विझल्यात खुणाही सरल्या गाथा उरले गीत व्रणांचे
आकाशी तुटल्या तार्यांचे खेद कुणाला आता
स्वेद ओघळे भाळावरती पाउल पुढचे पडता
आग निवळण्याआधी भडके परतुन जाता जाता
भंगुरतेचे स्वप्न अनोखे रेखिव घडले लेणे
अभंग त्याचे गुणगुणतांना शिरी वाहिले मेणे
गोत विखुरले शब्दस्वरांतुन गोत्र एक ते विरघळले
पात्र किनारे विस्तारुन अवघ्यांचे सागर झाले
.......................अज्ञात
७/१२/२०११
प्रतिक्रिया
7 Dec 2011 - 9:27 am | लीलाधर
गाथा अज्ञातकुलाची फारच छान जमवले आहे. व्वा व्वा अप्रतिम सुंदर..
पात्र किनारे विस्तारुन अवघ्यांचे सागर झाले,
ह्या सागरातून विहार करता गीत व्रणांचे स्फुरले !
7 Dec 2011 - 12:08 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
नेहमीप्रमाणे आम्ही परत एकदा नि:शब्द!!!
__/\__
7 Dec 2011 - 4:13 pm | अत्रुप्त आत्मा
+१ टू मि.का.
8 Dec 2011 - 7:02 am | इन्दुसुता
नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट .