सकाळी सहा वाजता मनोजचा निरोप घेउन निघालो,साधारण एक कि.मि. वर अक्कलकुव्याचे बसस्थानक आले.तिथे चहाच्या टपरीवर सुनिल मराठे आणि त्यान्चे दोस्त भेटले.एकमेकाचीचॉकशी झाली,परिक्रमेबद्दल बोलणे झाले,त्यानी आग्रहाने चहा दिला.त्यान्चा निरोप घेउन विनोबाएक्सप्रेस निघाली.
रस्ता चान्गला होता.१०कि.मि. वरील खापर या गावी पोहोचायला ९ वाजले.बाजाराचा दिवस होता खुप गर्दी होती एका टपरीवर नास्ता केला आणि पुढे निघालो.साधारण ७कि.मि. आलो,मागुन वाण्याविहिरचे कन्हैय्यालाल परदेशी त्यान्च्या मारुती गाडीतुन आले,आम्हाला पाहुन गाडी थाम्बवली,विचारले काल कुठे मुक्काम केला?आम्ही म्हटले तुमच्याकडेच येणार होतो पण मनोज शहाने आग्रह केला म्हणुन अक्कलकुवाला त्यान्च्याकडे राहिलो. काही हरकत नाही आजचा मुक्काम कुठे? गव्हाळीला पान्दुरन्गशास्त्री आठवले यान्च्या अम्रुतालयम मध्ये.तेव्हा ते म्हणाले उन झाले आहे,बसा गाडीत तेवढीच मैय्याची सेवा,बसलो गाडीत.गव्हाळीला पोहोचलो तेव्हा दुपारचा एक वाजुन गेला होता.
आश्रमात पोहोचलो,पण तिथे कुणीच नव्हते आता काय करायचे? पुढे निघालो,एका अन्गणात नाना नावाचे व्रुद्ध बसले होते,त्याना विचारले ते म्हणाले येथे हल्ली सोय नाही आदिवासी लोक प्रार्थने साठी फक्त येतात,आता काय करायचे नाना याना त्रास देणे योग्य नव्हते. नानाच म्हणाले थोडे पुढे पुलावरुन पलिकडे गेलात की उजव्या बाजुला एक हॉटेल आहे तिथे तुमची व्यवस्था होईल. साधारण एक कि.मि.वर नदीवरील पुल लागला तो ओलान्डून पलिकडे गेलो उजव्याबाजुला टेकाडावर स्वागतढाबा होता.आम्हाला पाहुन श्री.सुनिल चॉधरी पुढे आले,त्यानी ढाब्याच्या मागच्या बाजुला परिक्रमावासीन्साठी बागेत सोय केली आहे. भोजनप्रसाद घेतला,सुनिलने १००रुपये दक्षिणा दिली.तिथे राहण्याची सोय नव्हती पुढे जाणे क्रमप्राप्त होते.
दुपारचे ३ वाजले होते,डोक्यावर ऊन मी मी म्हणत होते खुप थकलो होतो पण चालत राहण्याशिवाय गत्यन्तरच नव्हते.साधारणपणे ५कि.मि. चाललो असू, धनशेरा आले.तिथे गुजराथ राज्याचे चेकपोष्ट होते,५ वाजले होते,चेकपोष्टवरील इन्स्पेक्टरना विचारले ते म्हणाले चिन्ता करु नका झाडाखाली बसा एखाद्या गाडीत तुम्हाला लिफ्ट मिळवुन देतो तुम्ही डायरेक्ट राजपिपलाला जा कारण इथुन पुढे जन्गलाचा भाग सुरु होतो इथुन १०/१५ कि.मि.तरी मुक्कामाची सोय नाही दिवस लहान आहेत लवकर रात्र होते,आम्हाला त्यान्चे म्हणणे पटले आम्ही एका झाडाखाली थाम्बलो,पोलिसानी आम्हाला चहा-पाणी दिले. थकवा थोडा कमी झाला.
एक गाडी इन्स्पेक्टरनी थाम्बवली,त्याना आमची ओळख करुन दिली,पिशव्या डिकित टाकुन गाडीत बसलो,इन्स्पेक्टरान्चे आभार मानले आणि निघालो.गाडी शहाद्याच्या श्री.एकनथ पाटील,ब्रिजलाल पाटील, भगवान चॉधरी यान्ची इन्डिका होती.ते सर्वजण अम्बाजीदेवीच्या पायी वारीला गेलेल्या त्यान्च्या मुलाना भेटायला चालले होते,राजपिपलाच्याही पुढे त्याना जायचे होते.थकल्या भागलेल्या आमची व्यवस्था मैय्याने केली होती. सरळ राजपिपला येथे जाणार असल्यामुळे आमचा ३/४ दिवसान्चा प्रवास वाचला होता. आज पर्यन्तच पदोपदी हा अनुभव येतो आहे,२०/२५ कि.मि. चाल झाली,खुप दमायला झाले की मैय्या वाहनाची व्यवस्था करते आणि पुढचा मुक्काम सुलभ होतो.
आजच्या प्रवासात अक्कल्कुवा येथे वरखेडी नदी,खापरला देहली नदी,पेचरीदेव जवळ कान्जी नदी,गव्हाळीला जिरानदी आणि डेडियापाडा राजपिपलाला करसन नदी एवढ्या नद्या पार केल्या अर्थात या सगळ्या नद्यान्वर पुल होते.गव्हाळी नन्तर चिचली या गावापासुन गुजराथ राज्य सुरु झाले.आज ३०कि.मि. पायी चाललो आणि ७० कि.मि. इन्डिका गाडीने असा अक्कलकुवा ते राजपिपला १०० कि.मि. प्रवास झाला. पाटील मन्डळीनी आम्हाला राज्पिपला येथे सन्तोष चॉकडी{ सन्तोष चॉक} येथे सोडले.
सन्तोषचॉकडी ला हरसिद्धीमाता गायत्रीमाता मन्दिराची चॉकशी केली आणि तिकडे गेलो.भक्तनिवासात फक्त रात्रीपुरतीच जागा मिळाली कारण दुसर्यादिवसापासुन पुढचे ४/५ दिवस सर्व भक्तनिवास मुख्यमन्त्री नरेन्द्र मोदी यान्च्या दॉर्यासाठी आरक्षित केलेले होते.ठीक आहे.आज खुप दमलो होतो रात्रीचा निवारा गरजेचा होता.येथे भोजन प्रसादाची व्यवस्था नव्हती त्यामुळे पुरोहित भोजनालयात भोजन घेतले. अर्थात सायम्पुजारती केल्या नन्तर. आता विश्रान्ती.उद्या गोराग्रामकडे प्रस्थान.
धनशेरा पासुन दाट जन्गल सुरु झाले होते.वळणावळणाचा नागमोडी रस्ता चान्गला होता.खाचखळगे,खड्डे अजिबात नव्हते गुजराथ मध्ये झालेला विकास दिसतो. एक सम्रुद्ध प्रदेश आहे गुजराथ. जन्गलही सुन्दर होते.वाटेत जानकी आदिवासी कन्या आश्रमशाळाही दिसली,पण वेळ नसल्याने बघता आली नाही.पुढच्या परिक्रमेत पाहू असा विचार केला. क्रमशः
प्रतिक्रिया
27 Jun 2012 - 9:37 am | स्पंदना
आता पर्यंतचे सारे भाग वाचले. आतिशय साधा भाव आहे तुमचा अन तुमच्या लिखाणात तो पुरेपुर उतरलाय.
नर्मदे हर!