पुन्हा जिवंत परत आले तर
मरण अटळ आहेच...
रोज जीव वाचला याच समाधान मिळावे
असेही घडते..
पण जगायच कस ते ठरवता आल असत तर?
कदाचित मरण्याआधी एकदातरी जिवंत
परत येता आल असत तर
येथे जिवंत माघारी आले तर येईन -
वाघिणीसारखी रुबाबात पण
गरजवंताचा कोथळा बाहेर काढणार नाही
अशी नखे आणि दात घेऊन
जिवंत राहिले आणि परत आले तर येईन-
मानेवर रुतून
न बसणार्या अलंकाराशिवाय
बघता येईल जग
पण कुण्या शेळीप्रमाणे मॄत्यूची वाट न बघता..
यदाकदाचित जिवंत परत आले तर येईन
एक व्यक्ती म्हणून-
बस ट्रेनमधून लोंबकळणारी
घरातून निघतांना, रस्त्यावर चालतांना
घरात बाहेर पायदळी तुडवली जाणारी -
कीडामुंगी म्हणून नाही
याउप्पर जिवंत राहिले तर परत येईन
जीवन देणार्याची कृतज्ञ म्हणून..
येईन अनेकांच्या हिताचा विचार करून .
त्यासाठीच जन्म आहे म्हणून..
- सोनाली जोशी
प्रतिक्रिया
3 Dec 2008 - 5:12 pm | विसोबा खेचर
सुंदर कविता..!
3 Dec 2008 - 10:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवितेतल्या भावना पोहचल्या. पण रचना, शब्द, की आणखी काहीतरी ,नेमकं काय सांगता येईना,
पण कवितेत काही तरी कसर राहिल्यासारखी वाटते.
3 Dec 2008 - 10:06 pm | प्राजु
खूप आवडली कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Dec 2008 - 10:28 pm | धनंजय
हा जन्म मरून पुन्हा येऊनच हवा होता काय?
याच आयुष्यात असा पुनर्जन्म व्हावा; शेळीची वाघीण व्हावी, मुंगीची व्यक्ती व्हावी - असे अधिक आशादायी चित्र थोडे स्पष्ट केले असते तर जास्त आवडले असते.
4 Dec 2008 - 11:24 am | दत्ता काळे
डॉ. बिरुटे साहेबांशी सहमत.