मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जणू काही आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस होता. (शोकांतिका)

ganeshpavale ·

जडभरत 24/07/2015 - 12:49
:( खूप सुन्न करणारी रचना.
निष्प्राण देह शांत शांत वाटत होता. आजूबाजूला गर्दी असली तरी... तिला कशा... कशाचीच भीती न्हवती.…
खूप वाईट वाटतंय... काय प्रतिसाद देऊ कळतंच नाही..

द-बाहुबली 25/07/2015 - 18:13
मुळातच नैतीक मुल्ये कुचकामी-च असतात, परिस्थीती माणसाला काहिच्या काही बनवु शकते. पोलीओ सारखी एखादि लसच निघायला हवी मानवाकडून विपरीत परिस्थीतीमधेही नैतीक मुल्ये न विसरली जाण्यासाठीची... बाकी काय बोलणार. चार-दोन निवडक स्त्रिया सोडल्या तर इतकी वाइट अवस्था समस्त स्त्रिजमातीवरच आहे इथे कि बोलता सोय नाही... :(

नि:शब्द करणारी वास्तव कविता.. शेवटचं कडवं वाचल्यावर भटसाहेबांच्या ओळी आठवल्या.. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते

In reply to by सुधांशुनूलकर

शब्दानुज 27/07/2015 - 19:55
अहो ही तर बोलते होण्याची वेळ आहे एक फार छान ओळ कुठेतरी वाचली होती. देवाच्या अवतराची वाट पाहू नका स्वताःतील देव जाग्र्ुत करा...

ganeshpavale 27/07/2015 - 14:00
लिहितानाच डोक्याचा भूग्गा झाला होता…. या विषयावर लिहाव कि नाही लिहाव यासाठी खुपदा विचार केला… आणि मग शेवटी मनातली सल उतरवली शब्दात… या अत्याचारी जातीचा खूपच तिरस्कार आलाय. रोजच नवीन नवीन बातम्या मनाचा थरकाप उडवतात

ganeshpavale 27/07/2015 - 14:00
लिहितानाच डोक्याचा भूग्गा झाला होता…. या विषयावर लिहाव कि नाही लिहाव यासाठी खुपदा विचार केला… आणि मग शेवटी मनातली सल उतरवली शब्दात… या अत्याचारी जातीचा खूपच तिरस्कार आलाय. रोजच नवीन नवीन बातम्या मनाचा थरकाप उडवतात

जडभरत 24/07/2015 - 12:49
:( खूप सुन्न करणारी रचना.
निष्प्राण देह शांत शांत वाटत होता. आजूबाजूला गर्दी असली तरी... तिला कशा... कशाचीच भीती न्हवती.…
खूप वाईट वाटतंय... काय प्रतिसाद देऊ कळतंच नाही..

द-बाहुबली 25/07/2015 - 18:13
मुळातच नैतीक मुल्ये कुचकामी-च असतात, परिस्थीती माणसाला काहिच्या काही बनवु शकते. पोलीओ सारखी एखादि लसच निघायला हवी मानवाकडून विपरीत परिस्थीतीमधेही नैतीक मुल्ये न विसरली जाण्यासाठीची... बाकी काय बोलणार. चार-दोन निवडक स्त्रिया सोडल्या तर इतकी वाइट अवस्था समस्त स्त्रिजमातीवरच आहे इथे कि बोलता सोय नाही... :(

नि:शब्द करणारी वास्तव कविता.. शेवटचं कडवं वाचल्यावर भटसाहेबांच्या ओळी आठवल्या.. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते

In reply to by सुधांशुनूलकर

शब्दानुज 27/07/2015 - 19:55
अहो ही तर बोलते होण्याची वेळ आहे एक फार छान ओळ कुठेतरी वाचली होती. देवाच्या अवतराची वाट पाहू नका स्वताःतील देव जाग्र्ुत करा...

ganeshpavale 27/07/2015 - 14:00
लिहितानाच डोक्याचा भूग्गा झाला होता…. या विषयावर लिहाव कि नाही लिहाव यासाठी खुपदा विचार केला… आणि मग शेवटी मनातली सल उतरवली शब्दात… या अत्याचारी जातीचा खूपच तिरस्कार आलाय. रोजच नवीन नवीन बातम्या मनाचा थरकाप उडवतात

ganeshpavale 27/07/2015 - 14:00
लिहितानाच डोक्याचा भूग्गा झाला होता…. या विषयावर लिहाव कि नाही लिहाव यासाठी खुपदा विचार केला… आणि मग शेवटी मनातली सल उतरवली शब्दात… या अत्याचारी जातीचा खूपच तिरस्कार आलाय. रोजच नवीन नवीन बातम्या मनाचा थरकाप उडवतात
लेखनप्रकार
[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते.

आमची(ही) निष्काम साहित्यसेवा : पूर्वप्रकाशित

विशाल कुलकर्णी ·

पैसा 18/07/2015 - 09:40
ह.ह.पु.वा.!! फँटास्टिक झालाय लिखाण! बादवे खरोखरच खमणराव आणि रड्याभाऊचे कारनामे लिहायला हरकत नाही! बाकी गंगी रंगी टेकाड्या वगैरे लिखाणही पूर्ण करावे ही विनंती! =)) =))

अजया 18/07/2015 - 10:00
=)) जमलंय. मजा आली वाचायला!! पै ताईशी सहमत,खमणराव रड्याभौके कारनामे वाचण्यास उत्सुक!

नाखु 18/07/2015 - 14:09
चिमणरावा बरोबर हरेक धाग्यावर "रडणार्या" रडूभाऊंबद्दल लिहायचे मनावर घ्या !!!! अता पहिली गोष्ट : लिखाण फर्मास पण पुढचा भाग कधी??? सदा (धांदरट)

In reply to by भीमराव

आपण खुपच मागासलेले दिसता बाबुदादासाहेब. म्हशींबरोबर वळूची जोडी लावताना आम्ही केवढा क्रांतिकारक विचार केला होता याची कल्पना तुम्हास येणे जरा कठीणच वाटते आम्हास. असो, असते मर्यादा काहीजणांच्या बाबतीत !

पैसा 18/07/2015 - 09:40
ह.ह.पु.वा.!! फँटास्टिक झालाय लिखाण! बादवे खरोखरच खमणराव आणि रड्याभाऊचे कारनामे लिहायला हरकत नाही! बाकी गंगी रंगी टेकाड्या वगैरे लिखाणही पूर्ण करावे ही विनंती! =)) =))

अजया 18/07/2015 - 10:00
=)) जमलंय. मजा आली वाचायला!! पै ताईशी सहमत,खमणराव रड्याभौके कारनामे वाचण्यास उत्सुक!

नाखु 18/07/2015 - 14:09
चिमणरावा बरोबर हरेक धाग्यावर "रडणार्या" रडूभाऊंबद्दल लिहायचे मनावर घ्या !!!! अता पहिली गोष्ट : लिखाण फर्मास पण पुढचा भाग कधी??? सदा (धांदरट)

In reply to by भीमराव

आपण खुपच मागासलेले दिसता बाबुदादासाहेब. म्हशींबरोबर वळूची जोडी लावताना आम्ही केवढा क्रांतिकारक विचार केला होता याची कल्पना तुम्हास येणे जरा कठीणच वाटते आम्हास. असो, असते मर्यादा काहीजणांच्या बाबतीत !
आज अचानक झुक्याच्या थोबडापुस्तकाने दोन-तीन वर्षांपूर्वी लिहीलेल्या एका लेखाची आठवण करून दिली. हा लेख त्यावेळी देवकाकांच्या होळी विशेषांकासाठी लिहीला होता. त्यामुळे तो अंक आनि माझा ब्लॉग सोडला तर इतरत्र कुठेच प्रकाशित केल्याचे आजतरी आठवत नाहीये. म्हणून हा जुनाच लेख आज पुन्हा मिपाकरांसाठी इथे पोस्ट करतोय. कोणी आधी वाचला असेल तर क्षमस्व ! ************************************************************************** लिहायला सुरूवात करून आता बरीच वर्षे झाली. आधी आम्ही काय लिहीतोय हे कुणालाच कळायचं नाही…..(कधी कधी आम्हालाही नाही)! कारण आमचे लेखन नेहमीच कधी चि.वि., कधी द.मा.

२. भानावर येण्यापूर्वी

निरन्जनदास ·

पैसा 29/06/2015 - 19:29
लक्षात येतंय.
आपल्या कृत्याची जाणीव असल्यानेच माणूस एखाद्या कृत्याकडे प्रवृत्त किंवा निवृत्त होतो. जाणिवेचा हा घटकच त्याला आत्मसंयम देतो. पतंजलींनी 'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' असे म्हटले आहे. वनस्पतींमध्ये चित्त (चेतना) असते, प्राण्यांमध्ये चित्तवृत्ती (चेतना आणि विकार) असतात, पण नियंत्रण नसते. माणसात मात्र (चेतना आणि विकार आणि) नियंत्रण असते. ते 'निरोध' या शब्दाने व्यक्त होते. वनस्पतीबाबत निरोधाचा प्रश्न उद्भवत नाही आणि प्राण्यांना निरोधाचे भान नसते. 'निरोधनाचे' भान हे नीतीचे भान असते, ते केवळ माणसात असते. ज्या व्यक्तीत हे 'निरोध' सामथ्र्य विकसित होते, तो योगी, संन्यासी. बौद्ध विचारातही 'दु:खनिरोध' आढळतो, तो याच भानातून.
आवडले. जो असा निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजावे का? कारण हे "भान" बहुसंख्यांना नसतेच.

In reply to by पैसा

निरन्जनदास 29/06/2015 - 21:54
खरे आहे तुमचे म्हणणे. निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजायला हरकत नसावी. बहुतेकजण 'बेभान' असतात. गोची अशी आहे की "आपण बेभान आहोत'' याची जाणीव त्यांना असू शकते, पण ते ''भानावर येण्यास'' तयार नसतात. पण तसा भास देण्यात ते यशस्वी होतात, इथे त्यांची आणि आपली, म्हणजे प्रेक्षकांची गफलत होऊ शकते. म्हणून ''साव ऽ ऽऽ धान ! "

In reply to by निरन्जनदास

पैसा 29/06/2015 - 22:10
काही जणांना आपण भानावर आहोत असा आत्मविश्वास असतो, पण दुरून पाहणार्‍याला काही वेगळंच दिसतं. The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves, and wise people so full of doubts. रसेल आठवला. दु:खनिरोधः याबद्दल वाचायला आवडेल.

सुधीर 29/06/2015 - 21:27
'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' आणि 'हे भान विकसित होणे आधुनिक लोकशाही धर्मासाठी अनिवार्य आहे'. हे शेवटचे दोन पॅरा आवडले.

@ माणसाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीवच त्याला आत्मभान देते. 'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते. >> अप्रतिम! वाचनखूण साठवलि गेली आहे. :)

सध्या तरी बर्‍याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.) पुढे कधी तरी निवांत वेळ मिळाला, तर परत एकदा व्यवस्थित, तन-मन एकत्र करून आणि मनन-चिंतनासाठी वेळ मिळाला तर, वाचायचा विचार आहे.

In reply to by मुक्त विहारि

सुबोध खरे 30/06/2015 - 10:11
सध्या तरी बर्‍याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.) हेच म्हणतो. मुळात माझे मन तत्वज्ञान सारख्या गंभीर विषयात रमत नाही. वाचले पण फारसे समजले नाही. (स्वगत-- बाप रे लोक इतका गूढ आणि खोल विचार करतात) आमची पट्टी काळी दोन. पांढरी पाच कशी झेपणार? त्यामुळे सध्या पास.

In reply to by पैसा

सुबोध खरे 30/06/2015 - 10:41
पैसा ताई हे असेच काहीतरी मोठ्या प्रमाणात मनोविकार शास्त्रात होतं. म्हणून आमचे ब्रिगेडियर पेठे सर(मनोविकारशास्त्राचे प्राध्यापक ज्यांच्या हाताखाली मी काही महिने काम केले) मला म्हणाले तू मनोविकार शास्त्रापेक्षा( PSYCHIATRY) क्षकिरण शास्त्र( RADIOLOGY) हा विषय घे ( SUBJECTIVE पेक्षा OBJECTIVE) घे. ते तुला जास्त चांगले जमेल. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. मला तत्त्वज्ञानाबद्दल आदर आहे पण ते मला झेपत नाही. तुझे आहे तुजपाशी मधील "डिके" सारखी माझी गत आहे. आपला शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस)

In reply to by सुबोध खरे

पैसा 30/06/2015 - 10:48
:) तुम्हाला आणि निरन्जनदासांनाही एक शंका विचारते. मी साधे म्हणून वाचले आणि मला या लेखातले बरेच भाग कळले. जे कळले नाहीत त्यासाठी मी निरन्जनदासांना हळूहळू विचारीनच. पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?

तुडतुडी 30/06/2015 - 12:38
पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?>>> मुळात आत्मभान येणे , 'स्व' ची जाणीव होणे हे भयानक काहीतरी आहे असंच ९०% लोकांचं मत असतं . ज्याला त्याची आवड असते त्यांना इतर लौकिक गोष्टींमध्ये रस वाटत नाही . कारण त्यातला फोलपणा त्यांना समजलेला असतो . परंतु इतरांना मात्र हे डिप्रेशन किंवा औदासिन्य वाटतं . त्यांनी स्वतः विवेकानंद किवा तत्सम वाचल्याशिवाय त्याचं महत्व समजणार नसतं .

निरन्जनदास 01/07/2015 - 18:03
सुहृद मित्र सुबोध, पैसा आणि तुडतुडी, तुम्ही चर्चेचा श्रीगणेशा केला हे अतिशय छान. हे पाहा, आता एक समस्या समजावून घेत येते का ते पाहू. प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे. तत्त्वज्ञान आणि तत्त्वभान यात मी व्यावसायिक तत्त्ववेत्ता (Professional Philosopher म्हणजे तत्त्वज्ञानाचा शिक्षक ) म्हणून ढोबळमानाने कसा फरक करतो आहे, तर तत्त्वज्ञान ही शिकण्याची तांत्रिक गोष्ट आहे तर तत्त्वभान महणजे ही तांत्रिक गोष्ट कशी शिकायची हे शिकायचे आहे. हा काही अंशी प्रशिक्षणाचा खेळ आहे. या खेळाचा मी एक प्रशिक्षक आहे, असे समजू. हा खेळ, त्याचे नियम समजावून घेऊन आपण खेळलो तर फार मजा येईल. हा नियम अर्थात प्रत्येक खेळाला लागू आहे. अगदी प्रेमाच्या खेळासह! पण नियम समजावून न घेता खेळायला जो जाईल त्याचा गोंधळ होणारच. तेच पैसा जे उदाहरण देतात त्यातील माणसाबाबत घडले असावे. शिवाय त्या म्हणतात "तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला." आणि सायकिअ‍ॅट्रिस्ट म्हणतो, " हे सगळे - म्हणजे तत्त्वज्ञानाचे वाचन आधी बंद कर" आता हे चमत्कारिक आहे. "तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?" याचे स्वतंत्र उत्तर "आहे/नाही" असे दोन्ही देता येईल. तुम्ही कोणत्या प्रकारचे तत्त्वज्ञान वाचता, निर्माण करता यावर तुमची मानसिकता अवलंबून राहील. काफ्का, कामु वाचाल तर निराशा वाटू शकते. मी नववीत म्हणजे १४ व्या वर्षी जी ए वाचायला सुरुवात केली. रमलखुणा वाचून नियतीवाद घुमू लागला. समजत नव्हतं. पण का समजत नाही, म्हणून पिच्छा पुरवला आणि तत्त्वज्ञानाचा खजिना गवसला. निराशा टाळली. पण म्हणून खूप आनंद झाला असे नाही. अजूनही जी ए वाचतो, आत कुठेतरी नवीन डोळा उघडतो! वि आ बुवा, ठणठणपाळ, पु. ल. वाचाल तर सगळा ताण जाईल. आपण सारेजण तत्त्वज्ञान समजावून घेऊ. मलाही तुमच्यामुळे नव्या गोष्टी कळतील की. सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.

In reply to by निरन्जनदास

अस्वस्थामा 02/07/2015 - 16:46
अभिनिवेशरहित लेखन आणि हा प्रतिसाद देखील खूप आवडला..
सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.
आणि
प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे.
हे मस्तच.. :) असो, आज हे वाचायला आमचे "सर" इथे हवे होते असे नमूद करतो. ;) (नेमाडे सर, तुम्हाला हे "सर" माहित नसतील तर तुम्ही या "सरांची" चिंता करु नका. चर्चेत कधीतरी ते येतीलच. )

In reply to by अस्वस्थामा

निरन्जनदास 02/07/2015 - 17:54
"सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता." या विधानात आणखी थोडी दुरुस्ती करतो. ती अशी : सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, मगच प्रत्यक्ष सायकल दुरुस्ती करता येईल. ती दुरुस्त झाली की आहेच ती दामटायला तयार ! ; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञान जाणून घ्यावयाचे तर तत्त्वज्ञानाची साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, ही साधने कोणती याचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग कोणतेही तत्त्वज्ञान अवघड राहणार नाही, होता होईल, तितके ते आकलनशक्तीच्या कह्यात येईल. तत्त्वज्ञानाच्या स्वरूपानुसार संथ गतीने आकलनशक्तीही विकसित होत राहील..... मग, तुमच्या समोर उभ्या ठाकलेल्या अनेक विचारविश्वातून तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. सरांना भेटायला मी उत्सुक आहे.

अर्धवटराव 01/07/2015 - 21:19
असं काहिसं म्हणायचं आहे का आपल्याला? तसं असल्यास विश्लेषणाची प्रेरणा हिच मनुष्य शरीराला इतर प्राण्यांपासुन वेगळं करते ??

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 02/07/2015 - 18:09
बरोबर ! विश्लेषण ही बौद्धिक कृती निखळ मानवी घटना आहे. बुद्धि (Reason), आत्मभान (Self awarness) आणि करुणा (Compassion) ही तीन वैशिष्ट्ये माणसाची लक्षणे आहेत. निव्वळ बुद्धिमान माणूस कितीही अधम पातळीवर जाऊ शकतो, याची उदाहरणे देण्याची गरज नाही. ज्याला आपण काय करीत आहोत, याची जाणीव असते तोच करुणाभाव विकसित करतो. येशूचं स्मरण केलं तर काय मिळतं, " हे ईश्वरा, त्यांना माफ कर ते काय करीत आहेत, हे त्यांना कळत नाही !! " करुणाहीन बुद्धि हिंसेशी मैत्री करते ! करुणा असेल तर आणि तरच मानवतेचा उदय शक्य होतो.

अस्वस्थामा 02/07/2015 - 16:49
अजून एक, तुमच्या लेखांमध्ये पुढच्या मागच्या लेखनाचा दुवा टाकता आला तर पहावे. तसेच धागा जर दखल पात्र झाला तर नवीन लेख आलेले लक्षात येईल इतरांच्यापण. (आम्हाला खोदकाम करावे लागले दुसर्‍या भागासाठी. ) (सा.सं. बघा जरा. :) )

मी पहिल्यांदा हे कबुल करु इच्छितो की या विषयावर बोलण्याचा मला काही एक अधिकार नाही. कारण या विषयाचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास मी केलेला नाही. मी खाली जी काही विधाने करणार आहे ती केवळ माझ्या शंका निरसन करण्यासाठीच केली आहेत. ती विधाने सत्य आहेत, किंवा मी म्हणतो ते बरोबरच आहे असा कोणताही दावा मी करत नाही.
निर्मिती ही आत्मभानाचे आणि संयमाचे निदर्शक आहे, तसे त्या उलट संहार, विध्वंस हे बेभानाचे लक्षण आहे
जर येथे विध्वंस करणे म्हणजे एखादी गोष्ट नष्ट करणे असेल तर ज्या शक्तीने हा खेळ रचला आहे ती शक्तीसुध्दा विध्वंस करताना दिसतेच ना? (महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स इत्यादी.) वरील विधान काही काळासाठी बाजूला ठेवले तरी सुध्दा जिवंत रहायचे असेल तर विध्वंस करावाच लागतो. विध्वंस केल्या शिवाय तुमच्या पोटात अन्न जाणार नाही. मग विध्वंस बेभान कसा? या पुढे जाउन जर मी असा दावा केला की "विध्वंस करणे ही नैसार्गीक प्रवृत्ती आहे आणि संयम हा निसर्गनियमाच्या विरुध्द आहे." तर माझ्या विधानात काही चुक आहे का? यापुढे जाउन असेही म्हटले जाते की या जगात कोणीच कशाचीही निर्मिती करु शकत नाही आणि त्याचा विध्वंसही करु शकत नाही. जे काही आपण जगतो, बघतो, अनुभवतो ती केवळ एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. उदा. सुर्यापासून पृथ्वी निर्माण झाली, आणि त्या पासून जीवसृष्टी. याच न्यायाने निर्मीती आणि विध्वंस म्हणजे एखाद्या उर्जास्वरुपाचे दुसर्‍या उर्जास्वरुपात रुपांतर करणे. जर असे असेल तर मग निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा? हे कसे ठरवले जाते?
प्राण्यांना ज्ञानशास्त्रीय आत्मभान नसते.
असा दावा करणे ही केवळ एक आत्मप्रौढी आहे असे वाटते. कारण असा दावा केवळ मनुष्यप्राणी इतर मनुष्यप्राण्यांपुढे करताना दिसतो. इतरांनी ते मान्य करावे यासाठी सुध्दा मनुष्यप्राणी इतरांशी संवाद साधताना दिसत नाही. जणू या विश्र्वातला एकमेव सजीव मनुष्यच आहे. (इथे मला जी.ए. कुलकर्णी यांची हंस आणि कावळे ही गोष्ट आठवत आहे.) जेव्हा मनुष्य या कोशामधुन बाहेर पडेल / फेकला जाईल तेव्हा कदाचीत त्याला प्रचंड मोठा धक्का बसेल.
'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते.
मी वर म्हणालो आहे की या जगात आपण जे काही अनुभवतो ती एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. ज्ञान हे देखिल त्याच उर्जेचे एक रुप आहे. हे जर मान्य केले तर ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते. (हे लिहीताना माझ्या डोळ्यासमोरुन मॅट्रीक्स मधला "निओ" आहे. मॉर्फियस त्याला जाणीव करुन देत नाही तो पर्यंत तो मॅट्रीक्स मधे सुखाने रहात असतो. ) माझ्या या शंकांची उत्तरे तुमच्या लेखमालेच्या पुढच्या भागांमधे येणार असतील तर इथे दिली नाहीत तरी चालु शकेल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मराठी_माणूस 06/07/2015 - 12:27
माझ्याही मनात असे विचार आले होते . तुम्ही ते व्यवस्थित शब्दात मांडले आहेत. विशेष करुन प्राण्यांचा आत्मभानाचा मुद्दा. कदाचीत , प्राण्यांना देखील आपल्या पेक्षा वेगळ्या प्रकारचे भान असेल जे आपल्या समजण्या पलीकडे असेल . जसे की , आपण एकमेकांशी भाषेच्या माध्यमातुन संवाद साधतो , प्राणी सुध्दा एकमेकांशी संवाद साधतात जो आपण समजु शकत नाही. हेमाडे सरांच्या उत्तराची प्रतिक्षा आणि उत्सुकता.

In reply to by मराठी_माणूस

निरन्जनदास 07/07/2015 - 14:38
हं, हे ही फार चूक नाही. प्राण्यांना भान नसते, असे नाही. पण ते 'आत्मभान' नसते. म्हणजे मानवी आत्मभान ज्या स्वरूपाचे असते, त्या स्वरूपाचे नसते. समाज, भाषा, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान इत्यादी मानवी आविष्कार केवळ मानवी आत्मभानच निर्माण करू शकते, प्राणिज भान नव्हे. समाज आणि समूह, टोळी, थवा, कळप यात आपण फरक का करतो ? कारण यातील प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, वेगळ्या जीवांना लागू आहे. अगदी फार काय पण खुद्द ही प्रस्तुत चर्चा फक्त मानव आणि केवळ मानवामध्येच चालू आहे, यापेक्षा वेगळा पुरावा कशाला ? माणसाला भाषा असेल काय ? त्याचे संवादाचे माध्यम कोणते ? अशी चर्चा कोणत्याही प्राण्यात चालू नाही, माणसात चालू आहे ! प्राण्यांचा अभ्यास माणूस करतो, प्राणी माणसाचा करीत नाहीत. त्यांना परंपरा नसते, कारण स्मृती नसते. परिणामी ते केवळ जनन करण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत. माणसाची स्मृती इतकी ताणली गेली की त्याला गतजन्मीचे आठवते !!! पुढे, अबब !!!! म्हणावे असे अनेक जन्माचे आठवते. श्रीकृष्ण तोच दावा करतो. अहो, जन्म, पुनर्जन्म, त्याचे चक्र, त्यातून मोक्ष हे आम्ही निर्माण केलेले महाजाल आहे ! प्राण्यांनी नाही. पण छान, चांगली भरीव चर्चा या निमित्ताने होते, याचे समाधान. मराठी माणसाला विचार केलाच पाहिजे बरं .

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

निरन्जनदास 07/07/2015 - 11:29
पैजारबुवा, प्रथम दिलगिरी व्यक्त करतो.. तुम्हाला प्रतिसाद देण्यास उशीर झाला. आणि आता, अनुक्रमे जाऊ. हे पाहा, मी पहिल्या लेखातच असे म्हंटले आहे की तत्त्वज्ञानावर बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. याचे कारण प्रत्येक 'जन' काहीतरी दृष्टीकोन बाळगत असतो. त्यामुळे तुम्ही अगदी बोलू शकताच. आणि मुळात हा विषयच असा आहे की प्रत्येक वेळी जगण्याचा नवा पैलू समोर आणि सामोरा येतो. त्यामुळे कितीही "परिपूर्ण' दृष्टीकोन मांडला तरी काहीतरी उरलेले असतेच. खरे तर त्यातूनच 'ईश्वर' जन्माला येतो. अधेमध्ये ईश्वर येत राहील.पण ते असो,
निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा?
यात काय होते पाहा : मानवी संस्कृतीची निर्मिती ही एक सुरचना आहे. निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स ही केवळ 'असणे' आहेत. त्यामागे हेतू नाही, नसतोही.. निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. आता, हे विसरणे किंवा दृष्टीआड करणे हा हिंसेचा मार्ग आहे. इतरांनी निर्माण केलेले काहीही नष्ट करणे, ही हिंसा असते. पण अन्न तयार करणे, ही हिंसा नाही, ते पोषण आहे. बॉम्ब इत्यादी युद्ध जनक कृती ही निर्मिती आहे का ? नाही ! कारण ती हिंसेची साधने आहेत. पण स्वयपाकघरातला चाकू ही निर्मिती आहे, आरोग्यविषयक साऱ्या वैद्यकीय शस्त्रक्रिया हिंसा नाही, ती निर्मिती आहे. नवीन काही निर्माण होण आणि ते जीवनदायी असणे, ही निर्मिती मानावी. पण नेमकी हीच, म्हणजे निर्मितीला हिंसा समजणे ही चूक जैनांनी केली आणि अहिंसेचा गैरअर्थ लावला, प्रत्यक्षात ते शोषणाचे नेते बनले. तुम्हाला माहित आहे का जैन धर्म भाजी कापणे, शिजविणे इत्यादीला हिंसा मानतोच, पण संभोगाला ही हिंसाच मानतो. त्यामुळे 'ब्रह्मचर्य' नावाची गोची त्यांनी प्रसारित केली. आता, विरोधाभास असा की हे तत्त्वज्ञान जगाला सांगण्यासाठी नवी माणसे हवीत, आपलीच हवीत, जैन हवीत तर 'संभोग' ही हिंसा करावी लागते ! ती त्यांनी केली. पण कशी ? बासुंदी खायची पण त्यात उंदीर पडल्यासारखा चेहरा करून !! आता, पहिल्या जैनाने हि "उन्दिरयुक्त बासुंदी' खाल्लीच नसती, तर त्याच्याबरोबरच जैन संप्रदायाची पर्मनंट हिंसा झाली असती. तसे झाले नाही. कारण .... शोधू आपण.... निसर्गातील उर्जेचे रुपांतर ही सुद्धा हिंसा नाही, ते तुम्ही अधोरेखित करता तसे केवळ "रुपांतर" आहे. "उर्जा अक्षय्यता" हा निसर्गनियम आहे. आता, ज्ञानाला उर्जा समजणे हे रूपक आहे. तेच जी एं नी वापरले आहे. ज्ञानाला अक्षय्यतेचा नियम लागू करणे, हा 'तर्कदोष' आहे. पण पुन्हा हीच महाभयावह चूक आम्ही ,म्हणजे वैदिक परंपरेने करून एक चिरस्थायी शोषण व्यवस्था आणली. पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! ज्ञानाला आत्म्याप्रमाणे अमर मानून वर्ण-जाती-लिंगभेद आणले गेले आणि एक पांगळा समाज तयार झाला. आता, आपण हे लक्षात घेऊ की ज्ञान ही कृत्रिम घटना आहे, तिचा प्रसार ही जाणीवपूर्वक करावयची कृती आहे.
ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते.
हे पाहा , ज्ञानाला असे आदर्श स्वरूप देता येत नाही. ते दिले गेले की तुम्ही म्हणता तसे वाटू लागते. ज्ञानाची जाणीव अशांतता कशी निर्माण करेल ? आपले प्राधान्य कशाला ? हा प्राचीन प्रश्न आहे : दुःखी सॉक्रेटीस की सुखी डुक्कर ! कुंती कृष्णाकडे , तुकोबा विठोबाला दु:खाची मागणी करतात. कोणत्या सुखी डुकराची स्मारके, पुरस्कार आपल्यात आहेत? (सध्या ही लाटही आलीय बरे का !! नावे माणसांची असतात, एवढाच फरक.) मुक्ता साळवे, फुले, आंबेडकर, आगरकर, स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई यांना अज्ञानामुळे सुख मिळाले की दु:ख ? अनेक प्रश्न आहेत, सोडविता येतील तितके सोडवू. मालिका जशी पुढे सरकेल, तसा काही खुलासा होत राहील, पण नवे प्रश्न येतील, त्यांचे स्वागत करू. तुमच्यामुळे नवे चिंतन झाले, हा काय कमी फायदा झाला ? निरंजनदास

In reply to by निरन्जनदास

सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद, उत्तरावर विचार करतो आहे. ज्या शंकांची उत्तरे मिळाली नाहीत ती मिळवण्यासाठी मालिका वाचत राहीन, पैजारबुवा,

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 07/07/2015 - 19:20
नैसर्गीक घटनांचा अन्वयार्थ लावणं, त्याला निर्मीती वा विनाशाची लेबलं लावणं हा जर आत्मभानाचा अविश्कार असेल तर तो माणसात निसर्गाकडुनच आलाय. मानवाला 'निर्मीती' ठाऊक आहे पण निसर्गाला नाहि असं होणार नाहि. जे घडतय ते केवळ ट्रान्फोर्मेशन असेल (आणि ते तसं आहेच) तर मानवी भानाला जाणवणारी निर्मीती/विनाश वगैरे देखील केवळ क्रिया आहेत. आणि जर मानवी भान सत्य असेल तर ते निसर्गात देखील ओतप्रेत भरलं आहे. निसर्गातल्या क्रिया विनाउद्देश असु शकतात पण भानरहित नाहि.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 07/07/2015 - 21:31
निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता, आणि असा
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !
पण निसर्ग असा दावा करीत नाही, कारण त्याला भान नाही. अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 07/07/2015 - 22:48
निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता,
असं का वाट्तं तुम्हाला? आणि निसर्गात भान नसतं तर त्याच निसर्गाची निर्मीती म्हणजे जो मानव त्यात भान निसर्गबाह्य पद्धतीने आलं (किंवा डेव्हलप झालं) असं म्हणायचं आहे का? असं असेल तर तुमची निसर्गाबद्द्लची संकल्पना फार मर्यादीत आहे. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल?
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !
धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल.
अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.
अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे. शिवाय तुम्ही ज्याला जीवनमान म्हणताहात ते एका विशिष्ट शरीरशास्त्र दृष्टीने एकवेळ ठीक आहे. शिवाय याच शरीराचं घडण ज्या निसर्गात, आणि निसर्गनियमांनी होतं, त्या निसर्गाकडेच मनुष्यशरीरात वावरणार्‍या (किंवा जाणवणार्‍या) सजीववत्वाचं प्रेरकत्व जातं. निसर्ग सजीव असल्याशिवाय मनुष्य सजीव असुच शकत नाहि.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 08/07/2015 - 09:33
फारच छान ! आवडलं. तुमच्या प्रतिसादाबद्दल मी अतिशय आभारी आहे. तुम्ही चालना देणारे म्हणणे मांडले आहे. आता, आपण तुमच्या मांडणीनुसार अनुक्रमे जावू. १.
माणूस निसर्गाची निर्मिती आहे
, म्हणजे नेमके काय आहे ? हे मला कळले नाही. म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ? २.
माझी निसर्गाची संकल्पना फार मर्यादीत आहे
, हे तुम्ही अचूक हेरलेत; हे मलाच माहित नव्हते. ते तुम्हाला कळाले. कृपया मला माझी निसर्गाची संकल्पना समजावून द्यावी. ३. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल? हा प्रश्न खरच महत्वाचा आहे. पण
निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित
म्हणजे नेमके काय ते मला समजले नाही. कृपया समजावून द्यावी. ४. "धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल." हे तुमचे म्हणणे मान्य आहे. याबद्दल आपण निवांतपणे बोलू. ५."अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे." हे ही माझ्या आकलनशक्ती पलीकडील विधान आहे. कृपया समजावून द्यावे. ६. निसर्ग सजीव असतो, या विधानाचा अर्थही माझ्या आकलनशक्ती पलीकडील आहे. कृपया समजावून द्यावे.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 08/07/2015 - 16:42
१)
म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ?
ड्जण्ट मॅटर. त्याकरता अनेक थेअरी वैज्ञानीक तपासताहेत. मूळ प्रश्न इतकाच कि मानवाला 'निर्मीती' शक्य आहे काय आणि असल्यास ति येते कुठुन. कारण ति क्षमता मानवाने निर्माण केलेली नाहि. २) निसर्ग म्हणजे मानव विरहीत एक कॉम्प्लेक्स क्रियांचं जंजाळ असं काहिसं वाटलं तुमच्या प्रतीसादातात. ३) अमुक एका ठिकाणि मनुष्य संपतो आणि निसर्ग सुरु होतो (किंवा त्या उलट) असं ठिकाण शोधा. ४) धन्यवाद ५) अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल. ६) मानव, वा इतर कुठलाहि प्राणि सजीव आहे + तो नैसर्गीक प्रक्रियेतुन घडला आहे.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 09/07/2015 - 16:25
तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे :
अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल.
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात. तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 09/07/2015 - 18:05
तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे
अशा आमच्या आठवणींच्या खपल्या काढु नका हो. जीवाला फार त्रास होतो :)
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात.
तर्कदोषाचं उदाहरण म्हणुन ते दिलय.
तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.
नको. तुमचं ब्रॉडकास्टींग उत्तम चाललय कि.

In reply to by निरन्जनदास

राही 07/07/2015 - 23:29
इतके सुंदर विवेचन! " निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. निसर्गाला हेतू नाही, त्याला आत्मभान नाही... नेमकी वाक्ये. फक्त एक शंका आहे, ती पुन्हा कधीतरी. आत्मभान हा माझा आवडता विषय आणि परवलीचा शब्द आहे. उत्सुकतेने वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद घेत आहे.

निरन्जनदास 08/07/2015 - 16:15
हं, आपण नावच मितभाषी घ्यायचं आणि लोकांना "और आन्दो" म्हणायचं ! मजा करताय राव तुम्ही!!

मदनबाण 08/07/2015 - 16:27
रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. हे देहभान असे हवे ? "आत्मभान" हे आत्म्याशी आणि त्या अनुशंगाने परमेश्वराशी असते. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M

निरन्जनदास 08/07/2015 - 16:56
नाही, देहभान नाही. आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. परमेश्वराशी तर नाहीच नाही. तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? कृपया वाचा.

In reply to by निरन्जनदास

मदनबाण 09/07/2015 - 13:58
आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. असण्याची जाणीव हे चेतना (consciousness) असल्यामुळे संभव होते ना ? आत्म्या शरीरात असल्यानेच चेतनेचे अस्तिव असते आणि म्हणुनच मनुष्या देहातुन प्राण निघुन गेल्यावरच शरीर संपूर्णपणे अचेतन होते. त्यामुळे असण्याची जाणीव होण्याचा आणि आत्म्याचा संबंध आहे. तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? हो... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Kisi Disco Mein Jayen...

In reply to by मदनबाण

निरन्जनदास 09/07/2015 - 16:29
तुम्ही आत्मा आहेच, असे गृहीत धरत आहात. ते गृहीत न धरता चेतनेचे स्पष्टीकरण देता येते का ? हा प्रश्न आहे. पुढील काही लेखात तुमच्या शंकाची उत्तरे मिळू शकतील. थोडी वाट पहावी, ही विनंती.

In reply to by बॅटमॅन

निरन्जनदास 09/07/2015 - 16:33
यातला साधा प्रश्न असा आहे की मानवेतरांना आत्मभान आहे की नाही, हे तुम्ही मानव बोलत आहात, मानवेतर नाही. तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही ! आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव हे विसरलो की गडबड होते.

In reply to by निरन्जनदास

बॅटमॅन 09/07/2015 - 16:43
तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही !
हाउ डू यू नो की ते बोलत नाहीत? मानवेतर सजीवांचे आपसातले जे काही संभाषण/संपर्क साधण्याची पद्धत असते ते मानवाला पूर्णपणे समजले आहे का? जर नसेल तर निव्वळ मानवाला कळत नाही म्हणून काही नाही असे म्हणण्यापैकीच आहे. हा तर मानवकेंद्रित दृष्टिकोन झाला!

In reply to by निरन्जनदास

संदीप डांगे 09/07/2015 - 17:06
आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव मानवेतर प्राण्यांना एखाद्या कृतीत धोका आहे हे कळलं तर ते परत तीच चूक करतांना दिसत नाहीत. ही ज्ञानात्मक जाणीव नाही का? मानव अशा चुका वारंवार करतांना दिसतो.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 09/07/2015 - 16:43
सहमत. फक्त मनुष्याला आत्मभान आहे याच्या पुष्ट्यर्थ लेखकांनी दिलेले स्पष्टीकरण पुरेसे नाही. कदाचित मनुष्य ज्या उलाढाली आज करतोय ते पाहून इतर प्राणी मनातल्या मनात हसतही असतील आणि म्हणत असतील की "बाबारे, हे सगळे उद्योग करून झालेत आमचे. शेवटी चार मूळ भावनांपलिकडे काहीच नाही हे आम्हाला कळलंय. म्हणून शांतपणे जगत असतो. सगळे निसर्गनियम व्यवस्थित पाळून. तूच अशांत आहेस कारण तू जस्ट अभीच आया है ज्युनिअर..." आता म्हणा ह्याला काही पुरावा आहे काय? तर असं नाहीये ह्यालाही काही पुरावा नाहीये. मानव स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत आलाय ते मला कायमच डोक्यात गेलेलं आहे. अरे चार मूळ भावना नियंत्रित करू शकत नाही तो कसा काय सर्वश्रेष्ठ?

गामा पैलवान 09/07/2015 - 20:09
निरन्जनदास, आपला लेख व संदेश वाचले. काही विधानांवर चर्चा करेन म्हणतो. १. >> पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त >> समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! पटलं नाही. हा दावा खरा असेल तर भक्तीमार्गी संत सगळ्या सर्वदेशी, सर्वकाळी, सर्वलिंगी, सर्वजात, सर्ववयीन कसे आढळून येतात? ते एका मूठभरांच्या गटात दाखल व्हायला हवेत ना? भक्तिमार्ग वेदविरोधी नाही. २. >> लोकशाही हा आजचा धर्म, 'युगधर्म' आहे. संविधान हीच माझी 'धर्माज्ञा' असते. लोकशाही हा अत्याधुनिक, >> व्यापक, मानवतावादी धर्म आहे. हा धर्म प्रत्येक माणसासह सर्व सजीवांच्या जगण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची >> संधी देतो. संविधान ही 'धर्माज्ञा' ताठर, कठोर नाही, ती बदलता येते, दुरुस्त करता येते. नवा नीतीनियम करता >> येतो. कालबाह्य गोष्टी वगळून ही 'धर्माज्ञा' कालसुसंगत करता येते. असहमत. भारतीय राज्यघटनेत सामान्य नागरिकांना मार्गदर्शन करणारे काहीही नाही. अपवाद करायचाच झाला तर फक्त ५१ व्या कलमाचा किंचित प्रमाणावर करता येईल. त्यात नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांकडे ढोबळमानाने निर्देश आहे. भारतीय जनमानसास अधिकारांपेक्षा कर्तव्यपूर्ती अधिक महत्वाची वाटते. त्यामुळे उपरोक्त विधान भारताच्या संदर्भात निरर्थक आहे. ३. >> निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. हे फार धाडसी विधान आहे. सूर्य पृथ्वीपासून १०८ सौरव्यास दूर आहे, तर चंद्र पृथ्वीपासून १०८ चांद्रव्यास दूर आहे. त्यामुळे खग्रास सूर्य्ग्रहानाच्या वेळेस चंद्रबिंब सूर्यबिंबास अचूकपणे झाकतं. आता हे इतकं प्रमाण आपोआप उत्पन्न झालं का? पृथ्वीवरील वातावरणात प्राणवायूचं प्रमाण २०% आहे. ते जरासं वाढून २२% झालं तर वनस्पती उत्स्फूर्तपणे पेट घेतील. हे प्रमाण निसर्गत: आढळून येतं. हेही आपोआप झालं का? या घटनांचा अर्थ काय लावायचा? निसर्ग रचना करतो आहे की नाहीये? ईश्वराने सृष्टी (=निसर्ग) उत्पन्न केली असा लावावा का? आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 11/07/2015 - 18:16
निरन्जनदास, >> त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. एक शंका आहे. मी जे खातो तो आहार माझं शरीर माझी परवानगी न घेता पचवून टाकतं. अन्नपचन ही एक नैसर्गिक क्रिया आहे, बरोबर? ती जिथे होत असते त्या शरीर नामे पिशवीला त्या क्रियेचं भान नाहीये. म्हणजेच मला आत्मभान असलं तरी माझ्या शरीराला मात्र आत्मभान नाही. तर मग मी माझ्या शरीराहून वेगळा मानावा का? तुमची मते ऐकायला आवडतील. आ.न., -गा.पै.

निरन्जनदास 13/07/2015 - 16:24
बॅटमॅन आणि संदीप मित्रहो, तुमच्या चर्चेतून सिद्ध होणारी एकच गोष्ट आहे की तुम्ही भूतदयावादी आहात ? तुम्हाला प्राण्यांची काळजी आहे. प्राण्यांच्या वतीने तुम्ही बुद्धिमान मनुष्यप्राणी बोलत आहात. तुमचे दावे 'बोलाची कधी बोलाचाच भात' असे होत आहे. तुमच्याशी स्वतःच्या भावना बोलणारा प्राणी भेटला तर मी त्यास भेटण्यास उत्सुक आहे. तथाकथित, अकथित, कथित, थकीत इत्यादी बुद्धिवाद्याचे सारे प्रकार केवळ माणसाचेच असतात, प्राण्यांचे नाही. अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते. आता, प्राण्यांनाच थेट माझ्याशी बोलू द्या . मग आपण बोलू.

In reply to by निरन्जनदास

संदीप डांगे 13/07/2015 - 16:52
अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते. मानवाप्राण्याचा सर्वात मोठा भ्रम तो हाच. आहारनिद्राभयमैथूनच्या पलिकडेही अनेक प्राणी अनेक भावना दाखवतात. माणसांपेक्षा प्राण्यांचे भवतालच्या निसर्गाबद्दलचे ज्ञान कैक पटीने जास्त असते. (भूकंप व सुनामी यापुर्वीचे प्राण्यांचे व्यवहार, योग्य मार्ग शोधत आपल्या मूळ ठिकाणी परतणे, इत्यादी.) प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही? त्यांची भाषा आपल्याला कळत नाही म्हणून त्यांना कसलेच ज्ञान नाही असे म्हणणे ही आत्मप्रौढी झाली. एखादा आदीवासी भले आपल्यासारखी चार बुकं शिकला नसेल पण त्याच्याकडे आपल्यापेक्षा वेगळे ज्ञान खचितच असेल आणि ते आपल्या चार बुकांपेक्षा जास्त मौल्यवान असेल. आपण ज्याप्रकारे व्यवहार करतो तसे व्यवहार न करणार्‍यांना गावंढळ व आडाणी समजणे हे स्वतःला आधुनिक समजणार्‍या माणसाच्या अहंकाराचे प्रथम लक्षण आहे. ज्या पद्धतीने पाश्चात्त्य देशातील पांढर्‍या लोकांना आफ्रीकी वंशाचे लोक हे आपल्याच मनुष्यवंशाचे वाटतच नव्हते, त्याप्रमाणेच इतर श्वापद ही चार भावनांपलिकडे काहीच राखत नाहीत असे मानणे आहे. प्राण्यांनी तुमच्याशी बोलले तरच तुम्हाला त्यांचे काय ज्ञान आहे/नाही हे समजेल असं तुमचं म्हणणं विचित्र आहे असे नम्रपणे नमूद करतो.

In reply to by संदीप डांगे

डांगे सरांचे म्हणणे बरोबर वाटते. विशेषत: प्राणी ज्या शांतपणे मृत्यू ला सामोरे जातात ती शक्ती मिळवण्या साठी मनुष्याला अपार कष्ट करावे लागतात. अजूनहि बरीच उदाहरणे देता येतील मनुष्य हा प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे हा दावा मान्य करता येणार नाही. पैजाराबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

संदीप डांगे 13/07/2015 - 17:25
धन्यवाद पैजारबुवा, मनुष्याने स्वतःच स्वतःला श्रेष्ठ ठरवून, निसर्गापासून वेगळा ठरवून निसर्गातून आपसूक मिळणार्‍या मौल्यवान ज्ञानाला दरवाजे बंद केलेत असं कधी कधी वाटतं. माणसाने आजवर जी काही प्रगती, विकास केलाय तो निसर्गाचेच निरिक्षण करून/त्याची कॉपी मारून केलाय. इतर प्राण्यांना तसे करण्याची काही आवश्यकता वाटली नसावी कारण उपजतच त्यांना मनुष्यापेक्षा जास्त क्षमता निसर्गाने बहाल केल्या आहेत. त्यांचे जगणे मनुष्यप्राण्यापेक्षा नक्कीच मजेदार आहे असे वाटते.

मराठी_माणूस 13/07/2015 - 17:11
खालिल वाक्ये आजच्या लोकसत्ता मधील ह्या लेखातील आहेत http://www.loksatta.com/sampadkiya-news/humans-forefathers-1122407/.
टाचणीच्या टोकाएवढा मेंदू असलेली मधमाशी, सांकेतिक नाचातून इतर मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते. कुत्र्याचे घ्राणेंद्रिय माणसाच्या घ्राणेंद्रियाहून अनेक पट सक्षम आहे. माणूस फक्त विशिष्ट कंपनसंख्येचे ध्वनी ऐकू शकतो. वटवाघळाची ही क्षमता माणसापेक्षा किती तरीपट जास्त आहे

निरन्जनदास 13/07/2015 - 20:55
माफ करा, पुन्हा तीच चूक घडते आहे. प्राण्यांना भावना आहेत आणि त्यांना भाषा आहे, म्हणून त्यांना संस्कृती निर्माण करता येते, असे नाही. माणसाने संस्कृती निर्माण केली, धर्म, तंत्रज्ञान तत्त्वज्ञान आणि कितीएक विज्ञाने निर्माण केली. साधी गोष्ट सौंदर्यशास्त्र हा भावनांचा आविष्कार आहे आणि भाषाशास्त्र, अर्थनिर्धारणशास्त्र इत्यादी भाषेचे. प्राणी हे करू शकत नाहीत. 'प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते' हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या अवैध आहे. तुम्ही 'प्राण्यांना संवादाची एक त्यांच्यापुरती पद्धती असते' असे म्हणू शकता फार तर. आता, तुम्ही जर असे म्हणाल की त्यांच्यातही ते असतेच, तर बोलणेच खुंटले !! दुसरे, तुम्ही आदिवासी मध्येच कुठून आणले ? ती माणसे आहेत, त्यांच्यात बुद्धिमत्ता आहे. ते विविध प्रकारे व्यक्त करतात, त्यांना कमी लेखणे चूकच आहे. हे, पहा, आपण काय पाहत आहोत; तर एकूण प्राणी जगतात माणूस हा प्राणी वेगळा कसा, का आहे ते ! (त्यात जगातले सगळे आदिवासी येतात ) माणसचे वैशिष्ट्य : बुद्धी, आत्मभान आणि करुणा. हे प्राण्यात नसते, हे कृपया लक्षात घ्या. ते अविकसित आहेत. आजचा सर्वात प्रगत प्राणी केवळ मनुष्य. आता, मराठी माणसाने काय लक्षात घ्यावे ; तर ते हे की पशु-पक्ष्यांना माणसापेक्षा जास्त तीव्र इंद्रिय असेलही. पण माणूस इंद्रियांच्या दृष्टीने पाहता अतिशय मर्यादित आहे. म्हणूनच त्याने इंद्रियांचा विस्तार केला. जसे कि हातोडा हा हाताचा विस्तार आहे, दुर्बीण हा डोळ्याचा , फोन-मोबाईल हा कानाचा इत्यादी. असा विस्तार प्राणी करू शकले का ? विज्ञान-तंत्रज्ञान (इंटरनेट मानवी आहे. प्राणिज नाही. ) हा मानवी ज्ञानाचा, त्याच्या अनंत मर्यादांचा विस्तार आहे. माणूस आपल्या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न करतो. 'मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते' पण कामापुराताच, माणूस बिनकामाचे किती फालतू संवाद करतो ! किती रद्दी निर्माण करतो? शेवटचा मुद्दा प्राणी माझ्याशी बोलले तर त्यांना माझ्या भाषेतच बोलावे लागेल. मी त्यांच्या भाषेत कसा बोलणार? विनोद म्हणून ची ची चू चू ठीक आहे. अर्थात तो विनोदही आपणच करतो. प्राण्याची भाषा ही म्हणजे प्राण्यांची संवादाची रीत त्यांची त्यांच्यापुरती खासगी असते. आणि भाषा खासगी नसते. कोणतीही भाषा जर ती भाषा असेल तर ती सार्वजनिकच असते. म्हणूनच कोणत्याही माणसाला - मराठी माणूस - धरून कोणतीही भाषा शिकता येते. एकजण दुसऱ्याची भाषा शिकू शकतो. प्राणी माणसाची भाषा शिकत नाहीत. ते ध्वनी ओळखतात. आता, कृपया तिन्ही लेख आपण प्रत्येकांनी एकामागे एक असे वाचावेत, सुटे वाचू नयेत. शक्य तो प्रिंट काढून समोर ठेऊन वाचावेत. ही विंनती. आता, आपण पुढील लेखाकडे जाऊ.

पैसा 29/06/2015 - 19:29
लक्षात येतंय.
आपल्या कृत्याची जाणीव असल्यानेच माणूस एखाद्या कृत्याकडे प्रवृत्त किंवा निवृत्त होतो. जाणिवेचा हा घटकच त्याला आत्मसंयम देतो. पतंजलींनी 'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' असे म्हटले आहे. वनस्पतींमध्ये चित्त (चेतना) असते, प्राण्यांमध्ये चित्तवृत्ती (चेतना आणि विकार) असतात, पण नियंत्रण नसते. माणसात मात्र (चेतना आणि विकार आणि) नियंत्रण असते. ते 'निरोध' या शब्दाने व्यक्त होते. वनस्पतीबाबत निरोधाचा प्रश्न उद्भवत नाही आणि प्राण्यांना निरोधाचे भान नसते. 'निरोधनाचे' भान हे नीतीचे भान असते, ते केवळ माणसात असते. ज्या व्यक्तीत हे 'निरोध' सामथ्र्य विकसित होते, तो योगी, संन्यासी. बौद्ध विचारातही 'दु:खनिरोध' आढळतो, तो याच भानातून.
आवडले. जो असा निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजावे का? कारण हे "भान" बहुसंख्यांना नसतेच.

In reply to by पैसा

निरन्जनदास 29/06/2015 - 21:54
खरे आहे तुमचे म्हणणे. निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजायला हरकत नसावी. बहुतेकजण 'बेभान' असतात. गोची अशी आहे की "आपण बेभान आहोत'' याची जाणीव त्यांना असू शकते, पण ते ''भानावर येण्यास'' तयार नसतात. पण तसा भास देण्यात ते यशस्वी होतात, इथे त्यांची आणि आपली, म्हणजे प्रेक्षकांची गफलत होऊ शकते. म्हणून ''साव ऽ ऽऽ धान ! "

In reply to by निरन्जनदास

पैसा 29/06/2015 - 22:10
काही जणांना आपण भानावर आहोत असा आत्मविश्वास असतो, पण दुरून पाहणार्‍याला काही वेगळंच दिसतं. The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves, and wise people so full of doubts. रसेल आठवला. दु:खनिरोधः याबद्दल वाचायला आवडेल.

सुधीर 29/06/2015 - 21:27
'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' आणि 'हे भान विकसित होणे आधुनिक लोकशाही धर्मासाठी अनिवार्य आहे'. हे शेवटचे दोन पॅरा आवडले.

@ माणसाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीवच त्याला आत्मभान देते. 'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते. >> अप्रतिम! वाचनखूण साठवलि गेली आहे. :)

सध्या तरी बर्‍याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.) पुढे कधी तरी निवांत वेळ मिळाला, तर परत एकदा व्यवस्थित, तन-मन एकत्र करून आणि मनन-चिंतनासाठी वेळ मिळाला तर, वाचायचा विचार आहे.

In reply to by मुक्त विहारि

सुबोध खरे 30/06/2015 - 10:11
सध्या तरी बर्‍याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.) हेच म्हणतो. मुळात माझे मन तत्वज्ञान सारख्या गंभीर विषयात रमत नाही. वाचले पण फारसे समजले नाही. (स्वगत-- बाप रे लोक इतका गूढ आणि खोल विचार करतात) आमची पट्टी काळी दोन. पांढरी पाच कशी झेपणार? त्यामुळे सध्या पास.

In reply to by पैसा

सुबोध खरे 30/06/2015 - 10:41
पैसा ताई हे असेच काहीतरी मोठ्या प्रमाणात मनोविकार शास्त्रात होतं. म्हणून आमचे ब्रिगेडियर पेठे सर(मनोविकारशास्त्राचे प्राध्यापक ज्यांच्या हाताखाली मी काही महिने काम केले) मला म्हणाले तू मनोविकार शास्त्रापेक्षा( PSYCHIATRY) क्षकिरण शास्त्र( RADIOLOGY) हा विषय घे ( SUBJECTIVE पेक्षा OBJECTIVE) घे. ते तुला जास्त चांगले जमेल. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. मला तत्त्वज्ञानाबद्दल आदर आहे पण ते मला झेपत नाही. तुझे आहे तुजपाशी मधील "डिके" सारखी माझी गत आहे. आपला शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस)

In reply to by सुबोध खरे

पैसा 30/06/2015 - 10:48
:) तुम्हाला आणि निरन्जनदासांनाही एक शंका विचारते. मी साधे म्हणून वाचले आणि मला या लेखातले बरेच भाग कळले. जे कळले नाहीत त्यासाठी मी निरन्जनदासांना हळूहळू विचारीनच. पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?

तुडतुडी 30/06/2015 - 12:38
पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?>>> मुळात आत्मभान येणे , 'स्व' ची जाणीव होणे हे भयानक काहीतरी आहे असंच ९०% लोकांचं मत असतं . ज्याला त्याची आवड असते त्यांना इतर लौकिक गोष्टींमध्ये रस वाटत नाही . कारण त्यातला फोलपणा त्यांना समजलेला असतो . परंतु इतरांना मात्र हे डिप्रेशन किंवा औदासिन्य वाटतं . त्यांनी स्वतः विवेकानंद किवा तत्सम वाचल्याशिवाय त्याचं महत्व समजणार नसतं .

निरन्जनदास 01/07/2015 - 18:03
सुहृद मित्र सुबोध, पैसा आणि तुडतुडी, तुम्ही चर्चेचा श्रीगणेशा केला हे अतिशय छान. हे पाहा, आता एक समस्या समजावून घेत येते का ते पाहू. प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे. तत्त्वज्ञान आणि तत्त्वभान यात मी व्यावसायिक तत्त्ववेत्ता (Professional Philosopher म्हणजे तत्त्वज्ञानाचा शिक्षक ) म्हणून ढोबळमानाने कसा फरक करतो आहे, तर तत्त्वज्ञान ही शिकण्याची तांत्रिक गोष्ट आहे तर तत्त्वभान महणजे ही तांत्रिक गोष्ट कशी शिकायची हे शिकायचे आहे. हा काही अंशी प्रशिक्षणाचा खेळ आहे. या खेळाचा मी एक प्रशिक्षक आहे, असे समजू. हा खेळ, त्याचे नियम समजावून घेऊन आपण खेळलो तर फार मजा येईल. हा नियम अर्थात प्रत्येक खेळाला लागू आहे. अगदी प्रेमाच्या खेळासह! पण नियम समजावून न घेता खेळायला जो जाईल त्याचा गोंधळ होणारच. तेच पैसा जे उदाहरण देतात त्यातील माणसाबाबत घडले असावे. शिवाय त्या म्हणतात "तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला." आणि सायकिअ‍ॅट्रिस्ट म्हणतो, " हे सगळे - म्हणजे तत्त्वज्ञानाचे वाचन आधी बंद कर" आता हे चमत्कारिक आहे. "तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?" याचे स्वतंत्र उत्तर "आहे/नाही" असे दोन्ही देता येईल. तुम्ही कोणत्या प्रकारचे तत्त्वज्ञान वाचता, निर्माण करता यावर तुमची मानसिकता अवलंबून राहील. काफ्का, कामु वाचाल तर निराशा वाटू शकते. मी नववीत म्हणजे १४ व्या वर्षी जी ए वाचायला सुरुवात केली. रमलखुणा वाचून नियतीवाद घुमू लागला. समजत नव्हतं. पण का समजत नाही, म्हणून पिच्छा पुरवला आणि तत्त्वज्ञानाचा खजिना गवसला. निराशा टाळली. पण म्हणून खूप आनंद झाला असे नाही. अजूनही जी ए वाचतो, आत कुठेतरी नवीन डोळा उघडतो! वि आ बुवा, ठणठणपाळ, पु. ल. वाचाल तर सगळा ताण जाईल. आपण सारेजण तत्त्वज्ञान समजावून घेऊ. मलाही तुमच्यामुळे नव्या गोष्टी कळतील की. सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.

In reply to by निरन्जनदास

अस्वस्थामा 02/07/2015 - 16:46
अभिनिवेशरहित लेखन आणि हा प्रतिसाद देखील खूप आवडला..
सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.
आणि
प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे.
हे मस्तच.. :) असो, आज हे वाचायला आमचे "सर" इथे हवे होते असे नमूद करतो. ;) (नेमाडे सर, तुम्हाला हे "सर" माहित नसतील तर तुम्ही या "सरांची" चिंता करु नका. चर्चेत कधीतरी ते येतीलच. )

In reply to by अस्वस्थामा

निरन्जनदास 02/07/2015 - 17:54
"सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता." या विधानात आणखी थोडी दुरुस्ती करतो. ती अशी : सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, मगच प्रत्यक्ष सायकल दुरुस्ती करता येईल. ती दुरुस्त झाली की आहेच ती दामटायला तयार ! ; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञान जाणून घ्यावयाचे तर तत्त्वज्ञानाची साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, ही साधने कोणती याचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग कोणतेही तत्त्वज्ञान अवघड राहणार नाही, होता होईल, तितके ते आकलनशक्तीच्या कह्यात येईल. तत्त्वज्ञानाच्या स्वरूपानुसार संथ गतीने आकलनशक्तीही विकसित होत राहील..... मग, तुमच्या समोर उभ्या ठाकलेल्या अनेक विचारविश्वातून तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. सरांना भेटायला मी उत्सुक आहे.

अर्धवटराव 01/07/2015 - 21:19
असं काहिसं म्हणायचं आहे का आपल्याला? तसं असल्यास विश्लेषणाची प्रेरणा हिच मनुष्य शरीराला इतर प्राण्यांपासुन वेगळं करते ??

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 02/07/2015 - 18:09
बरोबर ! विश्लेषण ही बौद्धिक कृती निखळ मानवी घटना आहे. बुद्धि (Reason), आत्मभान (Self awarness) आणि करुणा (Compassion) ही तीन वैशिष्ट्ये माणसाची लक्षणे आहेत. निव्वळ बुद्धिमान माणूस कितीही अधम पातळीवर जाऊ शकतो, याची उदाहरणे देण्याची गरज नाही. ज्याला आपण काय करीत आहोत, याची जाणीव असते तोच करुणाभाव विकसित करतो. येशूचं स्मरण केलं तर काय मिळतं, " हे ईश्वरा, त्यांना माफ कर ते काय करीत आहेत, हे त्यांना कळत नाही !! " करुणाहीन बुद्धि हिंसेशी मैत्री करते ! करुणा असेल तर आणि तरच मानवतेचा उदय शक्य होतो.

अस्वस्थामा 02/07/2015 - 16:49
अजून एक, तुमच्या लेखांमध्ये पुढच्या मागच्या लेखनाचा दुवा टाकता आला तर पहावे. तसेच धागा जर दखल पात्र झाला तर नवीन लेख आलेले लक्षात येईल इतरांच्यापण. (आम्हाला खोदकाम करावे लागले दुसर्‍या भागासाठी. ) (सा.सं. बघा जरा. :) )

मी पहिल्यांदा हे कबुल करु इच्छितो की या विषयावर बोलण्याचा मला काही एक अधिकार नाही. कारण या विषयाचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास मी केलेला नाही. मी खाली जी काही विधाने करणार आहे ती केवळ माझ्या शंका निरसन करण्यासाठीच केली आहेत. ती विधाने सत्य आहेत, किंवा मी म्हणतो ते बरोबरच आहे असा कोणताही दावा मी करत नाही.
निर्मिती ही आत्मभानाचे आणि संयमाचे निदर्शक आहे, तसे त्या उलट संहार, विध्वंस हे बेभानाचे लक्षण आहे
जर येथे विध्वंस करणे म्हणजे एखादी गोष्ट नष्ट करणे असेल तर ज्या शक्तीने हा खेळ रचला आहे ती शक्तीसुध्दा विध्वंस करताना दिसतेच ना? (महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स इत्यादी.) वरील विधान काही काळासाठी बाजूला ठेवले तरी सुध्दा जिवंत रहायचे असेल तर विध्वंस करावाच लागतो. विध्वंस केल्या शिवाय तुमच्या पोटात अन्न जाणार नाही. मग विध्वंस बेभान कसा? या पुढे जाउन जर मी असा दावा केला की "विध्वंस करणे ही नैसार्गीक प्रवृत्ती आहे आणि संयम हा निसर्गनियमाच्या विरुध्द आहे." तर माझ्या विधानात काही चुक आहे का? यापुढे जाउन असेही म्हटले जाते की या जगात कोणीच कशाचीही निर्मिती करु शकत नाही आणि त्याचा विध्वंसही करु शकत नाही. जे काही आपण जगतो, बघतो, अनुभवतो ती केवळ एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. उदा. सुर्यापासून पृथ्वी निर्माण झाली, आणि त्या पासून जीवसृष्टी. याच न्यायाने निर्मीती आणि विध्वंस म्हणजे एखाद्या उर्जास्वरुपाचे दुसर्‍या उर्जास्वरुपात रुपांतर करणे. जर असे असेल तर मग निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा? हे कसे ठरवले जाते?
प्राण्यांना ज्ञानशास्त्रीय आत्मभान नसते.
असा दावा करणे ही केवळ एक आत्मप्रौढी आहे असे वाटते. कारण असा दावा केवळ मनुष्यप्राणी इतर मनुष्यप्राण्यांपुढे करताना दिसतो. इतरांनी ते मान्य करावे यासाठी सुध्दा मनुष्यप्राणी इतरांशी संवाद साधताना दिसत नाही. जणू या विश्र्वातला एकमेव सजीव मनुष्यच आहे. (इथे मला जी.ए. कुलकर्णी यांची हंस आणि कावळे ही गोष्ट आठवत आहे.) जेव्हा मनुष्य या कोशामधुन बाहेर पडेल / फेकला जाईल तेव्हा कदाचीत त्याला प्रचंड मोठा धक्का बसेल.
'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते.
मी वर म्हणालो आहे की या जगात आपण जे काही अनुभवतो ती एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. ज्ञान हे देखिल त्याच उर्जेचे एक रुप आहे. हे जर मान्य केले तर ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते. (हे लिहीताना माझ्या डोळ्यासमोरुन मॅट्रीक्स मधला "निओ" आहे. मॉर्फियस त्याला जाणीव करुन देत नाही तो पर्यंत तो मॅट्रीक्स मधे सुखाने रहात असतो. ) माझ्या या शंकांची उत्तरे तुमच्या लेखमालेच्या पुढच्या भागांमधे येणार असतील तर इथे दिली नाहीत तरी चालु शकेल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मराठी_माणूस 06/07/2015 - 12:27
माझ्याही मनात असे विचार आले होते . तुम्ही ते व्यवस्थित शब्दात मांडले आहेत. विशेष करुन प्राण्यांचा आत्मभानाचा मुद्दा. कदाचीत , प्राण्यांना देखील आपल्या पेक्षा वेगळ्या प्रकारचे भान असेल जे आपल्या समजण्या पलीकडे असेल . जसे की , आपण एकमेकांशी भाषेच्या माध्यमातुन संवाद साधतो , प्राणी सुध्दा एकमेकांशी संवाद साधतात जो आपण समजु शकत नाही. हेमाडे सरांच्या उत्तराची प्रतिक्षा आणि उत्सुकता.

In reply to by मराठी_माणूस

निरन्जनदास 07/07/2015 - 14:38
हं, हे ही फार चूक नाही. प्राण्यांना भान नसते, असे नाही. पण ते 'आत्मभान' नसते. म्हणजे मानवी आत्मभान ज्या स्वरूपाचे असते, त्या स्वरूपाचे नसते. समाज, भाषा, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान इत्यादी मानवी आविष्कार केवळ मानवी आत्मभानच निर्माण करू शकते, प्राणिज भान नव्हे. समाज आणि समूह, टोळी, थवा, कळप यात आपण फरक का करतो ? कारण यातील प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, वेगळ्या जीवांना लागू आहे. अगदी फार काय पण खुद्द ही प्रस्तुत चर्चा फक्त मानव आणि केवळ मानवामध्येच चालू आहे, यापेक्षा वेगळा पुरावा कशाला ? माणसाला भाषा असेल काय ? त्याचे संवादाचे माध्यम कोणते ? अशी चर्चा कोणत्याही प्राण्यात चालू नाही, माणसात चालू आहे ! प्राण्यांचा अभ्यास माणूस करतो, प्राणी माणसाचा करीत नाहीत. त्यांना परंपरा नसते, कारण स्मृती नसते. परिणामी ते केवळ जनन करण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत. माणसाची स्मृती इतकी ताणली गेली की त्याला गतजन्मीचे आठवते !!! पुढे, अबब !!!! म्हणावे असे अनेक जन्माचे आठवते. श्रीकृष्ण तोच दावा करतो. अहो, जन्म, पुनर्जन्म, त्याचे चक्र, त्यातून मोक्ष हे आम्ही निर्माण केलेले महाजाल आहे ! प्राण्यांनी नाही. पण छान, चांगली भरीव चर्चा या निमित्ताने होते, याचे समाधान. मराठी माणसाला विचार केलाच पाहिजे बरं .

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

निरन्जनदास 07/07/2015 - 11:29
पैजारबुवा, प्रथम दिलगिरी व्यक्त करतो.. तुम्हाला प्रतिसाद देण्यास उशीर झाला. आणि आता, अनुक्रमे जाऊ. हे पाहा, मी पहिल्या लेखातच असे म्हंटले आहे की तत्त्वज्ञानावर बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. याचे कारण प्रत्येक 'जन' काहीतरी दृष्टीकोन बाळगत असतो. त्यामुळे तुम्ही अगदी बोलू शकताच. आणि मुळात हा विषयच असा आहे की प्रत्येक वेळी जगण्याचा नवा पैलू समोर आणि सामोरा येतो. त्यामुळे कितीही "परिपूर्ण' दृष्टीकोन मांडला तरी काहीतरी उरलेले असतेच. खरे तर त्यातूनच 'ईश्वर' जन्माला येतो. अधेमध्ये ईश्वर येत राहील.पण ते असो,
निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा?
यात काय होते पाहा : मानवी संस्कृतीची निर्मिती ही एक सुरचना आहे. निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स ही केवळ 'असणे' आहेत. त्यामागे हेतू नाही, नसतोही.. निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. आता, हे विसरणे किंवा दृष्टीआड करणे हा हिंसेचा मार्ग आहे. इतरांनी निर्माण केलेले काहीही नष्ट करणे, ही हिंसा असते. पण अन्न तयार करणे, ही हिंसा नाही, ते पोषण आहे. बॉम्ब इत्यादी युद्ध जनक कृती ही निर्मिती आहे का ? नाही ! कारण ती हिंसेची साधने आहेत. पण स्वयपाकघरातला चाकू ही निर्मिती आहे, आरोग्यविषयक साऱ्या वैद्यकीय शस्त्रक्रिया हिंसा नाही, ती निर्मिती आहे. नवीन काही निर्माण होण आणि ते जीवनदायी असणे, ही निर्मिती मानावी. पण नेमकी हीच, म्हणजे निर्मितीला हिंसा समजणे ही चूक जैनांनी केली आणि अहिंसेचा गैरअर्थ लावला, प्रत्यक्षात ते शोषणाचे नेते बनले. तुम्हाला माहित आहे का जैन धर्म भाजी कापणे, शिजविणे इत्यादीला हिंसा मानतोच, पण संभोगाला ही हिंसाच मानतो. त्यामुळे 'ब्रह्मचर्य' नावाची गोची त्यांनी प्रसारित केली. आता, विरोधाभास असा की हे तत्त्वज्ञान जगाला सांगण्यासाठी नवी माणसे हवीत, आपलीच हवीत, जैन हवीत तर 'संभोग' ही हिंसा करावी लागते ! ती त्यांनी केली. पण कशी ? बासुंदी खायची पण त्यात उंदीर पडल्यासारखा चेहरा करून !! आता, पहिल्या जैनाने हि "उन्दिरयुक्त बासुंदी' खाल्लीच नसती, तर त्याच्याबरोबरच जैन संप्रदायाची पर्मनंट हिंसा झाली असती. तसे झाले नाही. कारण .... शोधू आपण.... निसर्गातील उर्जेचे रुपांतर ही सुद्धा हिंसा नाही, ते तुम्ही अधोरेखित करता तसे केवळ "रुपांतर" आहे. "उर्जा अक्षय्यता" हा निसर्गनियम आहे. आता, ज्ञानाला उर्जा समजणे हे रूपक आहे. तेच जी एं नी वापरले आहे. ज्ञानाला अक्षय्यतेचा नियम लागू करणे, हा 'तर्कदोष' आहे. पण पुन्हा हीच महाभयावह चूक आम्ही ,म्हणजे वैदिक परंपरेने करून एक चिरस्थायी शोषण व्यवस्था आणली. पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! ज्ञानाला आत्म्याप्रमाणे अमर मानून वर्ण-जाती-लिंगभेद आणले गेले आणि एक पांगळा समाज तयार झाला. आता, आपण हे लक्षात घेऊ की ज्ञान ही कृत्रिम घटना आहे, तिचा प्रसार ही जाणीवपूर्वक करावयची कृती आहे.
ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते.
हे पाहा , ज्ञानाला असे आदर्श स्वरूप देता येत नाही. ते दिले गेले की तुम्ही म्हणता तसे वाटू लागते. ज्ञानाची जाणीव अशांतता कशी निर्माण करेल ? आपले प्राधान्य कशाला ? हा प्राचीन प्रश्न आहे : दुःखी सॉक्रेटीस की सुखी डुक्कर ! कुंती कृष्णाकडे , तुकोबा विठोबाला दु:खाची मागणी करतात. कोणत्या सुखी डुकराची स्मारके, पुरस्कार आपल्यात आहेत? (सध्या ही लाटही आलीय बरे का !! नावे माणसांची असतात, एवढाच फरक.) मुक्ता साळवे, फुले, आंबेडकर, आगरकर, स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई यांना अज्ञानामुळे सुख मिळाले की दु:ख ? अनेक प्रश्न आहेत, सोडविता येतील तितके सोडवू. मालिका जशी पुढे सरकेल, तसा काही खुलासा होत राहील, पण नवे प्रश्न येतील, त्यांचे स्वागत करू. तुमच्यामुळे नवे चिंतन झाले, हा काय कमी फायदा झाला ? निरंजनदास

