वीसेक वर्षांपूर्वी कांटा लगा या गाण्यामुळे प्रसिध्द झालेल्या शेफाली जरीवालाचे मागच्या आठवड्यात वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. ४२ हे काही जायचे वय नाही. तिला आदरांजली.
मनोरंजन व फॅशन क्षेत्रात काम करणार्या लोकांचे भांडवल म्हणजे त्यांची शरीरयष्टी, सुंदरता ई. ई. मग वयाचा प्रभाव दिसु नये म्हणुन ईतर उपाय जसे की शस्त्रक्रिया, काही ठरावीक औषधे घेणे, अगदी द्रवीडी प्राणायाम करण्यासारखे डायट घेणे वगेरे वगेरे प्रकार चालतात. त्याचा मग आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. शेफाली त्याचीच बळी ठरली.
स्पर्धा जीवघेणी आहे. अक्षरशः जीवघेणी. तिच्या आत्म्यास शांती लाभो.
एका अशिक्षित प्रधानमंत्रीला घाना देशाने सर्वोच्च पुरस्कार दिला. अशिक्षित व्यक्तीला मिळालेल्या विभिन्न देशांच्या सर्वोच्च पुरस्कारांची संख्या बहुतेक 25च्या जवळपास झाली असावी.
गेल्या अनेक वर्षांपासून चीनने जगाच्या वेगवेगळ्या भागात आपले हातपाय पसरायचे प्रयत्न चालूच ठेवले आहेत. त्या अंतर्गतच पॅसिफिक महासागरात आपले लष्करी तळ प्रस्थापित करण्यावर चीनचा भर आहे. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या दादागिरीचा फिलीपीन्स वगैरे आजूबाजूच्या देशांना त्रास होत आहे. त्यापलीकडे जाऊन दक्षिण पॅसिफिकमध्ये आपले सैनिकी तळ असावेत असा चीनचा प्रयत्न आहे. त्याविरूध्द फिजीचे पंतप्रधान सितीवेनी राबुका यांना आपला आवाज उठवला आहे आणि पॅसिफिकमध्ये चीनच्या लष्करी तळांना विरोध केला आहे.
मला कधीतरी फिजीला फिरायला जायची इच्छा आहे. त्यामुळे मी तिथल्या घडामोडींवर मधून मधून लक्ष ठेऊन असतो. ब्रिटिश काळात विविध देशांमध्ये उसाच्या मळ्यांमध्ये काम करायला भारतातून कंत्राटी पध्दतीवर मजूर नेले गेले होते. त्यांच्या कंत्राटाचा कालावधी संपल्यावर बरेचसे मजूर तिथेच राहिले आणि त्यामुळे बर्याच देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. त्रिनिदाद-टोबॅगो, सुरिनाम, मॉरीशस आणि फिजी अशी काही उदाहरणे आहेत. आज फिजीमध्ये एकूण लोकसंख्येच्या साधारण ३०% लोक भारतीय वंशाचे आहेत. तिथे पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बरेच मजूर ब्रिटिश काळात गेले त्यामुळे भोजपुरीने प्रभावित हिंदी तिथे बोलली जाते. दक्षिण भारतातूनही तिथे मजूर गेले होते. आज दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठे हिंदू मंदिर- शिव सुब्रमण्यम मंदिर फिजीमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या नांदी शहरात आहे. आपल्याकडे तामिळनाडूत हिंदू मंदिरांची जशी बांधकाम शैली असते साधारण तशीच त्या मंदिराच्या बांधकामातही वापरली आहे. नांदीहून २०-२५ किलोमीटर उत्तरेला गेले की लौटोका शहरात एक टिळक हायस्कूल आहे- आणि ते टिळक अर्थातच लोकमान्य टिळक. फिजीमधील मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे भारतीय वंशाच्या लोकांच्या मालकीचे आहेत. फिजीची राजधानी सुवामध्ये सगळ्यात मोठा मॉल आहे दामोदर सिटी मॉल . त्यांचाच दुसरे एक शहर लंबासामध्ये पण तसाच मोठा मॉल आहे. फिजीत सगळ्यात मोठी रिटेल चेन आहे आर.बी.पटेल ग्रुपची. राजधानी सुवामध्ये कित्येक भारतीयांची रेस्टॉरंट्स आहेत. तिथले गोविंदा हे शाकाहारी रेस्टॉरंट खूप प्रसिध्द आहे. देशातील फार तर ५% उद्योगधंदे मूलनिवासी फिजी लोकांच्या हातात आहेत असे मध्यंतरी वाचले होते.
एवढे सगळे रामायण लिहायचा उद्देश हा की आजच्या फिजीच्या पंतप्रधानांची पार्श्वभूमी. बाहेरून आलेल्या भारतीयांनी उद्योगधंदे-व्यवसायांमध्ये इतके पाय रोवले आहेत आणि भारतीय वंशाच्या लोकांची संख्या इतकी जास्त आहे यामुळे मूलनिवासी लोकांमध्ये अस्वस्थता आहे. १९८० च्या दशकात तर भारतीय वंशाच्या लोकांची संख्या अर्ध्याहूनही जास्त होती. ते १९८७ मध्ये सैन्यप्रमुख होते आणि भारतीय वंशाच्या लोकांच्या विरोधात होते. १९८७ मध्ये निवडणुक झाली आणि सत्तेत आले होते टिमोसी बवादरा हे लेबर पार्टीचे पंतप्रधान आणि त्यांचे उपपंतप्रधान होते भारतीय वंशाचे हरीश शर्मा. या सरकारला राबुकांनी उठाव करून सत्तेवरून खाली खेचले. त्यानंतर भारतीय वंशाच्या लोकांविरोधात मोठ्या प्रमाणावर दंगली झाल्या. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर भारतीय वंशाच्या लोकांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडला स्थलांतर केले. त्यामुळे आता भारतीय वंशाच्या लोकांची संख्या तिथे ३०% च्या आसपास इतकी कमी झाली. लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर राबुका पहिल्यांदा उपपंतप्रधान आणि मग १९९२ ते १९९९ या काळात पंतप्रधान पदावर विराजमान झाले. १९८७ मध्ये फिजीत लष्करी बंड झाले तेव्हा भारतात राजीव गांधींचे सरकार होते आणि परराष्ट्रमंत्री होते नारायणदत्त तिवारी. फिजीत झालेल्या प्रकारानंतर राबुकांना धडा शिकवायला रॉने तेव्हाच फिजीत ऑपरेशन सुरू केले होते आणि त्यानंतर आलेल्या सरकारांनी ते चालू ठेवले. शेवटी त्या ऑपरेशनला यश आले १९९९ मध्ये. याविषयी https://www.youtube.com/watch?v=LXqnjptvhu4 हा युट्यूब व्हिडिओ मस्त आहे.
पण त्यानंतर राबुकांना अक्कल सुचली असे दिसते. शेवटी जवळपास सगळे व्यवसाय भारतीय वंशाच्या लोकांच्या ताब्यात असतील तर त्यांना दुखावून चालायचे नाही हे त्यांना कळले असावे. तसाही भारतीय वंशाच्या लोकांचा इतरांना कुठेही त्रास नसतो. आपण बरे आणि आपले काम बरे असेच ते राहतात. मग ते असले तर फिजीच्या मूलनिवासींना खटकण्यासारखे खरं तर काही असू नये. २००६ मध्ये राबुका कुठलाशा शस्त्रक्रियेसाठी अहमदाबादला आले होते तेव्हा त्यांनी १९८७ मध्ये लष्करी उठाव केला आणि भारतीय वंशाच्या लोकांना त्रास दिला ही आपली चूक झाली हे कबुल केले. त्यानंतर ते काही वर्षे राजकीय विजनवासात होते पण २०१४ च्या निवडणुकांमध्ये परतले. तेव्हा फिजी फर्स्ट पक्षाचे सरकार स्थापन झाले आणि फ्रँक बेनमरामा पंतप्रधान झाले. हे महाशय २००६ मध्ये फिजीच्या नौदलाचे प्रमुख होते आणि २००६ मध्ये त्यांनी तत्कालीन सरकारविरोधात उठाव करून ते सरकार उलथवले होते. त्याचे कारण २००० मध्ये फिजीच्या संसदभवनात पंतप्रधान महेंद्र चौधरी आणि सगळ्या मंत्रीमंडळाला ओलीस ठेवायचा जो प्रकार झाला त्यातील दोषींना माफी द्यायची तरतूद असलेले एक विधेयक तत्कालीन सरकारने पास केले होते त्याला बेनमरामा यांचा विरोध होता. बेनमरामा पंतप्रधान असताना सध्याचे पंतप्रधान सितीवेनी राबुका विरोधी पक्षनेते होते. २०१७ मध्ये परत एकदा राबुकांनी १९८७ मधील लष्करी उठावाबद्दल माफी मागितली. २०२२ मध्ये राबुका पंतप्रधान झाले आणि मे २०२३ मध्ये त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट होणार होती त्यापूर्वी काही दिवस पंतप्रधान कार्यालयातून एक प्रसिध्दीपत्रक जारी करून परत एकदा त्यांनी १९८७ मध्ये भारतीय वंशाच्या लोकांना त्रास दिल्याबद्दल माफी मागितली.
