मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
27 Apr 2014 - 11:33 am
गाभा: 

मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर
मुंजीचे निमंत्रण मिळाले
निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ
थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!!
मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे??

..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी

आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे?
वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत

आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का??

संपादित /आधारित -स्रोत- अन्यत्र

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

27 Apr 2014 - 11:51 am | आयुर्हित

जागतिकीकरणामुळे व आधुनिक विचारशैली अंगीकारल्याने असे प्रसंग दिसणे काही नवीन नाही.
या प्रसंगात दाखविलेले मुंज हे कारण मात्र निमित्तमात्र आहे व त्या कारणाने एक Global family Get together होत आहे, यात काही वावगे आहे असे वाटत नाही.

मुंज केली अथवा नाही, हे असे ग्लोबल संस्कार होण्यावाचून राहणार थोडीच? नाही तरी आजकाल घराघरात टीवी व International Scool च्या माध्यमातून ह्या साऱ्या गोष्टी सर्वात आधी लहान मुलांपुढे येणारच की! आपल्या लहानपणी असलेले फिल्म्स ला U/A certificate देणारे censorship टीवी व प्रिंट मेडीयाला का लागू नाही? हाही प्रश्न उरतोच.

मुलांची विचारशक्ती दृढ करण्यासाठी जे काही महत्त्वाचे संस्कार करायचे आहेत त्याची मात्र कधीही उणीव होऊ देवू नये, हीच विनंती.

धमाल मुलगा's picture

27 Apr 2014 - 12:13 pm | धमाल मुलगा

मला नक्की तुमचा मुद्दा कळला नाही. तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे?

  1. मुंज करणे
  2. दारु पिणे
  3. पबमध्ये जाणे
  4. आयटम साँग्ज ब्यांडवर वाजवायला सांगणे
  5. त्या गाण्यांवर वरातीत नाचणे
  6. वरातीत घरच्या बायांनी नाचणे
  7. वरच्या गोष्टी मराठी ब्राह्मण कुटुंबात घडणं

च्यायला! एकतर रविवार, त्यात बारा वाजलेले...माझा बहुतेक मराठी कुटुंबातला सरदार झालाय.

यसवायजी's picture

27 Apr 2014 - 12:26 pm | यसवायजी

हैय्या..
त्यांचा विरोध 'चहा पिणे' किंवा 'दही खाणे' याबद्दल नसुन,चहात दही मिसळून खाण्याबद्दल आहे (असे वाटते).

लॉरी टांगटूंगकर's picture

28 Apr 2014 - 9:13 am | लॉरी टांगटूंगकर

यसवायभौ, उदाहरण जमलं आहे!! आपण भेटल्यावर तुम्हाला चा नै तर धै.

आनन्दा's picture

28 Apr 2014 - 5:37 pm | आनन्दा

खरच!! जाब्राट!!

मन्द्या, धै-मिसाळ आनी मं च्या-खारी.

ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का??
हे सर्व आणि गायत्री मंत्र एकत्र राहू शकत नाहीत काय? त्यांनी तसे एकत्र राहू नये काय? 'गायत्रीमंत्र' या शब्दाची निव्वळ माहिती असण्यासाठी उपरोल्लेखित गोष्टीं न करणे ही प्री-कंडिशन आहे काय? केव्हापासून? ती तशी असावी काय?

जेपी's picture

27 Apr 2014 - 12:48 pm | जेपी

अत्यंत ताजमहाली लेख .

चिन्मय खंडागळे's picture

27 Apr 2014 - 1:00 pm | चिन्मय खंडागळे

काका, पुण्यातल्या एखाद्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर बसून कपाळावर आठ्या पाडून शिरा ताणत करायचा कर्कश काथ्याकूट इथे कशाला टाकताय? आणि सारखी 'ब्राह्मण'त्वाची टिमकी वाजवायचं कारण काय? मराठी ब्राह्मण म्हणून जन्मले म्हणजे कोणी आकाशातून पडले नाहीत आणि संस्कृतीरक्षण करण्याचा ठेकाही घेऊन आलेले नाहीत. त्यांना स्वतःच्या पैशाने तंगड्या चावायच्यायत आणि बियर रिचवायची आहे तर तुमचं काय गेलं? तुम्ही आपले वरण-भात-लोणचं-रायतं-खीर ओरपत परंपरा सांभाळा की! तुमच्या तर घशात नाही कोणी बियर ओतायला आलं. उगाच आम्ही म्हणजे 'इतरांपेक्षा' कोणीतरी वेगळे आहोत म्हणून अहंभाव बाळगत फिरायचं आणि 'आपल्यातलेच' काही लोक आता 'इतरांसारखे वशाट खायला लागून' धर्म बुडवताहेत अशा अभिनिवेशात धागे पाडण्याचं हसू आलं.
आणि मुंजीचा आणि ३१ डिसेंबरचा, ग्रिलचा, माशांचा कशाचाच संबध काय? नक्की काय म्हणायचंय? तुमच्याकडे काय ३१ डिसेंबर साबुदाण्याची खिचडी खाऊन आणि पियुष पिऊन साजरा करतात का? असतीलही. म्हणून इतरांनी काय करायचं हे सांगणारे आपण कोण? मासे खाल्ले तर गायत्री मंत्राची पावर कमी होते का? का ब्रह्मतेजाला ग्रहण लागतं? जरा त्या बंगाली ब्राह्मणांना विचारून बघू या. आणि ३/४ प्यांटमध्य काय वाईट आहे? ३/४ घालून संस्कॄती बुडते आणि आणि धोतर नेसून वर येते काय? च्यायला त्या झिरझिरीत धोतर वापरणार्‍या आजोबा लोकांचे आतले लंगोट सुद्धा दिसत असत (घातले असल्यास) आणि नऊवारी साडीबद्दल काय बोलावं! साडी नेसायची इतकी विशोभित पद्धत अक्ख्या हिंदुस्थानात नाही. काय तर दोन पायांमधून तो पिळा मागे घेऊन मागच्या मागे 'खुपसायचा', आणि एवढे नऊ वार वापरून पोटर्‍या उघड्या पडायच्या त्या पडायच्याच. गुजराती लोकांमध्ये तर आपल्या या नऊवारी प्रकरणाबद्दल 'नऊ वार साडी अने तंगडी उघडी' अशी कायशीशी म्हण सुद्धा प्रचलित होती म्हणे! पण नऊवारी पारंपारिक म्हणून चांगली, आणि चांगल्या अंग झाकणार्‍या फॉर्मल ट्राऊझर्स मात्र वाईट होय? का बुवा?

गुजराती लोकांमध्ये तर आपल्या या नऊवारी प्रकरणाबद्दल 'नऊ वार साडी अने तंगडी उघडी' अशी कायशीशी म्हण सुद्धा प्रचलित होती म्हणे!

नऊ वार साडी नेसण्याचे ३-४ प्रकार आहेत. त्यात ब्राह्मणी, लावणी या २ महत्त्वाच्या. ब्राह्मणी प्रकारात पाय ऊघडे पडत नाहीत.
झैरात --
माझी बायको सगळ्या प्रकारच्या नऊवारी साड्या शिवते. गेल्या ५ वर्षात तिने अंदाजे ४०० साडया शिवल्या आहेत. अमेरीकेपासुन ऑस्ट्रेलिया पर्यंत साडया गेल्या आहेत.

दिव्यश्री's picture

27 Apr 2014 - 2:19 pm | दिव्यश्री

+++++++++++++++++ ११
फक्त योग्य पद्धतीने साडी नेसता आली पाहिजे .
बाकी सहावार साडीमध्ये देखील अंगप्रदर्शन होतेच . असो .

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Apr 2014 - 6:45 pm | llपुण्याचे पेशवेll

नऊ वार साडी अने तंगडी उघडी
ही म्हण "किती केले साडे तरी भागाबाईचे कुले उघडे' अशा प्रकारची असावी. नऊवार साडी जनरलाईझ करण्यासाठी नसावी.

प्रभाकर पेठकर's picture

27 Apr 2014 - 8:05 pm | प्रभाकर पेठकर

नऊ वार साडीला 'एव्हढे मोठे वस्त्र नेटकेपणाने नेसण्याचे, जगातील एकमेव 'कॉश्च्युम' म्हणून वाखाणले गेले आहे.

माज असल्याची लक्षणे, दुसरे काय ?

मुंज हे कारण मात्र निमित्तमात्र आहे व त्या कारणाने एक Global family Get together होत आहे, यात काही वावगे आहे असे वाटत नाही.

मग करता कशाला मुंज ? येव्हढीच हौस आहे, तर त्याऐवजी आपण लहान मुलांचे ऊष्टावण करतो तसे मुलगा १०-१२ वर्षाचा झाल्यावर बियरावण करावे.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Apr 2014 - 1:43 pm | प्रकाश घाटपांडे

मुंज हा आता कालबाह्य संस्कार आहे. तरीपण लोक ट्रॆडिशन जपण्याचा प्रयत्न करतात त्यात त्यांना मजा येते. एन्जॊय करतात. एक पारंपारिक सोहळा 'शास्त्रा'पुरता साजरा करतात. काही दिवसांनी संध्येच्या वेळी आचमने बिअर नी पण होतील.
आता शेंडी ठेवणारे , जानवं घालणारे, संध्या करणारे किती ब्राह्मण राहिलेत?

पैसा's picture

27 Apr 2014 - 2:14 pm | पैसा

हेच लिहायला आले होते. आता ३ साडेतीन वर्षाच्या मुला-मुलींना शिकवायला सुरुवात करतात आणि गुरूच्या घरी तर कोणीच रहायला जात नाहीत. त्या काळात मुलं गुरूच्या घरी रहायला जायची, त्यांना १२ वर्षे कष्टात काढावी लागतील म्हणून पक्वान्ने वगैरे करून घालत. आता त्यापैकी काहीच शिल्लक राहिले नाही. या संस्काराचं प्रयोजनच राहिलेलं नाही.

राहिली गोष्ट दारू पिणे आणि नाचणे. त्यासाठी मुंजीचाच मुहूर्त कशाला? कधीही करता येईल की! छापा पत्रिका आणि वाटा. "अमूक दिवशी, अमूक ठिकाणी दारू पिऊन नाचण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सहकुटुंब सहपरिवार येण्याचे करावे." हाकानाका!

