जयश्री ताइंची कधीच नाही वाचुन आमची झोप उडाली आणि काय म्हणतात ते एक विडंबन पाडले (एक प्रयत्न)
http://misalpav.com/node/4738
का बंध रेशमाशी जुळले कधीच नाही
गात्रात कंप माझ्या भरले कधीच नाही
त्या सॉवळ्याच होत्या रात्री जागून माझ्या
वाह्यात वागणे मज जमले कधीच नाही
सलवार ही फुलांची मद झुलवीत येते
मज त्या लयीत झुलणे जमले कधीच नाही
डोळ्यात मोजलेल्या रात्री कितीक माझ्या
सत्यात भेटणे तुज जमले कधीच नाही
जखमा दिल्या नखाने, जपल्या बर्याच सार्या
का भाव तू दिलेले वठले कधीच नाही
पद सोडले सदा मी, सोडेन मी पुन्हा ते
का सोडणे तुला मज जमले कधीच नाही
चेतन
प्रतिक्रिया
27 Nov 2008 - 9:46 pm | मदनबाण
डोळ्यात मोजलेल्या रात्री कितीक माझ्या
सत्यात भेटणे तुज जमले कधीच नाही
व्वा..मस्तच..
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर