फार आवडली गं.. डोळ्यात पाणीच आलं.. एक -एक करून आठवण येत असताना भिवाण्णाची होणारी ढासळणारी स्थिती, आणि पोराच्या कडू आठवणीने,शेत सोडून जायच्या कल्पनेने त्याला झालेला त्रास.. बरोब्बर पकडलायेस..
यशोधरा,
अतिशय भावस्पर्शी व आशयगर्भ लेखन.
लेखनाचा पोत हा अतिशय प्रगल्भ आणि प्रवाहि आहे.
भिवण्णाची कथा अतिशय सुंदर खुलवली आहेस. ग्रामीण भाषेचा बाज चांगलाच जमलाय.
असो,
इथे आपले असेच उत्तम लिखाण वाचायला मिळावे.
एका उत्तम लेखाबद्दल आपले अभिनंदन.
छान. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यातला एकच पैलू पकडत इतरांना स्पर्श करीत केलेली मांडणी आवडली. एरवी अशा प्रयत्नांत फसगत होत असते. इथे ती झाली नाही. बांधणी पक्की झाली. याचाच अर्थ तुम्ही रचनेविषयी विचार करूनच लिहिले आहे.
या कथेची अखेर वेगळ्या शब्दांत मांडता आली असती का याचा विचार करतोय... (अखेर म्हणजे तुम्ही केली आहे तीच, फक्त शब्द-वाक्यरचना वेगळी काही...) त्याचबरोबर अधिक समर्पक काही शीर्षक करता येईल का?
सुद॑र लिखाण केले आहेस, मस्त हळवा विषय आणि ग्रामीण भाषा ही जशीच्या तशी वापरली आहेस.
वाचता वाचता डोळ्यात कधी पाणी येते ते कळत ही नाही.
असेच छान लिखाण मिपाकरा॑ना वाचायला मिळु दे तुझ्या कडुन.
बिपिन कार्यकर्ते, अरुण मनोहर, भाग्यश्री, प्रशांत कवळे, पेठकरकाका, अभिज्ञ, तात्या, बेसनलाडू, शीतल, इनूभाव, पल्लवी कथा आवडल्याचं सांगितल्याबद्दल खूप खूप आभार.
नारदाचार्य, कथेचा शेवट जरासा बदलला. अजून निराळे शीर्षक काही सुचत नाही मला. तुम्हांला काही सुचले असेल तर जरुर सांगा. तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
बर्याच दिवसांनी भान विसरुन काहितरी वाचले. कथेने सुरवातीपासुन पकड घेतली ते भिवाण्णा काळ्याआईशी एकरुप झाला तोपर्यंत.. अंगावरचा शहारा जाणवला ..
यशोधरे खरच फार फार सुंदर लिहलं आहेस गं, अभिनंदन.
... कसं छोटसंच गोजिरवाणं झोपडीवजा घर होतं त्याचं. हसरी माय, पहाडासारखा बाप आणि - आत्तासुद्धा बहिणीचा तेह्वाचा अवतार आठवून हसू आलं त्याला - नाक सुरसूर ओढणारी आणि परकर नेसून, इकडून तिकडे कोंबड्यांमागं नाचणारी, आणि शेळीशी गप्पा मारणारी झिपरी, शेंबडी छोटी बहीण. आत्ता सुद्धा तिच्या आठवणीने तो आत जरा हलला. कशी गोजीरवाणी बाय होती... चंद्रभागा
किती सुरेख वर्णन, शब्दांचा किती व्यवस्थित वापर !! ग्रेट वन इंडिड्ड यशभाय !!
अशी लेखातली सौंदर्यस्थळं वेगळी काढता येणार नाहीत, सगळा लेखच छान आहे.
राज्यस्तरीय सरकारी साहित्य स्पर्धेला पाठवावा, तु बक्षिस घेतांना आम्हाला टाळ्या वाजवतांना खुप आनंद होईल. :)
हेच म्हणतो 9 Jun 2008 - 2:50 pm | राजे (not verified)
हेच म्हणतो आहे !
राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
नुकताच 'सरकार राज' पहिला (नाही आवडला)...त्यांनीही सेझ सारखाच मुद्द घेतला आहे...खरच वाटते असेच वाटत असेल त्या शेतकर्यांना...
गोष्ट छान जमली आहे यशोधरा!
हृदयस्पर्शी 9 Jun 2008 - 2:44 pm | पद्मश्री चित्रे
लिहिलं आहेस अगदी..
छान सुंदर कथा. 9 Jun 2008 - 10:49 pm | llपुण्याचे पेशवेll
अप्रतिम कथा आणि हृदयस्पर्शी शेवट.
जमिनीविकून जमिनदार म्हणवणार्या भिवण्णाच्या मुलाप्रमाणे आसपासचे उधळे पाटीलपुत्र्(आपल्या आडनावात पाटील लावणारे आणि सेझ साठी जमिनी विकणारे धेंड) पाहीले की जणू आपणच भिवण्णा झाल्याप्रमाणे वाटते.
पुण्याचे पेशवे
आनंदयात्री, तुझ्या कौतुकाच्या शब्दांबद्दल आभार मानत नाही, भाय लोकांत इतका भाईचारा हवच ना!! :)
राजे, ऋचा, स्वातीताई, सहज, डॉक्टरसाहेब, मनिष, पद्मश्री , पेशवे सरकार खूप खूप आभार कथा वाचून अभिप्राय दिल्याबद्द्ल.
खरं सांगायच तर मलाही दु:खी शेवट वाचायला आवडत नाही, पण इथे ते अपरिहार्य आहे!
कारण, भिवण्णा कधीच मृत्यू पावतो, जेह्वा त्याची जमीन विकली जाते तेह्वाच. मग शरीराने तो भले जिवंत का असेना!
प्रत्यक्ष आपल्या मुलाने जमिनीचा सौदा करणं, ह्या दु:खातून तो सावरु शकलेला नाही, त्या धक्क्यानं त्याची पत्नी कायमची कोसळल्याचं शल्यही आहे त्याला. ज्या मुलावर त्याच्या आशा होत्या, जो मुलगा काळ्या आईसाठी झगडेल असं त्याला वाटत होतं, त्यानेच अशी जमीन भिवण्णाला काही न सांगता सवरता परभारे वि़कली, हा एक धक्काच आहे त्याला.
पुन्हा जमीन हे केवळ शेतीचं साधन नाही आहे त्याच्यासाठी, त्याच्या आयुष्याच्या कित्येक आठवणी त्या जमिनीत रुजलेल्या आहेत...
त्याचं थकलेलं म्हातारं शरीर आणि त्याच बरोबर उदासत चाललेलं मन, किती सोसेल?
अतिशय सुरेख कथा....
मन अगदी हळहळून जातं.
शब्द आणि भावना अत्यंत प्रभावी पणे मांडल्या आहेत.. जणु काही नजरेसमोर सगळं घडत आहे...
यशोधरा,
तुमचे मनापासून अभिनंदन...
पुढील लेखनाच्य प्रतिक्षेत आहोत...
ग्रामीण भाषेचा बाज चांगला साधलाय. भिवाण्णाची उलघाल नेमक्या शब्दात टिपली आहे.
भीवाण्णाच्या लेखी काळ्या आईला सोडून जाणं ही कल्पनाच असह्य त्यामुळे शेवट असाच होणार कारण काळी आई हेच जगणं आणी तेच मरणं!
अशाच उत्तम कथा येऊदेत.
यशोधरा, काळ्या आईच्या लेकरांच्या कथा वाचायला मला नेहमीच अत्यंत आवडते. कुठेतरी जबरदस्त आपलेपणा वाटतो त्यात. भिवाण्णाही असाच माझा वाटला. खूपच नेमक्या शब्दात वर्णन करण्याची हातोटी झकास आहे तुझी. असंच लिहित जा मनापासून. नारदाचार्यांनी नाव सुचवायला सांगितलेले पाहून मला जर कुठले नाव सुचले असेल तर ते आहे 'मनासारखं'. कसं वाटतंय बघ.
रीतसर भागिरथी घरात आली, ती इथलीच होऊन गेली. ढेकूळ पाण्यात विरघळाव, तशी विरघळली.