लहानपणचे अनिर्बंध वर्तन सोडूनशील, दृढनिश्रय व शिस्त अंगी बाणून ज्ञान संपादन करणे, ब्रम्हचर्याचे काटेकोर पालन करणे हा व्रतबंध संस्काराचा प्रमुख हेतू आहे. यज्ञोपवीत धारण करण्याने वरील नियमांची आठवण सतत जागृत राहते. हा संस्कार मुलगा आठ वर्षाचा असतांना करणे चांगले. उपनयन संस्कारात अनेक उपविधी खालीलप्रमाणे असतात.
1 चौलकर्म - क्षौर करणे
2 वस्त्रधारण -नेसायचा पंचा मानेशी गाठ मारुन नेसावा व अंगावर पांघरायचा पंचा दोन्ही खांदयावरुन घ्यावा.
3 अजिनधारण -बसण्यासाठी लोकरीचे आसनघेणे.
4 यज्ञोपवीत धारण - यज्ञोपवीत म्हणजे जानवे. जानवे तीन पदरी असते. तीन पदरावरती तीनवेद व ब्रम्हगाठीवर अथर्व वेदाची स्थापना केली जाते. जानवे गळयात घालण्यापूर्वी सूर्याला दाखवावे. नंतर उजवा हात वर करून प्रथम हातात व नंतर गळयात घालावे.
5 आचमनविधी - संध्याकर्मविधी
6 प्रधनाज्य होम
7 अवक्षारणविधी - सूर्यदेवाची कृपा व्हावी म्हणून अवक्षारण विधी केला जातो.
8 विभूतिग्रहण
9 गायञीउपदेश
10 मेखलाधारण
11 दंडधारण– पळसाचा दंड (बटूच्या मस्तकाइतकीउंचीचीकाठी)
12 आचारबोध
13 अनुप्रवचनीयहोम.
14 मेधाजनन : हा विधी स्मरण, ग्रहण व धारण वाढविण्यासाठी केला जातो.
15 भिक्षाग्रहण - ओमभवतिभिक्षांदेही ! चातुर्वेदान षटशात्राणि अष्टादश पुराणनि पठीता भवामि || आई, मला भिक्षा दे मी चार वेद सहाशास्त्रे, अठरा पुराणे यांचे अध्ययन करणार आहे. असे म्हणून भिक्षा मागावी.
16 भोजनविधी - मौजीबंधन झालेल्या भोजनाला सुरुवात करण्यापूर्वी करण्यास येणारा विधी पात्रा भोवती पाणी फिरवावे. पात्राच्या उजव्या बाजूस खालून वरच्या दिशेस भाताच्या छोटया पाच आहुती दयाव्यात. आहुत्या देताना चित्राय स्वाहा| चित्रगुप्ताय स्वाहा | यमाय स्वाहा | यामधार्मय स्वाहा | सर्वेभ्योभूतेभ्याःस्वाहा | हे पाच मंत्र म्हणावेत. नंतर उजव्या हाताने आहुत्या वरून खाली गोळा कराव्यात. डाव्या हाताने हातावर थोडे पाणी घालून हात धुतल्यासारखा करावा. पात्रावर डाव्या हातावर उजवा हात पालथा धरून अहं वैश्वानरो भुत्वा प्राणिना देहामाश्रितः | प्राणापान सामायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम || हा श्लोक म्हणावा. नंतर "अमृतोपास्तानमासि" हा मंत्र म्हणत आचमन घ्यावे. नंतर प्राणाय स्वाहा | अपानाय स्वाहा | व्यानाय स्वाहा | उदानाय स्वाहा | समानाय स्वाहा | ब्राम्हणे स्वाहा | ह्या मंत्रांनी भाताच्या सहा प्राणायुती मुखात घ्याव्यात. डाव्या हाताच्या बोटाने थोडे पाणी डोळ्याला लावावे. नंतर भोजनास सुरुवात करावी. भोजन झाल्यावर डाव्या हाताने एक पळी पाणी उजव्या हातात घेऊन "अमृतोपास्तानमासि" | असे म्हणून आपोष्णी घ्यावी.
समावर्तन : सोडमुंज: ब्राम्हच्र्याश्रामातून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी समावर्तन-सोडमुंज संस्कार करण्यात येतो हल्ली मुंजीनंतर लगेच सोडमुंज करण्याची प्रथा निर्माण झाली आहे हे शास्त्रीय दृष्ट्या अनुचित आहे.

प्रसाद गोडबोले's picture

28 Apr 2014 - 7:55 am | प्रसाद गोडबोले

अतिषय सुंदर प्रतिसाद आयुरहित ! ह्या १६ विधींबद्दल अजुन दीटेल्स मधे म्हणजे मंत्र विधीं सकट लिहिता आले तर एक स्वतंत्र धागाच टाका ना !

आनंदी गोपाळ's picture

2 May 2014 - 9:19 pm | आनंदी गोपाळ

आयुरहित हा शब्द आवडला!

अतिषय सुंदर प्रतिसाद आयुरहित !

गोदबोले सहेब, अताआ तुमेपन मज्यासार्क लिहिला. हानतेच्यायला मा;;;;;
अयुर्हित सहेब, तुमला कुहुप जिवन मिलुदे.

आनंदी गोपाळ's picture

2 May 2014 - 9:17 pm | आनंदी गोपाळ

हा ब्लॉग तुमचाच का?

आनंदी गोपाळ's picture

2 May 2014 - 9:18 pm | आनंदी गोपाळ

अगदी "गायत्री"चा गायञीउपदेश करून वरून बोल्ड केलाय.

महान आहात.

हा ब्लॉग माझा नसून "विश्वकर्मा सुवर्णकार समाज मुंबई" यांचा आहे.
यावरून हे स्पष्ट होते की मुंज ही फक्त एका समाजाशी निगडीत नसून चा सर्व भारतीय लोकांनी मानलेल्या १६ संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार आहे!

मंदार दिलीप जोशी's picture

6 May 2014 - 4:35 pm | मंदार दिलीप जोशी

जाउद्या हो त्यांना वैचारिक कावीळ झालीये

मुंज करणे / लग्नातला लाजा होम करणे हा एक फालतू पणाच आहे.
काप गेले भोके राहिली सारखे किती दिवस हा असला निर्बुद्ध बाष्कळपणा आपण परंपराम्हणून वागवत रहाणार आहोत?

बॅटमॅन's picture

28 Apr 2014 - 2:00 am | बॅटमॅन

नक्की अडचण काय आहे जर कुणाला त्रास होत नसेल तर? तशी कैक प्रतीके वेष्टर्न संस्कृतीतही आहेतच की. कशाला पाहिजे नववर्ष काय अन व्हॅलेंटाईन्स डे तरी मग? अन शेवटी हेही विसरले जाते की या माध्यमातून लोकांना एकत्र जमून टीपी करायचा असतो. तथाकथित सिग्निफिकन्स हा कुणाच्याही गावी नसतो- आधीही फारसा कुणाच्याच गावी नव्हता. दे जस्ट वॉना हॅव फन, दॅट्स ऑल!

प्रसाद गोडबोले's picture

28 Apr 2014 - 7:57 am | प्रसाद गोडबोले

काप गेले भोके राहिली सारखे किती दिवस हा असला निर्बुद्ध बाष्कळपणा आपण परंपराम्हणून वागवत रहाणार आहोत?

>>>

जोवर जातिआधारित/ धर्माधारित आरक्षणे आहेत तोवर ! अर्थात यावश्चंद्रदिवाकरौ !! :P

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2014 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभौ, सहमत आहे.

माणुस जसा अधिक व्यस्त होत जाईल, अजून आधुनिक होत जाईल, दृष्टीकोणात फरक होत जाईल तेव्हा हे कमी होईल असे वाटते. अशा कितीतरी परंपरेच्या गोष्टी आता कालौघात मागे पडत चालल्याच आहेत 'काहो, मुलाची मुंजी केलीत की नै' आणि या प्रश्नाला 'आम्ही असलं काही करत नाही' अशी उत्तरं यायला लागलीत की हे बंद होईल. हं आता यातही परंपरा जपणारे आणि आधुनिक असे दोन गट होतील. किरकोळ कारकोळ चालूच राहील.

-दिलीप बिरुटे

तुमचा अभिषेक's picture

27 Apr 2014 - 2:09 pm | तुमचा अभिषेक

भले मग तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असाल.
भले मग तुम्ही कोणत्याही सणाला, पार्टीला वा कोणत्याही ओकेजनला पित असाल.
भले मग तुम्ही देशी पित असाल वा विदेशी पित असाल.
भले मग तुम्ही स्वताच्या पैश्याची पित असाल वा फुकटाची पित असाल.
भले मग तुम्ही मंगळवारी पित असाल वा रविवारी पित असाल
दारू ही वाईटच !!

फक्त एवढेच सांगू इच्छितो, अभ्या दारू पितो, अभ्या किडे करतो, अभ्या पोरींशी लफडे करतो. अभ्या कसाही असेल, पण अभ्या नीच नाही रे ..

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Apr 2014 - 11:56 am | डॉ सुहास म्हात्रे

दारू ही वाईटच !!

यकदम करेट... दारूसे लिवर खराब होता हय, भाय !

अवतार's picture

27 Apr 2014 - 2:11 pm | अवतार

लग्नाआधी नाईलाज म्हणून मुंज केली आणि दुसऱ्या दिवशी माझ्याबरोबर मटन कबाब आणि चिकन तवा राइसची पार्टी करून मुंज साजरी केली. कहर म्हणजे कबाब खातांना, "आता मात्र मी अगदी कर्मठ ब्राम्हण होणार आहे. म्हणजे सोमवार, मंगळवार आणि गुरुवार सोडून इतर दिवशी चिकन मटन हादडायला मोकळे आहोत." हे सतत चालू होतेच! ह्यात त्यालाही आणि मलाही काही वावगे वाटत नाही! :)

मुठीतून वाळू निसटणारच आहे हे माहित असूनही जर मुठीत वाळू पकडण्याचा मोह आवरत नसेल तर अशा वेळी उपदेश करण्यापेक्षा संयम उपयुक्त ठरतो.

प्यारे१'s picture

27 Apr 2014 - 2:34 pm | प्यारे१

विशिष्ट जातीतल्या लोकांनी विशिष्ट जातीतल्या लोकांसाठी काढलेला धागा ;)

प्रसाद गोडबोले's picture

27 Apr 2014 - 2:56 pm | प्रसाद गोडबोले

माझ्यामते मुंज काही एका विशिष्ठ जातीची मक्तेदारी न्हवे ... आर्य त्रैवर्णिकांना मुंजीचा अधिकार आहे...शिवाजी महाराजांनीही राज्याभिषेकाच्या आधी मुंज केल्याचे ऐकीवात आहे ! ... केवळ इतर जातीतल्या लोकांनी मुंज करणाचे बंद केल्याने मुंज हा एक संकार केवळ एका जातीतल्या लोकांच्या अखत्यारित आला आहे ...

आजही जर इतर त्रैवर्णिक लोकांनी मुंज करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे निओ-मॉडर्न हिंदु समाजाकडुन कौतुकच होईल असा अंदाज आहे !!