In reply to by निरन्जनदास

सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद, उत्तरावर विचार करतो आहे. ज्या शंकांची उत्तरे मिळाली नाहीत ती मिळवण्यासाठी मालिका वाचत राहीन, पैजारबुवा,

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 07/07/2015 - 19:20
नैसर्गीक घटनांचा अन्वयार्थ लावणं, त्याला निर्मीती वा विनाशाची लेबलं लावणं हा जर आत्मभानाचा अविश्कार असेल तर तो माणसात निसर्गाकडुनच आलाय. मानवाला 'निर्मीती' ठाऊक आहे पण निसर्गाला नाहि असं होणार नाहि. जे घडतय ते केवळ ट्रान्फोर्मेशन असेल (आणि ते तसं आहेच) तर मानवी भानाला जाणवणारी निर्मीती/विनाश वगैरे देखील केवळ क्रिया आहेत. आणि जर मानवी भान सत्य असेल तर ते निसर्गात देखील ओतप्रेत भरलं आहे. निसर्गातल्या क्रिया विनाउद्देश असु शकतात पण भानरहित नाहि.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 07/07/2015 - 21:31
निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता, आणि असा
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !
पण निसर्ग असा दावा करीत नाही, कारण त्याला भान नाही. अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 07/07/2015 - 22:48
निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता,
असं का वाट्तं तुम्हाला? आणि निसर्गात भान नसतं तर त्याच निसर्गाची निर्मीती म्हणजे जो मानव त्यात भान निसर्गबाह्य पद्धतीने आलं (किंवा डेव्हलप झालं) असं म्हणायचं आहे का? असं असेल तर तुमची निसर्गाबद्द्लची संकल्पना फार मर्यादीत आहे. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल?
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !
धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल.
अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.
अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे. शिवाय तुम्ही ज्याला जीवनमान म्हणताहात ते एका विशिष्ट शरीरशास्त्र दृष्टीने एकवेळ ठीक आहे. शिवाय याच शरीराचं घडण ज्या निसर्गात, आणि निसर्गनियमांनी होतं, त्या निसर्गाकडेच मनुष्यशरीरात वावरणार्‍या (किंवा जाणवणार्‍या) सजीववत्वाचं प्रेरकत्व जातं. निसर्ग सजीव असल्याशिवाय मनुष्य सजीव असुच शकत नाहि.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 08/07/2015 - 09:33
फारच छान ! आवडलं. तुमच्या प्रतिसादाबद्दल मी अतिशय आभारी आहे. तुम्ही चालना देणारे म्हणणे मांडले आहे. आता, आपण तुमच्या मांडणीनुसार अनुक्रमे जावू. १.
माणूस निसर्गाची निर्मिती आहे
, म्हणजे नेमके काय आहे ? हे मला कळले नाही. म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ? २.
माझी निसर्गाची संकल्पना फार मर्यादीत आहे
, हे तुम्ही अचूक हेरलेत; हे मलाच माहित नव्हते. ते तुम्हाला कळाले. कृपया मला माझी निसर्गाची संकल्पना समजावून द्यावी. ३. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल? हा प्रश्न खरच महत्वाचा आहे. पण
निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित
म्हणजे नेमके काय ते मला समजले नाही. कृपया समजावून द्यावी. ४. "धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल." हे तुमचे म्हणणे मान्य आहे. याबद्दल आपण निवांतपणे बोलू. ५."अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे." हे ही माझ्या आकलनशक्ती पलीकडील विधान आहे. कृपया समजावून द्यावे. ६. निसर्ग सजीव असतो, या विधानाचा अर्थही माझ्या आकलनशक्ती पलीकडील आहे. कृपया समजावून द्यावे.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 08/07/2015 - 16:42
१)
म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ?
ड्जण्ट मॅटर. त्याकरता अनेक थेअरी वैज्ञानीक तपासताहेत. मूळ प्रश्न इतकाच कि मानवाला 'निर्मीती' शक्य आहे काय आणि असल्यास ति येते कुठुन. कारण ति क्षमता मानवाने निर्माण केलेली नाहि. २) निसर्ग म्हणजे मानव विरहीत एक कॉम्प्लेक्स क्रियांचं जंजाळ असं काहिसं वाटलं तुमच्या प्रतीसादातात. ३) अमुक एका ठिकाणि मनुष्य संपतो आणि निसर्ग सुरु होतो (किंवा त्या उलट) असं ठिकाण शोधा. ४) धन्यवाद ५) अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल. ६) मानव, वा इतर कुठलाहि प्राणि सजीव आहे + तो नैसर्गीक प्रक्रियेतुन घडला आहे.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 09/07/2015 - 16:25
तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे :
अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल.
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात. तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 09/07/2015 - 18:05
तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे
अशा आमच्या आठवणींच्या खपल्या काढु नका हो. जीवाला फार त्रास होतो :)
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात.
तर्कदोषाचं उदाहरण म्हणुन ते दिलय.
तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.
नको. तुमचं ब्रॉडकास्टींग उत्तम चाललय कि.

In reply to by निरन्जनदास

राही 07/07/2015 - 23:29
इतके सुंदर विवेचन! " निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. निसर्गाला हेतू नाही, त्याला आत्मभान नाही... नेमकी वाक्ये. फक्त एक शंका आहे, ती पुन्हा कधीतरी. आत्मभान हा माझा आवडता विषय आणि परवलीचा शब्द आहे. उत्सुकतेने वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद घेत आहे.

निरन्जनदास 08/07/2015 - 16:15
हं, आपण नावच मितभाषी घ्यायचं आणि लोकांना "और आन्दो" म्हणायचं ! मजा करताय राव तुम्ही!!

मदनबाण 08/07/2015 - 16:27
रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. हे देहभान असे हवे ? "आत्मभान" हे आत्म्याशी आणि त्या अनुशंगाने परमेश्वराशी असते. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M

निरन्जनदास 08/07/2015 - 16:56
नाही, देहभान नाही. आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. परमेश्वराशी तर नाहीच नाही. तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? कृपया वाचा.

In reply to by निरन्जनदास

मदनबाण 09/07/2015 - 13:58
आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. असण्याची जाणीव हे चेतना (consciousness) असल्यामुळे संभव होते ना ? आत्म्या शरीरात असल्यानेच चेतनेचे अस्तिव असते आणि म्हणुनच मनुष्या देहातुन प्राण निघुन गेल्यावरच शरीर संपूर्णपणे अचेतन होते. त्यामुळे असण्याची जाणीव होण्याचा आणि आत्म्याचा संबंध आहे. तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? हो... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Kisi Disco Mein Jayen...

In reply to by मदनबाण

निरन्जनदास 09/07/2015 - 16:29
तुम्ही आत्मा आहेच, असे गृहीत धरत आहात. ते गृहीत न धरता चेतनेचे स्पष्टीकरण देता येते का ? हा प्रश्न आहे. पुढील काही लेखात तुमच्या शंकाची उत्तरे मिळू शकतील. थोडी वाट पहावी, ही विनंती.

In reply to by बॅटमॅन

निरन्जनदास 09/07/2015 - 16:33
यातला साधा प्रश्न असा आहे की मानवेतरांना आत्मभान आहे की नाही, हे तुम्ही मानव बोलत आहात, मानवेतर नाही. तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही ! आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव हे विसरलो की गडबड होते.

In reply to by निरन्जनदास

बॅटमॅन 09/07/2015 - 16:43
तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही !
हाउ डू यू नो की ते बोलत नाहीत? मानवेतर सजीवांचे आपसातले जे काही संभाषण/संपर्क साधण्याची पद्धत असते ते मानवाला पूर्णपणे समजले आहे का? जर नसेल तर निव्वळ मानवाला कळत नाही म्हणून काही नाही असे म्हणण्यापैकीच आहे. हा तर मानवकेंद्रित दृष्टिकोन झाला!

In reply to by निरन्जनदास

संदीप डांगे 09/07/2015 - 17:06
आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव मानवेतर प्राण्यांना एखाद्या कृतीत धोका आहे हे कळलं तर ते परत तीच चूक करतांना दिसत नाहीत. ही ज्ञानात्मक जाणीव नाही का? मानव अशा चुका वारंवार करतांना दिसतो.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 09/07/2015 - 16:43
सहमत. फक्त मनुष्याला आत्मभान आहे याच्या पुष्ट्यर्थ लेखकांनी दिलेले स्पष्टीकरण पुरेसे नाही. कदाचित मनुष्य ज्या उलाढाली आज करतोय ते पाहून इतर प्राणी मनातल्या मनात हसतही असतील आणि म्हणत असतील की "बाबारे, हे सगळे उद्योग करून झालेत आमचे. शेवटी चार मूळ भावनांपलिकडे काहीच नाही हे आम्हाला कळलंय. म्हणून शांतपणे जगत असतो. सगळे निसर्गनियम व्यवस्थित पाळून. तूच अशांत आहेस कारण तू जस्ट अभीच आया है ज्युनिअर..." आता म्हणा ह्याला काही पुरावा आहे काय? तर असं नाहीये ह्यालाही काही पुरावा नाहीये. मानव स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत आलाय ते मला कायमच डोक्यात गेलेलं आहे. अरे चार मूळ भावना नियंत्रित करू शकत नाही तो कसा काय सर्वश्रेष्ठ?

गामा पैलवान 09/07/2015 - 20:09
निरन्जनदास, आपला लेख व संदेश वाचले. काही विधानांवर चर्चा करेन म्हणतो. १. >> पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त >> समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! पटलं नाही. हा दावा खरा असेल तर भक्तीमार्गी संत सगळ्या सर्वदेशी, सर्वकाळी, सर्वलिंगी, सर्वजात, सर्ववयीन कसे आढळून येतात? ते एका मूठभरांच्या गटात दाखल व्हायला हवेत ना? भक्तिमार्ग वेदविरोधी नाही. २. >> लोकशाही हा आजचा धर्म, 'युगधर्म' आहे. संविधान हीच माझी 'धर्माज्ञा' असते. लोकशाही हा अत्याधुनिक, >> व्यापक, मानवतावादी धर्म आहे. हा धर्म प्रत्येक माणसासह सर्व सजीवांच्या जगण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची >> संधी देतो. संविधान ही 'धर्माज्ञा' ताठर, कठोर नाही, ती बदलता येते, दुरुस्त करता येते. नवा नीतीनियम करता >> येतो. कालबाह्य गोष्टी वगळून ही 'धर्माज्ञा' कालसुसंगत करता येते. असहमत. भारतीय राज्यघटनेत सामान्य नागरिकांना मार्गदर्शन करणारे काहीही नाही. अपवाद करायचाच झाला तर फक्त ५१ व्या कलमाचा किंचित प्रमाणावर करता येईल. त्यात नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांकडे ढोबळमानाने निर्देश आहे. भारतीय जनमानसास अधिकारांपेक्षा कर्तव्यपूर्ती अधिक महत्वाची वाटते. त्यामुळे उपरोक्त विधान भारताच्या संदर्भात निरर्थक आहे. ३. >> निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. हे फार धाडसी विधान आहे. सूर्य पृथ्वीपासून १०८ सौरव्यास दूर आहे, तर चंद्र पृथ्वीपासून १०८ चांद्रव्यास दूर आहे. त्यामुळे खग्रास सूर्य्ग्रहानाच्या वेळेस चंद्रबिंब सूर्यबिंबास अचूकपणे झाकतं. आता हे इतकं प्रमाण आपोआप उत्पन्न झालं का? पृथ्वीवरील वातावरणात प्राणवायूचं प्रमाण २०% आहे. ते जरासं वाढून २२% झालं तर वनस्पती उत्स्फूर्तपणे पेट घेतील. हे प्रमाण निसर्गत: आढळून येतं. हेही आपोआप झालं का? या घटनांचा अर्थ काय लावायचा? निसर्ग रचना करतो आहे की नाहीये? ईश्वराने सृष्टी (=निसर्ग) उत्पन्न केली असा लावावा का? आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 11/07/2015 - 18:16
निरन्जनदास, >> त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. एक शंका आहे. मी जे खातो तो आहार माझं शरीर माझी परवानगी न घेता पचवून टाकतं. अन्नपचन ही एक नैसर्गिक क्रिया आहे, बरोबर? ती जिथे होत असते त्या शरीर नामे पिशवीला त्या क्रियेचं भान नाहीये. म्हणजेच मला आत्मभान असलं तरी माझ्या शरीराला मात्र आत्मभान नाही. तर मग मी माझ्या शरीराहून वेगळा मानावा का? तुमची मते ऐकायला आवडतील. आ.न., -गा.पै.

निरन्जनदास 13/07/2015 - 16:24
बॅटमॅन आणि संदीप मित्रहो, तुमच्या चर्चेतून सिद्ध होणारी एकच गोष्ट आहे की तुम्ही भूतदयावादी आहात ? तुम्हाला प्राण्यांची काळजी आहे. प्राण्यांच्या वतीने तुम्ही बुद्धिमान मनुष्यप्राणी बोलत आहात. तुमचे दावे 'बोलाची कधी बोलाचाच भात' असे होत आहे. तुमच्याशी स्वतःच्या भावना बोलणारा प्राणी भेटला तर मी त्यास भेटण्यास उत्सुक आहे. तथाकथित, अकथित, कथित, थकीत इत्यादी बुद्धिवाद्याचे सारे प्रकार केवळ माणसाचेच असतात, प्राण्यांचे नाही. अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते. आता, प्राण्यांनाच थेट माझ्याशी बोलू द्या . मग आपण बोलू.

In reply to by निरन्जनदास

संदीप डांगे 13/07/2015 - 16:52
अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते. मानवाप्राण्याचा सर्वात मोठा भ्रम तो हाच. आहारनिद्राभयमैथूनच्या पलिकडेही अनेक प्राणी अनेक भावना दाखवतात. माणसांपेक्षा प्राण्यांचे भवतालच्या निसर्गाबद्दलचे ज्ञान कैक पटीने जास्त असते. (भूकंप व सुनामी यापुर्वीचे प्राण्यांचे व्यवहार, योग्य मार्ग शोधत आपल्या मूळ ठिकाणी परतणे, इत्यादी.) प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही? त्यांची भाषा आपल्याला कळत नाही म्हणून त्यांना कसलेच ज्ञान नाही असे म्हणणे ही आत्मप्रौढी झाली. एखादा आदीवासी भले आपल्यासारखी चार बुकं शिकला नसेल पण त्याच्याकडे आपल्यापेक्षा वेगळे ज्ञान खचितच असेल आणि ते आपल्या चार बुकांपेक्षा जास्त मौल्यवान असेल. आपण ज्याप्रकारे व्यवहार करतो तसे व्यवहार न करणार्‍यांना गावंढळ व आडाणी समजणे हे स्वतःला आधुनिक समजणार्‍या माणसाच्या अहंकाराचे प्रथम लक्षण आहे. ज्या पद्धतीने पाश्चात्त्य देशातील पांढर्‍या लोकांना आफ्रीकी वंशाचे लोक हे आपल्याच मनुष्यवंशाचे वाटतच नव्हते, त्याप्रमाणेच इतर श्वापद ही चार भावनांपलिकडे काहीच राखत नाहीत असे मानणे आहे. प्राण्यांनी तुमच्याशी बोलले तरच तुम्हाला त्यांचे काय ज्ञान आहे/नाही हे समजेल असं तुमचं म्हणणं विचित्र आहे असे नम्रपणे नमूद करतो.

In reply to by संदीप डांगे

डांगे सरांचे म्हणणे बरोबर वाटते. विशेषत: प्राणी ज्या शांतपणे मृत्यू ला सामोरे जातात ती शक्ती मिळवण्या साठी मनुष्याला अपार कष्ट करावे लागतात. अजूनहि बरीच उदाहरणे देता येतील मनुष्य हा प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे हा दावा मान्य करता येणार नाही. पैजाराबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

संदीप डांगे 13/07/2015 - 17:25
धन्यवाद पैजारबुवा, मनुष्याने स्वतःच स्वतःला श्रेष्ठ ठरवून, निसर्गापासून वेगळा ठरवून निसर्गातून आपसूक मिळणार्‍या मौल्यवान ज्ञानाला दरवाजे बंद केलेत असं कधी कधी वाटतं. माणसाने आजवर जी काही प्रगती, विकास केलाय तो निसर्गाचेच निरिक्षण करून/त्याची कॉपी मारून केलाय. इतर प्राण्यांना तसे करण्याची काही आवश्यकता वाटली नसावी कारण उपजतच त्यांना मनुष्यापेक्षा जास्त क्षमता निसर्गाने बहाल केल्या आहेत. त्यांचे जगणे मनुष्यप्राण्यापेक्षा नक्कीच मजेदार आहे असे वाटते.

