मला झाडावरची फुले तोडावयास आवडत नाही. मी दुसर्यान्या पण तोडू देत नाही. बागेतली फुले सगळ्याची,कुणा एकाचि नाही,हवी आसतील तर विकत आणा तेव्हढेच शेतकर्यान चार पैसे मिळतील.
आशाच एका वळणावरती
दिसली मजला हिरवी पाने
लपले होते फुल सयाने
उधळत होते गंध तराणे
निरागस,निरामय,प्रफुल्ल
डोलत होते वार्या संगे
धुंदी होती नव यौवनाची
तमा न होती त्यास उद्याची
कोण चितारी चित्र काढतो
रंगा सवे गंध पेरीतो
रंग,कुंचले मला मीळावे
भाव कवीच्या मनी दाटतो
विस्फारून नयन, ललना आली
फुल तोडण्या अधिर झाली
पाठ फिरवून उभी राहीली
जणू म्हणाली....
जातील काका मग भेटू आपण
तीच्या मनीचे गुढ कळाले
तिथेच काकाने ठाण मांडले
निराश होऊन निघून गेली
मग दोघे ते खुदकन हसले.....
१-८-२०२२
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3344
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे
पहिल्याच प्रतिसादात टीकास्त्र
In reply to साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे by चित्रगुप्त
रांगोळी घालताना पाहून
भारी
In reply to रांगोळी घालताना पाहून by चित्रगुप्त
गोविदाग्रज
In reply to भारी by ज्ञानोबाचे पैजार
रांगोळी घालताना पाहून
या लेखाच्या निमित्ताने अनेक