नितिन थत्ते's picture

28 Apr 2014 - 2:23 pm | नितिन थत्ते

आता त्रैवर्णिक राहिलेत कुठे?

नन्दान्तं क्षत्रियकुलं... का काय ते म्हणतात ना?

आदूबाळ's picture

27 Apr 2014 - 2:36 pm | आदूबाळ

उडन खटोला भाऊ / बहन

तुम्हाला काय म्हणायचंय ते कळलं. पण सगळा गुताडा झालाय.

तुमच्या डोक्यात असलेलं आदर्श ब्राह्मणाचं / मुंजीचं / नव वर्ष साजरं करण्याचं / वर्तनाचं / जगाचं मॉडेल जरा मांडता का? म्हणजे आक्षेप नक्की कशावर आहे हे पिनपॉईंट करायला बरं पडेल...

प्रसाद गोडबोले's picture

27 Apr 2014 - 2:45 pm | प्रसाद गोडबोले

लेख पटला :)
शो ऑफ्फ्, सेलिब्रेशन्स , धांगडधिंगा करायचा असेल तर त्याला इतर १७६० कारणं आहेतच की ...मुंज कशाला त्यात घुसडा ?

अवांतर : पोराला वैदिक शिक्षणाला घालणार असाल तरच त्याची मुंज करायची अन्यथा नाही .... असा स्पष्ट पवित्रा मी घेतल्याने आमच्या घरातले आधीच बिचकुन आहेत ... त्यांना हा लेख दाखवतो ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Apr 2014 - 2:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आणि हो हे फक्त ब्राम्हणांवरच का लिहिलय? बाकीचे जातीजमातीवाले हे सगळं करत नाहीत काय? उगीच उठलं पळी-भांड आणि जानव्यावर टिका केली की झालं का? दारु पिण, रस्त्यावर नंगानाच घालणं किंवा ३१ डिसेंबरला टल्ली होणं हे सगळ्याच बेवड्यांच्या घरी चालतं. गमतीची गोष्ट अशी की आधी ब्राम्हण घरात शक्यतो दारु प्यायली जात नाही. प्यायली तरी नंगानाच करणारे १०० पैकी ५ सुद्धा नसतील.

तुमचा आक्षेप नक्की कशावर आहे? मुंज करण्यावर? दारु पिण्यावर? ब्राम्हणांनी दारु पिण्यावर? मांसाहार करण्यावर? कुठले कपडे घालायचे ह्यावर?

उगीचं जनरलायझेशन करु नका.

इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी

अचं नाई कलायचं, मग मज्जा मज्जा कशी येणार? ;)

तुमचा अभिषेक's picture

27 Apr 2014 - 8:43 pm | तुमचा अभिषेक

त्यांनी मोहावर विजय मिळवल आहे आणि तुम्ही त्यांना उकसवा.

यसवायजी's picture

27 Apr 2014 - 10:51 pm | यसवायजी

म्हणजे १०० - २०० निश्चित.

नानासाहेब नेफळे's picture

27 Apr 2014 - 4:04 pm | नानासाहेब नेफळे

उपजात चित्पावनच असणार..
आजकाल ब्राह्मण्य जपण्याची नैतिक जबाबदारी देशस्थांवर येऊन पडली आहे.बरेच देशस्थ व्यवस्थीत धार्मिक विधी करतात. चित्पावन युवक युवती मात्र, indian born confused american या कॅटॅगरीत केव्हाचेच गेले आहेत.

हांगाश्शी ... नेफ़ळे आजोबा रॉक्स!!! आता मज्जा मज्जा , गम्माडी जम्मत येणार ;)

प्रसाद गोडबोले's picture

27 Apr 2014 - 4:08 pm | प्रसाद गोडबोले

हांगाश्शी ... नेफ़ळे आजोबा रॉक्स!!! आता मज्जा मज्जा , गम्माडी जम्मत येणार

हेच म्हणतो ... =))

मंदार दिलीप जोशी's picture

28 Apr 2014 - 5:21 pm | मंदार दिलीप जोशी

आहो ते आजोबा नाहीयेत, चांगले तरुण आहेत. ओळखतो त्यांना चांगलाच.

मंदार दिलीप जोशी's picture

28 Apr 2014 - 5:22 pm | मंदार दिलीप जोशी

"चांगले" हे विशेषण तारुण्याला लावावे. व्यक्तीला नाही. ;)

इरसाल's picture

30 Apr 2014 - 10:43 am | इरसाल

ठ्ठो ! सॉरी सॉरी.
ते ढिच्कॅव असे वाचावे. (पुर्वी बार टाकत आता पिस्तुलातुन गोळी झाडतात........भेंडी रस्त्यात गोळ्या पडल्यात आणी पिस्तुलाची नळी हातात धरुन कोणी रस्ता झाडतोय असे चित्र नजरेसमोर उभे र्‍हायलेय.)

राही's picture

27 Apr 2014 - 4:23 pm | राही

लग्नमुंजींच्या वरातीतले बेंडबाजे किंवा गणपतीविसर्जनाच्या ठणठणाटी मिरवणुका व्यक्तिशः आवडत नाहीत.
पण एक फरक जाणवतो. काही समाजांमध्ये -उदा.पंजाबी, गुजराती,- प्रसंगानुसार स्त्रीपुरुषांनी एकत्र मुक्तपणे (स्वैरपणे नव्हे) संगीताच्या तालावर डोलण्याची, नाचण्याची परंपरा आहे. युरोपमध्येही वॉल्त्झची संथ नृत्ये आनंददायी असतात. आपण मात्र नृत्याचा आनंद निर्भेळपणे घेऊ शकत नाही. असे का असावे?
बीटल्सच्या लोकप्रियतेमागे तरुणाईला बेधुंद नृत्याची संधी मिळण्याचा मोठा हिस्सा होता. अर्थात अशी अ‍ॅम्फेटामाइनयुक्त नृत्ये योग्य नाहीतच. पण थोडेसे सैल व्हायला, संकोच थोडासा झुगारायला काय हरकत आहे? अंग सदैव आखडलेले, वृत्ती सदैव आक्रसलेल्याच असायला हव्यात का?

पण थोडेसे सैल व्हायला, संकोच थोडासा झुगारायला काय हरकत आहे? अंग सदैव आखडलेले, वृत्ती सदैव आक्रसलेल्याच असायला हव्यात का?

त्याला आक्षेप नाही, पण मुंज हा संस्कार हाच मुळात या सार्‍यांवर विजय मिळवायचे/ नियंत्रित जीवन जगण्यचे शिक्षण द्यायला केल जातो. त्याच दिवशी असे अनियंत्रित वागून आपण त्या मुलावर काय संस्कार करणार?

मंदार कात्रे's picture

28 Apr 2014 - 8:40 pm | मंदार कात्रे

सहमत

बॅटमॅन's picture

29 Apr 2014 - 7:37 pm | बॅटमॅन

अनिर्बंधच व्हायचे असेल तर त्यासाठी आपल्या संस्कृतीत स्पेशल सण दिलेलाच आहे - शिमगा. काय घालायचा तो दंगा घाला तेव्हा.

आनंदी गोपाळ's picture

2 May 2014 - 9:32 pm | आनंदी गोपाळ

आपण मात्र नृत्याचा आनंद निर्भेळपणे घेऊ शकत नाही. असे का असावे?

घोटूल मधे ढोलियाच्या तालावर हलकेच थिरकणारी पावलं आपल्याकडलीच असलीत, तरी, मध्यंतरीच्या काळात 'मराठे' म्हणजे 'जेत्यांची संस्कृती' होती.

मराठीमधे मार्दव नाही. हार्श शब्दप्रयोग आहेत. बसा! अन तश्रीफ रखिये, (इथे कोणत्याही इतर भाषेतील शब्द वापरा : उदा. प्लीज हॅव अ सीट, अगदी प्लीज वगळूनही.) यातला फरक पहा. या मराठी भाषेत अनेकदा मार्दव अन अजीजी यांत फरक रहात नाही. एकतर अजीजी नायतर 'बसून घ्याला सांगून र्‍हाय्लोय ना!' स्टाईल शब्द.

यातच मधे कुठेतरी मराठे 'बायकांसोबत नाचत' नाहीत, ते 'बायका नाचवतात', असला एक समज प्रचलित झाला असावा. तमाशा त्याचे एक उदाहरण. बाईसोबत नाचणारा पुरुष फक्त नाच्याच.

दरम्यानच्या काळात कुठेतरी आपण जगज्जेते सुसंस्कृत लोक, थिरकणे विसरलो. तुम्ही नृत्याचे म्हणताहात, समूहगान असाही एक प्रकार असतो. तोदेखिल विरळा होत गेला आहे आपल्याकडे. पण माणसाची मूळ प्रवृत्ती जात नाही. जाणार नाही. खेडोपाडी गरबा खेळला जातो आजकाल. अगदी लग्नाच्या मिरवणूकीत लोक गरबा खेळल्यासारखे नाचतात. तीच गाणी डीजेवर लावून.
इ.
असो.
असे का असावे या प्रश्नाचे हे माझ्या मतीनुसारचे उत्तर आहे. 'मराठे' हा शब्द मरहट्टे, महाराष्ट्र देशीचे अटकेपार झेंडे फडकवणारे वीर, या हिशोबाने वाचावा. जात/धर्म इ.वादी शब्दप्रयोग तो नाही, हे नोंदवितो.

समाजातला दांभिकपणा उघडा पडण्याचा आणि एक सुमुहूर्त ?मुंजीची पार्टी ऐवजी पार्टीनंतर मुंज उरकली असेल .निमंत्रितांनी तोंडभरून बटु आणि आईवडीलांना आशिर्वाद दिले असतील .आणखी काय पाहिजे ?

ज्यांना या संस्काराबद्दल काही कळते ते श्रृंगेरी ,श्रीशैलम ,माटुंग्याचा शंकरमठ ,कुर्ला (प)कृष्णमंदिर ,सायन पूर्व कृष्ण मंदिर ,जिएसबी संघ ,चेंबूरचा मठ ,डोंबिवलीचे ज्ञानेश्वर कार्यालय इत्यादी गाठतात आणि गाजावाजा करत नाहीत .

भाते's picture

27 Apr 2014 - 5:08 pm | भाते

दारू सर्वजातिय/ धर्मिय पितात. तेच मांसाहारा बाबत. अगदी वर्षभर. मग इथे केवळ ब्राम्हणांचाच ऊल्लेख का?
आपल्या पैकी किती जण रोज सकाळी देवपूजेनंतर संध्या करतात? लहानपणी मुंज झाल्यावर नवलाईचे नऊ दिवस असल्याप्रमाणे सुट्टीत रोज संध्या केली जाते. पण पुढे शाळा सुरु झाल्यावर ते जमतेच असे नाही. रोजच्या ऑफिसच्या गडबडीत देवपूजा आटोपल्यावर गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणताना नजर घडयाळाच्या काटयावर असते. मग कशाला तो मुंजीचा अट्टाहास!
दारू पिणारे अनेक ब्राम्हण मी बघितले आहेत जे आधी गळ्यातले जानवे काढुन खिशात ठेवतात आणि मग दारू ढोसतात. कशाला का दिखाऊपणा?
३१ डिसेंबरचा ऊल्लेख आला आहे म्हणुन सांगतो. १ जानेवारी २०१३ ला अंगारकी चतुर्थी होती. ३१ डिसेंबर २०१२ ला रात्री पावणे बारा पर्यंत लॉलीपॉप खात दारू धोसणारे (सर्वजातिय) दुसऱ्या दिवशी माझा ऊपास आहे असे सांगत होते. काय उपयोग आहे त्याचा? कशाला ते ऊपासतापास!

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Apr 2014 - 6:50 pm | llपुण्याचे पेशवेll

एक सुधारणा. संध्या पूजा करायच्या आधी करायची असते.

भाते's picture

27 Apr 2014 - 8:07 pm | भाते

पण, मला खरंच याची कल्पना नव्हती.

नितिन थत्ते's picture

28 Apr 2014 - 2:29 pm | नितिन थत्ते

>>मग इथे केवळ ब्राम्हणांचाच ऊल्लेख का?

बाकीचे काय फुकटच गेलेले असतात (ब्राह्मण तस्सं मुळ्ळीच करत नैत) अशी ज्यांची समजूत असते त्यांना "बॉ बॉ बॉ; ब्राह्मण दारू पितात !!!" असं वाटणारच. ;)

बाकी काहीही असो, मशारनिल्हे ब्राह्मण कुटुंबाने मांसाहार आणि सोमरसपान करून प्राचीन आर्य संस्कृती टिकवली असेच म्हणणे आहे. पोषाख म्लेंच्छ असला म्हणून काय झाले? उलट आजकाल मांस आणि सोमरस ही आपल्या संस्कृतीची प्राचीन प्रतीके अहद दिल्ली (लाहोर म्हण्णार होतो पण साला १९४७ चा घोळ झाला.) तहद चंदावर नव्या जोमाने दिसू लागली आहेत.

म्हणा, गर्व से कहो...

धमाल मुलगा's picture

27 Apr 2014 - 7:28 pm | धमाल मुलगा

आयला! बॅट्याची बॅट सचिनच्या वरताण तळपली की. :)

जाता जाता: 'गर्व से कहो...' ला उत्तर देण्याआधी आपल्याला क्युबन सिगार्स, पाईप्स वगैरे अस्सल जिंदादिल खानदानी माणसाला शोभणार शौक हाळी देणार्‍याने केलेले चालतात की झोंबतात हे मात्र पडताळून पहायला हवं.

:)

बाकी हाळी देणारे कोण? तथाकथित संस्कृतिरक्षक तर नव्हे? तसे तर शौक ज्यांना पर्वडतात अन झेपतात त्या सर्वांनीच करावे, हाकानाका.

दिव्यश्री's picture

27 Apr 2014 - 6:03 pm | दिव्यश्री
दिव्यश्री's picture

27 Apr 2014 - 6:16 pm | दिव्यश्री

.

.

भाते's picture

27 Apr 2014 - 8:11 pm | भाते

मला करडया रंगाच्या गोलामध्ये पांढऱ्या रंगात वजाचे चिन्ह दिसते आहे. काय गडबड आहे?

सखी's picture

27 Apr 2014 - 8:26 pm | सखी

मलापण, दिवश्री फक्त पुण्यवान माणसांनाच दिसतात का गं ह्या नऊवारी? :)

प्यारे१'s picture

27 Apr 2014 - 8:37 pm | प्यारे१

सगळी 'वजावट'च आहे राव आमच्या इथेही!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2014 - 6:19 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/funny/1/hammer-smiley-emoticon.gif
========================
बाकि .. चालू द्या!!!

चिंतामणी's picture

28 Apr 2014 - 1:42 am | चिंतामणी

एव्हढाव्ह प्रतीसाद तुमच्याकडुन अपेक्षीत नाही.

करा थोडी बॅटींग.

प्रसाद गोडबोले's picture

28 Apr 2014 - 8:00 am | प्रसाद गोडबोले

करा थोडी बॅटींग.

>>> हेच म्हणतो :)

आनंदी गोपाळ's picture

2 May 2014 - 9:36 pm | आनंदी गोपाळ

बॅटिंग म्हणजे ब्याटम्यानने लिवलेले पर्तिसाद का?

जोशी 'ले''s picture

27 Apr 2014 - 6:38 pm | जोशी 'ले'

अच्छा असं झालं तर... :-D

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Apr 2014 - 6:51 pm | llपुण्याचे पेशवेll

उडन खटोला,
स्वस्थ राहून गंमत बघत रहा.

मुंज हा कधीकाळी तयार झालेल्या १६ संस्कारांमधील एक संस्कार आहे. तो करावा का नाही हा अगदी गौण मुद्दा आहे. ज्यांना करायची असेल ते करतील आणि ज्यांना करायची नसेल त्यांनी करू नये. माझ्या बाबतीत लहानपणीच मुंज आणि सोडमुंज हे ३ दिवसांच्या अंतराने झाले, मी कधी संध्या केलेली नाही. जानवे नंतर स्विमिंगला गेलो तेंव्हा स्विमिंग पूल मधेच हात मारताना पडले.... त्यामुळे मी काही धार्मिक पध्दतीने याचा विचार करत नाही. पण तरी देखील त्या वयातला एक संस्कार - केवळ त्या दिवशीचे होम-हवन, मंत्र वगैरेच नाही, तर तो सोहळा करायच्या आधीचे प्लॅनिंग, त्यातील नातेवाईकांची आणि आप्तेष्टांची involvement, प्रेम या सगळ्याचा एक मनावर एक सुखद परीणाम झाला जो कायमचा लक्षात राहीला. माझ्या दृष्टीने हा सगळा एक संस्कार असतो. कारण किंचित समजायला लागणार्‍या वयात पण तरी देखील आपल्याला कळत-नकळ आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुंजच नाही पण कुठलिही गोष्ट जेंव्हा केवळ शो ऑफ म्हणून होते तेंव्हा त्यातून दूरगामी ना धड संस्कार होतात ना इतर काही सकारात्मक फायदा...

अशाच प्रकारचा (किंचीत मोठ्या) मुला-मुलीवरील ज्यूइश संस्कार बार मिट्झ्वा आणि बाट् मिट्झ्वा पाहीले आहेत. त्यातील मुद्दा हा मुल हे वयात येत असतानाचा एक संस्कार आणि सोहळा आहे. तोच प्रकार मुंजीच्या बाबतीत समजून घेतला आणि मग संस्कार म्हणून केले तर अधुनिक काळाला अनुसरून एक चांगला संस्कार तयार करता येईल. त्यात जात आणायची काही गरज देखील नाही.

एक उदाहरण म्हणून सांगतो: बार मिट्झ्वा आणि बाट् मिट्झ्वा हे ज्या दिवशी होतात त्या दिवशी मुळ सोहळा हा पारंपारीक असतो. त्यात राबाय (ज्यू प्रिस्ट) कडून त्यांच्या पध्दतीने धार्मिक संस्कार केले जातात वगैरे. त्यांच्या पध्दतीत पार्टी असल्याने त्याअनुषंगाने खाणे-पिणे आणि डान्सिंग केले जाते.... पण महत्वाचा मुद्दा त्या आधीचा असतो. आधी एक वर्षभर त्या मुलाला-मुलीला थोडेफार संस्कार (बेसिक हिब्रू भाषा येणे, इतिहास वगैरे) शिकवले जातात आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे छोटासा का होईना एक समाजसेवेचा प्रकल्प हा (मदत घेऊन) प्लॅन करणे आणि पुर्ण करणे गरजेचे असते. त्या सगळ्याचा मुलांवर नक्कीच चांगला परीणाम होतो.

मेघवेडा's picture

3 Jun 2014 - 1:03 am | मेघवेडा

"मुंज हा कालबाह्य संस्कार आहे/या संस्काराचं प्रयोजनच राहिलेलं नाही/निर्बुद्ध बाष्कळपणा" - हे सगळं तुम्ही 'विधीं'ना अनुसरून म्हणत असाल तर ठीक परंतु संस्कार आणि त्यामागचं तत्त्व, विचार वगैरे काहीच कालबाह्य, अकारण वा निर्बुद्ध बाष्कळ वाटत नाही. मुलानं गुरूगृही वेदाध्ययन करायला जाण्याऐवजी तोच मुलगा (फॉर दॅट मॅटर मुलगी - म्हणजे कुणी मला विचारलं मुलींची मुंज करावी का तर त्याला माझं उत्तर 'हो' आहे) हल्ली शाळा झाल्यावर युनिव्हर्सिटीला जायला घराबाहेर पडू लागला आहे. तेथे त्याला स्वतः पडेल ते काम करून पैसे कमवण्याची अक्कल पक्षी व्यवहारज्ञानाचे अध्ययन करायचे आहे. गुरू कोण - हे जग. मग मातृभोजनाचा काय अर्थ - झालं आता, आईकडून लाड करून घेतले ते पुरे आता यापुढे आपले आपण काय ते बघा. भिक्षावळ? मुला घराबाहेर पडतो आहेस तेव्हा ही घे आपली भिक्षा/शिदोरी. पुढे मात्र पोटापाण्याला काहीतरी कर. चार पैसे कमवून खा. वेळ पडल्यास भिक्षा माग पण चौर्यकर्म करू नकोस, लुच्चेलबाडी करू नकोस इत्यादि विचार्/अर्थ आपण समजवून घेऊन बटूला कस्टमाईज्ड उपदेश करावा.
मुलगा आता शिशुवयातून कुमारवयात चालला. स्वावलंबी होण्याकडे त्याने एक पाऊल टाकलं - असा उदात्त विचार अशी व्यापक धारणा या उपनयन संस्कारामागे आहे. या धारणेचे आपण अनुयायी बनले पाहिजे. या संस्कारांमागची तत्त्वं आपण बघावी. नुसतंच जर आपण विधींमध्ये अडकून बसलो तर खरंच आपलं देव भलं करो. विधी = फंक्शन (काळ). काळ बदलला तसे विधी बदलायला हवेत. अजिनधारणाला आजच्या युगात काही अर्थ नाही. हरणं मारणं कायद्यानं गुन्हा आहे तेव्हा तो विधी आपण बंद केला पाहिजे. कन्यादानाला काही अर्थ नाही. कन्या कमॉडिटी नाहीत तेव्हा तो विधी आपण बंद केला पाहिजे. पण म्हणून काही समग्र उपनयन अथवा विवाह 'संस्कार' कालबाह्य नि बाष्कळ ठरत नाहीत. कालबाह्य ठरतात ते केवळ विधी. पण कोणते विधी करावेत नि कोणते करू नयेत हे आपण ठरवूच शकतोच की.
तेव्हा माझ्यामते एकूणच सगळं राईट-ऑफ करण्यापेक्षा काय घेता येईल ते घ्यावं नि पुढे चलावं. उरला प्रश्न कार्याचा तर वर विकास यांनी म्हणल्याप्रमाणे किंचित समजायला लागणार्‍या वयात असलं तरी देखील मुलाला कळत-नकळत आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुलावर खर्‍या अर्थाने 'संस्कार' होतो. हीच ती आपली संस्कृती. हाच आपला धर्म. धर्म म्हणजे शिखा धारण केलेला बटू नाही. धर्म म्हणजे जानव्याची ब्रह्मगाठ नाही. धर्म म्हणजे मानेभोवती गाठ मारलेला पंचा नाही. धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2014 - 9:28 am | अत्रुप्त आत्मा

@तेव्हा माझ्यामते एकूणच सगळं राईट-ऑफ करण्यापेक्षा काय घेता येईल ते घ्यावं नि पुढे चलावं.>>> +++++१११११

@धर्म म्हणजे मानेभोवती गाठ मारलेला पंचा नाही. धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे.>>>>> यासाठी एक कडक सॅल्युट.

प्यारे१'s picture

3 Jun 2014 - 12:46 pm | प्यारे१

>>>धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे.
वा!

आक्खा प्रतिसाद सुंदर. ह्यासाठी एक 'प्यार्टी' लागू. हवंतर जानवं काढून ठेवा तीर्थप्राशन होईस्तोवर ;)

जानव्यासहित तीर्थप्राशन केले तर काय होईल हो ? ... तो पण एक विधीच की.. *biggrin*

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jun 2014 - 10:42 pm | अत्रुप्त आत्मा

@ तो पण एक विधीच की.. Biggrin>>> =)) विधी नव्हे!!! निषेध!!!!!!!!! :p =))

बाळ सप्रे's picture

3 Jun 2014 - 3:12 pm | बाळ सप्रे

विधी = फंक्शन (काळ).

वा वा!!

पण प्रत्यक्षात काय होत.. विधी हे अशा पोथीपुस्तकातून वाचून केले जातात ज्यांना काळाप्रमाणे बदलण्याचे वावडे असते!! मुंज हा विधी केला जातो.. त्यामागचे तत्व, विचार (जे कालबाह्य नाही) ते सगळं गुंडाळून ठेवले जातं .. त्या तत्व/ विचारांनुसार आजच्या काळाला अनुरुप विधी कुठेही होत नाहित!!

सप्रेसाहेब, लग्नातल्या विधींचे अर्थही असेच आपापल्या सोयीने गुंडाळून ठेवले आहेत, म्हणून कोणी लग्न करायचे थांबते काय? पण त्याविषयीचे लेख पाडले जात नाहीत.

बाळ सप्रे's picture

4 Jun 2014 - 10:32 am | बाळ सप्रे

लग्न करायचे कुणी थांबत नाही, थांबूही नये पण कालबाह्य विधी थांबवता येतील..

लग्न म्हणजे विधी नव्हेत. लग्न म्हणजे सहजीवनाची सुरुवात. जे आवश्यक आहे. गतानुगतिक विधी टाळून लग्न म्हणजे आजच्या काळात लग्नाचे रजिस्ट्रेशन, मित्र/ नातेवाईकांना बोलावून सहभोजन ई.

तसेच मुंज म्हणजे विधी नव्हेत.. तर शिक्षणासाठी मुलाला दूर पाठवणे (मेघवेडा यांच्या प्रतिसादानुसार).. मग ते गतानुगतिक पद्धतिने ८ व्या वर्षी मुहूर्त बघून न करता जेव्हा मुलगा/ मुलगी शिक्षणासाठी दूर जाण्याची वेळ येइल (if applicable) तेव्हा म्हणजे साधारण १०वी १२वी नंतर मुलं गावात सुविधा नसल्याने शहरात जातात तेव्हा किंवा परदेशी शिक्षणासाठी जाण्यावेळी करणे..

खास मेवे स्टाईल. बर्‍याच दिवसांनी प्रतिसाद का होईना वाचून बरं वाटलं. *i-m_so_happy*

मृत्युन्जय's picture

3 Jun 2014 - 3:37 pm | मृत्युन्जय

अतिशय उत्तम प्रतिसाद.

कवितानागेश's picture

3 Jun 2014 - 4:37 pm | कवितानागेश

मेवे रॉक्स. :)

सखी's picture

3 Jun 2014 - 5:22 pm | सखी

सुरेख प्रतिसाद, खरं तर सगळाच संग्रही ठेवावा असा, खालचे विशेष आवडले.
चार पैसे कमवून खा. वेळ पडल्यास भिक्षा माग पण चौर्यकर्म करू नकोस, लुच्चेलबाडी करू नकोस इत्यादि विचार्/अर्थ आपण समजवून घेऊन बटूला कस्टमाईज्ड उपदेश करावा.
मुलाला कळत-नकळत आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुलावर खर्‍या अर्थाने 'संस्कार' होतो. हीच ती आपली संस्कृती. हाच आपला धर्म.

पैसा's picture

4 Jun 2014 - 9:57 pm | पैसा

बरं वाटलं प्रतिसाद वाचून. बरंचंसं पटलं. विधींना पकडून राहण्यात काहीच अर्थ नाही. लेखातील उदाहरणांमधे मुंजीचे विधी हे त्याचा अर्थ किंवा कारण समजून न घेता केवळ एकत्र जमायचे निमित्त म्हणून केलेले दिसत आहेत. तसे असेल तर अजिबात करू नये असंच मी म्हणेन. आपल्या मनाला पटेल ते करावं. त्याची पूर्वापार करायला सांगितलं आहे म्हणून कोणत्यातरी संस्काराशी नावापुरती सांगड घालू नये.

माझ्या मुलाची मुंज अगदी थोडक्यात आणि गंभीरपणे केली होती. आहेर-देणेघेणे इ. ला पूर्ण फाटा दिला. फक्त जवळचे नातेवाईक त्या निमित्ताने एकत्र जमले. गप्पा झाल्या. मजा आली. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाच्या मुंजीतच सोडमुंज केली. तेव्हा भाचा काशीला जायला निघतो, त्याला परत आणण्यासाठी मामा "तुला मुलगी देतो" असं म्हणाला नाही, तर तुला ३२ जीबी चा पेनड्राईव्ह देतो म्हणाला! सगळेच खूश!

प्रभाकर पेठकर's picture

5 Jun 2014 - 5:31 am | प्रभाकर पेठकर

>>>>"तुला मुलगी देतो" असं म्हणाला नाही, तर तुला ३२ जीबी चा पेनड्राईव्ह देतो म्हणाला!

बायकोची स्मरणशक्ती, म्हणजे डाटा साठविण्याची आणि रिट्रिव्ह करण्याचा वेग दोन्ही अफाट असते.

'सहा महिन्यांपूर्वी हिच भाजी शेजारच्या अमुकतमुक बाईंनी पाठविली होती तेंव्हा बोटं चाटत (स्वतःचीच) खाल्ली होती.'

किंवा,

'आज वन्संचं कौतुक करताय, करा, पण हेच मी ३ वर्षांपूर्वी शार्दूलच्या मुंजीत सांगितलं होतं तर 'तुला काही कळत नाही म्हणाला होतात''

किंवा,

'वन्संच्या दिराला, वशिला लावून बँकेत चिकटवून घेताय पण ५ वर्षांपूर्वी, माझ्या भावाला बँकेत चिकटवून घ्या म्हंटलं तर तेंव्हा व्हेकन्सी नव्हती, म्हणे.'

वगैरे वगैर डाटा साठवणं आणि नेमक्यावेळी रिट्रिव्ह करणं ३२ जीबी पेनड्राईव्हला, बिचार्‍याला, काय जमणार?

पैसा's picture

5 Jun 2014 - 11:54 am | पैसा

आणि या आठवणींना कसलंच लिमिट नाही! कधीही कुठेही बरोबर हजर करता येतात!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 12:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणि या साठवणीतल्या आठवणी काहीही प्रयास न करता (म्हणजे कॉप्युटर सुरू करा, पेनड्राईव्ह लावा, फाईल सर्च करा, इ, इ) प्रकाशापेक्षा जास्त वेगाने येऊन तुमच्यावर आदळतात. छॅ, छॅ, पेनड्रईव्हला तिच्या डाव्या पायाच्या करंगळीच्या नखाशीही स्पर्धा करता येणे शक्य नाही ;) =))

रेवती's picture

27 Apr 2014 - 7:12 pm | रेवती

मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर
अहो मग त्याला काय झालं? उन्हाळा सुरु आहे ना? घालू द्या की त्यांना हवे तसे कपडे? त्या बाई आणि बुवांनी अगदी पारंपारिक वेषात जरी आमंत्रण दिले असते ना तरी "आले मोठे परंपरा जपणारे, माहितीये, यांच्या घरी मांसाहार चालतो" असं म्हणायलाही कमी करत नाहीत लोक! म्हणजे कसंही वागलं तरी लोक्स हे नावे ठेवण्यासाठीच अपॉईंट केलेले असतात.
मी मात्र पंजाबी कपडे घालून आमंत्रण दिले असते (साडीबीडी आवडते पण झेपत नै हो) कारण मला ते आवडतात.

मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार
छे हो, माझ्या मुलांनी अज्याबात नकार दिला होता. पहिली संध्या त्याने मुंजीच्या दुसर्‍या दिवशी केली होती. आमचे पुण्यातले घर लहान असल्याने ज्या गेस्ट हाउसावर नातेवाईक राहिले होते तिकडे हा संध्याकाळी खेळायला पळाला. रात्री हा पेंगत असताना आजीनं दृष्ट काढली तेवढच!

ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता
घालू द्याकी! त्यांना निदान भिक्षावळीच्यावेळी असं काही करता आलं, आम्हाला तर मनपाने परवानगी दिली नव्हती. दिली असती तरी कोणीही नाचले नसते याची ग्यारेंटी, सगळे वयस्क नातेवाईक गुढगे दुखी, पाठदुखी ने त्रस्त आहेत. आजकाल कोणत्याही जातीधर्मात भयंकर जुन्या पद्धतीने काहीही समारंभ होत नाहीत. अमूक हॉल, तमूक गार्डन नावे असलेल्या ठिकाणी हिरवळीवर जेवणाचे स्टॉल लावून उभा उभ्या जेवणे होणारे समारंभ, लग्नाअधी होणार्‍या ब्याचलरांच्या पार्ट्या आजकाल महाराष्ट्रातही चालतात ते सगळे काय ब्राह्मण असतात का? त्यांनी परंपरा न पाळल्याचे लेख मात्र छापून येत नाहीत. तुम्ही वरील लेख लिहून एका जातीवर उगीच अन्याय करताय. ;)

३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात
३१ डिसेंबरच कश्याला रेव्हपार्टीमध्ये पकडलेली मुले, मुली हा सगळा ब्रह्मवर्गच असतो काय? डिसेंबरात पार्टी करणे का अधिकार फक्त ब्राह्मणांनाच दिलाय का? तसे असल्यास कागदोपत्री दाखवा. पाहयला गेलं तर महाराष्ट्रीय लोकच नव्हे तर इतर राज्यीय लोकही खाद्यपेयांचा आस्वाद जास्तच प्रेमाने घेत असलेले दिसतील. तुमच्याकडून विदा गोळा करण्यात चूक झालीये का जरा बघा.

लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ?
स्वतंत्र भारताचे नागरीक म्हणून त्यांना हवे ते करू शकतात, तेही त्यांचे पैसे खर्च करून!
तुम्हाला रुचत नसेल तर आमंत्रण देणार्‍यांना सरळ तोंडावर सांगा.
गायत्री मंत्र फक्त माझ्या मुलालाच नाही तर त्याच्या सगळ्या जातींच्या, विविध भाषा बोलणार्‍या (भारतीय) मित्रांना अगदी खणखणीत आवाजात (कधीकधी जास्तच जोरात) म्हणता येतो आणि तो म्हणणे हा त्यांचा हक्क आहे. हामेरिकन सरकारही त्याला आक्षेप घेत नाही.

एक ल्ह्यायचं र्‍हायलं, ते म्हणजे ज्यांना गायत्री मंत्र म्हणता येत नाही त्यांचेही काही वाईट होणार नसते.
दुसरं असं की तुमच्या लेखातून काय म्हणायचय हे समजलं. हा बदललेला प्रकार, फक्त मुंजीतीलच नव्हे, लग्नातीलही पाहिल्यावर मलाही विचित्र वाटले होते हे कबूल करते पण बदल हा असणारच! तुम्ही, मी किंवा कोणीही हा बदल थांबवू शकत नाही मग आहे त्यातच आनंद मानायला शिकले. दोन वर्षांपूर्वी माझ्या भाचीचा साखरपूडा हा लग्नासारखा मोठा केला होता आणि साडी वगैरे जाऊ दे, घागरा पद्धत आली असल्याचे जाणवले. असो, त्यांचे लग्न होऊन ते सुखात आहेत हे महत्वाचे! माझा मुलगा नक्की काय करणार आहे हे मलाही माहित नाही. त्याने समारंभातच नव्हे पण इतरवेळीही मद्यपान करू नये यासाठी मी आग्रही राहीन पण बाकी विविध प्राणी खाण्यात सध्या तरबेज झालाय.

जौ द्या मला तरी हे किस्से जरा अतिच 'वेचक' वाटताय..निदान माझ्या तरि पहाण्यात असले काहि आले नाहि..

कोणाचे किस्से? लेखकमहाशयांचे की मी लिहिलेले? असू द्या हो, त्यांचे अनुभव त्यांनी लिहिले व माझे मी लिहिले.

जोशी 'ले''s picture

28 Apr 2014 - 6:19 am | जोशी 'ले'

अर्थात लेखक महाशयांचे... :-)

भाते's picture

27 Apr 2014 - 8:05 pm | भाते

अगदी योग्य आणि समर्पक प्रतिसाद. सगळे मुद्दे पटले मला तुमचे.
मी असा विचार करायला कधी शिकणार? आशिर्वाद असु द्या तुमचा.

रेवती's picture

28 Apr 2014 - 3:02 am | रेवती

आहेत की नै मौलिक विचार! ;)

टेस्ट मॅचची आयपीएलची मॅच केलीस.

तो धम्यासुध्दा फिका पडला.

चिंतुकाका, किती दिवसांनी पाठींबा द्यायला आलात!
काही नै जरा गंमत केली.
धागाकर्त्यांचे म्हणणे काही पूर्णपणे खोटे नाही पण आज टंकायला वेळ होता तो सत्कारणी लावला.

चिंतामणी's picture

28 Apr 2014 - 5:43 pm | चिंतामणी

खूप दिवसांनी इकडे फिरकलो आणि तुझी बॅटींग बघून प्रतिसाद दिल्यावाचुन राहवेना.

असेच भारी भारी पोस्ट वाचायला मिळाले तर पुन्हा पुन्हा नक्की येइन.

सखी's picture

27 Apr 2014 - 8:30 pm | सखी

रेवाक्का रॉक्स!!

स्वप्नांची राणी's picture

27 Apr 2014 - 7:46 pm | स्वप्नांची राणी

>>> ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता >>>>

माझ्याकडे माझं पोर आणि त्याची चुलत भावंड, अशी एकत्रित मुंज झाली पालीला. मुंज लावणारा ऐंशीचा खडुस, म्हातारा ब्रम्हवृंद होता. त्यानी हे नाचगाणे, मुलांना वरातीच्या वेळा सजविणे ई.ई. काहिही करु दिले नाही. सारखा वसावसा ओरडत फक्त होता," साँस्कांर ओंहे नां हां, नाँच गाँणी कसली काँरताँय डोंबार्‍याँ साँरखीं...!!!" (खडुस म्हातार्‍याची उपजात सांगण्याचा मोह आवरत नाहीये पण आवरते..*diablo* ]:-> }:-> ]:> }:> >:-] >:] (6) :diablo: *DIABLO* )

पोटे's picture

27 Apr 2014 - 8:17 pm | पोटे

हं

भडकमकर मास्तर's picture

27 Apr 2014 - 9:38 pm | भडकमकर मास्तर

खूप छान पाककृती.. वीकांताला करून पाहीन !!

यसवायजी's picture

27 Apr 2014 - 10:55 pm | यसवायजी

वीकांताला करून पाहीन !!


काय? गोटा? ;)

त्यांनी असल्या बर्‍याच पाकृ करुन बघितल्या आहेत. ;)
हवं असल्यास खोदकाम करा अथवा (त्यांच्याशीच) संपर्क साधा!

@ भडकमकर मास्तर, नया(लगता) है वह! =))

अस्सा हाय काय? खोदकाम करतो मग.

ष्ट्यांडर्ड भडकमकरी प्रतिसाद ;) =))

चौकटराजा's picture

27 Apr 2014 - 9:53 pm | चौकटराजा

सगळे पर्तिसाद रॉक्स !!!!
मौजी त मौज असते. गोटा असतो . बेटकुळी भरण्याची धमकी असते. गोट्यावरून घेर्‍यातून खोडकर पणे हात फिरविणे असते.मुंज मुलाला सिल्कची सुळासुळीत चड्डी घालयला मिळते. मौजी एक सामाजिक कार्य आहे. नाभिकाना एरवीच्या पाचपट पयशे मिळतात.

इरसाल's picture

28 Apr 2014 - 5:04 pm | इरसाल

नाभिका वरुन आठवले,
नाभिकारे वारा वाहे रे... डौलाने हाक जरा नाव आज रे असे वाटायचे. म्हटलां नाभिक कसा नाव हाकल शेवटी ते नाविका रे असे आहे हे सम्जले.

धागा आणि प्रतिसाद वाचून मजा आली.
असे काही चटपटीत वाचले की छान वाटते.

मंदार कात्रे's picture

27 Apr 2014 - 11:37 pm | मंदार कात्रे

या धाग्यात शतक पार करण्याचे पोटेन्शियल दिसते आहे.... :)

बाकी आत्मुबाबा स्मायलीवाले यांचा जरा सविस्तर प्रतिसाद अपेक्षित !

एखाद्या अधुनिक पद्धतीने रहाणार्‍या कुटुंबातील मुलाची मुंज जर त्यानी त्यांना पहिजे त्या पद्धतीने केली तर हरकत काय आहे?
माझ्या दोनही भावांच्या आणि नात्यातल्या काहींच्या मुंजी अगदी साग्रसंगीत, वाड्यात मांडव वगैरे घालून केलेल्या आठवतात. काही दिवस त्यांनी संध्या, जेवताना चित्राहूती घालणे वगैरे केल्याचे स्मरते. पण नंतर आजतागायत पळी, ताम्हन हातात तरी घेतले असेल की नाही शंका आहे. गणपतीच्या वेळी नवे जानवे विकत घ्यावे लागते. (त्यांचं ऐकून गायत्री मंत्र मलाही पाठ झाला होता... )
पण यात कुणाला दोष देण्याचे आणि आकांडतांडव करण्याचे काही कारण मला दिसत नाही.

पूर्वी मुंज झाल्यानंतर मुलगा गुरूगृही जात असे आणि त्याच अनुषंगाने मुंजीचे विधी असतात. म्हणजे मातृभोजन, भिक्षावळ, पित्याने गुरूमंत्र (मुलाच्या कानात) सांगणे इ. पण आता मुलं गुरूगृही जात नाहीत त्यामुळे तसेही मुंजीचे सांकेतिक महत्व आता राहीले नाही. मुंज ८ व्या ९व्या वर्षी होऊन मग विद्याभ्यासाला प्रारंभ होत असे. आता शिक्षण वयाच्या ३र्‍या ४थ्या वर्षा पासून सुरू होते. मग मुंज करण्यात काय अर्थ राहीला आहे ?
पण तरीही असे समारंभ होत रहावेत असे मला वाटते. त्यातल्या धार्मिक घटकां बरोबरच तो एक आनंद सोहळा आहे हे समजावे. म्हणजे करण्यात काही कमी-जास्तं झाले तर राग येणार नाही.
असे समारंभ म्हणजे एक कौटुंबिक संमेलन असते. इतरवेळी कार्यव्यग्रतेमुळे भेटु न शकणार नातेवाईक, मित्रंमंडळी आवर्जुन एकत्रं येतात अशा वेळी थोडीफार मौजमजा केली तर काय हरकत आहे?
चिकनीचमेली गाण्यावर नाचणे वगैरे जरा अतिशयोक्ती वाटते आहे. कारण मी तर सकाळी मुंज, संध्याकाळी दारुपार्टी असं घडताना पाहिलेलं नाही. लोकं (विशेषतः मराठी) इतकं तारतम्यं नक्कीच बाळगत असतील.

ते जोडपं तुम्हाला आवर्जुन निमंत्रण द्यायला आले हे लक्षात न घेता तुम्ही त्यांच्या कपड्यावर टिका करणे याला काय म्हणावे ?

जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल.

आणि एक आठवले : निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, आणि सोपानदेव यांना संन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकले आणि त्यांच्या मुंजी लावायला कुणी ब्राम्हण तयार नव्हता. मुंज नाही म्हणून गुरूचा अनुग्रह नाही. पण याच भावंडांनी मायमराठीला लाखमोलाची लेणी घडवली.

सखी's picture

28 Apr 2014 - 8:57 am | सखी

मनीषा सगळाच प्रतिसाद आवडला, शेवटचे दोन परिच्छेद विशेष आवडले.

पांथस्थ's picture

30 Apr 2014 - 10:34 am | पांथस्थ

जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल.

काय बहारदार प्रतिसाद आहे! क्या बात है!

अनेक प्रतिसाद वाचनीय आहेत, विदा, स्वानुभव पण दिले आहेत अनेकांनी. पण तुम्ही दोन ओळीत जो सार सांगीतलात त्याला तोड नाही!

अपना तो दिन बन गया!

अत्रुप्त आत्मा's picture

30 Apr 2014 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा

@जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gif

@आणि एक आठवले : निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, आणि सोपानदेव यांना संन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकले आणि त्यांच्या मुंजी लावायला कुणी ब्राम्हण तयार नव्हता. मुंज नाही म्हणून गुरूचा अनुग्रह नाही. पण याच भावंडांनी मायमराठीला लाखमोलाची लेणी घडवली. .>>> आमच्या धर्मशास्त्र्यांना त्याची किंमत नसते. आजही ते..अज्ञाताच्या गुहेत काठ्या मारत फिरण्याला आदर्श-सदाचारी-जीवन समजतात. असो!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Apr 2014 - 12:46 am | निनाद मुक्काम प...

माझ्या मुंजीची १९८८ साली विडीयो केसेट केली होती. घोड्यावरून भिक्षावळ फडके रोड वरून गणपतीच्या मंदिरात गेली होती.
त्यांनतर महिनाभर मी संध्या केली. मग आठवत नाही पण पुढे त्यात खंड पडला ,आज इतक्या वर्षाने कधीतरी
ती विडीयो कसेट पहिली तर ह्या सभारंभाच्या निमित्ताने जमलेले अनेक नातेवाईक ज्यातले काही कैलासवासी झाले आहेत त्यांना पाहता आले. बरे वाटले.
धाग्याचा विषय पाहून ज्या अपेक्षेने तो उघडला होता व तडक प्रतिसाद वाचायला घेतेले , मग मूळ लेख वाचला. तेव्हा अपेक्षापूर्ती झाली.

साती's picture

28 Apr 2014 - 3:08 am | साती

पूर्वी म्हणे बायका पण शिकत असत आणि वैदिक ज्ञान वैगेरे घेत असत.
मग मुंज फक्तं मुलाचीच का?
मुलीची का नाही?

अगदी हौशी मौजीसाठी मुंज म्हटलं तरी मुलीच्या नावाने हौस मौज का नाही?

ता. क. माझ्या नवर्याच्या धर्मात मुंजीसारखा विधी मुलगा मुलगी दोघांसाठी आहे. मुलासाठी 'शाल' आणि मुलीला 'किरगुणी'
बर्याचदा एकाच मांडवात घरातल्या मुलामुलींची एकत्र शाल किरगुणी करतात.
आजकाल यातही मुख्य विधी संपल्यावर मुलांना भेटवस्तू द्यायच्या वेळेस बाजूला ऑर्केस्ट्रा चालू करतात. ;)
अजून दारू पिणे वैगेरे पाहिले नाही.

बॅटमॅन's picture

28 Apr 2014 - 3:31 am | बॅटमॅन

अवांतर उत्सुकता: धर्म/पंथ कुठला? लिंगायत?

साती's picture

28 Apr 2014 - 6:18 am | साती

हो.

बॅटमॅन's picture

28 Apr 2014 - 2:37 pm | बॅटमॅन

धन्यवाद.

पिशी अबोली's picture

28 Apr 2014 - 1:11 pm | पिशी अबोली

माझ्या मैत्रिणीची झाली आहे मुंज. मुंज मुलींची करु नये असं शास्त्र कुणाला माहीत असल्यास संदर्भ जाणून घ्यायला आवडेल.
बाकी हौसेमौजेखातर मुलीची मुंज करायची आहे असं एक उदाहरण आणि वैदिकीचा अधिकार तिला यावा म्हणून करायची आहे असं दुसरं अशी दोन हल्लीच ऐकली.

कवितानागेश's picture

28 Apr 2014 - 6:30 pm | कवितानागेश

होय. मुलींची मुंज करता येते.
पूर्वी मनशक्ती केंद्रात स्वामी विज्ञानानंद सामूहिक मुंज करायचे,त्यात मुलींचीही मुंज होत असे.
अजूनही करत असतील , कल्पना नाही.
बाकी , मुंजीनिमित्त 'चिकन पार्टी' आमच्या काही नातेवाईकांमध्येही झाली आहे. अगदी माझ्या लहानपणीपण पाहिलिये.
ज्याची त्याची मर्जी!
हे जर का खरोखरच 'चुकीचे' असेल, तरी असे वागणार्‍यांना मी दोष देणार नाही. तर 'मुंज' म्हणजे नक्की काय, हे कधीही न कळलेल्या आपल्या समाजाच्या आधीच्या काही पिढ्यांना देइन.
माझ्या डोळ्यासमोर झालेली गोष्ट, एक दाक्षिणात्य ( कर्मठ ब्राह्मण) काकू मुलाच्या मुंजीचे आमंत्रण करायला घरी आल्या होत्या. त्याचवेळेस एक उत्तर भारतीय (ब्राह्मण) काका बसले होते. त्यांनी विचारलं, 'उपनयन' चा अर्थ काय हो?
आई काहीतरी सांगणार तेवढ्यात काकू चटकन म्हणाल्या , ' उप' म्हणजे 'सब' ( इन्लिशमध्ये). म्हणजे ते एक छोटं 'लग्न'च असतं!!
... आईनी तोंडावर आलेले सगळं संस्कृत गपकन गिळून टाकलं... मी हसायला आत पळाले!

लिम्स, लगेच अर्थ शोधला. - 'उपनयन' का अर्थ है "पास या सन्निकट ले जाना।" सम्भवत: आरम्भ में इसका तात्पर्य था "आचार्य के पास (शिक्षण के लिए) ले जाना।" हो सकता है; इसका तात्पर्य रहा हो नवशिष्य को विद्यार्थीपन की अवस्था तक पहुँचा दे

असं शास्त्र नाही, असं वाटतं. कधी वाचण्यात आलं नाही. माझ्याही मैत्रिणीची आणि तिच्या घरातील प्रत्येक मुलीची मुंज झाली आहे.

मंदार दिलीप जोशी's picture

29 Apr 2014 - 6:52 pm | मंदार दिलीप जोशी

मुलींचीही मुंज करतात

जोशी 'ले''s picture

28 Apr 2014 - 7:48 am | जोशी 'ले'

अर्थात, लेखक महाशयांचे... :-)

राही's picture

28 Apr 2014 - 8:09 am | राही

पारशांमध्ये नवजोत समारंभ मुलगे-मुली दोघांचाही करतात. क्रिस्टिअनांमध्ये फर्स्ट कम्यूनिअन दोघांचेही असते. पारशांमध्ये सात वर्षांखालच्या 'खुर्द'--लहानग्यांचे नवजोत होऊ शकत नाही. त्यावेळेस प्रथमच मुला/मुलीला सद्रा चढवण्यात येतो आणि 'कश्टि' नावाचा जानव्यासारखा धागा कंबरेला बांधण्यात येतो. पुढील आयुष्यात त्यांनी या दोन गोष्टी कायम अंगावर बाळगायच्या असतात.

सुबोध खरे's picture

28 Apr 2014 - 12:04 pm | सुबोध खरे

गालिब शराब पीने दे मस्जिद मी बैठकर
या वो जगह बता दे जहां पार खुदा न हो I
एखाद्या गोष्टीचे औचित्य असते तेवढाही विधिनिषेध नसेल तर प्रश्नच मिटला.
शेवटी आपण देवळात बसून ओली पार्टी केली किंवा
राजघाटावर बायका नाचवल्या आणी ओली पार्टी केली तरी फरक पडत नाही.
महात्मा गांधीना शिव्या देणारे लोक सुद्धा त्या स्थळाचे पावित्र्य समजून घेताना पाहीले. ( जेंव्हा त्यांना प्रश्न विचारला कि हे कसे तेंव्हा ते म्हणाले आमचा गांधीजींच्या विचारसरणीला विरोध आहे. त्यांच्या प्रामाणिक पणाला किंवा इतर गुणांना नव्हे).
आत्यंतिक विरोध असूनही त्यांना स्थळाचे पावित्र्य समजत होते.
कोर्टात अर्धी चड्डी घातली तर चालेल काय?
किंवा आपल्या बायकोला घेऊन स्त्रीरोग तज्ञा कडे गेल्यावर लोड शेडींग आहे म्हणून तो अर्ध्या चड्डीत बसलेला असेल तर चालेल काय?
आता याचे उत्तर हो असेल तर प्रश्नच मिटला.
बाकी मुंज केली काय किंवा नाही केली काय? काय फरक पडतो. हा वैयक्तिक प्रश्न आहे.
माझ्या डॉक्टर मित्राच्या दवाखान्याच्या बाहेरून एक लग्नाची वरात चालली होती त्यात बँड वाले अतिशय सुरात गाणे वाजवत होते
"दिल मी छुपा के प्यार का तुफान ले चले I
हम आज अपनी मौत का समान ले चले I
कसलाही विधिनिषेध नसेल तर आईबापांचे कामजीवन अशा विषयावर सुद्धा रसभरीत चर्चा करता येईल किंवा मुलान्समोरही कामक्रीडा करता येईल .
असो ज्याचे मत त्याच्या पाशी.

विकास's picture

28 Apr 2014 - 5:15 pm | विकास

"औचित्य" या एका शब्दात सर्व आले. १००% सहमत.

दोन जणांचे प्रतिसाद आलेले नाहीत अजुन ..

प्रतीक्षेत ...