मराठी_माणूस 13/07/2015 - 17:11
खालिल वाक्ये आजच्या लोकसत्ता मधील ह्या लेखातील आहेत http://www.loksatta.com/sampadkiya-news/humans-forefathers-1122407/.
टाचणीच्या टोकाएवढा मेंदू असलेली मधमाशी, सांकेतिक नाचातून इतर मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते. कुत्र्याचे घ्राणेंद्रिय माणसाच्या घ्राणेंद्रियाहून अनेक पट सक्षम आहे. माणूस फक्त विशिष्ट कंपनसंख्येचे ध्वनी ऐकू शकतो. वटवाघळाची ही क्षमता माणसापेक्षा किती तरीपट जास्त आहे

निरन्जनदास 13/07/2015 - 20:55
माफ करा, पुन्हा तीच चूक घडते आहे. प्राण्यांना भावना आहेत आणि त्यांना भाषा आहे, म्हणून त्यांना संस्कृती निर्माण करता येते, असे नाही. माणसाने संस्कृती निर्माण केली, धर्म, तंत्रज्ञान तत्त्वज्ञान आणि कितीएक विज्ञाने निर्माण केली. साधी गोष्ट सौंदर्यशास्त्र हा भावनांचा आविष्कार आहे आणि भाषाशास्त्र, अर्थनिर्धारणशास्त्र इत्यादी भाषेचे. प्राणी हे करू शकत नाहीत. 'प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते' हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या अवैध आहे. तुम्ही 'प्राण्यांना संवादाची एक त्यांच्यापुरती पद्धती असते' असे म्हणू शकता फार तर. आता, तुम्ही जर असे म्हणाल की त्यांच्यातही ते असतेच, तर बोलणेच खुंटले !! दुसरे, तुम्ही आदिवासी मध्येच कुठून आणले ? ती माणसे आहेत, त्यांच्यात बुद्धिमत्ता आहे. ते विविध प्रकारे व्यक्त करतात, त्यांना कमी लेखणे चूकच आहे. हे, पहा, आपण काय पाहत आहोत; तर एकूण प्राणी जगतात माणूस हा प्राणी वेगळा कसा, का आहे ते ! (त्यात जगातले सगळे आदिवासी येतात ) माणसचे वैशिष्ट्य : बुद्धी, आत्मभान आणि करुणा. हे प्राण्यात नसते, हे कृपया लक्षात घ्या. ते अविकसित आहेत. आजचा सर्वात प्रगत प्राणी केवळ मनुष्य. आता, मराठी माणसाने काय लक्षात घ्यावे ; तर ते हे की पशु-पक्ष्यांना माणसापेक्षा जास्त तीव्र इंद्रिय असेलही. पण माणूस इंद्रियांच्या दृष्टीने पाहता अतिशय मर्यादित आहे. म्हणूनच त्याने इंद्रियांचा विस्तार केला. जसे कि हातोडा हा हाताचा विस्तार आहे, दुर्बीण हा डोळ्याचा , फोन-मोबाईल हा कानाचा इत्यादी. असा विस्तार प्राणी करू शकले का ? विज्ञान-तंत्रज्ञान (इंटरनेट मानवी आहे. प्राणिज नाही. ) हा मानवी ज्ञानाचा, त्याच्या अनंत मर्यादांचा विस्तार आहे. माणूस आपल्या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न करतो. 'मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते' पण कामापुराताच, माणूस बिनकामाचे किती फालतू संवाद करतो ! किती रद्दी निर्माण करतो? शेवटचा मुद्दा प्राणी माझ्याशी बोलले तर त्यांना माझ्या भाषेतच बोलावे लागेल. मी त्यांच्या भाषेत कसा बोलणार? विनोद म्हणून ची ची चू चू ठीक आहे. अर्थात तो विनोदही आपणच करतो. प्राण्याची भाषा ही म्हणजे प्राण्यांची संवादाची रीत त्यांची त्यांच्यापुरती खासगी असते. आणि भाषा खासगी नसते. कोणतीही भाषा जर ती भाषा असेल तर ती सार्वजनिकच असते. म्हणूनच कोणत्याही माणसाला - मराठी माणूस - धरून कोणतीही भाषा शिकता येते. एकजण दुसऱ्याची भाषा शिकू शकतो. प्राणी माणसाची भाषा शिकत नाहीत. ते ध्वनी ओळखतात. आता, कृपया तिन्ही लेख आपण प्रत्येकांनी एकामागे एक असे वाचावेत, सुटे वाचू नयेत. शक्य तो प्रिंट काढून समोर ठेऊन वाचावेत. ही विंनती. आता, आपण पुढील लेखाकडे जाऊ.
लेखनविषय:

हे हृदय कसे बापाचे......!

शिव कन्या ·

एस 21/06/2015 - 07:56
वा! खूपच छान माहिती. अशाच प्रकारचे अजून एक उदाहरण म्हणजे हॉर्नबिल किंवा धनेश या पक्ष्याचे. एखाद्या झाडाच्या ढोलीत मादी अंडी घालते. मग नर त्या ढोलीत बसून ती उबवतो. मादी बाहेरून ती ढोली चिखलाने बंद करते आणि केवळ चारा आतल्या नराला देता येईल इतपतच छिद्र ठेवते. आतापर्यंत पक्षिसंशोधकांचा असा समज होता की आत मादी असते. पण खरेतर ढोलीत स्वतःला दिवसेंदिवस कोंडून घेणारा नर असतो. (माहिती साभार पक्षितज्ञ श्री. मारुती चितमपल्ली यांच्या एका पुस्तकातून.) आणखीही उदाहरणे सांगता येतील. एम्परर पेंग्वीन या अ‍ॅन्टार्क्टिका खंडात आढळणार्‍या पक्ष्यातही मादी मासे पकडून घेऊन येण्याची जबाबदारी स्वीकारते, तर नर हा तिथल्या जीवघेण्या थंडीत काहीही न खातापिता अंडे उबवत बसतो. सस्तन प्राण्यांमध्ये मात्र पिलांच्या संगोपनाची जबाबदारी ही मादीवर बहुतांश वेळेस आलेली दिसून येते.

स्पंदना 21/06/2015 - 08:33
वा तर्री ताई. अगदी दिन विषेश साधून हां लेख आला. स्वैप्स यांची माहिती सुद्धा खरच अवाक करणारी. माझ्या सुद्धा माहिती प्रमाणे मादी आत आणि नर बाहेर असच होत.

एस 21/06/2015 - 07:56
वा! खूपच छान माहिती. अशाच प्रकारचे अजून एक उदाहरण म्हणजे हॉर्नबिल किंवा धनेश या पक्ष्याचे. एखाद्या झाडाच्या ढोलीत मादी अंडी घालते. मग नर त्या ढोलीत बसून ती उबवतो. मादी बाहेरून ती ढोली चिखलाने बंद करते आणि केवळ चारा आतल्या नराला देता येईल इतपतच छिद्र ठेवते. आतापर्यंत पक्षिसंशोधकांचा असा समज होता की आत मादी असते. पण खरेतर ढोलीत स्वतःला दिवसेंदिवस कोंडून घेणारा नर असतो. (माहिती साभार पक्षितज्ञ श्री. मारुती चितमपल्ली यांच्या एका पुस्तकातून.) आणखीही उदाहरणे सांगता येतील. एम्परर पेंग्वीन या अ‍ॅन्टार्क्टिका खंडात आढळणार्‍या पक्ष्यातही मादी मासे पकडून घेऊन येण्याची जबाबदारी स्वीकारते, तर नर हा तिथल्या जीवघेण्या थंडीत काहीही न खातापिता अंडे उबवत बसतो. सस्तन प्राण्यांमध्ये मात्र पिलांच्या संगोपनाची जबाबदारी ही मादीवर बहुतांश वेळेस आलेली दिसून येते.

स्पंदना 21/06/2015 - 08:33
वा तर्री ताई. अगदी दिन विषेश साधून हां लेख आला. स्वैप्स यांची माहिती सुद्धा खरच अवाक करणारी. माझ्या सुद्धा माहिती प्रमाणे मादी आत आणि नर बाहेर असच होत.
(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....) रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत! अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही. पण निसर्गाची किमया आणि माया अगाध! ............. ............. ................ एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल?

ये दोस्ती ......

शिव कन्या ·

छान आहे कथा. स्वतःमधील व्यंगावर जिद्दीने मात करून किती सुंदर फुलवले आहे जीवन ह्या दोघांनी स्वतःचे आणि इतरांचे देखील!!!! आपण अनेकदा आपल्या बारीकसारिक गोष्टींचा उगीचच बाऊ करत असतो. ह्या अश्या कथांमुळे खूप प्रेरणा मिळते पुढे जाण्यासाठी.

एस 09/06/2015 - 23:46
अप्रतिम! हे मौक्तिक खास इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by एस

नाखु 10/06/2015 - 10:42
अगदी असेच म्हणतो. काही विधायक/प्रेरणादायी वाचायला मिळणे हे दुरापास्तच झाले आहे आज काल. वाचक नाखु

In reply to by स्पंदना

शिव कन्या 10/06/2015 - 19:15
उत्तम प्रश्न. उत्तर चीनचा बराचसा भाग औद्योगिकरणाच्या जाळ्यात अडकलेला. या कथेत जी नदी उल्लेखलेली आहे, ती सुद्धा प्रदूषित आहे. खाली video clip चा धागा दिला आहे. त्यात दिसेल.तसेच एकूण जमीन आणि हवा पाहता, ती काही सुफळ झाडे वाटत नाहीत. पण, स्थानिक प्रशासनाने त्याना सुरवातीला तुटपुंजी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख आणखी एका बातमीत वाचला. [त्याचा धागा हरवला बघा. मिळाला परत तर टाकीन.] चीनच्या बेसुमार लोकांमध्ये जिथे धडधाकट लोकांनाच काम मिळायची मारामार, तिथे अपंगांना फारसे काम मिळत नाही. सुरुवात भयानकच होती. पण जसजशी झाडी मोठी होऊ लागली, तसतशी वेगवेगळ्या कारणांसाठी वाळलेला लाकूडफाटा विकून थोडेबहुत पैसे सुटायचे. लोकांना त्यांची माहिती होऊ लागली, तशी त्यांना ते व्यक्तिगत मदत करू लागले. शिवाय, पायाने लिहून दाखवणे, विणकाम करून दाखवणे यातून मिळणारे थोडे बहुत पैसे, वेंकी मित्राला मदत म्हणून देई. पण एकूण, सगळे कष्टप्रद! पण हे काम करता करता, त्यांच्या मनाने जी उभारी धरली ती सगळ्या संकटांवर मात करणारी आहे. आज ते म्हणतात, हि झाडं आमच्या मुलांप्रमाणे आहेत. ती विकावीशी वाटत नाहीत. आम्ही नाही, पण आमच्या पुढच्या पिढीला यांची फळे मिळतील. ज्यांच्याकडे खायचीही भ्रांत आहे, त्यांच्याकडे हे शहाणपण कुठून येते?

कुसुमाग्रजान्च्या ओळि आठ्वल्या अनन्त आमुचि ध्येय्यासक्ति अनन्त अन आशा... किनारा तुला पामराला... ---- कोलम्बसाचे गर्वगीत.

सुंदर प्रेरणादायक कथा ! ही कथा वाचून भारतीय जादव पायेंगची आठवण झाली. या एकांड्या शिलेदाराने आसाममध्ये १३६० एकरांत जंगल निर्माण केले आहे. त्याबद्दल मिपावर एक लेखही आल्याचे आठवते.

हाडक्या 10/06/2015 - 20:16
एक तार्किक प्रश्न.. अशा गोष्टी वाचल्या की एक लॉजिकल प्रश्न डोक्यात येतो, तो म्हणजे त्या हात नसलेल्याने (अथवा त्याच्या इतर कोणी कुटुंबियांनी/नात्यातल्यांनी) त्यांचा एक डोळा दुसर्‍यास दान दिला असता तर चालले नसते का ? म्हणजे त्यातही काही अडथळे (वैद्यकिय वगैरे) आहेत का ? अन्यथा हाच त्यांचा प्रवास किती तरी सोप्पा झाला असता असे वाटते.

In reply to by हाडक्या

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 09:57
१. नेत्रदान हे मरणोत्तरच केले जाते. २. डोळा दान केला की कोणत्याही अंधाला दृष्टी आली असे होत नाही. फक्त कॉर्निअल ऑपॅसिटी उर्फ डोळ्याची समोरची काच खराब असेल, तर बदलता येते, त्यातही जर-तर आहेतच. ३. कथेत लिहिलेला जन्मतः मोतीबिंदू व नेत्रपेढी यांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 10:01
(प्रतिसाद देताना अर्धवट व दोनदा प्रकाशित झाला होता.) दगड लागून खराब झालेल्या डोळ्यास मात्र नेत्रदानाने पुन्हा नजर येऊ शकते.

अजया 11/06/2015 - 21:26
अतिशय प्रेरणादायी कथा.तुम्ही सातत्याने अशा नवनविन कथा उत्तम अनुवाद करुन मिसळपाववर आणता.मागच्याही सर्वच कथांची निवड विचारपूर्वक केलेली होती. धन्यवाद !

चिगो 11/06/2015 - 21:36
अपंगत्वावर एकमेकांच्या सहाय्याने केलेली ही मात खरंच प्रेरणादायी आहे.. त्यांच्या ह्या जिद्दीला सलाम करुनही जादेव पायेंगशी तुलना अप्रस्तुत आहे. कारणे दोन.. १. हे दोघे सरकारी मोबदल्यात, अत्यल्प का होईना, झाडे लावलात.. जादेवने जंगलावरील प्रेमापोटी ते केलेय. २. स्केल: ते अपंग आहेत, हे मान्य करुनही तीन हेक्टर जंगल लागवडीची तुलना १३६० एकर जंगल उभारणीशी करता येत नाही.. थोडा जास्तच ऑब्जेक्टीव्ह झाल्याबद्दल क्षमस्व.. 'ईको टास्क फोर्स'द्वारा भारतीय सैन्यपण आसाममधे कोकरझार आणि नामेरी येथे जंगल जोपासण्याचं काम करतेय. वर्षाला जवळपास ४-५ लाख झाडे लावणे व जोपासणे हे या टास्कफोर्सचं काम.. पुन्हा एकदा जादेशवी तुलना नाहीच, कारण की 'इस्टर्न प्लान्टर्स'नावाची अख्खी बटालीअन लागली आहे ह्या कामात..

In reply to by चिगो

शिव कन्या 11/06/2015 - 23:53
चिगो, वाचून प्रतिक्रिया दिलीत धन्यवाद. तुलना करणे अप्रस्तुत नाहीच. उलट या निमित्ताने, आपल्या देशात, बाहेर कोण कोण एकांडे शिलेदार काय आणि किती धडपड करतात, ते कळले तर चांगलेच. होय, ETF चे काम दमदार आहे. आणि ते तसेच होणे गरजेचेही आहे.

छान आहे कथा. स्वतःमधील व्यंगावर जिद्दीने मात करून किती सुंदर फुलवले आहे जीवन ह्या दोघांनी स्वतःचे आणि इतरांचे देखील!!!! आपण अनेकदा आपल्या बारीकसारिक गोष्टींचा उगीचच बाऊ करत असतो. ह्या अश्या कथांमुळे खूप प्रेरणा मिळते पुढे जाण्यासाठी.

एस 09/06/2015 - 23:46
अप्रतिम! हे मौक्तिक खास इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by एस

नाखु 10/06/2015 - 10:42
अगदी असेच म्हणतो. काही विधायक/प्रेरणादायी वाचायला मिळणे हे दुरापास्तच झाले आहे आज काल. वाचक नाखु

In reply to by स्पंदना

शिव कन्या 10/06/2015 - 19:15
उत्तम प्रश्न. उत्तर चीनचा बराचसा भाग औद्योगिकरणाच्या जाळ्यात अडकलेला. या कथेत जी नदी उल्लेखलेली आहे, ती सुद्धा प्रदूषित आहे. खाली video clip चा धागा दिला आहे. त्यात दिसेल.तसेच एकूण जमीन आणि हवा पाहता, ती काही सुफळ झाडे वाटत नाहीत. पण, स्थानिक प्रशासनाने त्याना सुरवातीला तुटपुंजी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख आणखी एका बातमीत वाचला. [त्याचा धागा हरवला बघा. मिळाला परत तर टाकीन.] चीनच्या बेसुमार लोकांमध्ये जिथे धडधाकट लोकांनाच काम मिळायची मारामार, तिथे अपंगांना फारसे काम मिळत नाही. सुरुवात भयानकच होती. पण जसजशी झाडी मोठी होऊ लागली, तसतशी वेगवेगळ्या कारणांसाठी वाळलेला लाकूडफाटा विकून थोडेबहुत पैसे सुटायचे. लोकांना त्यांची माहिती होऊ लागली, तशी त्यांना ते व्यक्तिगत मदत करू लागले. शिवाय, पायाने लिहून दाखवणे, विणकाम करून दाखवणे यातून मिळणारे थोडे बहुत पैसे, वेंकी मित्राला मदत म्हणून देई. पण एकूण, सगळे कष्टप्रद! पण हे काम करता करता, त्यांच्या मनाने जी उभारी धरली ती सगळ्या संकटांवर मात करणारी आहे. आज ते म्हणतात, हि झाडं आमच्या मुलांप्रमाणे आहेत. ती विकावीशी वाटत नाहीत. आम्ही नाही, पण आमच्या पुढच्या पिढीला यांची फळे मिळतील. ज्यांच्याकडे खायचीही भ्रांत आहे, त्यांच्याकडे हे शहाणपण कुठून येते?

कुसुमाग्रजान्च्या ओळि आठ्वल्या अनन्त आमुचि ध्येय्यासक्ति अनन्त अन आशा... किनारा तुला पामराला... ---- कोलम्बसाचे गर्वगीत.

सुंदर प्रेरणादायक कथा ! ही कथा वाचून भारतीय जादव पायेंगची आठवण झाली. या एकांड्या शिलेदाराने आसाममध्ये १३६० एकरांत जंगल निर्माण केले आहे. त्याबद्दल मिपावर एक लेखही आल्याचे आठवते.

हाडक्या 10/06/2015 - 20:16
एक तार्किक प्रश्न.. अशा गोष्टी वाचल्या की एक लॉजिकल प्रश्न डोक्यात येतो, तो म्हणजे त्या हात नसलेल्याने (अथवा त्याच्या इतर कोणी कुटुंबियांनी/नात्यातल्यांनी) त्यांचा एक डोळा दुसर्‍यास दान दिला असता तर चालले नसते का ? म्हणजे त्यातही काही अडथळे (वैद्यकिय वगैरे) आहेत का ? अन्यथा हाच त्यांचा प्रवास किती तरी सोप्पा झाला असता असे वाटते.

