आता एकदम ५१ प्रश्न आहेत .. शेवटचा हप्ता.
सोमवारी दासनवमी आहे .. तोपर्यन्त सोडविण्याचा प्रयत्न करावा, तसाही विकांत आहे.
५१ ‘वादविवादात पराभव झाल्यास जीभ कापून देईन’ असे म्हणणारे विद्वान कोण ?
५२ वादविवादात पराभूत झाल्यानंतर ते विद्वान समर्थ शिष्य झाले त्यानंतरचे त्यांचे नाव काय ?
५३ त्यांची नियुक्ती कोणत्या मठावर झाली ?
५४ शिरवळ मठाचे मठाधिपती कोण होते ?
५५ शिरवळला भुईकोट किल्ला होता, त्याचे नाव काय ?
५६ पहिले दोन चरण समर्थांचे, नंतरचे दोन चरण कल्याणांचे अशी रचना आहे त्या काव्याचे नाव काय ?
५७ या रचनेत किती श्लोक आहेत ?
५८ कल्याणास सर्पदंश झाल्यानंतर विष उतरवण्यासाठी समर्थांनी कोणास नवस केला ?
५९ मिरज मठासाठी कोणत्या यवन सरदाराने जागा दिली ?
६० समर्थांच्या स्त्री शिष्यांत कीर्तनाचा अधिकार कोणाला होता ?
६१ समर्थ शिष्यांत बसून कीर्तन करण्याचा मान कोणाचा ?
६२ समर्थांचे उपलब्ध चित्र कोणत्या समर्थ शिष्याने तयार करून घेतले ?
६३ विवेक करावे साधन हे पत्र कोणाच्या हातचे ?
६४ कोणत्या गडावर समर्थांनी कीर्तन केले ?
६५ समर्थांनी शिवाजी महाराज यांना स्वप्नात प्रसाद दिला ही घटना कोणत्या गावी घडली ?
६६ समर्थांच्या झोळीत राज्य टाकण्याची घटना कोणत्या गावी घडली ?
६७ पाषाणात जिवंत बेडकी निघाली ही घटना कोठे घडली ?
६८ समर्थांनी कृष्णेकाठी ११०० सत्पुरुषांचा मेळावा घेतला ते गाव कोणते ?
६९ कीर्तनामध्ये कल्याण स्वामींना डोक्यावर टाळ मारताच अभंग आठवला ते गाव कोणते ?
७० माजलेला हत्ती कल्याण स्वामींनी शांत केला ही घटना कोणत्या गावी घडली ?
७१ समर्थांनी विठ्ठलमूर्तीची स्थापन कोणत्या गावी केली ?
७२ समर्थस्थापित कोणत्या गावचा मठ आजही पंढरपूरच्या आषाढीवारीची परंपरा सांभाळतो ?
७३ मारूतीने कोणत्या गावचा मदरसा पाडला ?
७४ समर्थ ज्या नदीच्या तळाशी पद्मासनात बसले होते त्या नदीचे नाव काय ?
७५ सज्जनगडावर रामदासस्वामी संस्थांनाची स्थापन कोणी केली ? केव्हा ?
७६ समर्थ सांप्रदायाची प्रस्थानत्रयी कोणती ?
७७ ग्रंथराज दासबोधाची रचना कोणत्या मठात झाली ?
७८ दासबोधात एकूण किती ओव्या आहेत ?
७९ दासबोधात एकाच ओवी दोनदा आली आहे, ती कोणती ?
८० समर्थांची चतुःसूत्री सांगणारी ओवी कोणती ?
८१ ‘प्र’ ने सुरू होणारे दासबोधातले पाच शब्द सांगा.
८२ समर्थांनी मनाच्या श्लोकांची रचना कुठे केली ?
८३ श्रीसमर्थ कायम वास्तव्यासाठी सज्जनगडावर केव्हा आले ?
८४ कल्याण स्वामी कोणत्या नदीचे पाणी समर्थांसाठी गडावर आणत असत ?
८५ वेण्णास्वामींनी सज्जनगडावर देह केव्हा ठेवला ?
८६ गडावरील राममंदिरात असलेल्या मूर्ती घडविणारा अंध कारागीर कोण ?
८७ समर्थांनी शेवटचे पत्र कोणास पाठवले ?
८८ समर्थांच्या नंतर चाळीस वर्षे सज्जनगडाचा कारभार कोणी पहिला ?
८९ औरंगजेबाने सज्जनगड जिंकला तेव्हा गडाचे नाव काय ठेवले ?
९० औरंगजेबाने सज्जनगड जिंकल्यावर गडावरील राममूर्ती कोठे हलवली ?
९१ समर्थांच्या निर्वाण प्रसंगी त्यांच्या सन्निध असणारे त्यांचे दोन शिष्य कोणते ?
९२ अंत्यसंस्कारानंतर समर्थांच्या अस्थी कोठे जतन केल्या होत्या ?
९३ समर्थांच्या अस्थिंचे विसर्जन कोणी व केव्हा केले ?
९४ समर्थांच्या अस्थींबरोबर कोणत्या शिष्याच्या अस्थिंचे विसर्जन झाले ?
९५ ‘बुडाला औरंग्या पापी’ असे समर्थ कोणत्या काव्यात म्हणतात ?
