का लागली दृष्ट तेजोनिधीला
अवेळी कसा आज सूर्यास्त झाला
अर्ध्यातूनी सोडूनी डाव ऐसा
शरण भास्करा तू कसा या निशेला
बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची
कशी सांज निमिषात उतरुन आली
अंधार डोही धरा दीनवाणी
कशी भासते आज केविलवाणी
कंटाळवाणी प्रतिक्षा रवीची
आस वेड्या जीवाला नव्याने उषेची
जयश्री अंबासकर
प्रतिक्रिया
23 Feb 2009 - 8:03 pm | शितल
जयवी ताई,
मस्त कविता केली आहेस, आवडली. :)
23 Feb 2009 - 8:19 pm | संदीप चित्रे
>> बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची
कशी सांज निमिषात उतरुन आली
या ओळी विशेष आवडल्या, जयश्री.
23 Feb 2009 - 9:00 pm | प्राजु
अतिशय सुरेख काव्य आहे.
भास्कराने निशेला शरण जाणे... जबरदस्त कल्पना. :)
बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची
कशी सांज निमिषात उतरुन आली
सुरेख! जयूताई, तुझ्या प्रतिभेसमोर मी नतमस्तक आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Feb 2009 - 12:11 am | विसोबा खेचर
बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची
कशी सांज निमिषात उतरुन आली
अप्रतीम शब्दयोजना...!
आपला,
(जयूचा फ्यॅन) तात्या.
24 Feb 2009 - 9:30 am | अनिल हटेला
सुंदर कविता !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
24 Feb 2009 - 11:04 am | दत्ता काळे
बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची
कशी सांज निमिषात उतरुन आली
- ग्रेट्ट्च . . .
24 Feb 2009 - 11:06 am | अवलिया
मस्तच .... :)
--अवलिया