✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
गुरुवार, 02/25/2016 - 21:34  ·  लेख
लेख
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल... हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत... १. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील. २. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्‍यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिक्रिया
बातमी

प्रतिक्रिया द्या
59310 वाचन

💬 प्रतिसाद (280)

प्रतिक्रिया

बाई पूर्णपणे अडचणीत आल्या आहेत

विवेक ठाकूर
Sat, 02/27/2016 - 13:34 नवीन
विद्यापिठाच्या चिफ मेडिकल ऑफिसर डॉ राजश्री यांनी, विद्यार्थ्याच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर, काही मिनीटात तिथे पोहोचून आणि वैद्यकीय तपासणी करुन संध्याकाळी ७.२० ला तो मृत झाल्याची घोषणा केली. तशी नोंदही त्यांनी विद्यापिठाच्या हेल्थ बुकमधे केली आहे. त्यांनी लगेच कुलगुरुंना तसं कळवलं आणि त्या स्वतः तिथे पहाटे तीन वाजेपर्यंत हजर होत्या. तिथे हजर असलेल्या प्रत्येकाला ते माहिती आहे असं त्यांनी म्हटलंय. ही वस्तुस्थिती झिकरुल्लाह निशा या विद्यार्थ्यानं स्वतंत्रपणे वेरिफाय केली आहे.
I was the person who called health center immediately after learning that Rohith Hanged in NRS hostel. Within 5 minutes CMO Health center Dr. Rajashree P has reached the spot and she checked the pulses and declared him dead. There were Telangana police also present there. Today MHRD minister lied to entire nation that no doctor and police were allowed to check the dead body till 6:30 AM of next day.
शिवाय विद्यार्थ्याला वेळीच मदत मिळाली असती तर तो रिवाइव होऊ शकला असता वगैरे धादांत खोटी आणि निव्वळ भावनिक वक्तव्य करुन बाईंनी संसदेची (आणि देशाची) पूर्ण दिशाभूल केली आहे. डॉ राजश्रींचं हे स्टेटमंट :
“I am a medical doctor and I have enough experience and competence to examine and determine if a person can be revived. In my opinion, Rohith was dead for probably 2-3 hours by the time he was found,” said Dr P Rajshree, the university’s medical officer.
तस्मात, सदर भाषण म्हणजे लेखकाला वाटला तसा वस्तुपाठ वगैरे काही नाही. हिंदी आणि इंग्रजी बोलण्याचा बर्‍यापैकी सराव आणि भावनिक भाषणबाजी करण्याची हतोटी यापलिकडे बाईंकडे काही दिसत नाही. बातमीची लिंक
  • Log in or register to post comments

बाई अडचणीत आलेल्या कशाकाय?

गामा पैलवान
Sat, 02/27/2016 - 14:52 नवीन
विनय ठाकूर, तुम्ही दुवा दिलेला लेख वाचला. त्यावरून इराणीबाई अडचणीत आलेल्या वाटंत नाहीत. त्यांनी पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालाचा हवाला दिलाय. म्हणजे कोणी खोटं बोलत असेल तर ते पोलीस किंवा विद्यापीठाची नोंदवही यांपैकी आहेत. माझा अंदाज परत सांगतो. रोहितची हत्या झालेली आहे आणि ती आत्महत्या म्हणून खपवायचा प्रयत्न चाललाय. अन्यथा स्वत: फासावर गेलेल्या रोहितला टेबलावर आडवं कोणी केलं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

तुमचा अंदाज आहे आणि रोहितच्या सुसाइड नोटमुळे तो बाद ठरतो.

विवेक ठाकूर
Sat, 02/27/2016 - 15:41 नवीन
शिवाय डॉ राजश्रींचा रिपोर्ट खाली दिला आहे त्यात तशी शक्यता दर्शवलेली नाही. पण मूळ मुद्दा असा आहे.....एका जवाबदार मंत्र्यानी संसदेसमोर बोलतांना, गंभीर आरोप करण्यापूर्वी किमान फॅक्ट्स पूर्णपणे वेरिफाय करायला हव्यात. त्याच्या मृत्यूची नोंद संध्याकाळी ७.३० लाच झाली आहे, अशा वेळी दुसर्‍या दिवशी सकाळी ६.३० पर्यंत विद्यार्थ्याला वैद्यकीय मदतच मिळाली नाही आणि त्याही पुढे जाऊन, तशी मदत मिळाली असती तर तो वाचू शकला असता वगैरे बोलणं म्हणजे त्या पदावर त्यांची राहाण्याची त्यांची क्षमताच प्रश्नांकित करते. डॉ राजश्रींनी केलेल्या स्टेटमंटची तीन ठिकाणी नोंद आहे. The entry made by Dr Rajashree in the university health centre record book is also being shared widely online. Her statement on the record book says, she received a call from university's NRS hostel at around 7.20p.m. She immediately rushed to the hostel in the ambulance and found that the body by that time had been kept on the bed. It further reads that she informed the Vice-Chancellor, Dean of Students Welfare (DSW), Registrar immediately. आणि रिपोर्ट मधली नोंद अशी आहे : The document reads: “Body … cold, bloody abdomen, protruding tongue, froth coming out of the mouth.” The entry also says the pupils were dilated, that there was “no heart sound” and no sounds of breathing.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