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्या १९८३ मध्ये फिजीला गेल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये म्हणजे सत्तेत आल्यावर सहा महिन्यातच नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाला कोणत्या तरी परिषदेसाठी गेले असताना फिजीच्या भेटीवर पण गेले होते. त्यानंतर इंडो-पॅसिफिक काऊंसिलच्या बैठका मधूनमधून होत असतात आणि स्वतः पंतप्रधान त्यात लक्ष घालतात. त्यात फिजीबरोबरच किरिबाती, तुवालू, वानुआतू वगैरे देश सहभागी होतात. चीनच्या वर्चस्ववादाला शह द्यायला हा भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि त्या भागात फिजी हा सगळ्यात महत्वाचा आणि बर्यापैकी भक्कम अर्थव्यवस्था असलेला देश आहे. तो देश आणि त्यातूनही एकेकाळी भारतीयांचा द्वेष करणार्या पंतप्रधानांच्या नेतृत्वातील सरकार असताना चीनविरोधात जात असेल तर ते चांगलेच होईल. २०२२ मध्ये बेनमरामा यांचा निवडणुकीत पराभव होऊन राबुका पंतप्रधान झाले त्याचे वाईट वाटले होते कारण त्यांची पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर फार विश्वास ठेवण्यायोग्य ते आहेत का हा प्रश्न होता. तसे नसेल तर ते आपल्यासाठी चांगलेच आहे.
अवांतरः
१. कधीतरी फिजीमधील २००० आणि २००६ मधील उठावांवर लिहायला आवडेल.
२. २०१४ मध्ये हायवे टू सुवा हा फिजी-हिंदी भाषेतील आलेला फिजीत निर्माण झालेला पहिला हिंदी चित्रपण https://www.youtube.com/watch?v=N_cRnae7Nqo वर बघता येईल. ते हिंदी सगळे समजत नाही त्यामुळे सबटायटल बघावे लागले होते. आपल्या चित्रपटांच्या तुलनेत फिजीचा चित्रपट उद्योग किती मागे आहे हे तो चित्रपट बघून कळेल.
३. फिजी बेटे किती सुंदर आहेत हे २०१२ मध्ये आलेल्या टेबल नं. २१ या हिंदी चित्रपटात बघायला मिळेल. त्या चित्रपटाचे शुटिंग फिजीमध्ये झाले आहे. इतर देशातून निर्मात्यांनी आपल्याकडे येऊन चित्रपटांचे शुटिंग करावे यासाठी तेव्हा फिजीच्या सरकारने काही योजना सुरू केली होती. त्या अंतर्गत टेबल नं. २१ चे शुटिंग फिजीमध्ये झाले.
बजेट डेफिसीट बद्दल बोलण्यात सगळे रिपब्लिकन पुढे असतात. पण डेफिसीटचा डोंगर नेहमी रिपब्लिकन उभे करतात.
न्यू यॉर्क सिटी महापौर उमेदवार ममदानीला डिपोर्ट करण्याची धमकी ट्रम्प देत आहे. इतकेच काय, त्याच्या बिलावर एकेकाळचा दोस्त इलॉन मस्क टीका करतोय तर त्याच्यावर पण तपास करावा असे ट्रम्प म्हणतोय.
दोन बातम्या ऐकण्यात आहेत
१) शी जिन पिंग सध्या दिसेनासे झाले आहेत. त्यांच्या वावर कुठे दिसत नाहिय्ये. चीन चा इतिहास पाहिलाअ तर असे दिसते की शी जिन पिंग हे लवकरच पदावरून पाय उतार झालेले दिसतील.
२) मार्क जुकरबर्ग ला ओव्हल ऑफिस मधील एका मिटींग मधून बाहेर घालवून देण्यात आले.
ते स्वतःच पेरत असतील असल्या बातम्या.
कोण आपल्या मागे उठते ते चेक करायला.
एकतर ह्यांचे निवास पोलादी पडद्याचे. एकछत्री म्हणावा असा कारभार.
मग टिपिकल हुकुमशहा जसे वागतो तसे वागणारच हे दोघे.
देशभर विविध क्षेत्रात दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढतच चालला आहे, तिकडे डीआरडीओचे संचालक पाकिस्तानला गोपनिय माहिती पुरवली म्हणून जेलात आहे, आता नव्याने त्यांनी जामिनीसाठी अर्ज केला आहे, पाकिस्तानला पुरवलेली माहिती गोपनिय नव्हती म्हणून जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. अरे भावड्या, पण शेण खाल्लेच कशाला. अर्थात कायद्यातून सुटतील जामीन वगैरे मिळेल.
दुसरीकडे, देशातील वैद्यकीय शिक्षणातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट सीबीआयने शुक्रवारी उघडकीस आणले. धक्कादायक बाब म्हणजे या गैरव्यवहारात केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अधिकाऱ्यांसह मध्यस्थ आणि खासगी वैद्यकीय कॉलेजांच्या प्रतिनिधींचे जाळे सहभागी असल्याचे उघड झाले आहे. सर्व गैरव्यवहारांची पाळेमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयापर्यंत पोहोचलेली आहेत.
चौकशी होईल, आणि पुन्हा अगा जे घडलेच नाही. गोबरयुगात हे असं चालायचंच. सर्वांना आषाढी एकदाशीच्या हार्दिक शुभेच्छा.
उद्धव आणि राज एकत्र राहावेत असं बाळासाहेबांचं स्वप्नं कधी होतं? तसं असतं तर "नवा पक्ष काढून नकोस इथे सेनेत राहा" असा प्रयत्न केला नसता का? "जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं"- राज आजच्या वरळीच्या सभेतील भाषणात.
गेल्या महिन्यात अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स ह्या कंपनीने जर्मनीच्या एका संरक्षण कंपनीबरोबर मोठा करार केला. भारतिय सैन्याला रिलायन्स डिफेन्स terminally guided munitions (TGM) पुरवणार आहे. रत्नागिरीतील वातड येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. कोकणवासियांचे त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.! https://www.business-standard.com/companies/news/reliance-defence-diehl-...
ही बातमी वाचुन आनंदात मग्न असताना परवा दुसरी बातमी आली. Anil Ambani says SBI slapped ‘fraud’ tag on Rcom loan acct without hearing him https://www.livemint.com/industry/banking/anil-ambani-responds-to-sbi-s-...
दोन्ही कंपन्या वेगळ्या आहेत पण अनिल अंबानींच्याच. असो.
सध्या एक विडिओ फिरतो आहे. काही उत्तर भारतीय बायका ( या म्हणे बाहेरून पैसे देऊन आणल्या होत्या)एका मराठी मुलीला चोप देत आहेत कोकणात.( कोकणी रान माणूस चानेलवर पाहा). एका गावात कुणी उत्तर भारतीयाने कोकणात जमीन घेऊन कुंपण घालायला सुरुवात केल्यावर जवळच्या गावातील गावकरी संतापले. "आमची गुरे आम्ही इकडे चारत होतो ते बंद करता येणार नाही" म्हणून विरोध करायला गेलेली एक तरुणी मार खाऊन आली.
म्हणजे इकडेही तीस वर्षांत मुंबई होणार हे नक्की.
बॉलीवूडमधील नामवंत कोरिऑग्राफर फराह खानच्या घरच्या स्वयंपाकघरात झुरळांचा सुळसुळाट झाला होता. त्याचे कारण तिच्या स्वयंपाकघरातील कॅबिनेट्स लाकडी होती आणि लाकडी कॅबिनेट्स ओली झाल्यावर झुरळांना मोकळे रान मिळते हे तिला कळले. म्हणून मग तिने लाकडी कॅबिनेट्स बदलून स्टिलची कॅबिनेट्स करून घेतली आहेत असे समजते. तुमच्या घरी पण अशी झुरळे वाढली असतील तर काय करायचे याचे मार्गदर्शन फराह खानने सगळ्यांना केले आहे.
जेन स्ट्रीटने चुकीच्या पद्धती वापरून भांडवली बाजारातील इंडेक्स ऑप्शन्समध्ये ४३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमावल्याच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आरोपांदरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या 'सेबी' या सर्वोच्च संस्थेच्याच पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जेन स्ट्रीट आणि संबंधित संस्थांनी बँक निफ्टी निर्देशांकात कृत्रिमरीत्या चढ-उतार करण्यासाठी 'इंट्रा-डे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी' आखल्याचे सेबीने म्हटले होते.
<'सेबी' या सर्वोच्च संस्थेच्याच पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.>
सेबी कधीच पारदर्शक नव्हती आणि सेबीची धोरणे कायम "देवो दूर्बल घातकः" याला अनुसरून मोठ्या माशांना फायदेशीर अशी होती. सुचेता दलाल या बाई कायम सेबीच्या अनागोंदी कारभाराला उघडं पाडत असतात.
