भारतीय स्थलांतरे, सामाजीकरण आणि समरसता- भाग १ राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू
मानवी स्थलांतरांना खूप मोठा इतिहास आहे तसा तो भारतीय स्थलांतरांनासुद्धा असणे ओघानेच येते. एकदा अधीक जुन्या इतिहासात गुंतले की काही वेळा अलिकडील इतिहासाचाही मागोवा घ्यायचे राहून जाते म्हणून या विषयाची सुरवात स्वातंत्र्योत्तर भारतापासून करतो आहे.
मानवी स्थलांतरांची शिक्षण, दुष्काळ ते रोगराई अथवा उपचार, व्यवसाय बदल अशी बरीच कारण असू शकतात. अर्थात स्थलांतर करणार्यांच एक मोठ प्रमाण पोटापाण्यासाठी स्थलांतर करण्यामुळे होते. अधिक उत्तम संधी तिकडे स्थलांतर हे नैसर्गिक आहे. या स्थलांतरांमुळे स्थानिक आणि स्थलांतरीतांची विवीध स्वरूपाच्या देवाण घेवाणी सोबत सांस्कृतीक देवाण घेवाणही होत असते. आधुनिक दळणवळण आणि संपर्क माध्यमांमुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीचा वेग वाढला असला तरीही स्थलांतरीतांच स्थानिकात समरस होणे, अथवा सामाजीकरण होणे हि वेळखाऊ आणि शतकोन शतके चालणारी प्रक्रीया असू शकते प्रत्यक्षात त्यात अनेक अडचणी असू शकतात.
ब्रिटीशपुर्व काळात राजे आणि बादशाही नेमणूका आणि सैनिकी कारवायांमुळे स्थलांतरे होत होतीच पण ब्रिटीश काळात प्रशासकीय , औद्योगीक, शैक्षणिक इत्यादी कारणाने होणार्या स्थलांतरांच प्रमाण वाढल असेल. स्वातंत्र्योत्तर सुरवातीच्या काळात औद्योगीक कारणाने झालेल्या स्थलांतरा प्रमाणेच, केंद्रीय समाजवादी अर्थव्यवस्थेत केंद्रसरकारच्या शासकीय कर्मचार्यांच्या स्थलांतरात वाढच झाली असणार. प्रांत भाषा आणि जाती धर्म गटांनी विभागलेल्या समूहातील सर्वच भेद संपूष्टात आले असे नाही पण काही बदल वेगाने झाले. प्रत्येक प्रांतातील आणि समुदायाची वेषभूषा वेगवेगळी असे त्यात आता बराच एकसारखेपणा आला आहे, उदाहरणा दाखल पंजाबी ड्रेस हा सध्याचा भारतीय स्त्रीयांचा प्रमूख पोषाख झाला आहे. नवनीवीन फॅशन्स आल्या तरीही सर्व देशभर सर्वसाधारणपणे एकसारखा परिणाम होताना दिसतो आहे. यास दूरचित्रवाणी आणि चित्रपट इत्यादींचाही वाटा असेल. विशीष्ट प्रांताकरताच माहित असलेलेले खाद्य पदार्थ दुसर्या वेगेवेगळ्या प्रांतात मिळतातच एवढेच नाही तर अगदी घरातही रोजच्या जेवणात बनू लागले आहेत. दूरचित्रवाणी चित्रपट आणि क्रिकेट इत्यादी मनोरंजन साधनांनी सांस्कृतीकरित्या भारतीय लोक समरस होण्यात मोठी भर घातली आहे. गणेश आणि दुर्गाउत्सव देशातील वेगवेगळ्या भागात पोहोचले आहेत. भांगडा आणि गरबा हि नृत्ये एखाद्या विशीष्ट प्रांताची न रहाता आधूनिक भारताची महत्वपूर्ण सांस्कृतीक ओळख होत आहेत.
सामाजीकरणाच्या बर्याच समस्या शिल्लक आहेतच, या नंतरच्या धाग्यातून मला त्यांचा अधिक उहापोह करावयाचा आहेच परंतु तत्पुर्वी स्वातंत्र्योत्तर काळात सांस्कृतिक देवाण घेवाणीच जे यश आहे त्याची नोंद घेणे हा या धाग्याचा उद्देश. माझ्याकडून यशस्वी सांस्कृतीक देवाणघेवाणीचे बरेच बारकावे सुटले असण्याची शक्यता आहे. मिपाकरांना हा विषय आवडल्यास या बाबत सांस्कृतिक देवाणघेवाणीचे रोचक बारकावे नोंदवत अधिक चर्चा होऊ शकेल अशी आशा आणि विनंती.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान विषय
औद्योगिकीकरणानंतरची शहरे आणि
सामाजीकरण म्हणजे काय नक्की?
सामाजीकरण म्हणजे काय नक्की?
ओह, अच्छा. धन्यवाद.
मूम्बईत सध्या स्थलांतरीतांचे पिक्च्रर फार लागतात.
त्यांच्यातला एखादा सिन्हा
निर्वासितांचा विषय.
खरयं. सिंधी समाज स्थिरावला