सही!!! लाजवाब!!!!
भीवाण्णाच्या काळ्या माय ने डोळ्यांत अश्रू तरळले. सुंदर लिहीलंय. सर्वच अंगांनी लेख छान जमलाय.
काळा पहाड
ही कथा थोडी उशीरा वाचली. त्यामुळे प्रतिक्रिया लिहायला वेळ लागला.
कथा मला खूप आवडली. कथेचा स्कोप तुम्ही अगदी मर्यादित ठेवला आहे. गुंतागुंत टाळली आहे. मात्र या मर्यादित स्कोपमधे एकूण भाषेचा , कथानकाचा तोल ढळू न देता काम केले आहे. याबद्द्दल तुमचे अभिनंदन !
तुमचे हे लिखाण पाहून सांगावेसे वाटते की याहून जास्त व्यामिश्र अशा घटना आणि माणसामाणसांमधल्या नात्यांचा आणि प्रवृत्तींचा वेध घेण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. जसजसे हे होईल तसतसे लिखाणाची लांबीसुद्धा वाढेलच. आणि मग भाषा, कथानक यांच्यातील एकजीवत्व , "कोहीरन्स" , आणि त्या सगळ्याचा मिळून एक गडद परिणाम होण्याची शक्यता निर्माण होईल. तुमची झेप अजून दूर जावी ; भरारी बनावी अशी शुभेच्छा !
प्रतिक्रिया
8 Jun 2008 - 2:24 am | बिपिन कार्यकर्ते
कथा आवडली. छान लिहिली आहे.
बिपिन.
8 Jun 2008 - 4:09 am | अरुण मनोहर
काळ्या मातीचे पाय असलेली ही कथा ह्रदयाला भिडून जाते. औरभी लिख्खो यशोधरा....
8 Jun 2008 - 6:06 am | भाग्यश्री
फार आवडली गं.. डोळ्यात पाणीच आलं.. एक -एक करून आठवण येत असताना भिवाण्णाची होणारी ढासळणारी स्थिती, आणि पोराच्या कडू आठवणीने,शेत सोडून जायच्या कल्पनेने त्याला झालेला त्रास.. बरोब्बर पकडलायेस..
http://bhagyashreee.blogspot.com/
8 Jun 2008 - 9:29 am | प्रशांतकवळे
खुपच छान...
हृदयाला हात घालते..
एसइझेड मध्ये ज्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांच्या भावना पण अशाच असतील..
प्रशांत
8 Jun 2008 - 9:46 am | प्रभाकर पेठकर
भिवण्णाची व्यथा काळजाला घरं पाडणारी आहे. लेखन नेमके, भावनेने ओथंबलेले अणि प्रवाही आहे. अभिनंदन.
अशाच नवनविन कथा मिपावर वाचायला मिळतील अशी अपेक्षा.
8 Jun 2008 - 10:18 am | अभिज्ञ
यशोधरा,
अतिशय भावस्पर्शी व आशयगर्भ लेखन.
लेखनाचा पोत हा अतिशय प्रगल्भ आणि प्रवाहि आहे.
भिवण्णाची कथा अतिशय सुंदर खुलवली आहेस. ग्रामीण भाषेचा बाज चांगलाच जमलाय.
असो,
इथे आपले असेच उत्तम लिखाण वाचायला मिळावे.
एका उत्तम लेखाबद्दल आपले अभिनंदन.
अभिज्ञ.
8 Jun 2008 - 10:53 pm | विसोबा खेचर
यशोधरा,
अभिज्ञच्या आणि इतरही सर्वांच्या प्रतिसादाशी सहमत! खूपच सुंदर लिहिलं आहेस. एक दर्जेदार लेखन वाचण्याचा आनंद वाटला!
तुझं अधिकाधिक उत्तमोत्तम लेखन मिपाकरांना वाचायला मिळो हीच इच्छा!
तात्या.