राहुल गांधी यांचं मत सोडून देऊ. पण आपणास या अद्भुत जीव चराचर सृष्टीचं ज्ञान आहे, तेव्हा आपल्या दिव्यचक्षुने आपलं मत मांडून या इहसृष्टीला उपकृत करावे म्हणजे, समस्त जीव जंतू यांना मोक्षाची दारं उघड़तील, असे वाटते.
ती जी काय सेबी वगैरे आहे, ती काही का करेना, सामान्य गुंतवणूकदारांचं काही का नुकसान होईना, रा.गा. त्याच्याविरूध्द बोललेत म्हणून सेबीला चूक म्हणणार नाही.
यात तुंम्हाला कावीळ, द्वेष इ.इ. दिसत नाही का?
डॉ.खरेच्या कुठे नादी लागता. गोबरफॅन असल्यामुळे त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा नाहीत.
सेबीचे अध्यक्ष काल म्हणाले, आम्हाला नवीन नियमांची गरज नाही; तर अधिक अंमलबजावणी आणि देखरेखीची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या संस्थांकडून गुंतवणुकीत वेगवेगळ्या प्रकारे फेरफार केला जाऊ शकतो. इतके म्हणूनही सर्वत्र शांतता आहे.
ज्या व्यक्तीने जातीनिहाय जनगणनेला विरोध करणाऱ्या सरकारला हा निर्णय घ्यायला भाग पाडले त्याची वचक वाढल्याने त्याचे मत घेताना अवघडलेपणा येणे साहजिकच आहे. त्यामुळे आधार कार्ड, वस्तू आणि सेवा कर, मनरेगाला विरोध करणाऱ्या ५६ " छातीच्या माती खाणाऱ्याचे मत घेतले तरी चालेल.
>> सेबी बरोबर कि चूक हा मुद्दा मुळात अलाहिदा
मग काय राहूल गांधी यांचे ट्रोलिंग करणे हाच तुमचा मुद्दा? स्वतःच कबुली दिल्याबद्दल धन्यवाद.
बाकी...
>> परदेशात जाऊन भंपक बोलणारा हा माणूस
हे वाचून मजा आली. निदान बोलू तरी शकतोय. तेही टेलिप्रॉम्प्टरशिवाय :-)
परदेशात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला मुळात प्रश्नच न समजल्यामुळे भलतेच उत्तर देणार्यापेक्षा
किंवा
देशात एकाही पत्रकार परिषदेला सामोरे जाण्याची हिंमत नसलेल्यापेक्षा
निदान बोलू तरी शकतोय. तेही टेलिप्रॉम्प्टरशिवाय :-)
ही ही ही . . .
एकदा काहीतरी प्रश्न विचारला होता होस्ट ने रागा ला ... तेव्हा जी फे फे झाली होती ती अजुन आठवतेय !!
जेन स्ट्रीट या कंपनीने जो हजारो कोटी रुपयांचा नफा मिळवला त्यात सान्य गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. सेबीचे काम सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हे आहे. ते करण्यात सेबी अपयशी ठरली आहे. म्हणून रागा यांनी सेबीच्या पारदर्शकतेची मागणी केली आहे. हा मूळ मुद्दा डॉ. बिरुटे यांनी मांडला होता.
गुंतवणूकदारांच नुकसान, सेबीची अकार्यक्षमता, अपारदर्शकता हे सगळं राहिलं बाजूला... तुंम्ही लागलात रागाच्या लायकीच्या मागे. म्हणजे आपलं, नागरिकांचं नुकसान झालं तरी चालेल पण रागा ला श्रेय मिळता कामा नये. ही कसली वृत्ती म्हणायची?
जेन स्ट्रीट कंपनीमुळे देशातील किरकोळ गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागला. या प्रकरणी भांडवली बाजार नियामक संस्था सेबीने कंपनीने कमाविलेला ४ हजार ८०० कोटी रुपयांचा नफा जप्त करण्याचे आदेश दिले, तरीही तोटा झालेल्या गुंतवणूकदारांना कोणतीही भरपाई मिळणार नाही.
>> आपल्यातीलच एका ऐवजी साप आपला राजा
लोकशाहीत कसला राजा? कोणीही खुर्चीवर बसला तरी प्रश्न विचारलेच पाहिजेत. एकचालकानुवर्तीत वाढलेल्यांना हे कळतच नाही की पत्रकार, नागरीक प्रश्न विचारणार. सरळ पाणी पिऊन पळून जातात.
स्टार प्रवाहवर लवकरच नवीन मालिका सुरू होत आहे. त्या नव्या मालिकेचा प्रोमो उद्या म्हणजे १० जुलै रोजी येणार आहे. त्या प्रोमोची झलक म्हणून 'तुमची आवडती खलनायिका परत येत आहे' असा प्रचार स्टार प्रवाहने केला आहे.
ही आवडती खलनायिका कोण असेल याविषयी रसिकांमध्ये तर्क लढविले जायला सुरवात केली जात आहे. अनेकांनी रूपाली भोसले असेल असे म्हटले आहे तर काहींनी माधवी निमकर असेल अशी अपेक्षा केली आहे.
मस्तच एकदम.
मागे एकदा एका अशाच खासदार गायकवाडांनी कर्मचार्याला मारले म्हणून त्यांना विमानप्रवासबंदी करुन माज उतरवला होता म्हणे.
आता दुसर्या एका आमदार गायकवाडाने आमदार निवासातल्या कॅन्टीनचे अन्न खराब होते म्हणून नेसत्या टोवेल बनियानवर जाउन कॅन्टीनवाल्याला हाणले.
तूर्तास सदरहू आमदाराला निदान अन्नबंदी तरी करुन माज उतरवावा व आम्ही कसे वेगळे आहोत हे दाखवून द्यावे.
ते सगळं सोडा हो. विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामना बघायला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारतात आले होते ना?पाहुण्या देशाचा पंतप्रधान भारतात मुद्दामून क्रिकेट सामना बघायला येणार हे म्हटल्यावर मोदींनाही तिथे जाणे भाग होते. अन्यथाही ते थोडा वेळ तरी गेलेच असते पण पाहुण्या देशाचा पंतप्रधान येणार म्हटल्यावर नक्कीच. तिथे समजा आय.सी.सी आणि बी.सी.सी.आय चे माजी अध्यक्ष या नात्याने शरद पवार पण उपस्थित असते तर मोदी पवारांकडे बोट दाखवत ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना काय म्हणाले असते माहित आहे का-- यांचे बोट धरून मी राजकारणात आलो.
जनसुरक्षा कायद्यातील काही तरतुदींमध्ये बदल करण्यात आले आहेत. सदर विधेयकाच्या कक्षेत आता केवळ डाव्या -कडव्या व तत्सम संघटना असणार आहेत. ह्यात उजव्या कडव्या संघटनांना सूट असणार आहे का?
विधेयकाच्या कक्षेत आता केवळ डाव्या -कडव्या व तत्सम संघटना असणार आहेत. ह्यात उजव्या कडव्या संघटनांना सूट असणार आहे का?
आज संध्याकाळी विधानसभेत रोहित पवारांनी हाच प्रश्न विचारला.
उजव्या कडव्या संघटनेबद्दल एक अवाक्षर काल विधासभेत काढले नाही. उजवे कड़वे आणि सरकार मिळून सरकार विरूद्ध केलेले आंदोलन हिंसक, देशविघातक ठरवून मोकळे होतील. चौकशी होऊन अशा संघटना व्यक्ती निर्दोष सुटेपर्यन्त जेलात खितपत पडतील.
या कायद्याचा वापर करू डाव्या विचारांच्या संघटना, राजकीय पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आदी कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांवर, शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी संघटनांवर कारवाई होणार नाही.-मा.मुख्यमंत्री ( उजवे सोडून सगळे )
असे जरी म्हणत असले तरी 'सरकार विरुद्ध' बोलणा-यांचा आवाज दाबण्याचाच एक भाग आहे, आणि दबले नाही तर, जनसुरक्षा कायद्यात भले तो सुटेल पण त्याची जी हरेशमेंट जी होईल त्याने तो कधीही सरकार विरोधी भूमिका घेणार नाही. उद्या सरकार विरुद्ध लिहिणारे-बोलणारे हिंसक आणि शहरी नक्षलवादी ठरवून जेलात घालतील असे वाटायला लागले आहे.
आदिवासी संघटित नसल्याने त्यांना सरकारविरोधी मोर्चा काढायचा असल्यास डाव्यांच्या झेंड्याखाली काढावा लागतो. वनवासी संघटना सध्याच्या सरकारविरोधात आदिवासींचा मोर्चा काढणार नाहीत ( कारण स्पष्ट आहे ). बळी डाव्यांचाच जाणार, सरकारचा उद्देशही तोच आहे. आदिवासी, कष्टकऱ्यांना वालीच न राहिल्याने सध्याच्या सरकारचे फावणार आहे.
