मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...
अता उराशी कसा धरावा किरण तरी मी
दिशादिशांचा प्रकाश मोठा बनून गेलो..
तुझ्याविना मी मुकाच येथे थिजून गेलो
मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...
मलाच कळते ..नसेच ही वाट ओळखीची ...
तरी कशी पावलांस या ओढ लागलेली?
पुन्हा पुन्हा मी इथेच येतो तुझ्याच दारी..
असाच चकवा मला तरी का छळून गेला?
कशास बांधू उगाच त्या आठवांस आता?
तयास शब्दात मोकळे मी करुन गेलो..
असाच यावा भरून डोळा कधी ढगाचा..
तसाच मीही कधी अवेळी झरून गेलो...
कुणी तुझे नाव घेतले अन् उदास झालो ..
जरी किनारे कितीक आले पुढ्यात माझ्या
तरी तयां डावलून मी का निघून आलो?...
मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...
प्रतिक्रिया
24 Sep 2007 - 8:54 am | प्रमोद देव
छान आहे काव्य!
24 Sep 2007 - 11:48 am | चित्तरंजन भट
सुट्यासुट्या ओळी छान आहेत.
अवांतर:
ह्या चित्तरचा कवी रंजनशी काही संबंध नाही, हे निक्षून सांगावेसे वाटते.
24 Sep 2007 - 9:11 pm | रंजन
धन्यवाद.
24 Sep 2007 - 9:52 pm | प्राजु
आवडली कविता.
- प्राजु.
24 Sep 2007 - 10:00 pm | सर्किट (not verified)
असाच यावा भरून डोळा कधी ढगाचा..
तसाच मीही कधी अवेळी झरून गेलो...
छान. खूप आवडल्या ह्या ओळी.
- सर्किट