.

प्रदीप साळुंखे
Sat, 02/27/2016 - 14:59 नवीन
एक-दोन त्रुटी जरी सापडल्या तरी त्या भाषणाचं महत्व कमी होत नाही. जेएनयु,वेमुलाप्रकरणी सरकारवर होणारी निराधार आगपाखड त्यांनी पुराव्यांसहित जोशपूर्ण आवेशात खोडून काढली आहे.
हिंदी आणि इंग्रजी बोलण्याचा बर्‍यापैकी सराव आणि भावनिक भाषणबाजी करण्याची हतोटी यापलिकडे बाईंकडे काही दिसत नाही.
नेत्यांकडे भाषणाची कला असणे कधीही चांगले असते. अहो एका राजकीय पक्ष्याच्या फक्त म्होरक्यानं भाषण केलं कि त्यांचे 12-13 चेले सहज निवडून येतात म्हणजे बघा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

एक-दोन त्रुटी जरी सापडल्या तरी त्या भाषणाचं महत्व कमी होत नाही ?

विवेक ठाकूर
Sat, 02/27/2016 - 15:49 नवीन
ज्योक मारतायं काय ? भाषणाचा गाभाच फ्रॉड आहे मग त्या उर्वरित डायलॉगबाजीला (बच्चेकी माँ, विसी कुणी अपाँइट केला, शिर कापून देईन, पदावर राहाणार नाही, स्वतःच्या गंगेतल्या अस्थी काय म्हणतील... वगैरे) काय अर्थ उरतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे

.

प्रदीप साळुंखे
Sat, 02/27/2016 - 15:54 नवीन
ओक्के, तुमचं मत वेगळं असू शकतं. अपना अपना स्टाईल होता है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

अपना अपना स्टाईल होता है ?

विवेक ठाकूर
Sat, 02/27/2016 - 16:02 नवीन
बाई फक्त स्टाईल मारतायंत आणि स्वतःचा टिआरपी वाढवतायंत. त्यांना बाकी कशाशी देणंघेणं नाही हाच तर मुद्दा आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे

लेखाचे शिर्शक पाहिल्यास हे

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 02/27/2016 - 17:26 नवीन
लेखाचे शिर्शक पाहिल्यास हे ध्यानात येईल की लेखात दिलेल्या चित्रफितीतल्या प्रसंगावरच चर्चा अपेक्षित आहे. तेव्हा त्या मृत्युसंदर्भात, काही मतप्रदर्शन करण्याअगोदर, इतर कोण काय म्हणतो आहे याऐवजी, चित्रफितीत इराणी काय म्हणाल्या ते समजण्यासाठी, ती चित्रफित पाहिली असती तर बरे झाले असते. इतकेच ! मुख्य म्हणजे, कोणत्याही कारणाने, माध्यमातले सोईचे तेवढे उचलणे जमत नसल्याने, आम्ही मूळ पुरावा (जो इथे चित्रफितीच्या स्वरूपात आहे आणि ज्यात बरेच पुरावे आहेत तो) पाहून मतप्रदर्शन केले आहे. इतर फाटे फोडण्याचा मानस/अनुभव/आवड नसल्याने... पास :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

हा प्रतिसाद म्हणजे स्व-मतांधतेचा वस्तुपाठ म्हणता येईल का?

विवेक ठाकूर
Sat, 02/27/2016 - 23:19 नवीन
चित्रफित तुम्ही धागा काढण्यापूर्वीच खफवर टाकली गेली होती आणि त्याच वेळी ती फार बारकाईनं पाहिली आहे.
आम्ही मूळ पुरावा (जो इथे चित्रफितीच्या स्वरूपात आहे आणि ज्यात बरेच पुरावे आहेत तो) पाहून मतप्रदर्शन केले आहे
तेच तर प्रतापरावांनी वर म्हटलंय : बोलबच्चनला भुलणारी आपली जनता आहे !
माध्यमातले सोईचे तेवढे उचलणे जमत नसल्याने...
हे तुम्ही लिहीलं नसतं तर बरं झालं असतं ! कारण त्याचं असं आहे.... नेहमी व्यक्ती मूळात कशी आहे यावर तीच्या वक्तव्याची किंमत ठरते. व्यक्ती प्रामाणिक असेल आणि भले वक्तृत्वप्रविण नसेल, तर दुसर्‍याचं अहीत कदापी करणार नाही. पण व्यक्तीच फ्रॉड असेल तर तीचं वक्तृत्व कौशल्य कितीही भूलवो, शेवटी लोकांची फसवूणच होते. अर्थात, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तस्मात, व्यक्तीची सचोटी, तिच्या वक्तव्यापेक्षा महत्त्वाची आहे. याचा व्यत्यासही तितकाच खरा आहे, जर व्यक्तीची दुटप्पेगिरी उघडकीस आली तर आपसूकच ती अप्रमाणिक आहे हे सिद्ध होतं. तुम्हाला वक्तव्यानं भुरळ घातली आणि आता व्यक्ती अप्रामाणिक आहे हे पुराव्यानिशी शाबित झाल्यावर, ते मान्य करायला जड जातंय. तुमच्या म्हणण्याप्रमाणे केवळ विडिओ आणि लेखाचं शीर्षक वाचून मत बनवणं हे केवळ अशिक्षित करु शकेल. कारण बाईंकडे वक्तृत्वशैली आहे किंवा नाही हा प्रश्न गौण आहे, बाई प्रामाणिक आहेत किंवा नाही हा मुद्दा आहे. अर्थात, इतका उघड मुद्दा इतरांनाच काय थोडी दिलदारी दाखवलीत तर तुम्हाला सुद्धा मान्य होईल. तरीही केवळ शीर्षकाबद्दल बोलायचं झालं तर मी वरती म्हटल्याप्रमाणे : `हिंदी आणि इंग्रजी बोलण्याचा बर्‍यापैकी सराव आणि भावनिक भाषणबाजी करण्याची हतोटी यापलिकडे बाईंकडे काही दिसत नाही '.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

उत्कृष्ट प्रतिसाद

आजानुकर्ण
Sun, 02/28/2016 - 03:24 नवीन
तुमचा प्रतिसाद खूप आवडला. निव्वळ त्यासाठी लॉगिन करुन प्रतिसाद द्यायला आलो. महामहोपाध्याय इराणीदेवींचे भाषण हे फार तर 'खोटे बोल पण रेटून बोल' याचा सुंदर वस्तुपाठ आहे असे म्हणता येईल. असो. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

जाऊ द्या हो.

अर्धवटराव
Sun, 02/28/2016 - 10:40 नवीन
"अरविंद बरोदब दीड तास" जर "मैफिलीसारखा" रंगत असेल इतर सर्वकाहि (वेल..नॉट लिटरली सर्वकाहि.. फ्यु आर एक्स्म्प्टेड ;) ) पानि कम चाय वाटणारच :ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

विषय काय आणि प्रतिसाद काय!

विवेक ठाकूर
Sun, 02/28/2016 - 11:10 नवीन
पेपर वगैरे वाचत असाल तर संसदेचा प्लॅटफॉर्म वापरुन जनतेची दिशाभूल केल्याबद्दल, इराणी बाईंविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल होतोयं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

करेक्ट.

अर्धवटराव
Sun, 02/28/2016 - 11:52 नवीन
विषय काय आणि प्रतिसाद काय!
मलाहि नेमकं हेच वाटलं. मूळात लेख काय आणि त्यावर प्रतिसाद काय. पण मग आठवलं... न्यायदानाची हौस एका जन्मात भागत नाहि हेच खरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

न्यायदानाची हौस ?

विवेक ठाकूर
Sun, 02/28/2016 - 12:01 नवीन
स्वतः लेखक निरुत्तर आहेत आणि तुम्ही विचारतायं `लेख काय आणि त्यावर प्रतिसाद काय?' तुमचे प्रतिसाद तुम्हाला कळाले तरी पुरे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

शाब्बास.