उपजात सांगायचा मोह आवरलात नि माती खाल्लीत. ती सांगता तर एव्हाना दोन-अडिचशे प्रतिसाद सहज मिळत होते.
बाकी मुंज हा विधी फक्त ब्राह्मणांतच करतात हा ब्राह्मणेतरांतला गैरसमज आणि आमची बरोबरी करायला ब्राह्मणेतर मुंज करतात ही एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्याने (आता त्याची उपजात सांगायचा मोह मी आवरतो) उधळलेली मुक्ताफळे असं दोन्ही ऐकून कान केव्हाच तृप्त झालेत.

जाता जाता, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

स्वप्नांची राणी's picture

28 Apr 2014 - 3:44 pm | स्वप्नांची राणी

बघा बघा...खाल्लीत कि नाही माती तुम्ही पण..!! या, बरोबरच केक कापू..!

जाता जाता, हल्ली असे उपजातीपातींवरुन युद्ध पेटत नाहीत हो...जास्त थोर्थोर विषय हवेत...

>>खाल्लीत कि नाही माती तुम्ही पण..!!
धागा माझा नाय हो!! नायतर मी कशाला हात आवरता घेतोय.

दिव्यश्री's picture

28 Apr 2014 - 3:28 pm | दिव्यश्री

काही वर्षांपूर्वी एका सुप्रशिद्ध महाराजांनी त्यांच्या नातवाची मुंज केली होती . त्यावेळी लैच धुराळा उडाला होता . यागोष्टीची आठवण झाली . असो . ज्यांनी फोटू दिसण्यासाठी कष्ट घेतले त्यांचे जाहीर आभार . धन्यवाद .
वरील फटू पाहून सुजाण , चाणाक्ष लोक/वाचक लग्गेच ओळखतील कि ब्राह्मणी नौ वार कोणती आणि 'नऊ वार साडी अने तंगडी उघडी' हा प्रकार कोणता . बाकी ती म्हण कोपी पेस्ट केली आहे हे सुज्ञाना वेगळे सांगायला नकोच . धन्यवादच .

पैसा's picture

28 Apr 2014 - 3:38 pm | पैसा

तू पब्लिकसाठी शेअर केले नसणार.

इष्टुर फाकडा's picture

28 Apr 2014 - 3:43 pm | इष्टुर फाकडा

लेख थोडा दात ओठ खाऊ झालाय. मुंज प्रकार कालबाह्य झालाय हे खरच आहे. तरीही माझ्या मुलाची मुंज घरातल्या लोकांना करायचीच असेल तर ती घरातच करायला लावेन आणि बाकी समारंभ न केल्यामुळे वाचलेल्या पैशातून काहीतरी माझ्या गावातल्या शाळेतल्या पोरांसाठी करेन.
हे मी करेन बाकीच्यांनी काय करावं हे ते ठरवतील :)

राही's picture

28 Apr 2014 - 4:38 pm | राही

नऊवार लुगडी अने बन्ने तंगडी उघडी ही म्हण बडोदा मराठीत (हिला धेडगुजरी म्हणावं की धेड मराठी?) खूप चालते. मराठी सरदारांच्या आणि एकूणच मराठी लोकांच्या पोकळ बडेजावाची टिंगल करण्यासाठी ती वापरली जाई.
ब्राह्मण बायकांचे नऊवारी नेसण ओचे खोचलेले असते, आणि इतर अनेक जातीतल्या बायकाही ओचे खोचतात मात्र ते थोडे आखूड खोचतात. काम करताना आखूड नेसण बरे पडते. मी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले एक दुर्मीळ कुटुंबछायचित्र पाहिले आहे. त्यात त्या ब्राह्मण कुटुंबातल्या बाईंनी ओचे अगदी आखूड म्हणजे अर्ध्या पोटरीपर्यंत खोचलेले आहेत.
पायांवर निर्‍या लोळवणारे नेसण मला वाटते बालगंधर्वांनी लोकप्रिय केले. त्यांची उंची कमी होती त्यामुळे त्यांना भरपूर पन्ह्याचे लुगडे पायघोळ होत असावे. ते पदराचा एक काठदेखील अगदी खालून म्हणजे अगदी घोट्यापासून घेत. जुन्या लोकांकडून असे ऐकले आहे की असे पायघोळ आणि पावलांवर निर्‍या लोळवणारे नेसण गरत्या बाईचे लक्षण मानले जात नसे. बाईचे नेसण सैल, अघळपघळ फलकारणारे असू नये असा संकेत होता. स्वयंपाकाची वगैरे कामे करणार्‍या गरीब ब्राह्मण बायकांनाही असे नेसण सोयीचे होते. कष्टकरी बायका दुहेरी ओचे खोचत. म्हणजे डावीकडे खोचलेल्या ओच्यामधे पुन्हा उजवीकडची एखादी निरी अडकवीत. यामुळे कुठल्याही पावलामध्ये लुगडे अडकण्याचा प्रश्न येत नसे.
बाकी नऊवारी नेसण्याचे अनेक प्रकार आहेत. कोणी निर्‍या उजवीकडे फिरवून खोचतात तर कोणी डावीकडे. कोणी कोणी निर्‍यांचे दोन भाग करून ते विरुद्ध दिशांना म्हणजे डावी-उजवीकडे वळवून खोचतात. कोळी बायका निर्‍या फार ठेवीत नसत. कमी निर्‍यांमुळे सुटा राहिलेला पदर कंबरेभोवती घट्ट गुंडाळीत. यामुळे वजन उचलताना कंबरेत लचक किंवा उसण भरत नसे.
या संबंधात कुणाकडे जुनी चित्रे, जुने संदर्भ (पेशवाईपूर्वीचे) असतील तर जाणून घ्यायला आवडेल. पेशवाईमुळे महाराष्ट्राच्या समाजजीवनावर मोठा परिणाम झाला. खाणे-पिणे, वस्त्रप्रावरणे, भाषा अशा बाबतीत नवी मूल्ये प्रस्थापित झाली. तेव्हा त्या आधीचा महाराष्ट्र कसा होता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

राही's picture

28 Apr 2014 - 4:41 pm | राही

स्वयंपाकादि कामे करणार्‍या बायकांनाही असे आखूड नेसण सोयीचे होते.
असे वाचावे.

कपिलमुनी's picture

28 Apr 2014 - 5:21 pm | कपिलमुनी

या संबंधात कुणाकडे जुनी चित्रे, जुने संदर्भ (पेशवाईपूर्वीचे) असतील

चित्रगुप्त यांच्याकडे जुनी चित्रे असतात..

आनन्दा's picture

28 Apr 2014 - 6:11 pm | आनन्दा

अबाबाबाबाबा

सुहास..'s picture

28 Apr 2014 - 6:23 pm | सुहास..

http://www.misalpav.com/node/18445

लुगड्यात गमावल ;)

स्वप्नांची राणी's picture

28 Apr 2014 - 6:24 pm | स्वप्नांची राणी

नऊवार नेसुन घोड्यावर पण बसता यायचे म्हणे. त्यादृष्टीनेही आखूड नेसणच योग्य असावं.

अर्थात आखुड नेसा वा पायघोळ नेसा, नऊवार फक्त पुढुनच पिसारा फुलवलेल्या मोरासारखी आकर्षक दिसते. मागुन नेटका पदर अंगभर घेतला तरच ठीक...

(नऊवार अज्जिबात ना आवडणारी...स्वरा)

उडन खटोला's picture

28 Apr 2014 - 6:08 pm | उडन खटोला

धागा शतकपार नेल्याबद्दल समस्त मिपा करांचे आभार !

बरीच साधक बाधक चर्चा झालेली आहे . पण ती नौवारी साडीवर घसरेल, अशी अपेक्षा नव्हती!

असो

आभार

मंदार दिलीप जोशी's picture

28 Apr 2014 - 6:17 pm | मंदार दिलीप जोशी

आपण एकदा लाहोरला भेट द्यावी

मानले का आभार! इथली आतषबाजी संपलेली दिसतीये. असो. ;)

पूर्वी नऊवारी/ धोतर (थोडक्यात कोणतंही सकच्छ नेसलेलं वस्त्र)हे घरंदाज पणाचं लक्षण मानलं जाई. कासोट्याशिवायची लुगडी फक्त देवदास्या (मुरळ्या वैगरे), वारांगना आदि स्त्रिया नेशीत असत, म्हणून घरंदाज स्त्रियांनी अशी लुगडी नेसणं पसंत केलं जात नसे. नंतरच्या काळात शन्वारे तेल्यांच्या स्त्रिया पाचवारी लुगडी नेशीत असत. थोडक्यात त्या काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी होता.

सूड साहेब
एकदा वैद्यकीय सर्वेक्षणासाठी बुधवार पेठेत जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा तेथील स्त्रियांची चेहेर्याची अतिशय भडक रंगरंगोटी (मेक अप) पाहून मी माझ्या मित्राला विचारले कि या स्त्रिया एवढे भडक रंग का वापरतात? त्याचे उत्तर असे होते कि साधे सोज्वळ रंग वापरले तर त्या स्त्रिया "तशा" आहेत हे लोकांना कसे कळेल?
थोडक्यात कोणत्याहि काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी असू शकतो. .

रेवती's picture

28 Apr 2014 - 7:39 pm | रेवती

अगदी असाच संवाद मी आणि आईमध्ये झाला. बुधवार पेठेतील बायका वेगळ्या का दिसतात यावर आईने घाबरून लक्ष्मीरोडवर रिक्षा थांबवली व मला घरी आणले. यापुढे त्यापेठेबद्दल काही विचारायचे नाही वगैरे दटावले. मी नवव्या यत्तेत होते व असे काही स्पष्टीकरण देणे तिला अवघड वाटले असावे.

>>थोडक्यात कोणत्याहि काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी असू शकतो
ह्म्म!! शक्यता नाकारता येत नाही.

आदिजोशी's picture

30 Apr 2014 - 12:22 pm | आदिजोशी

मुळात असलं काही घडलं ह्यावरच माझा विश्वास नाही. कितीही उच्चभॄ झाले तरी ब्राह्मण इतके उथळ होणार नाहीत. उगाच ब्राह्मणांना नावं ठेवण्यासाठी तयार केलेला कल्पनाविलास आहे हा. पुरावे द्या.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Apr 2014 - 3:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

+ ईन्फिनिटी. हेच म्हणतो. ह्यांच्या 'टु डु लिस्ट' मधे ब्राम्हणांच्या नावानी शंख करणे ही रोजची एक टास्क असते.

(गो ब्राम्हणाभिमानी) अनिरुद्ध.

मंदार दिलीप जोशी's picture

2 May 2014 - 10:15 am | मंदार दिलीप जोशी

ह्यांच्या 'टु डु लिस्ट' मधे ब्राम्हणांच्या नावानी शंख करणे ही रोजची एक टास्क असते.>>>

:D :D :D