8 Jun 2008 - 11:07 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
8 Jun 2008 - 4:41 pm | नारदाचार्य
छान. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यातला एकच पैलू पकडत इतरांना स्पर्श करीत केलेली मांडणी आवडली. एरवी अशा प्रयत्नांत फसगत होत असते. इथे ती झाली नाही. बांधणी पक्की झाली. याचाच अर्थ तुम्ही रचनेविषयी विचार करूनच लिहिले आहे.
या कथेची अखेर वेगळ्या शब्दांत मांडता आली असती का याचा विचार करतोय... (अखेर म्हणजे तुम्ही केली आहे तीच, फक्त शब्द-वाक्यरचना वेगळी काही...) त्याचबरोबर अधिक समर्पक काही शीर्षक करता येईल का?
8 Jun 2008 - 5:49 pm | शितल
सुद॑र लिखाण केले आहेस, मस्त हळवा विषय आणि ग्रामीण भाषा ही जशीच्या तशी वापरली आहेस.
वाचता वाचता डोळ्यात कधी पाणी येते ते कळत ही नाही.
असेच छान लिखाण मिपाकरा॑ना वाचायला मिळु दे तुझ्या कडुन.
8 Jun 2008 - 10:59 pm | इनोबा म्हणे
सुंदर लिहीलं आहे. ग्रामीण बाज आवडला.भिवाण्णा मनाला चटका लावून गेला.
पु. ले. शु.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
9 Jun 2008 - 8:04 am | पल्लवी
शाळेत असताना अशा छान छान कथा अभ्यासक्रमात असायच्या..ग्रामिण बाजेच्या..
आज बर्याच दिवसांनी असं काहितरी वाचलंय..
येसु ताई, तु अजुन खुप खुप लिही.. अभिनंदन आणि शुभेच्छा..
9 Jun 2008 - 8:08 am | यशोधरा
बिपिन कार्यकर्ते, अरुण मनोहर, भाग्यश्री, प्रशांत कवळे, पेठकरकाका, अभिज्ञ, तात्या, बेसनलाडू, शीतल, इनूभाव, पल्लवी कथा आवडल्याचं सांगितल्याबद्दल खूप खूप आभार.
नारदाचार्य, कथेचा शेवट जरासा बदलला. अजून निराळे शीर्षक काही सुचत नाही मला. तुम्हांला काही सुचले असेल तर जरुर सांगा. तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
9 Jun 2008 - 11:42 am | आनंदयात्री
बर्याच दिवसांनी भान विसरुन काहितरी वाचले. कथेने सुरवातीपासुन पकड घेतली ते भिवाण्णा काळ्याआईशी एकरुप झाला तोपर्यंत.. अंगावरचा शहारा जाणवला ..
यशोधरे खरच फार फार सुंदर लिहलं आहेस गं, अभिनंदन.
... कसं छोटसंच गोजिरवाणं झोपडीवजा घर होतं त्याचं. हसरी माय, पहाडासारखा बाप आणि - आत्तासुद्धा बहिणीचा तेह्वाचा अवतार आठवून हसू आलं त्याला - नाक सुरसूर ओढणारी आणि परकर नेसून, इकडून तिकडे कोंबड्यांमागं नाचणारी, आणि शेळीशी गप्पा मारणारी झिपरी, शेंबडी छोटी बहीण. आत्ता सुद्धा तिच्या आठवणीने तो आत जरा हलला. कशी गोजीरवाणी बाय होती... चंद्रभागा
किती सुरेख वर्णन, शब्दांचा किती व्यवस्थित वापर !! ग्रेट वन इंडिड्ड यशभाय !!
अशी लेखातली सौंदर्यस्थळं वेगळी काढता येणार नाहीत, सगळा लेखच छान आहे.
राज्यस्तरीय सरकारी साहित्य स्पर्धेला पाठवावा, तु बक्षिस घेतांना आम्हाला टाळ्या वाजवतांना खुप आनंद होईल. :)
9 Jun 2008 - 2:50 pm | राजे (not verified)
हेच म्हणतो आहे !
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
9 Jun 2008 - 11:30 am | ऋचा
खुप सुंदर लिहिले आहेस..
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
9 Jun 2008 - 11:47 am | स्वाती दिनेश
यशोधरा,कथा चटका लावून जाते.फार छान लिहिले आहेस..