अर्धवटराव
Sun, 02/28/2016 - 12:05 नवीन
धागा लेखक निरुत्तर आहे कि उपेक्षा करतोय हे कळणं फार अवघड नाहि. आणि रेडेओला कान नसल्यामुळे त्याला प्रतिसाद ऐकुच जात नाहि, त्यामुळे ते कळावे अशी आमचीही अपेक्षा नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

उपेक्षा?

विवेक ठाकूर
Sun, 02/28/2016 - 12:53 नवीन
स्वतःचे प्रतिसाद स्वतःला कळतायंत का ते आधी वाचून पाहा आणि जमल्यास विषयाला धरुन बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

किती छान वाटतय.

अर्धवटराव
Sun, 02/28/2016 - 13:08 नवीन
पुर्वजन्मीचे संस्कार टिकुन राहातात हे जगातल्या कुठल्याच प्रयोगशाळेत सिद्ध होऊ शकत नाहि. पण मिपाची बात हि कुछ और है.
स्वतःचे प्रतिसाद स्वतःला कळतायंत का ते आधी वाचून पाहा
तुम्हाला तसं वाटणं सहाजीक आहे.
आणि जमल्यास विषयाला धरुन बोला
तुम्हाला हेही वाटणं सहाजीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

चालुद्या (मिपाची बँड्विड्थ

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 02/28/2016 - 13:18 नवीन
चालुद्या (मिपाची बँड्विड्थ वापरून) मोफतचे स्वमतांध स्वप्नरंजन आणि स्वपाठ थोपटणे... ही सवय आता सर्वांनाच माहितीची झाली आहे... (इथे कोणी नवीन वाचक असल्यास त्यांचा गैरसमज होऊ नये यासाठीच केवळ हा प्रतिसाद प्रपंच. जुने लोक ओळखून आहेतच) अजून कळले नसल्यास : यापुढे जर एखादा वैयक्तीक, असंबंध आणि अतीभरकटलेला असा नसलेला प्रतिसाद आला तर आणि तरच अतीआश्चर्यपूर्वक त्याची दखल घेली जाईल. तशी शक्यता खूप धूसर आहे आणि हे केवळ संशयाचा फायदा देण्यासाठी लिहिले आहे. चला, हे पण जरूरीपेक्षा जास्त महत्व देणे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

काय भारी लिहीता हो !

विवेक ठाकूर
Sun, 02/28/2016 - 13:57 नवीन
जनतेची दिशाभूल केल्याबद्दल इराणी बाईंविरुद्ध सोमवारी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल होतोयं.
याबद्दल कुणाची पाठ थोपटणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पेपर वगैरे वाचत असाल तर

श्रीगुरुजी
Sun, 02/28/2016 - 14:05 नवीन
पेपर वगैरे वाचत असाल तर संसदेचा प्लॅटफॉर्म वापरुन जनतेची दिशाभूल केल्याबद्दल, इराणी बाईंविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल होतोयं.
सर्व राजवटींच्या काळात असल्या हक्कभंग प्रस्तावांना भूतकाळात केराची टोपली नशीबात आली होती आणि यावेळीही केराची टोपलीच नशिबी येणार आहे. असले हजारो हक्कभंग प्रस्ताव आले तरी त्यामुळे कोणालाही शष्प फरक पडत नाही. विश्वास बसत नसेल तर पुढील आठवड्यात या प्रस्तावाचं काय होतंय ते बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

ते बघूच पण मूळ मुद्दा तसाच राहातो !

विवेक ठाकूर
Sun, 02/28/2016 - 14:24 नवीन
बाईंचं भाषण म्हणजे दामटून खोटं बोलण्याचा वस्तुपाठ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

म्हणजे तुम्हाला खरं माहित आहे?

बोका-ए-आझम
Sun, 02/28/2016 - 16:56 नवीन
मग सांगा इथे. शिवाय एखाद्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याने तो दोषी सिद्ध होतो हा नवीन नियम झालाय हे माहित नव्हतं. शिवाय ज्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणलाय ते राजा हरिश्चंद्राचे अवतार आहेत त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट म्हटली की ती सत्यच असणार. मग प्रश्नच मिटला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

तुम्ही वरचे प्रतिसाद वाचलेत का?