In reply to by हाडक्या

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 09:57
१. नेत्रदान हे मरणोत्तरच केले जाते. २. डोळा दान केला की कोणत्याही अंधाला दृष्टी आली असे होत नाही. फक्त कॉर्निअल ऑपॅसिटी उर्फ डोळ्याची समोरची काच खराब असेल, तर बदलता येते, त्यातही जर-तर आहेतच. ३. कथेत लिहिलेला जन्मतः मोतीबिंदू व नेत्रपेढी यांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 10:01
(प्रतिसाद देताना अर्धवट व दोनदा प्रकाशित झाला होता.) दगड लागून खराब झालेल्या डोळ्यास मात्र नेत्रदानाने पुन्हा नजर येऊ शकते.

अजया 11/06/2015 - 21:26
अतिशय प्रेरणादायी कथा.तुम्ही सातत्याने अशा नवनविन कथा उत्तम अनुवाद करुन मिसळपाववर आणता.मागच्याही सर्वच कथांची निवड विचारपूर्वक केलेली होती. धन्यवाद !

चिगो 11/06/2015 - 21:36
अपंगत्वावर एकमेकांच्या सहाय्याने केलेली ही मात खरंच प्रेरणादायी आहे.. त्यांच्या ह्या जिद्दीला सलाम करुनही जादेव पायेंगशी तुलना अप्रस्तुत आहे. कारणे दोन.. १. हे दोघे सरकारी मोबदल्यात, अत्यल्प का होईना, झाडे लावलात.. जादेवने जंगलावरील प्रेमापोटी ते केलेय. २. स्केल: ते अपंग आहेत, हे मान्य करुनही तीन हेक्टर जंगल लागवडीची तुलना १३६० एकर जंगल उभारणीशी करता येत नाही.. थोडा जास्तच ऑब्जेक्टीव्ह झाल्याबद्दल क्षमस्व.. 'ईको टास्क फोर्स'द्वारा भारतीय सैन्यपण आसाममधे कोकरझार आणि नामेरी येथे जंगल जोपासण्याचं काम करतेय. वर्षाला जवळपास ४-५ लाख झाडे लावणे व जोपासणे हे या टास्कफोर्सचं काम.. पुन्हा एकदा जादेशवी तुलना नाहीच, कारण की 'इस्टर्न प्लान्टर्स'नावाची अख्खी बटालीअन लागली आहे ह्या कामात..

In reply to by चिगो

शिव कन्या 11/06/2015 - 23:53
चिगो, वाचून प्रतिक्रिया दिलीत धन्यवाद. तुलना करणे अप्रस्तुत नाहीच. उलट या निमित्ताने, आपल्या देशात, बाहेर कोण कोण एकांडे शिलेदार काय आणि किती धडपड करतात, ते कळले तर चांगलेच. होय, ETF चे काम दमदार आहे. आणि ते तसेच होणे गरजेचेही आहे.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........ ........ हेग्झियाच्या डाव्या डोळ्यात जन्मतःच मोतीबिंदू होता.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

नाखु 30/05/2015 - 16:17
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिला का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.

In reply to by नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.

एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?

In reply to by यसवायजी

भीडस्त 31/05/2015 - 13:49
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.

@वल्ली धरलेणीकर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-015.gif हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-015.gif केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-003.gif ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-009.gifजाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-016.gif "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-019.gif मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 30/05/2015 - 18:48
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.

भाते 30/05/2015 - 20:14
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  .  . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...  .  . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.  . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला हेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...  .  .  पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...  . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...  ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...  . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...  .  .  (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...  . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...  . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...  .  .  . बुटीकचे मालक...  अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .

In reply to by आदूबाळ

एकदम अनुमोदन ! त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =)) बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे. बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबा पाटील 31/05/2015 - 20:14
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५ आपला बाबा पाटील

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:17
खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:29
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

नाखु 01/06/2015 - 10:57
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by चौथा कोनाडा

टवाळ कार्टा 01/06/2015 - 12:13
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

चौथा कोनाडा 01/06/2015 - 12:22
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 01/06/2015 - 19:55
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.

नाखु 30/05/2015 - 16:17
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिला का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.

In reply to by नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.

एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?

In reply to by यसवायजी

भीडस्त 31/05/2015 - 13:49
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.

@वल्ली धरलेणीकर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-015.gif हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-015.gif केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-003.gif ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-009.gifजाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-016.gif "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-019.gif मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 30/05/2015 - 18:48
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.

भाते 30/05/2015 - 20:14
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  .  . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...  .  . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.  . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला हेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...  .  .  पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...  . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...  ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...  . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...  .  .  (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...  . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...  . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...  .  .  . बुटीकचे मालक...  अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .

In reply to by आदूबाळ

एकदम अनुमोदन ! त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =)) बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे. बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबा पाटील 31/05/2015 - 20:14
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५ आपला बाबा पाटील

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:17
खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:29
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

नाखु 01/06/2015 - 10:57
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by चौथा कोनाडा

टवाळ कार्टा 01/06/2015 - 12:13
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

चौथा कोनाडा 01/06/2015 - 12:22
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 01/06/2015 - 19:55
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

दाग अच्छे है

आकाश खोत ·

हृदयस्पर्शी अनुभव ! नागरिकांच्या कर्तव्यांच्या किंवा 'सिस्टीम'च्या नुसत्या गप्पा मारणार्‍यांच्यापेक्षा तो टॅक्सीचालक अनेक पट वरच्या दर्जाचा नागरीक आहे ! तुम्ही त्याच्याप्रती दाखवलेली भावनाही स्पृहणीय आहे ! यानिमीत्ताने नुकताच मुंबईत भर वस्तीत आणि पोलीस चौकीपासून केवळ १५-२० मीटरवर झालेला एक अपघात आठवला. चारचाकीने ठोकर मारून पळून गेल्यामुळे आणि आजूबाजूच्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्या २३-२४ वर्षीय जखमी युवतीला २५-३० मिनिटे वैद्यकीय मदत मिळाली नाही आणि तिचा मृत्यु झाला. अपघातानंतर २० मिनीटांनी तेथे आलेल्या दोन सीआरपीएफ च्या जवानांनी तिला हॉस्पीटलमध्ये नेले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हॉस्पीटलच्या प्रवेशव्दारापर्यंत त्या तरूणीची नाडी लागत होती. तिथे वेळेवर असा जागरूक आणि सहृदय नागरिक असता तर ती तरूणी आज जिवंत असती ! :( असे प्रसंग आपल्यावर आणि आपल्या जवळच्यांवरही येऊ शकतात हे लोक विसरले आहेत काय ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टवाळ कार्टा 21/05/2015 - 18:27
असे प्रसंग आपल्यावर आणि आपल्या जवळच्यांवरही येऊ शकतात हे लोक विसरले आहेत काय ?
होय...त्यामुळेच रस्त्यावर बेशिस्तीने गाड्या हाकायचे प्रकार सुरु झालेत...आत्ता आहे त्याच्या १० पट बेशिस्त आपण म्हातारे झाल्यावर असेल हे अश्या लोकांच्या गावीसुध्धा नसते जाताजाता...इथे मिपावरसुध्धा माझ्या बाईकच्या धाग्यावर कट मारुन काटा किर्र बाईक चालवता येते असे लिहिले होते (रंगासेठ...शोधणार का? :) )

राही 21/05/2015 - 18:16
खरोखर, दुर्मीळ का होईना काही चांगली माणसं या जगात अजूनही आहेत म्हणून चांगुलपणावरचा विश्वास उडाला नाहीय अजून. आपण त्या टेक्सीचालकाचे कौतुक केलेत हेही दुर्मीळच. नाही तर 'मला काय त्याचे' म्हणणारेच अधिक. लेख लिहिलायही छान.

रेवती 21/05/2015 - 18:25
बाईगं! वाचूनच कसेतरी झाले. त्या टॅक्सीचालकाचे आभार मानावेत तेवढे थोडे! बरे झाले तुम्ही निदान थोडे पैसे वर दिलेत. चालकांनी बक्षिसाच्या अपेक्षेने का होईना अशी मदत करावी. नाहीतर कितीतरी तरणेताठे जीव हकनाक जातात.

टिवटिव 21/05/2015 - 19:23
माझा पण असाच अपघात झाला होता. २० मिनिटे रस्त्यावर पडुन होतो. अशाच एका काळीपिवळी ड्रायव्हरने सरकारी दवाखान्यात नेउन टाकले म्हणुन वाचलो.बाबांनी माझ्या लग्नात त्याचा पुर्ण मानपान केला.

सुधीर 21/05/2015 - 21:21
हब समोरचा पश्चिम द्रूत गती मार्ग ओलांडण्यासाठी सबवे आसतो हे ब-याच वेळा नवख्यांना माहीत नसतं (काही वेळा अगदी शहरात राहणा-यांनाही). अगांवर काटा यायचा भरगाव वेगाने जाणा-या गाड्यांपुढे पाठी-पुढे करणारी माणसं पाहिली की. दोन तीन जणांना मी स्वत: सबवे दाखवला आहे. तिथे एक साईन बोर्ड असायला हवा होता. तसाच पुढे जोगेश्वरी फ्लायओव्हर वरून अंधेरीच्या दिशेकडून येणारे मोटरबाईकस्वार आणि पुलाखालून येणा-या गाड्या यांचे अपघातही बरेच झालेले आहेत.

सतिश गावडे 21/05/2015 - 21:29
अनुभवकथन आवडले. हल्ली "कशाला झंजटात पडायचे" असे म्हणत अपघातप्रसंगी कुणी मदत करत नाही. एका टॅक्सी ड्रायव्हरची सहृदयता पाहून बरे वाटले.

nikhil Patil 21/05/2015 - 23:31
खरंच खूप कमी आहेत अशी मदत करणारे माणसे.खूप लोकांना वाटत कि आपण मदत केली पाहिजे,पण पोलिस उगाच ञास देईल म्हणून कोणी करत नाही.

आकाश खोत 22/05/2015 - 10:42
मंडळी हि कथा काल्पनिक आहे. हब मॉलजवळच काही दिवस आधी एका मुलीचा वेळेत मदत न मिळाल्यामुळे मृत्यु झाला. तिच्या भावाने व्यथित होऊन तिचा जीव वाचू शकला असता अशी खंत फेसबुकवर "दि लॉजिकल इंडियन" या पेजवर व्यक्त केली. त्यातुन मला हि कथा सुचली. असे लोक असावेत या आशेने. आणि चांगले आणि (वाईट नाही पण) दुर्लक्ष करणारे असे दोन्ही प्रकारचे लोक सर्वत्र असतात. आपण संकटात असताना आपल्याला कसे लोक भेटतात हे आपलंच नशीब म्हणायचं. मी त्या फेसबुकवरच्या पोस्टचा दुवा पण कथेखाली दिला होता. पण तरीही काही वाचकांचा हा खरा अनुभव आहे असा समज झालेला दिसतो. त्यामुळे माझ्याकडून काही राहिले असल्यास क्षमस्व. पण तरीही माझ्या कुटुंबियांना सुदैवाने काही प्रसंगी अशा वेगवेगळ्या लोकांनी खरोखर मदत केली आहे. हि कथा त्यांना अर्पण. आणि टीवटीव यांच्या प्रतिसादावरून दिसते कि मी वर्णन केल्यासारखाच प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला होता. हा योगायोगच म्हणायचा. सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by आकाश खोत

एस 22/05/2015 - 20:13
या कथेवरून प्रेरणा घेऊन जर कोणी अपघातग्रस्तांना मदतीस प्रवृत्त झाले तर तेच या कथेचे खरे यश असेल. लिहित रहा.

शि बि आय 22/05/2015 - 19:02
खरच.. !!असे डाग एकाद्या मेडल पेक्षा कमी नसतात…म्हणूनच असे डाग चांगले असतात. धन्य तो माणूस !! पेशाने माणूस कोणी ही असो आतली माणुसकी जपली तरच माणूस म्हणता येते ना त्याला

नाखु 23/05/2015 - 10:59
ह्यो डाग मिरवायची ऐपत फक्त त्याच टॅक्शीवाल्याची हाये भित्राट लोकांना नाही संभाळणार हा दागिना नतमस्तक नाखु

सुबोध खरे 24/05/2015 - 22:57
हि जवळ जवळ नऊ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या वडिलांच्या पोटात दुखत होते म्हणून मी लष्कर्तून निवृत्त झालेल्या पोटाच्या सर्जनची अपोइन्टमेंट घेतली. त्यांनी ठाणे येथील हिरानंदानी रुग्णालयात सायंकाळी सात वाजता आमच्या साठी येण्याचे कबुल केले. तेथे त्यांचा त्या दिवशी वार नव्हता तरीही त्यांनी माझ्या ओळखीमुळे यायचे कबुल केले होते. संध्याकाळी भरपूर वाहतूक असते म्हणून मी मोटर सायकलनेच जायचे ठरवले. सर लष्करातून निवृत्त झालेले असल्याने वेळेचे पक्के होते. मुलुंड हून मी सव्वा सहा वाजता घरून निघालो. मध्ये ठाण्याच्या टोल नाक्यावर वाहनांचा खोळंबा झालेला होता. त्यातून वाट काढत पुढे आलो तर कोपरी पुलाच्या जरासे पुढे माझ्या पुढे चाललेल्या मारुती व्हानने तेथे रस्ता ओलांडत असलेल्या एका पन्नाशीच्या माणसाला ठोकले. तो माणूस रस्त्यावर आडवा झाला तेंव्हा त्या मोटारीतील माणसाने मोटार मागे घ्यायला सुरुवात केली माझ्या लक्षात आले कि हा पळण्याच्या तयारीत आहे. मी सरला मोटार सायकल त्याच्या पुढे आडवी लावली आणि त्याचा जाण्याचा मार्ग बंद केला. त्यानंतर मी आणि वडील खाली उतरलो आणि त्या माणसाला पाहू लागलो. त्याला बरेच लागले होते पण तो उठला. मी तेथे जमलेल्या माणसाना सांगितले कि मी डॉक्टर आहे आणि ठाणे सिव्हील रुग्णालयात याला घेऊन चला.आपण त्याला तेथे पाहू त्या मारुती व्हान च्या ड्रायव्हर ला सांगितले याला सिव्हील मध्ये घेऊन चल. तेथे जमलेल्या माणसांमुळे त्याला नकार देणे शक्य नव्हतेच त्या माणसाबरोबर त्याचे दोन मित्रही होते. तेही त्यात बसले. मी त्यांना म्हणालो यांना घेऊन या मी तेथे सर्व व्यवस्था करतो. आणि मी मोटार सायकल चालू केली. मला एकदम आठवले कि आपल्याला ठाणे हिरानंदानी येथे जायचे आहे. मी सरळ ठाणे सिव्हिल रुग्णालयाचा फोन फिरवला आणि ठेवणीतील आवाज काढून सांगितले कि मी नौदलातील डॉक्टर बोलतो आहे. मला ड्युटीवरील डॉक्टरशी बोलायचे आहे. तो डॉक्टर फोनवर आल्यावर त्याल मी सर्व परिस्थिती समजावून दिली आणि सांगितले कि मला तेथे येणे शक्य होणार नाही. पोलिस केस आहे तर जरा काळजी घ्या. परत येताना सिव्हिल रुग्णालयात जायचे असे ठरवून मी पुढे गेलो. सरांना भेटल्यावर वडिलांची शल्य क्रिया करेन आवश्यक आहे असे समजले तेंव्हा त्या सगळ्या गडबडीत मी हे सिव्हिल रुग्णालयात जायचे विसरून गेलो. त्यामुळे त्या माणसाचे पुढे काय झाले हे समजले नाही.( यथावकाश वडिलांची शल्यक्रिया ठाणे हिरानंदानी रुग्णालयात झाली आणि ते व्यवस्थित झाले) पण हि एक रुखरुख लागून राहिली. बहुधा त्या माणसाचा इलाज तेथे व्यवस्थित झाला असावा.

हृदयस्पर्शी अनुभव ! नागरिकांच्या कर्तव्यांच्या किंवा 'सिस्टीम'च्या नुसत्या गप्पा मारणार्‍यांच्यापेक्षा तो टॅक्सीचालक अनेक पट वरच्या दर्जाचा नागरीक आहे ! तुम्ही त्याच्याप्रती दाखवलेली भावनाही स्पृहणीय आहे ! यानिमीत्ताने नुकताच मुंबईत भर वस्तीत आणि पोलीस चौकीपासून केवळ १५-२० मीटरवर झालेला एक अपघात आठवला. चारचाकीने ठोकर मारून पळून गेल्यामुळे आणि आजूबाजूच्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्या २३-२४ वर्षीय जखमी युवतीला २५-३० मिनिटे वैद्यकीय मदत मिळाली नाही आणि तिचा मृत्यु झाला. अपघातानंतर २० मिनीटांनी तेथे आलेल्या दोन सीआरपीएफ च्या जवानांनी तिला हॉस्पीटलमध्ये नेले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हॉस्पीटलच्या प्रवेशव्दारापर्यंत त्या तरूणीची नाडी लागत होती. तिथे वेळेवर असा जागरूक आणि सहृदय नागरिक असता तर ती तरूणी आज जिवंत असती ! :( असे प्रसंग आपल्यावर आणि आपल्या जवळच्यांवरही येऊ शकतात हे लोक विसरले आहेत काय ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टवाळ कार्टा 21/05/2015 - 18:27
असे प्रसंग आपल्यावर आणि आपल्या जवळच्यांवरही येऊ शकतात हे लोक विसरले आहेत काय ?
होय...त्यामुळेच रस्त्यावर बेशिस्तीने गाड्या हाकायचे प्रकार सुरु झालेत...आत्ता आहे त्याच्या १० पट बेशिस्त आपण म्हातारे झाल्यावर असेल हे अश्या लोकांच्या गावीसुध्धा नसते जाताजाता...इथे मिपावरसुध्धा माझ्या बाईकच्या धाग्यावर कट मारुन काटा किर्र बाईक चालवता येते असे लिहिले होते (रंगासेठ...शोधणार का? :) )

राही 21/05/2015 - 18:16
खरोखर, दुर्मीळ का होईना काही चांगली माणसं या जगात अजूनही आहेत म्हणून चांगुलपणावरचा विश्वास उडाला नाहीय अजून. आपण त्या टेक्सीचालकाचे कौतुक केलेत हेही दुर्मीळच. नाही तर 'मला काय त्याचे' म्हणणारेच अधिक. लेख लिहिलायही छान.