असेच लिहित रहा..पुलेशु,
स्वाती
9 Jun 2008 - 11:48 am | सहज
वरील सर्व अनुकूल प्रतिसादांशी सहमत.
लेख अतिशय छान. अजुन असेच उत्तमोत्तम लेख वाचायला मिळावे ही अपेक्षा.
9 Jun 2008 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कथेची सुरेख बांधणी आणि जीवाला चटका लावणारा समारोप.
अजून येऊ दे, अशाच सुरेख ग्रामीण कथा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
9 Jun 2008 - 12:23 pm | मनिष
नुकताच 'सरकार राज' पहिला (नाही आवडला)...त्यांनीही सेझ सारखाच मुद्द घेतला आहे...खरच वाटते असेच वाटत असेल त्या शेतकर्यांना...
गोष्ट छान जमली आहे यशोधरा!
9 Jun 2008 - 2:44 pm | पद्मश्री चित्रे
लिहिलं आहेस अगदी..
9 Jun 2008 - 10:49 pm | llपुण्याचे पेशवेll
अप्रतिम कथा आणि हृदयस्पर्शी शेवट.
जमिनीविकून जमिनदार म्हणवणार्या भिवण्णाच्या मुलाप्रमाणे आसपासचे उधळे पाटीलपुत्र्(आपल्या आडनावात पाटील लावणारे आणि सेझ साठी जमिनी विकणारे धेंड) पाहीले की जणू आपणच भिवण्णा झाल्याप्रमाणे वाटते.
पुण्याचे पेशवे
10 Jun 2008 - 12:06 am | यशोधरा
आनंदयात्री, तुझ्या कौतुकाच्या शब्दांबद्दल आभार मानत नाही, भाय लोकांत इतका भाईचारा हवच ना!! :)
राजे, ऋचा, स्वातीताई, सहज, डॉक्टरसाहेब, मनिष, पद्मश्री , पेशवे सरकार खूप खूप आभार कथा वाचून अभिप्राय दिल्याबद्द्ल.
असाच लोभ असूदे. :)
10 Jun 2008 - 2:42 am | सुवर्णमयी
हृदयस्पर्शी कथा.
10 Jun 2008 - 2:42 am | सुवर्णमयी
हृदयस्पर्शी कथा.
10 Jun 2008 - 2:56 am | धनंजय
कथा.
(पण मृत्यूने कथेचा शेवट साधायला नको होता असे वाटते.)
असेच सुरेख लेखन येत राहू द्या.
10 Jun 2008 - 10:36 pm | यशोधरा
पण मृत्यूने कथेचा शेवट साधायला नको होता असे वाटते
खरं सांगायच तर मलाही दु:खी शेवट वाचायला आवडत नाही, पण इथे ते अपरिहार्य आहे!
कारण, भिवण्णा कधीच मृत्यू पावतो, जेह्वा त्याची जमीन विकली जाते तेह्वाच. मग शरीराने तो भले जिवंत का असेना!
प्रत्यक्ष आपल्या मुलाने जमिनीचा सौदा करणं, ह्या दु:खातून तो सावरु शकलेला नाही, त्या धक्क्यानं त्याची पत्नी कायमची कोसळल्याचं शल्यही आहे त्याला. ज्या मुलावर त्याच्या आशा होत्या, जो मुलगा काळ्या आईसाठी झगडेल असं त्याला वाटत होतं, त्यानेच अशी जमीन भिवण्णाला काही न सांगता सवरता परभारे वि़कली, हा एक धक्काच आहे त्याला.
पुन्हा जमीन हे केवळ शेतीचं साधन नाही आहे त्याच्यासाठी, त्याच्या आयुष्याच्या कित्येक आठवणी त्या जमिनीत रुजलेल्या आहेत...
त्याचं थकलेलं म्हातारं शरीर आणि त्याच बरोबर उदासत चाललेलं मन, किती सोसेल?
काय वाटत तुम्हांला?
10 Jun 2008 - 10:01 pm | डोमकावळा
अतिशय सुरेख कथा....
मन अगदी हळहळून जातं.