विवेक ठाकूर
Sun, 02/28/2016 - 17:17 नवीन
बाई काय खोटं बोलल्यात ते वर सप्रमाण दिलंय त्यामुळे दोष तर उघड आहे. आणि तुम्ही तर भलताच ज्योक मारतायं, हक्कभंगाचा ठराव येणं याचा ना खेद ना खंत, वर ठराव आणणारे कोण आहेत? तुम्हाला लेखाचा विषय काय आहे याची तरी कल्पना आहे का? लेखकाच्या मते :
मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ? याचं सदर भाषण हा `वस्तुपाठ' आहे
आणि बाईंच्या मुद्दलातच खोट आहे असा शाबित केलेला प्रतिवाद आहे. तस्मात, विषय काय आहे ते बघून प्रतिसाद द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तुम्हाला अक्कल आहे असा संशय होता.

बोका-ए-आझम
Sun, 02/28/2016 - 18:42 नवीन
आता तो पूर्णपणे निघून गेला. झिकरुल्लाह निशा आणि डाॅ.राजश्री यांना तुम्ही वैयक्तिकरीत्या ओळखता का? एकदा आयडी बॅन होऊनपण अक्कल आलेली दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

अरे वा !

विवेक ठाकूर
Sun, 02/28/2016 - 19:10 नवीन
तुम्हाला वाचता तरी येतं असं वाटत होतं पण तुम्ही तर त्या खालची पातळी देखिल गाठू शकता हे दाखवून दिलं ! इथे व्यक्तींना ओळखण्याचा प्रश्नच येत नाही , पुरावे तर्कशुद्ध आहेत का हे महत्वाचं होतं पण ते बहुदा तुमच्या आवाक्या बाहेर दिसतंय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

जशी तुमची पातळी तशी आमची पातळी!

बोका-ए-आझम
Sun, 02/28/2016 - 21:00 नवीन
आम्ही गि-हाईक बघून पुडी बांधतो.तुमच्यासारख्या अहंमन्य लोकांना तीच भाषा समजते. काय करणार? सरकारने मानसिक रुग्णांसाठी रुग्णालयं काढली आहेत. पण तुमच्यासारख्या मूर्खांसाठी काहीच ठेवलं नाही. Btw, तुम्हाला स्वाभिमान नाही का हो? एकदा जिथे आयडी बॅन झाला, तिथे परत येणं म्हणजे लाळघोटेपणाशिवाय आणखी काहीही नाही. आणि परत आपल्या मूर्खपणाची हद्द दाखवतात इथे. जाऊ दे. लहानपणीच चांगले संस्कार झाले असते तुमच्यावर तर अशी वेळ आली नसती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

मग सांगा इथे. शिवाय एखाद्यावर

श्रीगुरुजी
Sun, 02/28/2016 - 21:10 नवीन
मग सांगा इथे. शिवाय एखाद्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याने तो दोषी सिद्ध होतो हा नवीन नियम झालाय हे माहित नव्हतं. शिवाय ज्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणलाय ते राजा हरिश्चंद्राचे अवतार आहेत त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट म्हटली की ती सत्यच असणार. मग प्रश्नच मिटला!
जेव्हा काहीच करता येत नसते, आपली बाजू पूर्ण लंगडी असते, आपण पूर्ण उघडे पडलेलो असतो तेव्हातेव्हाच असले हक्कभंग प्रस्ताव आणले जातात. एखाद्या मंत्र्याने एखादी घोषणा अधिवेशन सुरू असताना सभागृहाऐवजी सभागृहाबाहेर केली तर लगेच सभागृहातील आमदारांच्या हक्काचा भंग झाला असा आरडाओरडा करून हक्कभंग प्रस्ताव आणला जातो. त्याला अर्थातच काहीही अर्थ नसतो. राज्यसभेत विरोधकांचे बहुमत असल्याने मुद्दाम लोकसभेऐवजी राज्यसभेत हा प्रस्ताव येणार आहे. त्यावरील मतदानात सरकारऐवजी विरोधकांच्याच बाजूने जास्त मते पडणार आहेत. पण त्याने शष्प फरक पडणार नाही. जे भाषण स्मृती इराणींनी लोकसभेत केले तेच भाषण त्यांनी राज्यसभेत केले. परंतु लोकसभेत विरोधकांची हक्कभंग प्रस्ताव आणण्याची हिंमत नाही कारण तो प्रस्ताव तिथे मंजूर होणारच नाही. स्मृती इराणी खरोखरच खोटे बोलल्या याबद्दल विरोधकांची खात्री असती तर प्रस्ताव नामंजूर होणार हे दिसत असूनसुद्धा त्यांनी हक्कभंग प्रस्ताव लोकसभेत सुद्धा आणता आला असता. निदान त्यानिमित्ताने चर्चा होऊन त्यांचा तथाकथित खोटेपणा उघडकीला आणता आला असता. पण ते करायची हिंमत नाही. राज्यसभेत बहुमत असल्याने विरोधक फक्त तिथेच प्रस्ताव आणणार. राज्यसभेत विरोधक असल्याने वाटेल तो प्रस्ताव आणला तरी तो मंजूर होणारच आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. निरूद्योगी विरोधकांना त्यामुळे थोडावेळ गारगार वाटेल इतकंच. लोकसभेत जे भाषण अधिकृत रेकॉर्डमध्ये गेले आहे त्याच्याबद्दल कोणताही अधिकृत आक्षेप लोकसभेच्या कामकाजाच्या नोंदीत नसेल. पण राज्यसभेत जर सभापतींनी स्थगन प्रस्ताव चर्चेला घेऊन त्यावर मतदान घेतले तरच त्यावरील आक्षेप कामकाजाच्या नोंदीत येतील. म्हणजे एका सभागृहात त्या भाषणावरील आक्षेप अधि़कृत कामकाजात असतील तर दुसर्‍या सभागृहात तेच भाषण आक्षेपविरहीत असे कामकाजात नोंदले जाईल. एकंदरीत त्यामुळे शून्य फरक पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

