समजावल आहे मनाला आता
मागे वळुन बघायच नाही.
जरी आला विचार अंतरी
आठवणीत अडकायच नाही.
झाली जखम मनाला तरी
जखमी होऊन रडायच नाही.
आपल सुख मिळाव आपल्याला तरी
हे जरी असल खर तरी
जगात कोणी कुणाच नसत
हे खोट समजायच नाही.
असेल ताकद लढायची तर
हरलेला डाव नव्या उमेदीने उभा करुन
परत कधी खचायच नाही.
मागे वळुन बघायच नाही....
प्रतिक्रिया
28 Dec 2011 - 10:51 am | फिझा
मस्त जमलिये कविता ...!! आवडली !!!!
28 Dec 2011 - 10:53 am | लीलाधर
एकदम कवी कुसुमाग्रजांची कविता आठवली.
कणा
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा !
28 Dec 2011 - 3:28 pm | पक पक पक
झक्कास........
28 Dec 2011 - 5:01 pm | मनीषा
वा! छान आहे कविता.
लिहीत रहा !
(अगदी कृष्णाने धनंजयाला (अर्जुनाला) गीता अशीच सांगीतली असेल.)
29 Dec 2011 - 10:37 am | निश
तुम्हा सगळ्यानचे आभार व धन्यवाद