टिंब 'रात्री' पण चालेल.
28 Apr 2011 - 11:52 am | मिसळलेला काव्यप्रेमी
अहो, ती टिंब एवढ्याकरता आहेत की कविता वाचतांना त्याठिकाणी मला एक छोटा पॉज अपेक्षीत आहे.
29 Apr 2011 - 9:06 am | निनाद
पॉज म्हणजे विराम, म्हणजे तुम्हाला स्वल्पविराम अपेक्षित आहेत का?
वाचण्याचा पॉज वाचकाला ठरवू देत असे मला वाटते!
टिंबांचा वापर म्हणजे नवकवी असल्याची लक्षणे मी मानतो.
तुम्ही तर जुने कवी आहात, म्हणून म्हणतो;
का वाचकांचा वेळ मोडा
आता टिंबे सोडा|
सुटे थांबण्याचा तिढा
विरामचिन्हे जोडा||
28 Apr 2011 - 5:58 pm | विसोबा खेचर
चांगली कविता..!
28 Apr 2011 - 7:26 pm | दत्ता काळे
कविता आवडली.
28 Apr 2011 - 11:47 pm | कवितानागेश
आवडली.
28 Apr 2011 - 11:50 pm | पाषाणभेद
एकदम मस्त आहे
29 Apr 2011 - 12:01 am | स्वानन्द
ओये मिका... खासच!! वेड...
29 Apr 2011 - 8:45 am | मदनबाण
छान...
29 Apr 2011 - 9:10 am | रामदास
कालच्या रात्रीची का ? ही तर रोजच्या रात्रीची कविता आहे. आवडली.
पण लाल मेंदी दिवसेंदिवस गडद काळी का होते आहे ?
29 Apr 2011 - 9:11 am | नगरीनिरंजन
छान कविता!
29 Apr 2011 - 10:39 am | मुलूखावेगळी
छान रे
गझल वाटतेय का ही.
29 Apr 2011 - 11:10 am | निनाद
कविता नव्हे, ही गझल; सांगा मिकाला
पण तो नाही म्हणतो, गझल करायला |
जमत नाही म्हणे नाट्य आणायला
नि शब्दांच्या मालगाड्या पाठवायला ||
;)
29 Apr 2011 - 11:08 am | किसन शिंदे
एवढं सगळं कसं सुचतं राव तुम्हाला???
लय भारी!!!
29 Apr 2011 - 2:43 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सर्वांना धन्यु :)