उद्या सरकार विरुद्ध लिहिणारे-बोलणारे हिंसक आणि शहरी नक्षलवादी ठरवून जेलात घालतील असे वाटायला लागले आहे.
असा कायदा अनेक राज्यांनी केला आहे. माओवाद याला 'लेफ्ट विंग एक्स्ट्रिमिझम' अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. याला न्यायालयातही तेच म्हटलं जातं.
कसंय की डावेच स्वत:ला डावे म्हणवून घेतात. जे डावे नाहीत ते उजवे धरले जातात. कोणीही बिगरडावा आपणहून स्वत:स उजवा म्हणवून घेत नाही. त्यामुळे डावे की उजवे हा वाद डाव्यांनी न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सोडवलेला बरा पडावा. ( पडावा या क्रियापदांतही डावा हा शब्द लपलेला आहेच. )
संविधानकारांनी संविधान कठोर आणि लवचिक दोन्ही बनवले आहे, जेणेकरून त्यात बदल करणे शक्य होईल... पण गोबरयुगात घटनेची वाट लागेल हे घटनाकरांच्या लक्षात आले नसावे....
>> उद्या सरकार विरुद्ध लिहिणारे-बोलणारे हिंसक आणि शहरी नक्षलवादी ठरवून जेलात घालतील
असे होण्याची दाट शक्यता आहे.
हा कायदा हेतुपुरस्सर अनेक गोष्टींची व्याख्या अत्यंत मोघम ठेवून सरकारच्या मर्जीनुसार कोणालाही तुंरूंगात घालण्याची व त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याची सोय करून देणारा आहे. मुळात युएपीए सारखा कायदा आधीच अस्तित्वात असताना या कायद्याची गरजच नव्हती. म्हणून हा कायदा जनसुरक्षा नसून भाजप सुरक्षेसाठी आणला आहे असे विरोधकांचे मत आहे.
काही नाही शी जिनपिनगचया वरचढ कोणी झायावर ते खरोखरच नाहीसे झालेले असण्याची शक्यता जास्त आहे . चीनमधे पार्टीचे लोक जास्तविचार न करता शूट at साईट ही असते , ङोईजड झाला एखादा कार्यकर्ता की शूट हे असते. जॅक maaचे पुढे काय झाले हे त्याना एकदाच विमानाचा जिना चढताना दाखवले अर्थात जुना फोटो . नन्तर अजूनही त्या बद्द्ल काहीच आलेले नाही वर्त़मानपत्रात.. निरीक्षण करत ठेवणे या चिनी लोकान्चे हेच आपण करु शकतो. जे जे होईल ते पहात राहणे.
प्रतिक्रिया
2 Jul 2025 - 8:28 pm | गामा पैलवान
शेफाली जरीवाला हीस हृत्शूल झटका आला. त्यात तिचे निधन झाले.
लसबळी?
-गा.पै.
2 Jul 2025 - 8:32 pm | शाम भागवत
जरीवाला नावावरून संजीव कुमार आठवला.
2 Jul 2025 - 8:37 pm | शाम भागवत
त्यांचेही निधन ४८ व्या वर्षी झाले होते.
3 Jul 2025 - 12:44 am | कॉमी
लसबळी?
3 Jul 2025 - 7:28 am | सुक्या
मनोरंजन व फॅशन क्षेत्रात काम करणार्या लोकांचे भांडवल म्हणजे त्यांची शरीरयष्टी, सुंदरता ई. ई. मग वयाचा प्रभाव दिसु नये म्हणुन ईतर उपाय जसे की शस्त्रक्रिया, काही ठरावीक औषधे घेणे, अगदी द्रवीडी प्राणायाम करण्यासारखे डायट घेणे वगेरे वगेरे प्रकार चालतात. त्याचा मग आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. शेफाली त्याचीच बळी ठरली.
स्पर्धा जीवघेणी आहे. अक्षरशः जीवघेणी. तिच्या आत्म्यास शांती लाभो.
3 Jul 2025 - 10:49 am | कपिलमुनी
याचा काही मेडिकल इव्हिड्न्स आहे का ?
3 Jul 2025 - 10:45 am | विवेकपटाईत
एका अशिक्षित प्रधानमंत्रीला घाना देशाने सर्वोच्च पुरस्कार दिला. अशिक्षित व्यक्तीला मिळालेल्या विभिन्न देशांच्या सर्वोच्च पुरस्कारांची संख्या बहुतेक 25च्या जवळपास झाली असावी.
3 Jul 2025 - 11:02 am | चंद्रसूर्यकुमार
गेल्या अनेक वर्षांपासून चीनने जगाच्या वेगवेगळ्या भागात आपले हातपाय पसरायचे प्रयत्न चालूच ठेवले आहेत. त्या अंतर्गतच पॅसिफिक महासागरात आपले लष्करी तळ प्रस्थापित करण्यावर चीनचा भर आहे. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या दादागिरीचा फिलीपीन्स वगैरे आजूबाजूच्या देशांना त्रास होत आहे. त्यापलीकडे जाऊन दक्षिण पॅसिफिकमध्ये आपले सैनिकी तळ असावेत असा चीनचा प्रयत्न आहे. त्याविरूध्द फिजीचे पंतप्रधान सितीवेनी राबुका यांना आपला आवाज उठवला आहे आणि पॅसिफिकमध्ये चीनच्या लष्करी तळांना विरोध केला आहे.
मला कधीतरी फिजीला फिरायला जायची इच्छा आहे. त्यामुळे मी तिथल्या घडामोडींवर मधून मधून लक्ष ठेऊन असतो. ब्रिटिश काळात विविध देशांमध्ये उसाच्या मळ्यांमध्ये काम करायला भारतातून कंत्राटी पध्दतीवर मजूर नेले गेले होते. त्यांच्या कंत्राटाचा कालावधी संपल्यावर बरेचसे मजूर तिथेच राहिले आणि त्यामुळे बर्याच देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. त्रिनिदाद-टोबॅगो, सुरिनाम, मॉरीशस आणि फिजी अशी काही उदाहरणे आहेत. आज फिजीमध्ये एकूण लोकसंख्येच्या साधारण ३०% लोक भारतीय वंशाचे आहेत. तिथे पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बरेच मजूर ब्रिटिश काळात गेले त्यामुळे भोजपुरीने प्रभावित हिंदी तिथे बोलली जाते. दक्षिण भारतातूनही तिथे मजूर गेले होते. आज दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठे हिंदू मंदिर- शिव सुब्रमण्यम मंदिर फिजीमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या नांदी शहरात आहे. आपल्याकडे तामिळनाडूत हिंदू मंदिरांची जशी बांधकाम शैली असते साधारण तशीच त्या मंदिराच्या बांधकामातही वापरली आहे. नांदीहून २०-२५ किलोमीटर उत्तरेला गेले की लौटोका शहरात एक टिळक हायस्कूल आहे- आणि ते टिळक अर्थातच लोकमान्य टिळक. फिजीमधील मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे भारतीय वंशाच्या लोकांच्या मालकीचे आहेत. फिजीची राजधानी सुवामध्ये सगळ्यात मोठा मॉल आहे दामोदर सिटी मॉल . त्यांचाच दुसरे एक शहर लंबासामध्ये पण तसाच मोठा मॉल आहे. फिजीत सगळ्यात मोठी रिटेल चेन आहे आर.बी.पटेल ग्रुपची. राजधानी सुवामध्ये कित्येक भारतीयांची रेस्टॉरंट्स आहेत. तिथले गोविंदा हे शाकाहारी रेस्टॉरंट खूप प्रसिध्द आहे. देशातील फार तर ५% उद्योगधंदे मूलनिवासी फिजी लोकांच्या हातात आहेत असे मध्यंतरी वाचले होते.
एवढे सगळे रामायण लिहायचा उद्देश हा की आजच्या फिजीच्या पंतप्रधानांची पार्श्वभूमी. बाहेरून आलेल्या भारतीयांनी उद्योगधंदे-व्यवसायांमध्ये इतके पाय रोवले आहेत आणि भारतीय वंशाच्या लोकांची संख्या इतकी जास्त आहे यामुळे मूलनिवासी लोकांमध्ये अस्वस्थता आहे. १९८० च्या दशकात तर भारतीय वंशाच्या लोकांची संख्या अर्ध्याहूनही जास्त होती. ते १९८७ मध्ये सैन्यप्रमुख होते आणि भारतीय वंशाच्या लोकांच्या विरोधात होते. १९८७ मध्ये निवडणुक झाली आणि सत्तेत आले होते टिमोसी बवादरा हे लेबर पार्टीचे पंतप्रधान आणि त्यांचे उपपंतप्रधान होते भारतीय वंशाचे हरीश शर्मा. या सरकारला राबुकांनी उठाव करून सत्तेवरून खाली खेचले. त्यानंतर भारतीय वंशाच्या लोकांविरोधात मोठ्या प्रमाणावर दंगली झाल्या. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर भारतीय वंशाच्या लोकांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडला स्थलांतर केले. त्यामुळे आता भारतीय वंशाच्या लोकांची संख्या तिथे ३०% च्या आसपास इतकी कमी झाली. लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर राबुका पहिल्यांदा उपपंतप्रधान आणि मग १९९२ ते १९९९ या काळात पंतप्रधान पदावर विराजमान झाले. १९८७ मध्ये फिजीत लष्करी बंड झाले तेव्हा भारतात राजीव गांधींचे सरकार होते आणि परराष्ट्रमंत्री होते नारायणदत्त तिवारी. फिजीत झालेल्या प्रकारानंतर राबुकांना धडा शिकवायला रॉने तेव्हाच फिजीत ऑपरेशन सुरू केले होते आणि त्यानंतर आलेल्या सरकारांनी ते चालू ठेवले. शेवटी त्या ऑपरेशनला यश आले १९९९ मध्ये. याविषयी https://www.youtube.com/watch?v=LXqnjptvhu4 हा युट्यूब व्हिडिओ मस्त आहे.
पण त्यानंतर राबुकांना अक्कल सुचली असे दिसते. शेवटी जवळपास सगळे व्यवसाय भारतीय वंशाच्या लोकांच्या ताब्यात असतील तर त्यांना दुखावून चालायचे नाही हे त्यांना कळले असावे. तसाही भारतीय वंशाच्या लोकांचा इतरांना कुठेही त्रास नसतो. आपण बरे आणि आपले काम बरे असेच ते राहतात. मग ते असले तर फिजीच्या मूलनिवासींना खटकण्यासारखे खरं तर काही असू नये. २००६ मध्ये राबुका कुठलाशा शस्त्रक्रियेसाठी अहमदाबादला आले होते तेव्हा त्यांनी १९८७ मध्ये लष्करी उठाव केला आणि भारतीय वंशाच्या लोकांना त्रास दिला ही आपली चूक झाली हे कबुल केले. त्यानंतर ते काही वर्षे राजकीय विजनवासात होते पण २०१४ च्या निवडणुकांमध्ये परतले. तेव्हा फिजी फर्स्ट पक्षाचे सरकार स्थापन झाले आणि फ्रँक बेनमरामा पंतप्रधान झाले. हे महाशय २००६ मध्ये फिजीच्या नौदलाचे प्रमुख होते आणि २००६ मध्ये त्यांनी तत्कालीन सरकारविरोधात उठाव करून ते सरकार उलथवले होते. त्याचे कारण २००० मध्ये फिजीच्या संसदभवनात पंतप्रधान महेंद्र चौधरी आणि सगळ्या मंत्रीमंडळाला ओलीस ठेवायचा जो प्रकार झाला त्यातील दोषींना माफी द्यायची तरतूद असलेले एक विधेयक तत्कालीन सरकारने पास केले होते त्याला बेनमरामा यांचा विरोध होता. बेनमरामा पंतप्रधान असताना सध्याचे पंतप्रधान सितीवेनी राबुका विरोधी पक्षनेते होते. २०१७ मध्ये परत एकदा राबुकांनी १९८७ मधील लष्करी उठावाबद्दल माफी मागितली. २०२२ मध्ये राबुका पंतप्रधान झाले आणि मे २०२३ मध्ये त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट होणार होती त्यापूर्वी काही दिवस पंतप्रधान कार्यालयातून एक प्रसिध्दीपत्रक जारी करून परत एकदा त्यांनी १९८७ मध्ये भारतीय वंशाच्या लोकांना त्रास दिल्याबद्दल माफी मागितली.
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्या १९८३ मध्ये फिजीला गेल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये म्हणजे सत्तेत आल्यावर सहा महिन्यातच नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाला कोणत्या तरी परिषदेसाठी गेले असताना फिजीच्या भेटीवर पण गेले होते. त्यानंतर इंडो-पॅसिफिक काऊंसिलच्या बैठका मधूनमधून होत असतात आणि स्वतः पंतप्रधान त्यात लक्ष घालतात. त्यात फिजीबरोबरच किरिबाती, तुवालू, वानुआतू वगैरे देश सहभागी होतात. चीनच्या वर्चस्ववादाला शह द्यायला हा भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि त्या भागात फिजी हा सगळ्यात महत्वाचा आणि बर्यापैकी भक्कम अर्थव्यवस्था असलेला देश आहे. तो देश आणि त्यातूनही एकेकाळी भारतीयांचा द्वेष करणार्या पंतप्रधानांच्या नेतृत्वातील सरकार असताना चीनविरोधात जात असेल तर ते चांगलेच होईल. २०२२ मध्ये बेनमरामा यांचा निवडणुकीत पराभव होऊन राबुका पंतप्रधान झाले त्याचे वाईट वाटले होते कारण त्यांची पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर फार विश्वास ठेवण्यायोग्य ते आहेत का हा प्रश्न होता. तसे नसेल तर ते आपल्यासाठी चांगलेच आहे.
अवांतरः
१. कधीतरी फिजीमधील २००० आणि २००६ मधील उठावांवर लिहायला आवडेल.
२. २०१४ मध्ये हायवे टू सुवा हा फिजी-हिंदी भाषेतील आलेला फिजीत निर्माण झालेला पहिला हिंदी चित्रपण https://www.youtube.com/watch?v=N_cRnae7Nqo वर बघता येईल. ते हिंदी सगळे समजत नाही त्यामुळे सबटायटल बघावे लागले होते. आपल्या चित्रपटांच्या तुलनेत फिजीचा चित्रपट उद्योग किती मागे आहे हे तो चित्रपट बघून कळेल.
३. फिजी बेटे किती सुंदर आहेत हे २०१२ मध्ये आलेल्या टेबल नं. २१ या हिंदी चित्रपटात बघायला मिळेल. त्या चित्रपटाचे शुटिंग फिजीमध्ये झाले आहे. इतर देशातून निर्मात्यांनी आपल्याकडे येऊन चित्रपटांचे शुटिंग करावे यासाठी तेव्हा फिजीच्या सरकारने काही योजना सुरू केली होती. त्या अंतर्गत टेबल नं. २१ चे शुटिंग फिजीमध्ये झाले.
3 Jul 2025 - 11:29 am | कॉमी
बिग ब्युटीफुल बिल पास झाले.
बजेट डेफिसीट बद्दल बोलण्यात सगळे रिपब्लिकन पुढे असतात. पण डेफिसीटचा डोंगर नेहमी रिपब्लिकन उभे करतात.
न्यू यॉर्क सिटी महापौर उमेदवार ममदानीला डिपोर्ट करण्याची धमकी ट्रम्प देत आहे. इतकेच काय, त्याच्या बिलावर एकेकाळचा दोस्त इलॉन मस्क टीका करतोय तर त्याच्यावर पण तपास करावा असे ट्रम्प म्हणतोय.
3 Jul 2025 - 3:02 pm | विजुभाऊ
दोन बातम्या ऐकण्यात आहेत
१) शी जिन पिंग सध्या दिसेनासे झाले आहेत. त्यांच्या वावर कुठे दिसत नाहिय्ये. चीन चा इतिहास पाहिलाअ तर असे दिसते की शी जिन पिंग हे लवकरच पदावरून पाय उतार झालेले दिसतील.
२) मार्क जुकरबर्ग ला ओव्हल ऑफिस मधील एका मिटींग मधून बाहेर घालवून देण्यात आले.
4 Jul 2025 - 7:14 pm | रात्रीचे चांदणे
शी जिन पिंग आणि पुतीन यांच्याविषयी ह्या अशा बातम्या नेहमी येत असतात. कालांतराने खोट्या होत्या हेच सिद्ध होतं. बघू ह्या बातमीच कांय होतंय ते.
4 Jul 2025 - 9:10 pm | अभ्या..
ते स्वतःच पेरत असतील असल्या बातम्या.
कोण आपल्या मागे उठते ते चेक करायला.
एकतर ह्यांचे निवास पोलादी पडद्याचे. एकछत्री म्हणावा असा कारभार.
मग टिपिकल हुकुमशहा जसे वागतो तसे वागणारच हे दोघे.
5 Jul 2025 - 8:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देशभर विविध क्षेत्रात दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढतच चालला आहे, तिकडे डीआरडीओचे संचालक पाकिस्तानला गोपनिय माहिती पुरवली म्हणून जेलात आहे, आता नव्याने त्यांनी जामिनीसाठी अर्ज केला आहे, पाकिस्तानला पुरवलेली माहिती गोपनिय नव्हती म्हणून जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. अरे भावड्या, पण शेण खाल्लेच कशाला. अर्थात कायद्यातून सुटतील जामीन वगैरे मिळेल.
दुसरीकडे, देशातील वैद्यकीय शिक्षणातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट सीबीआयने शुक्रवारी उघडकीस आणले. धक्कादायक बाब म्हणजे या गैरव्यवहारात केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अधिकाऱ्यांसह मध्यस्थ आणि खासगी वैद्यकीय कॉलेजांच्या प्रतिनिधींचे जाळे सहभागी असल्याचे उघड झाले आहे. सर्व गैरव्यवहारांची पाळेमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयापर्यंत पोहोचलेली आहेत.