रेवती 21/05/2015 - 18:25
बाईगं! वाचूनच कसेतरी झाले. त्या टॅक्सीचालकाचे आभार मानावेत तेवढे थोडे! बरे झाले तुम्ही निदान थोडे पैसे वर दिलेत. चालकांनी बक्षिसाच्या अपेक्षेने का होईना अशी मदत करावी. नाहीतर कितीतरी तरणेताठे जीव हकनाक जातात.

टिवटिव 21/05/2015 - 19:23
माझा पण असाच अपघात झाला होता. २० मिनिटे रस्त्यावर पडुन होतो. अशाच एका काळीपिवळी ड्रायव्हरने सरकारी दवाखान्यात नेउन टाकले म्हणुन वाचलो.बाबांनी माझ्या लग्नात त्याचा पुर्ण मानपान केला.

सुधीर 21/05/2015 - 21:21
हब समोरचा पश्चिम द्रूत गती मार्ग ओलांडण्यासाठी सबवे आसतो हे ब-याच वेळा नवख्यांना माहीत नसतं (काही वेळा अगदी शहरात राहणा-यांनाही). अगांवर काटा यायचा भरगाव वेगाने जाणा-या गाड्यांपुढे पाठी-पुढे करणारी माणसं पाहिली की. दोन तीन जणांना मी स्वत: सबवे दाखवला आहे. तिथे एक साईन बोर्ड असायला हवा होता. तसाच पुढे जोगेश्वरी फ्लायओव्हर वरून अंधेरीच्या दिशेकडून येणारे मोटरबाईकस्वार आणि पुलाखालून येणा-या गाड्या यांचे अपघातही बरेच झालेले आहेत.

सतिश गावडे 21/05/2015 - 21:29
अनुभवकथन आवडले. हल्ली "कशाला झंजटात पडायचे" असे म्हणत अपघातप्रसंगी कुणी मदत करत नाही. एका टॅक्सी ड्रायव्हरची सहृदयता पाहून बरे वाटले.

nikhil Patil 21/05/2015 - 23:31
खरंच खूप कमी आहेत अशी मदत करणारे माणसे.खूप लोकांना वाटत कि आपण मदत केली पाहिजे,पण पोलिस उगाच ञास देईल म्हणून कोणी करत नाही.

आकाश खोत 22/05/2015 - 10:42
मंडळी हि कथा काल्पनिक आहे. हब मॉलजवळच काही दिवस आधी एका मुलीचा वेळेत मदत न मिळाल्यामुळे मृत्यु झाला. तिच्या भावाने व्यथित होऊन तिचा जीव वाचू शकला असता अशी खंत फेसबुकवर "दि लॉजिकल इंडियन" या पेजवर व्यक्त केली. त्यातुन मला हि कथा सुचली. असे लोक असावेत या आशेने. आणि चांगले आणि (वाईट नाही पण) दुर्लक्ष करणारे असे दोन्ही प्रकारचे लोक सर्वत्र असतात. आपण संकटात असताना आपल्याला कसे लोक भेटतात हे आपलंच नशीब म्हणायचं. मी त्या फेसबुकवरच्या पोस्टचा दुवा पण कथेखाली दिला होता. पण तरीही काही वाचकांचा हा खरा अनुभव आहे असा समज झालेला दिसतो. त्यामुळे माझ्याकडून काही राहिले असल्यास क्षमस्व. पण तरीही माझ्या कुटुंबियांना सुदैवाने काही प्रसंगी अशा वेगवेगळ्या लोकांनी खरोखर मदत केली आहे. हि कथा त्यांना अर्पण. आणि टीवटीव यांच्या प्रतिसादावरून दिसते कि मी वर्णन केल्यासारखाच प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला होता. हा योगायोगच म्हणायचा. सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by आकाश खोत

एस 22/05/2015 - 20:13
या कथेवरून प्रेरणा घेऊन जर कोणी अपघातग्रस्तांना मदतीस प्रवृत्त झाले तर तेच या कथेचे खरे यश असेल. लिहित रहा.

शि बि आय 22/05/2015 - 19:02
खरच.. !!असे डाग एकाद्या मेडल पेक्षा कमी नसतात…म्हणूनच असे डाग चांगले असतात. धन्य तो माणूस !! पेशाने माणूस कोणी ही असो आतली माणुसकी जपली तरच माणूस म्हणता येते ना त्याला

नाखु 23/05/2015 - 10:59
ह्यो डाग मिरवायची ऐपत फक्त त्याच टॅक्शीवाल्याची हाये भित्राट लोकांना नाही संभाळणार हा दागिना नतमस्तक नाखु

सुबोध खरे 24/05/2015 - 22:57
हि जवळ जवळ नऊ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या वडिलांच्या पोटात दुखत होते म्हणून मी लष्कर्तून निवृत्त झालेल्या पोटाच्या सर्जनची अपोइन्टमेंट घेतली. त्यांनी ठाणे येथील हिरानंदानी रुग्णालयात सायंकाळी सात वाजता आमच्या साठी येण्याचे कबुल केले. तेथे त्यांचा त्या दिवशी वार नव्हता तरीही त्यांनी माझ्या ओळखीमुळे यायचे कबुल केले होते. संध्याकाळी भरपूर वाहतूक असते म्हणून मी मोटर सायकलनेच जायचे ठरवले. सर लष्करातून निवृत्त झालेले असल्याने वेळेचे पक्के होते. मुलुंड हून मी सव्वा सहा वाजता घरून निघालो. मध्ये ठाण्याच्या टोल नाक्यावर वाहनांचा खोळंबा झालेला होता. त्यातून वाट काढत पुढे आलो तर कोपरी पुलाच्या जरासे पुढे माझ्या पुढे चाललेल्या मारुती व्हानने तेथे रस्ता ओलांडत असलेल्या एका पन्नाशीच्या माणसाला ठोकले. तो माणूस रस्त्यावर आडवा झाला तेंव्हा त्या मोटारीतील माणसाने मोटार मागे घ्यायला सुरुवात केली माझ्या लक्षात आले कि हा पळण्याच्या तयारीत आहे. मी सरला मोटार सायकल त्याच्या पुढे आडवी लावली आणि त्याचा जाण्याचा मार्ग बंद केला. त्यानंतर मी आणि वडील खाली उतरलो आणि त्या माणसाला पाहू लागलो. त्याला बरेच लागले होते पण तो उठला. मी तेथे जमलेल्या माणसाना सांगितले कि मी डॉक्टर आहे आणि ठाणे सिव्हील रुग्णालयात याला घेऊन चला.आपण त्याला तेथे पाहू त्या मारुती व्हान च्या ड्रायव्हर ला सांगितले याला सिव्हील मध्ये घेऊन चल. तेथे जमलेल्या माणसांमुळे त्याला नकार देणे शक्य नव्हतेच त्या माणसाबरोबर त्याचे दोन मित्रही होते. तेही त्यात बसले. मी त्यांना म्हणालो यांना घेऊन या मी तेथे सर्व व्यवस्था करतो. आणि मी मोटार सायकल चालू केली. मला एकदम आठवले कि आपल्याला ठाणे हिरानंदानी येथे जायचे आहे. मी सरळ ठाणे सिव्हिल रुग्णालयाचा फोन फिरवला आणि ठेवणीतील आवाज काढून सांगितले कि मी नौदलातील डॉक्टर बोलतो आहे. मला ड्युटीवरील डॉक्टरशी बोलायचे आहे. तो डॉक्टर फोनवर आल्यावर त्याल मी सर्व परिस्थिती समजावून दिली आणि सांगितले कि मला तेथे येणे शक्य होणार नाही. पोलिस केस आहे तर जरा काळजी घ्या. परत येताना सिव्हिल रुग्णालयात जायचे असे ठरवून मी पुढे गेलो. सरांना भेटल्यावर वडिलांची शल्य क्रिया करेन आवश्यक आहे असे समजले तेंव्हा त्या सगळ्या गडबडीत मी हे सिव्हिल रुग्णालयात जायचे विसरून गेलो. त्यामुळे त्या माणसाचे पुढे काय झाले हे समजले नाही.( यथावकाश वडिलांची शल्यक्रिया ठाणे हिरानंदानी रुग्णालयात झाली आणि ते व्यवस्थित झाले) पण हि एक रुखरुख लागून राहिली. बहुधा त्या माणसाचा इलाज तेथे व्यवस्थित झाला असावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी गोरेगावच्या एका आयटी कंपनीत काम करतो. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हब मॉलच्या बाजुलाच आमचं ऑफिस आहे. त्यादिवशी आमची एक महत्वाची रिलीज होती. ह्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याच अडचणी आल्या. त्यावर मात करत आम्ही अगदी वेळेत काम संपवलं होतं. आज टेस्टिंगचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी उशिर होणार याचा अंदाज होताच. पण पुन्हा आम्हाला नेटवर्क, डेटाबेस अश्या तांत्रिक आणि प्रोजेक्ट मधल्याही काही अडचणी आल्या. त्या दिवशी कोणीही रिलीज संपल्याशिवाय जायचं नाही असं ठरलेलं होतंच. पण अपेक्षेपेक्षा जास्तच उशीर झाला. ते काम दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चाललं.

मदत हवी आहे.

रामदास ·

पैसा 19/05/2015 - 14:38
सर्वप्रथम शुभेच्छा! कुंभमेळ्याबद्दल फार माहिती नाही. लिखाणात मदत करणे मला कठीण आहे. मात्र भाषांतराला नक्की मदत करू शकेन. आलेख बनवण्यातही मदत करू शकेन.

कंजूस 19/05/2015 - 16:13
यानंतर सहामहिन्यांनी उज्जेनचा मेळा येतो -२२एप्रल ते २१मे .त्यांचे नकाशासह माहितीपत्रक मागच्या वर्षीच प्रकाशित झाले(मध्य प्रदेश पर्यटन यांचेकडून)

रामदास 20/05/2015 - 10:18
कालच बर्‍याच सभासदांचे -त्यांच्या संपर्कातील मित्रमंडळींचे आणि मिपावर केवळ वाचनमात्र आणि सभासद नसलेल्यांचे पण निरोप आले आहेत. काही जणांशी संपर्क झाला आहे. पुनश्च धन्यवाद.

श्रीयुत रामदासजी, स. न. वि.वि. मिसळपाव च्या वेब साईट वरून आपल्याला दोन पुस्तके तयार करण्यासाठी मदत हवी आहे असे समजले . मला मदत करण्याची इच्छा आहे माझा मोबाईल क्रमांक ९८२१२२३७०९ असा आहे. मी बोरीवली ( मुंबई ) येथे रहात आहे. सेवा निवृत्त आहे. , पण भाषा आवडीचा विषय आहे. प्रत्यक्ष मदत कोणत्या स्वरूपाची हवी आहे ते कळवावे जयंत शिंपी

NAKSHATRA 22/01/2021 - 18:51
काका नमस्कार , तुम्ही दिलेला नंबर लागत नाही, मला आपला सध्याचा नंबर द्यावा हि नम्र विनंती चंद्रकांत सोनवणे ९६८९८८४२२८ धन्यवाद

पैसा 19/05/2015 - 14:38
सर्वप्रथम शुभेच्छा! कुंभमेळ्याबद्दल फार माहिती नाही. लिखाणात मदत करणे मला कठीण आहे. मात्र भाषांतराला नक्की मदत करू शकेन. आलेख बनवण्यातही मदत करू शकेन.

कंजूस 19/05/2015 - 16:13
यानंतर सहामहिन्यांनी उज्जेनचा मेळा येतो -२२एप्रल ते २१मे .त्यांचे नकाशासह माहितीपत्रक मागच्या वर्षीच प्रकाशित झाले(मध्य प्रदेश पर्यटन यांचेकडून)

रामदास 20/05/2015 - 10:18
कालच बर्‍याच सभासदांचे -त्यांच्या संपर्कातील मित्रमंडळींचे आणि मिपावर केवळ वाचनमात्र आणि सभासद नसलेल्यांचे पण निरोप आले आहेत. काही जणांशी संपर्क झाला आहे. पुनश्च धन्यवाद.

श्रीयुत रामदासजी, स. न. वि.वि. मिसळपाव च्या वेब साईट वरून आपल्याला दोन पुस्तके तयार करण्यासाठी मदत हवी आहे असे समजले . मला मदत करण्याची इच्छा आहे माझा मोबाईल क्रमांक ९८२१२२३७०९ असा आहे. मी बोरीवली ( मुंबई ) येथे रहात आहे. सेवा निवृत्त आहे. , पण भाषा आवडीचा विषय आहे. प्रत्यक्ष मदत कोणत्या स्वरूपाची हवी आहे ते कळवावे जयंत शिंपी

NAKSHATRA 22/01/2021 - 18:51
काका नमस्कार , तुम्ही दिलेला नंबर लागत नाही, मला आपला सध्याचा नंबर द्यावा हि नम्र विनंती चंद्रकांत सोनवणे ९६८९८८४२२८ धन्यवाद
लेखनविषय:
या वर्षी जुलै महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. या विषयावर एका पुस्तकाच्या शब्दांकनाचे माझ्याकडे आले आहे.एकाच वेळी दोन भाषांमध्ये हे पुस्तक तयार करताना माझ्यावर ताण आला आहे. या पुस्तकाची काही प्रकरणे लिहायला मला मदत हवी आहे. तयार झालेल्या प्रकरणांचे भाषांतर करण्यासाठी पण मदतीची आवश्यकता आहे.त्या खेरीज उपलब्ध असलेल्या विदाचे आलेख वगैरे बनविण्यासाठी पण मदत हवी आहे.मानधन आणि श्रेयनिर्देश मिळेल. कृपया संपर्क करा . रामदास ९५९४११०८६१ किंवा nathconsulting@gmail.com

मनकवडा डॉक्टर …

पगला गजोधर ·

In reply to by सुबोध खरे

पगला गजोधर 07/05/2015 - 14:17
एक्झाटली… हेच … डोळस स्त्रीला सोनोग्राफीमधले आपले मुल पाहून जसा हर्ष होत असेल, तसाच हर्ष त्या अंध स्त्रीला, तिच्या गर्भाच्या त्रिमितीय रचनेला स्पर्शून झाला असेल.

In reply to by स्वैर परी

रुपी 07/05/2015 - 23:40
अगदी! सुरुवातीच्या काही आठवड्यांत जेव्हा गर्भाच्या हालचाली फार जाणवत नाहीत तेव्हा तर ही सोनोग्राफी अगदी वरदान असते. पण आणखी थोडं खुलवून लिहिलं असतं तर नीट समजलं असतं. म्हणजे हे सगळं कल्पनातीत आहे, की खरोखर कुणी हा अनुभव घेतलाय? खरा असेल तर मग त्याचा फायदा इतरांनाही होऊ शकतो.

बाळाचे सोनोग्राफीतील दोन्ही फोटो एकदम झकास. डॉक्टरने ३-डी प्रिंटरचा कल्पकतेने केलेला वापर मनाला भावून गेला. धन्यवाद प.ग. ह्या माहितीबद्दल. माझा डॉक्टरांबद्दल असलेला आदर हजारपटीने वाढला.

सुंदर भावस्पर्शी कथा ! सद्या तंत्रज्ञान इतके पुढे चालले आहे की ते वापरून आपण काय करू शकतो याची सीमा केवळ आपल्या कल्प्नाशक्तीच्या ताकदीवर अवलंबून आहे !

In reply to by सुबोध खरे

पगला गजोधर 07/05/2015 - 14:17
एक्झाटली… हेच … डोळस स्त्रीला सोनोग्राफीमधले आपले मुल पाहून जसा हर्ष होत असेल, तसाच हर्ष त्या अंध स्त्रीला, तिच्या गर्भाच्या त्रिमितीय रचनेला स्पर्शून झाला असेल.

In reply to by स्वैर परी

रुपी 07/05/2015 - 23:40
अगदी! सुरुवातीच्या काही आठवड्यांत जेव्हा गर्भाच्या हालचाली फार जाणवत नाहीत तेव्हा तर ही सोनोग्राफी अगदी वरदान असते. पण आणखी थोडं खुलवून लिहिलं असतं तर नीट समजलं असतं. म्हणजे हे सगळं कल्पनातीत आहे, की खरोखर कुणी हा अनुभव घेतलाय? खरा असेल तर मग त्याचा फायदा इतरांनाही होऊ शकतो.

बाळाचे सोनोग्राफीतील दोन्ही फोटो एकदम झकास. डॉक्टरने ३-डी प्रिंटरचा कल्पकतेने केलेला वापर मनाला भावून गेला. धन्यवाद प.ग. ह्या माहितीबद्दल. माझा डॉक्टरांबद्दल असलेला आदर हजारपटीने वाढला.

सुंदर भावस्पर्शी कथा ! सद्या तंत्रज्ञान इतके पुढे चालले आहे की ते वापरून आपण काय करू शकतो याची सीमा केवळ आपल्या कल्प्नाशक्तीच्या ताकदीवर अवलंबून आहे !
कल्पना करा, संध्याकाळच्या वेळेस आपण आपल्या घरात असताना, अचानक सर्व शहरातली लाईट गेली, आणि आपल्याकडे एकदम बुक्क अंधार झाला तर, अंधाराला डोळे सरवयापर्यंत, मनावर कशी एकप्रकारची अनामिक भीती एकटेपणाची काळोखी पसरते. आता त्या काही क्षणांच्या अनुभवावर अंध व्यक्तींचा जीवनातील काळोखीवर खर्‍या अर्थाने विचार करून, अंध बांधवांच्या दु:क्खाची भयाणता, डोळस व्यक्ती कल्पना करू शकते. स्पर्श आणि आवाज यांच्या माध्यमातूनच अंधांचा जगाशी संपर्क येतो.

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.