सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
9 May 2023 - 1:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेहमीप्रमाणेच छान कविता.
लैच अवघड असतं.
-दिलीप बिरुटे
9 May 2023 - 2:10 pm | कर्नलतपस्वी
इस रंग बदलती दुनियामे सब कुछ मेरा है
आशा परिस्थितीत इदं न मम म्हणणे कठीण आहे.
आवडली.
10 May 2023 - 8:42 pm | श्रीगणेशा
कविता भावली!
"माझं असं काहीच नाही", असं म्हणून मनाची समजूत घालणं, एवढाच एक पर्याय उरतो, शेवटी!
11 May 2023 - 10:07 am | तुषार काळभोर
अशी भावना असणे हेच मुळात खूप अवघड असते.
इतकं तटस्थपणे व्यवहारात/संसारात वागणं, जगणं काही अपवादात्मक व्यक्तींव्यतिरिक्त इतरांना नाही जमत. छोट्या छोट्या गोष्टींत आपला जीव अडकतो.
त्यामुळेच घरात अडगळ साठत राहते. त्यामुळेच (पुरेशी जागा असेल तर) अडगळीची खोली घरात असते.
आणि हे केवळ वस्तूंसाठी नाही. त्या त्या वेळच्या भावना, स्मृती, विचार यांचंही तेच आहे.
बर्याच जणांत वयानुसार, अनुभवानुसार कमी जास्त प्रमाणात अशी तटस्थता किंवा स्थितप्रज्ञता येते. बर्याच जणांत येतच नाही.
14 May 2023 - 12:06 pm | प्राची अश्विनी
बिरुटे सर, कर्नल तपस्वी, श्रीगणेशा आणि तुषार काळभोर.... धन्यवाद!