चौकशी होईल, आणि पुन्हा अगा जे घडलेच नाही. गोबरयुगात हे असं चालायचंच. सर्वांना आषाढी एकदाशीच्या हार्दिक शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
5 Jul 2025 - 2:34 pm | कंजूस
उद्धव आणि राज एकत्र राहावेत असं बाळासाहेबांचं स्वप्नं कधी होतं? तसं असतं तर "नवा पक्ष काढून नकोस इथे सेनेत राहा" असा प्रयत्न केला नसता का? "जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं"- राज आजच्या वरळीच्या सभेतील भाषणात.
5 Jul 2025 - 4:05 pm | चंद्रसूर्यकुमार
बाळासाहेबांना जमले नाही ते मी करून दाखविणार आहे असे स्वतः फडणवीसांनी राज ठाकरेंना प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा सांगितले असावे.
5 Jul 2025 - 4:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
गेल्या महिन्यात अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स ह्या कंपनीने जर्मनीच्या एका संरक्षण कंपनीबरोबर मोठा करार केला. भारतिय सैन्याला रिलायन्स डिफेन्स terminally guided munitions (TGM) पुरवणार आहे. रत्नागिरीतील वातड येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. कोकणवासियांचे त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.!
https://www.business-standard.com/companies/news/reliance-defence-diehl-...
ही बातमी वाचुन आनंदात मग्न असताना परवा दुसरी बातमी आली.
Anil Ambani says SBI slapped ‘fraud’ tag on Rcom loan acct without hearing him
https://www.livemint.com/industry/banking/anil-ambani-responds-to-sbi-s-...
दोन्ही कंपन्या वेगळ्या आहेत पण अनिल अंबानींच्याच. असो.
5 Jul 2025 - 10:25 pm | धर्मराजमुटके
मग आता कोकणात असले प्रकल्प नको म्हणून कोकणी माणुस कोकणस्थ बाणा कधी दाखवणार आहे ?
8 Jul 2025 - 6:25 pm | कंजूस
सध्या एक विडिओ फिरतो आहे. काही उत्तर भारतीय बायका ( या म्हणे बाहेरून पैसे देऊन आणल्या होत्या)एका मराठी मुलीला चोप देत आहेत कोकणात.( कोकणी रान माणूस चानेलवर पाहा). एका गावात कुणी उत्तर भारतीयाने कोकणात जमीन घेऊन कुंपण घालायला सुरुवात केल्यावर जवळच्या गावातील गावकरी संतापले. "आमची गुरे आम्ही इकडे चारत होतो ते बंद करता येणार नाही" म्हणून विरोध करायला गेलेली एक तरुणी मार खाऊन आली.
म्हणजे इकडेही तीस वर्षांत मुंबई होणार हे नक्की.
7 Jul 2025 - 10:50 am | चंद्रसूर्यकुमार
बॉलीवूडमधील नामवंत कोरिऑग्राफर फराह खानच्या घरच्या स्वयंपाकघरात झुरळांचा सुळसुळाट झाला होता. त्याचे कारण तिच्या स्वयंपाकघरातील कॅबिनेट्स लाकडी होती आणि लाकडी कॅबिनेट्स ओली झाल्यावर झुरळांना मोकळे रान मिळते हे तिला कळले. म्हणून मग तिने लाकडी कॅबिनेट्स बदलून स्टिलची कॅबिनेट्स करून घेतली आहेत असे समजते. तुमच्या घरी पण अशी झुरळे वाढली असतील तर काय करायचे याचे मार्गदर्शन फराह खानने सगळ्यांना केले आहे.
अधिक माहिती- https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/home-decor-hacks/farah-kha... वर
7 Jul 2025 - 11:09 am | प्रचेतस
हल्ली मोठी झुरळं दिसत नाहीत, लहान मात्र दिसतात.
7 Jul 2025 - 11:22 am | चंद्रसूर्यकुमार
स्वयंपाकघरात आलेल्या झुरळांचा बंदोबस्त कसा करायचा असा नवा धागा काढला पाहिजे कोणीतरी :)
7 Jul 2025 - 11:35 am | प्रचेतस
काढा तुम्हीच, आम्ही उपाय सांगायला येऊच :)
7 Jul 2025 - 2:13 pm | गामा पैलवान
पूर्वतयारी इथे आहे : https://misalpav.com/node/24718
-गा.पै.
8 Jul 2025 - 6:28 pm | कंजूस
हीच लहान झुरळे ( सिताफळाच्या बीसारखी दिसणारी) रेल्वेच्या डब्यांतही असतात. कशाला जातील रेल्वे सोडून? सगळी सोय असते.
7 Jul 2025 - 11:57 am | कपिलमुनी
रात्रि झोपताना झुरळे असतील तिथे टाकावी.
घर बंद असेल तेव्हा सर्व झुरळे लपतील अशा ठिकाणी टाकावी ..
वास वाईट असतो .
गुण नक्कि येतो .
8 Jul 2025 - 6:18 pm | कंजूस
पण झुरळे कुठून घरात येतात त्या जागाच प्रथम बंद करायच्या आणि मग आलेली झुरळे कोणत्यातरी उपायाने नष्ट करायची मग पुढे काहीच करावे लागत नाही.
8 Jul 2025 - 9:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जेन स्ट्रीटने चुकीच्या पद्धती वापरून भांडवली बाजारातील इंडेक्स ऑप्शन्समध्ये ४३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमावल्याच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आरोपांदरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या 'सेबी' या सर्वोच्च संस्थेच्याच पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जेन स्ट्रीट आणि संबंधित संस्थांनी बँक निफ्टी निर्देशांकात कृत्रिमरीत्या चढ-उतार करण्यासाठी 'इंट्रा-डे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी' आखल्याचे सेबीने म्हटले होते.
-दिलीप बिरुटे
8 Jul 2025 - 10:40 am | युयुत्सु
<'सेबी' या सर्वोच्च संस्थेच्याच पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.>
सेबी कधीच पारदर्शक नव्हती आणि सेबीची धोरणे कायम "देवो दूर्बल घातकः" याला अनुसरून मोठ्या माशांना फायदेशीर अशी होती. सुचेता दलाल या बाई कायम सेबीच्या अनागोंदी कारभाराला उघडं पाडत असतात.
8 Jul 2025 - 9:52 am | सुबोध खरे
राहुल गांधी ?
मग ठीकच आहे
8 Jul 2025 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राहुल गांधी यांचं मत सोडून देऊ. पण आपणास या अद्भुत जीव चराचर सृष्टीचं ज्ञान आहे, तेव्हा आपल्या दिव्यचक्षुने आपलं मत मांडून या इहसृष्टीला उपकृत करावे म्हणजे, समस्त जीव जंतू यांना मोक्षाची दारं उघड़तील, असे वाटते.
-दिलीप बिरुटे
8 Jul 2025 - 7:28 pm | स्वधर्म
ती जी काय सेबी वगैरे आहे, ती काही का करेना, सामान्य गुंतवणूकदारांचं काही का नुकसान होईना, रा.गा. त्याच्याविरूध्द बोललेत म्हणून सेबीला चूक म्हणणार नाही.
यात तुंम्हाला कावीळ, द्वेष इ.इ. दिसत नाही का?
8 Jul 2025 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉ.खरेच्या कुठे नादी लागता. गोबरफॅन असल्यामुळे त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा नाहीत.
सेबीचे अध्यक्ष काल म्हणाले, आम्हाला नवीन नियमांची गरज नाही; तर अधिक अंमलबजावणी आणि देखरेखीची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या संस्थांकडून गुंतवणुकीत वेगवेगळ्या प्रकारे फेरफार केला जाऊ शकतो. इतके म्हणूनही सर्वत्र शांतता आहे.
-दिलीप बिरुटे
8 Jul 2025 - 10:43 am | सुबोध खरे
राहुल गांधींचं मत सोडून द्यायचं? मग कुणाचं घ्यायचं?
केजरीवाल? पवार साहेब? ममता? अखिलेश? लालू कि उठा /राठा?
ता पण एकदा सांगून टाका
8 Jul 2025 - 1:38 pm | आग्या१९९०
ज्या व्यक्तीने जातीनिहाय जनगणनेला विरोध करणाऱ्या सरकारला हा निर्णय घ्यायला भाग पाडले त्याची वचक वाढल्याने त्याचे मत घेताना अवघडलेपणा येणे साहजिकच आहे. त्यामुळे आधार कार्ड, वस्तू आणि सेवा कर, मनरेगाला विरोध करणाऱ्या ५६ " छातीच्या माती खाणाऱ्याचे मत घेतले तरी चालेल.
8 Jul 2025 - 7:59 pm | सुबोध खरे
राहुल गांधी याना स्वतःचे मत आहे का? त्याचा करता करविता वेगळाच आहे.
केवळ गांधी घराण्यात जन्माला आला एवढे सोडले तर काहीही कर्तृत्व नसलेला माणूस. आणि
त्याच्या पुढे लोटांगण घालणारे काँग्रेसी सगळेच धन्य आहेत.
परदेशात जाऊन भंपक बोलणारा हा माणूस. सिंगापूर मध्ये जाऊन काय बोलला?
तर सारी एम आर आय मशिन्स जोडली कि भारताची आरोग्यसेवा सुधारेल. ते कसे ते विचारले तर त्याचे उत्तर देता येईना
असली आचरट मते परदेशात व्यक्त करणाऱ्या बिनडोक माणसाला सेबी काम कसे करते हेही माहिती असणे शक्य नाही.
सेबी बरोबर कि चूक हा मुद्दा मुळात अलाहिदा आहे.
8 Jul 2025 - 8:19 pm | आग्या१९९०
पण देशात तो पत्रकार परिषद टाळत नाही. टेलीप्राँपटर शिवाय भाषण देतो.
8 Jul 2025 - 8:44 pm | स्वधर्म
>> सेबी बरोबर कि चूक हा मुद्दा मुळात अलाहिदा
मग काय राहूल गांधी यांचे ट्रोलिंग करणे हाच तुमचा मुद्दा? स्वतःच कबुली दिल्याबद्दल धन्यवाद.
बाकी...
>> परदेशात जाऊन भंपक बोलणारा हा माणूस
हे वाचून मजा आली. निदान बोलू तरी शकतोय. तेही टेलिप्रॉम्प्टरशिवाय :-)
परदेशात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला मुळात प्रश्नच न समजल्यामुळे भलतेच उत्तर देणार्यापेक्षा
किंवा
देशात एकाही पत्रकार परिषदेला सामोरे जाण्याची हिंमत नसलेल्यापेक्षा
रागाचं बरंच नाही का?
8 Jul 2025 - 10:21 pm | सुक्या
निदान बोलू तरी शकतोय. तेही टेलिप्रॉम्प्टरशिवाय :-)
ही ही ही . . .
एकदा काहीतरी प्रश्न विचारला होता होस्ट ने रागा ला ... तेव्हा जी फे फे झाली होती ती अजुन आठवतेय !!
9 Jul 2025 - 6:18 pm | स्वधर्म
पण कुणीतरी भर मुलाखतीत पाणी मागितलेले... नंतर इतका धसका घेतला, की एकही पत्रकार परिषद घ्यायची हिंमत झाली नाही.
रागा पत्रकारांना अजिबात घाबरत नाही.
9 Jul 2025 - 9:38 am | सुबोध खरे
लोटांगण घालणारे काँग्रेसी
9 Jul 2025 - 10:15 am | आग्या१९९०
चाटणारे भक्त. जिभेला काही विश्रांती?
9 Jul 2025 - 6:20 pm | स्वधर्म
कधीतरी चेंज म्हणून व्यक्तींना झोडपायचं, हिणवायचं, हीन लेखायचं सोडून...
मुद्द्यावर बोललात तर बरं वाटेल तुंम्हालाच. बाकी तुमची मर्जी.
9 Jul 2025 - 7:13 pm | सुबोध खरे
कधीतरी चेंज म्हणून व्यक्तींना झोडपायचं, हिणवायचं, हीन लेखायचं
ज्या व्यक्तीची अजिबात लायकी नाही ती आपल्या माथी मारली जाते हि गोष्ट वेदनादायक नाही का?
आणि आश्चर्य म्हणजे दुसरा कुणीही चालेल पण श्री मोदी नको असे समजणाऱ्या व्यक्तींना हे लक्षात येत नाही हे हि समजण्याच्या पलीकडे आहे.
आपल्यातीलच एका ऐवजी साप आपला राजा म्हणून स्वीकारला तर आपला सर्वनाश होईल हे बेडकांना समजत नाही पण माणसांना समजत नाही.
मूर्ख माणसाला कसलीच भीती वाटत नाही सुज्ञ माणसाचे तसे नसते.
सेबी बद्दल बोलायची राहुल गांधी यांची कुवत आहे का? एवढाही विचार असू नये?
9 Jul 2025 - 8:17 pm | स्वधर्म
जेन स्ट्रीट या कंपनीने जो हजारो कोटी रुपयांचा नफा मिळवला त्यात सान्य गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. सेबीचे काम सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हे आहे. ते करण्यात सेबी अपयशी ठरली आहे. म्हणून रागा यांनी सेबीच्या पारदर्शकतेची मागणी केली आहे. हा मूळ मुद्दा डॉ. बिरुटे यांनी मांडला होता.
गुंतवणूकदारांच नुकसान, सेबीची अकार्यक्षमता, अपारदर्शकता हे सगळं राहिलं बाजूला... तुंम्ही लागलात रागाच्या लायकीच्या मागे. म्हणजे आपलं, नागरिकांचं नुकसान झालं तरी चालेल पण रागा ला श्रेय मिळता कामा नये. ही कसली वृत्ती म्हणायची?
नवरा मेला तरी चालेल, पण सवत रंडकी झाली पाहिजे :-)
10 Jul 2025 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जेन स्ट्रीट कंपनीमुळे देशातील किरकोळ गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागला. या प्रकरणी भांडवली बाजार नियामक संस्था सेबीने कंपनीने कमाविलेला ४ हजार ८०० कोटी रुपयांचा नफा जप्त करण्याचे आदेश दिले, तरीही तोटा झालेल्या गुंतवणूकदारांना कोणतीही भरपाई मिळणार नाही.
-दिलीप बिरुटे
9 Jul 2025 - 8:21 pm | स्वधर्म
>> आपल्यातीलच एका ऐवजी साप आपला राजा
लोकशाहीत कसला राजा? कोणीही खुर्चीवर बसला तरी प्रश्न विचारलेच पाहिजेत. एकचालकानुवर्तीत वाढलेल्यांना हे कळतच नाही की पत्रकार, नागरीक प्रश्न विचारणार. सरळ पाणी पिऊन पळून जातात.
9 Jul 2025 - 6:53 pm | चंद्रसूर्यकुमार
स्टार प्रवाहवर लवकरच नवीन मालिका सुरू होत आहे. त्या नव्या मालिकेचा प्रोमो उद्या म्हणजे १० जुलै रोजी येणार आहे. त्या प्रोमोची झलक म्हणून 'तुमची आवडती खलनायिका परत येत आहे' असा प्रचार स्टार प्रवाहने केला आहे.
ही आवडती खलनायिका कोण असेल याविषयी रसिकांमध्ये तर्क लढविले जायला सुरवात केली जात आहे. अनेकांनी रूपाली भोसले असेल असे म्हटले आहे तर काहींनी माधवी निमकर असेल अशी अपेक्षा केली आहे.
ही खलनायिका कोण असेल असे तुमचे मत आहे?
9 Jul 2025 - 7:26 pm | गामा पैलवान
तिस्ता सेटलवाड !
9 Jul 2025 - 9:29 pm | अमरेंद्र बाहुबली
तिच्या नावाने पाच हजार रुपये रोजचा मशरुम खाऊनही चेहरा काळा ठिक्कर पाडतो म्हणे!
9 Jul 2025 - 10:55 pm | अभ्या..
मस्तच एकदम.
मागे एकदा एका अशाच खासदार गायकवाडांनी कर्मचार्याला मारले म्हणून त्यांना विमानप्रवासबंदी करुन माज उतरवला होता म्हणे.
आता दुसर्या एका आमदार गायकवाडाने आमदार निवासातल्या कॅन्टीनचे अन्न खराब होते म्हणून नेसत्या टोवेल बनियानवर जाउन कॅन्टीनवाल्याला हाणले.
तूर्तास सदरहू आमदाराला निदान अन्नबंदी तरी करुन माज उतरवावा व आम्ही कसे वेगळे आहोत हे दाखवून द्यावे.
10 Jul 2025 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुख्यमंत्री यांनी सभापती महोदय यांच्याकडे कार्यवाही करण्याची शिफारस केली. काय कार्यवाही होते ते येत्या काही दिवसात दिसून येईल.
दरम्यान, उपाहारगृह चालकाचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी निलंबित केला. विषय संपला.
-दिलीप बिरुटे
10 Jul 2025 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज गुरुपोर्णिमा. 'विश्वगुरु' यांनाही गुरुपोर्णिमेच्या शुभेच्छा. आज आपण नसता तर, भारतीय जनता कोणत्या तरी बेटावर कंदमुळे खात खितपत पडली असती.
आपण समस्त जगाला आपल्या अमोघ वाणीने ज्ञान देऊन तृप्त केले आहे. आपणास गुरु पोर्णिमेच्या खुप शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
10 Jul 2025 - 9:39 am | आग्या१९९०
आज विश्वगुरू आपल्या गुरु ' टेलीप्रॉम्प्टर ' समोर नतमस्तक होऊन फोटोसेशन करणार का?
