अग्रलेख
टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी.
टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी.
महत्वाची सुचना:
ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....
चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे.
त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद!!!
चर्चेचा विषय:
निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते??
लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ?
उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ?
फेसबुक मध्ये ग्रूप्स, पेजेस आणि टाईमलाईन अशा तीन ठिकाणी चर्चा करता येते. पण या चर्चा तशा वाढत जातात. माझ्या सारखी व्यक्ती क्वचीतच फेसबुकवर जाते. आपण आपापसात केलेली जुनी चर्चा कशी शोधावी. ?
विशीष्ट ग्रूप्स, पेजेस, टाईम लाईन आणि ज्या दोन सदस्यांमध्ये चर्चा झाली त्यांची नावे देऊन जुनी चर्चा शोधता येते काय याची माहिती हवी आहे.
मुद्दामहून कॉलेजच्या बोलीभाषेत लिहले आहे, इंग्रजाळलेल्या. काही जोडाक्षरे गंडताहेत.
मराठी विकिपीडियावरील वि़ज्ञान हा लेख अद्ययावत करू इच्छितो आहे. खालील माहितीचे स्वागत असेल
१) वि़ज्ञान म्हणजे काय (व्याख्या) ?
* उपप्रश्न :
** वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय ? वैज्ञानिक पद्धती कशी अवलंबिली जाते ? सायंटीफीक एनक्वायरी (मराठी शब्द सुचवा) म्हणजे काय ती कशी केली जाते ?
२) वि़ज्ञानाचे आणि वैज्ञानिकांचे उद्दीष्ट/ध्येय/साध्य काय असते ?
३) विज्ञानाची अभिप्रेत कार्ये कोणती ?
४) विज्ञानाची साधने कोणती ?
भारत देश म्हणजे गेली साठ वर्षे मानाने संसदीय लोकशाही राबविणारा देश , देशाला आपल्या लोकशाही चा सार्थ अभिमान
लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य वा देश पण इतके असूनही देशाला अजूनही निवडून आलेला प्रतिनिधी शंभर टक्के लोकांनी निवडलेला नाही
नक्की होतेय काय ?
कशी होईन समर्थ लोकशाही?
मतदान सक्तीचे करावे का?
लोकांना मतदानासाठी खेचून आणण्यामधे नेते कमी पडतात का?
मतदान केंद्रावर पोहचायाची व्यवस्था नक्की कुणी करायची?
निवडणूक आयोगाने नक्की काय करावे म्हणजे शंभर टक्के मतदान होईल आणि सुदृढ सशक्त लोकशाही अस्तित्वास येईल?
खालील विषयांवर निश्चित अशी माहिती कुणाकडे असल्यास हवी आहे.
सहसा बिल्डर गाळा धारकाना पार्किंग वाटून देतो. यात स्टिल्ट खाली पार्किंग हवे असेल तर काही पैसे आपल्या करारात न दाखवता रोखीने घेतो. नंतर काही काळाने इमारतीचे खरेदी खत करून सहकारी गृहरचना संस्था स्थापन केली जाते. काही कालाने दुचाक्यांची संस्ख्या वाढते .अशी वेळ आल्यास चारचाकी बाहेर हकलण्याचे दडपण जनरल बॉडीचा ठराव करून किंवा अनधिकृत्त पणे धमकी वगैरे देऊन आणण्यात येते. अशा स्थितीत बिल्डरने केलेले वाटप वा जनरल बॉडीने केलेला ठराव यात
कायदेशीरित्या महत्ता कोणाची.(who supercedes whom ? )
आंतरजालाची २५ वर्षे झाली याचा आनंद साजरा होतो न होतो तोच मागोमाग फायरवॉल्स आणि अँटीव्हायरस आणि इतरही सुरक्षा वापरून निर्धास्त होऊ पहात असलेल्या सर्वांनाच हार्टब्लीड (Heartbleed) बग ही त्रुटी लक्षात येऊन मोठाच धक्का दिला आहे. जवळपास दोन तृतीयांश (२/३) वेबसाईट्सवर त्यात अगदी विश्वासार्ह समजल्या जाणार्या असंख्य वेबसाईट्स सहित अनेक ठिकाणी नोंदवलेले सदस्य नाव आणि पासवर्ड इतर व्यक्तीगत माहितीची गोपनीयता राखली न गेल्याची हादरवून टाकणारी शक्यता समोर आली आहे की ज्याबाबत सामान्य आंतरजाल उपयोगकर्ता काही म्हणजे काही करू शकत नाही.
खर म्हणजे मागच्याच महिन्यात इंटरनेट चा उदय होऊन पंचविस वर्षे झाली. सर्नचे अभियंता टिम बर्नर-ली यांनी १९९० मध्ये आंतरजालाची सुरुवात केली[१]. सर्न या संस्थेने ३० एप्रील १९९३ पासून आंतरजाल संकल्पना सर्वांना मुक्त केली.[२] सायबर विश्वात मराठीचे पहिले पाऊल रोवण्याचा मान ‘मायबोली‘ या संकेतस्थळाला जातो. १९९६ मध्ये (www.maayboli.com) हे संकेत स्थळ सुरू झाले[३] म्हणजे मराठी आंतरजालावर येऊनही जवळपास १८ वर्षे झाली.
सर्व सामान्य जनतेच लक्ष देशाच्या राजकारणाकडे लागल असताना भारतीय सर्वोच्च न्यायालय क्रिडाक्षेत्रातील राजकारणावर (BCCI) उपाय योजण्यात व्यस्त झाले आहे. क्रिडा, संस्कृती, सहकार, शिक्षण या क्षेत्रातील कंपुगिरी हल्ली राजकारणातील राजकारणावर ताण करताना दिसते आहे.
Many of the associations by virtue of being not-for-profit companies, abuse the system of proxies, and retain control by controlling the memberships.