शब्द आणि भावना अत्यंत प्रभावी पणे मांडल्या आहेत.. जणु काही नजरेसमोर सगळं घडत आहे...
यशोधरा,
तुमचे मनापासून अभिनंदन...
पुढील लेखनाच्य प्रतिक्षेत आहोत...
10 Jun 2008 - 10:51 pm | चतुरंग
ग्रामीण भाषेचा बाज चांगला साधलाय. भिवाण्णाची उलघाल नेमक्या शब्दात टिपली आहे.
भीवाण्णाच्या लेखी काळ्या आईला सोडून जाणं ही कल्पनाच असह्य त्यामुळे शेवट असाच होणार कारण काळी आई हेच जगणं आणी तेच मरणं!
अशाच उत्तम कथा येऊदेत.
चतुरंग
12 Jun 2008 - 12:04 pm | वेदश्री
यशोधरा, काळ्या आईच्या लेकरांच्या कथा वाचायला मला नेहमीच अत्यंत आवडते. कुठेतरी जबरदस्त आपलेपणा वाटतो त्यात. भिवाण्णाही असाच माझा वाटला. खूपच नेमक्या शब्दात वर्णन करण्याची हातोटी झकास आहे तुझी. असंच लिहित जा मनापासून. नारदाचार्यांनी नाव सुचवायला सांगितलेले पाहून मला जर कुठले नाव सुचले असेल तर ते आहे 'मनासारखं'. कसं वाटतंय बघ.
13 Jun 2008 - 8:34 am | यशोधरा
सुवर्णमयी, डोमकावळा, चतुरंग, वेदश्री धन्यवाद.
छान आहे ग तुला सुचलेलं शीर्षक वेदश्री.. :)
चतुरंग, अगदी ....
13 Jun 2008 - 2:20 pm | काळा_पहाड
रीतसर भागिरथी घरात आली, ती इथलीच होऊन गेली. ढेकूळ पाण्यात विरघळाव, तशी विरघळली.
सही!!! लाजवाब!!!!
भीवाण्णाच्या काळ्या माय ने डोळ्यांत अश्रू तरळले. सुंदर लिहीलंय. सर्वच अंगांनी लेख छान जमलाय.
काळा पहाड
15 Jun 2008 - 12:03 pm | मुक्तसुनीत
ही कथा थोडी उशीरा वाचली. त्यामुळे प्रतिक्रिया लिहायला वेळ लागला.
कथा मला खूप आवडली. कथेचा स्कोप तुम्ही अगदी मर्यादित ठेवला आहे. गुंतागुंत टाळली आहे. मात्र या मर्यादित स्कोपमधे एकूण भाषेचा , कथानकाचा तोल ढळू न देता काम केले आहे. याबद्द्दल तुमचे अभिनंदन !
तुमचे हे लिखाण पाहून सांगावेसे वाटते की याहून जास्त व्यामिश्र अशा घटना आणि माणसामाणसांमधल्या नात्यांचा आणि प्रवृत्तींचा वेध घेण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. जसजसे हे होईल तसतसे लिखाणाची लांबीसुद्धा वाढेलच. आणि मग भाषा, कथानक यांच्यातील एकजीवत्व , "कोहीरन्स" , आणि त्या सगळ्याचा मिळून एक गडद परिणाम होण्याची शक्यता निर्माण होईल. तुमची झेप अजून दूर जावी ; भरारी बनावी अशी शुभेच्छा !
15 Jun 2008 - 4:56 pm | यशोधरा
काळा_पहाड, कथा वाचून तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल खूप आभार.
याहून जास्त व्यामिश्र अशा घटना आणि माणसामाणसांमधल्या नात्यांचा आणि प्रवृत्तींचा वेध घेण्याचा प्रयत्न तुम्ही करावा
मुक्तसुनीत, मी जरुर प्रयत्न करेन. तुमच्या सूचनांबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनापासून खूप धन्यवाद.
सगळ्याच मिपाकरांचे खूप आभार. तुम्ही सगळेच खूप भरभरून दाद देता, कौतुक करता... खूप हुरुप वाढतो त्यामुळे! असाच लोभ असूदेत. :)