10 Jul 2025 - 9:53 am | अमरेंद्र बाहुबली
निदान ज्या पवारांचे बोट धरून राजकारणात चालायला
शिकले त्यांचे शोधल मीडियावर आभार तरी मानतील!
10 Jul 2025 - 10:13 am | चंद्रसूर्यकुमार
ते सगळं सोडा हो. विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामना बघायला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारतात आले होते ना?पाहुण्या देशाचा पंतप्रधान भारतात मुद्दामून क्रिकेट सामना बघायला येणार हे म्हटल्यावर मोदींनाही तिथे जाणे भाग होते. अन्यथाही ते थोडा वेळ तरी गेलेच असते पण पाहुण्या देशाचा पंतप्रधान येणार म्हटल्यावर नक्कीच. तिथे समजा आय.सी.सी आणि बी.सी.सी.आय चे माजी अध्यक्ष या नात्याने शरद पवार पण उपस्थित असते तर मोदी पवारांकडे बोट दाखवत ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना काय म्हणाले असते माहित आहे का-- यांचे बोट धरून मी राजकारणात आलो.
10 Jul 2025 - 11:11 am | सुबोध खरे
कुठे मोरू लोकांच्या वैफल्यग्रस्त प्रतिसादांना उत्तर देताय ?
त्यांच्या उचक्या चालू द्या ! २०२९ पर्यंत
कदाचित २०३४ पर्यंत.
राहुल गांधीं चा प्रश्न नाही
प्रश्न ज्यांना त्यांच्या भारताचे भविष्य दिसते त्यांच्या बुद्धीचा आहे
10 Jul 2025 - 11:12 am | सुबोध खरे
त्यांच्यात ( राहुल गांधींमध्ये)
10 Jul 2025 - 12:02 pm | आग्या१९९०
जनसुरक्षा कायद्यातील काही तरतुदींमध्ये बदल करण्यात आले आहेत. सदर विधेयकाच्या कक्षेत आता केवळ डाव्या -कडव्या व तत्सम संघटना असणार आहेत. ह्यात उजव्या कडव्या संघटनांना सूट असणार आहे का?
10 Jul 2025 - 12:15 pm | सुबोध खरे
काय बदल आहेत?
10 Jul 2025 - 10:24 pm | आग्या१९९०
विधेयकाच्या कक्षेत आता केवळ डाव्या -कडव्या व तत्सम संघटना असणार आहेत. ह्यात उजव्या कडव्या संघटनांना सूट असणार आहे का?
आज संध्याकाळी विधानसभेत रोहित पवारांनी हाच प्रश्न विचारला.
10 Jul 2025 - 10:46 pm | गामा पैलवान
फौजदारी खटला ज्या कुणावर लागलाय त्या सर्व संघटना या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. उगीच डावे/उजवे वगैरे शब्दच्छल नको.
-गा.पै.
11 Jul 2025 - 12:40 am | आग्या१९९०
मग विधेयकात फक्त डाव्या संघटनांचा उल्लेख का? स्पष्टता हवी की नको?
11 Jul 2025 - 10:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उजव्या कडव्या संघटनेबद्दल एक अवाक्षर काल विधासभेत काढले नाही. उजवे कड़वे आणि सरकार मिळून सरकार विरूद्ध केलेले आंदोलन हिंसक, देशविघातक ठरवून मोकळे होतील. चौकशी होऊन अशा संघटना व्यक्ती निर्दोष सुटेपर्यन्त जेलात खितपत पडतील.
या कायद्याचा वापर करू डाव्या विचारांच्या संघटना, राजकीय पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आदी कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांवर, शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी संघटनांवर कारवाई होणार नाही.-मा.मुख्यमंत्री ( उजवे सोडून सगळे )
असे जरी म्हणत असले तरी 'सरकार विरुद्ध' बोलणा-यांचा आवाज दाबण्याचाच एक भाग आहे, आणि दबले नाही तर, जनसुरक्षा कायद्यात भले तो सुटेल पण त्याची जी हरेशमेंट जी होईल त्याने तो कधीही सरकार विरोधी भूमिका घेणार नाही. उद्या सरकार विरुद्ध लिहिणारे-बोलणारे हिंसक आणि शहरी नक्षलवादी ठरवून जेलात घालतील असे वाटायला लागले आहे.
-दिलीप बिरुटे
11 Jul 2025 - 10:38 am | आग्या१९९०
आदिवासी संघटित नसल्याने त्यांना सरकारविरोधी मोर्चा काढायचा असल्यास डाव्यांच्या झेंड्याखाली काढावा लागतो. वनवासी संघटना सध्याच्या सरकारविरोधात आदिवासींचा मोर्चा काढणार नाहीत ( कारण स्पष्ट आहे ). बळी डाव्यांचाच जाणार, सरकारचा उद्देशही तोच आहे. आदिवासी, कष्टकऱ्यांना वालीच न राहिल्याने सध्याच्या सरकारचे फावणार आहे.
11 Jul 2025 - 1:28 pm | गामा पैलवान
प्राडॉ,
असा कायदा अनेक राज्यांनी केला आहे. माओवाद याला 'लेफ्ट विंग एक्स्ट्रिमिझम' अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. याला न्यायालयातही तेच म्हटलं जातं.
कसंय की डावेच स्वत:ला डावे म्हणवून घेतात. जे डावे नाहीत ते उजवे धरले जातात. कोणीही बिगरडावा आपणहून स्वत:स उजवा म्हणवून घेत नाही. त्यामुळे डावे की उजवे हा वाद डाव्यांनी न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सोडवलेला बरा पडावा. ( पडावा या क्रियापदांतही डावा हा शब्द लपलेला आहेच. )
अधिक माहिती : https://www.bbc.com/marathi/articles/cvg6kp8gpl1o
आ.न.,
-गा.पै.
11 Jul 2025 - 7:46 pm | आग्या१९९०
घटनेत डावे उजवे असा प्रकार नाही.
11 Jul 2025 - 8:15 pm | सुबोध खरे
मूळ घटनेत समाजवाद आणि सर्मधर्मसमभाव पण नव्हता
तो नंतर घुसवला आहे.
मूळ घटनेत समान नागरी कायदा आहे.
44. Uniform civil code for the citizens
The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India.
काय करता त्याचं?
11 Jul 2025 - 8:40 pm | आग्या१९९०
जे नाही ते सांगितले.
11 Jul 2025 - 8:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संविधानकारांनी संविधान कठोर आणि लवचिक दोन्ही बनवले आहे, जेणेकरून त्यात बदल करणे शक्य होईल... पण गोबरयुगात घटनेची वाट लागेल हे घटनाकरांच्या लक्षात आले नसावे....
-दिलीप बिरुटे
11 Jul 2025 - 9:00 pm | स्वधर्म
>> उद्या सरकार विरुद्ध लिहिणारे-बोलणारे हिंसक आणि शहरी नक्षलवादी ठरवून जेलात घालतील
असे होण्याची दाट शक्यता आहे.
हा कायदा हेतुपुरस्सर अनेक गोष्टींची व्याख्या अत्यंत मोघम ठेवून सरकारच्या मर्जीनुसार कोणालाही तुंरूंगात घालण्याची व त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याची सोय करून देणारा आहे. मुळात युएपीए सारखा कायदा आधीच अस्तित्वात असताना या कायद्याची गरजच नव्हती. म्हणून हा कायदा जनसुरक्षा नसून भाजप सुरक्षेसाठी आणला आहे असे विरोधकांचे मत आहे.
11 Jul 2025 - 9:15 pm | आग्या१९९०
विनाशकाले विपरीत बुद्धी.
10 Jul 2025 - 12:41 pm | कर्नलतपस्वी
10 Jul 2025 - 12:41 pm | कर्नलतपस्वी
कुछ तो गुरू है,कुछ गुरू घंटाल,
बुझो तो ग्यान है वरना जी का जंजाल....
ऐसे सभी गुरू और गुरूघंटालोको शिष्योत्तम का प्रणाम.
11 Jul 2025 - 8:20 am | nutanm
काही नाही शी जिनपिनगचया वरचढ कोणी झायावर ते खरोखरच नाहीसे झालेले असण्याची शक्यता जास्त आहे . चीनमधे पार्टीचे लोक जास्तविचार न करता शूट at साईट ही असते , ङोईजड झाला एखादा कार्यकर्ता की शूट हे असते. जॅक maaचे पुढे काय झाले हे त्याना एकदाच विमानाचा जिना चढताना दाखवले अर्थात जुना फोटो . नन्तर अजूनही त्या बद्द्ल काहीच आलेले नाही वर्त़मानपत्रात.. निरीक्षण करत ठेवणे या चिनी लोकान्चे हेच आपण करु शकतो. जे जे होईल ते पहात राहणे.
11 Jul 2025 - 8:26 am | nutanm
आणि आपल्या देशाने सीमेवर शस्त्र सज्ज रहाणे व आपण एकजुटीने सरकार लष्कर सैनिकान्चया पाठीशी रहाणे सरकारचे मनोधैर्य वाढविणे व बळ देणे हेच करू शकतो..