९६ या काव्याची रचना कोठे झाली ?
९७ छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना राज्याभिषेकाचे निमंत्रण द्यायला आले तेव्हा समर्थांनी त्यांना कोणता आशीर्वाद दिला व कोणत्या वस्तू दिल्या ?
९८ शालिवाहन शके १९३० या साली कोणत्या समर्थशिष्याची जन्मशताब्दी झाली ?
९९ त्या शिष्याचे जन्मस्थळ व समाधीस्थळ कोणते?
१०० त्यांना समर्थांनी कोठे दर्शन दिले ?
१०१ त्या शिष्याने लिहिलेल्या दोन ग्रंथांची नावे सांगा.
जय जय रघुवीर समर्थ
प्रतिक्रिया
21 Feb 2014 - 5:08 pm | बॅटमॅन
५१ बहुतेक सदाशिवशास्त्री आठवले/येवलेकर असे काहीसे नाव आहे.
५५ किल्ले सुभानमंगळ.
५९ आदिलशाही किल्लेदार जलालखान.
६० वेणाबाई अन बहुतेक अक्का.
८४ उरमोडी नदी.
९५ आनंदवनभूवन.
सध्या इतकेच आठवते आहे.
21 Feb 2014 - 5:11 pm | विटेकर
५९ मिरज मठासाठी कोणत्या यवन सरदाराने जागा दिली ?
काय ओ हे ? तुमी मिर्जेच नय काय ?
21 Feb 2014 - 5:16 pm | बॅटमॅन
हो, म्हणून तर जलालखान म्हणालो. तोच तेव्हा मिरजेचा किल्लेदार होता, नै का? त्यानेच जागा दिली असे मला वाटते.
21 Feb 2014 - 5:27 pm | प्रसाद गोडबोले
५१ ‘वादविवादात पराभव झाल्यास जीभ कापून देईन’ असे म्हणणारे विद्वान कोण ? >> वामन पंडीत (?)
६५ समर्थांनी शिवाजी महाराज यांना स्वप्नात प्रसाद दिला ही घटना कोणत्या गावी घडली ? सातारा - अजिंक्यतारा
६६ समर्थांच्या झोळीत राज्य टाकण्याची घटना कोणत्या गावी घडली ? सातारा
७० माजलेला हत्ती कल्याण स्वामींनी शांत केला ही घटना कोणत्या गावी घडली ? चाफळ
७५ सज्जनगडावर रामदासस्वामी संस्थांनाची स्थापन कोणी केली ? केव्हा ? >> वादग्रस्त प्रश्न
७६ समर्थ सांप्रदायाची प्रस्थानत्रयी कोणती ? मनोबोध , दासबोध आणि आत्माराम
८० समर्थांची चतुःसूत्री सांगणारी ओवी कोणती ?
८१ ‘प्र’ ने सुरू होणारे दासबोधातले पाच शब्द सांगा >>> प्रयत्न प्रचीती प्रबोध ? ?
८४ कल्याण स्वामी कोणत्या नदीचे पाणी समर्थांसाठी गडावर आणत असत ? उरमोडी / उर्वशी (?)
८७ समर्थांनी शेवटचे पत्र कोणास पाठवले ? संभाजी महाराज
८८ समर्थांच्या नंतर चाळीस वर्षे सज्जनगडाचा कारभार कोणी पहिला ?
८९ औरंगजेबाने सज्जनगड जिंकला तेव्हा गडाचे नाव काय ठेवले ? नवरसतारा
९० औरंगजेबाने सज्जनगड जिंकल्यावर गडावरील राममूर्ती कोठे हलवली ? >>> वासोटा (?)( नॉट शुअर )
९१ समर्थांच्या निर्वाण प्रसंगी त्यांच्या सन्निध असणारे त्यांचे दोन शिष्य कोणते ?
९४ समर्थांच्या अस्थींबरोबर कोणत्या शिष्याच्या अस्थिंचे विसर्जन झाले ? कल्याणस्वामीच असणार ...दुसरे कोण ?
९५ ‘बुडाला औरंग्या पापी’ असे समर्थ कोणत्या काव्यात म्हणतात ? आनंदवन भुवन
९७ छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना राज्याभिषेकाचे निमंत्रण द्यायला आले तेव्हा समर्थांनी त्यांना कोणता आशीर्वाद दिला व कोणत्या वस्तू दिल्या ?
९८ शालिवाहन शके १९३० या साली कोणत्या समर्थशिष्याची जन्मशताब्दी झाली ? श्रीधर स्वामी
९९ त्या शिष्याचे जन्मस्थळ व समाधीस्थळ कोणते? शिगेहळ्ळी कर्नाटक
१०० त्यांना समर्थांनी कोठे दर्शन दिले ? (पुण्याहुन सातारला येताना ? )
१०१ त्या शिष्याने लिहिलेल्या दोन ग्रंथांची नावे सांगा. आर्य संस्कृती आणि ?
4 Mar 2014 - 3:11 pm | विटेकर
http://dasbodhabhyas.org/literature/Samarth_Charitra_Prashna_Manjusha_an...
प्रश्नमंजुषेची उत्तरे अपलोड केली आहेत !