२८२ वगैरे

चौकटराजा
Mon, 02/29/2016 - 09:09 नवीन
आपल्याला नक्की आकडा म्हईत नाही पण तो मेजारिटीत असल्याने हक्कभंग कचर्‍यात जाणार हे नक्की. कारण आपल्या भार्तात व्यक्ति निवडून येत असली तरी पक्ष नावाची एक संस्था जो पर्यंत अस्तित्वात आहे तो पर्यन्त सत्दविवेकाने मतदान असंभव .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आणि अजून एक तुमच्या लक्षात आलं की नाही गुरुजी?

बोका-ए-आझम
Mon, 02/29/2016 - 15:19 नवीन
नेहमी व्यक्ती मूळात कशी आहे यावर तीच्या वक्तव्याची किंमत ठरते.
हे विठांच्या प्रतिसादातलं वाक्य आणि त्यांच्या प्रतिसादांत त्यांनी स्मृती इराणींना लावलेली खोटारडेपणाची लेबलं पहा. यांनी आधीच ठरवून ठेवलेलं आहे की स्मृती इराणी खोटं बोलत आहेत आणि बाकीचे सगळे खरं बोलताहेत. पूर्वग्रहदूषित म्हणतात ते यापेक्षा वेगळं काय असतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हे फार पूर्वीच लक्षात आले आहे

श्रीगुरुजी
Mon, 02/29/2016 - 20:44 नवीन
हे फार पूर्वीच लक्षात आले आहे. यांचे विचार पूर्वग्रहदूषित आहेत हे २०१४ पासूनच माहिती आहे. पण यांच्या विचारांशी जे सहमत आहेत ते 'सुज्ञ व विचार करू शकणारे' आणि नाहीत ते 'माथेफिरू' अशी विभागणी त्यांनी केव्हाच करून टाकली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

@एक्का

कपिलमुनी
Sat, 02/27/2016 - 15:43 नवीन
या भाषणामधल्या (काही ) खोट्या गोष्टी उघड होत आहेत, ज्या स्मृती ईराणी यांनी संसदेत चुकीच्या सांगितल्या आहेत त्याला सुद्धा खोट्याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे का ?
  • Log in or register to post comments

वर प्रतापरावांनी एकदम सही विधान केलंय ते पुनरुधृत करतो

विवेक ठाकूर
Sat, 02/27/2016 - 15:56 नवीन
बोलबच्चनला भुलणारी आपली जनता आहे !
त्यामुळे सदर लेख आणि भाषणाची भलामण करणारे प्रतिसाद सदर विधानाचा आदर्श वस्तुपाठ आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

ठाकूर महोदय

आरोह
Sat, 02/27/2016 - 17:07 नवीन
दुर्गा महिषासुर प्रकरणावर आपले काय मत आहे
  • Log in or register to post comments

एक मिनिट

याॅर्कर
Sat, 02/27/2016 - 17:20 नवीन
चर्चा पुराणकथांवर न घसरलेलीच बरी असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोह

हे मात्र खरे आहे की, अवकाशात

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 02/27/2016 - 17:34 नवीन
हे मात्र खरे आहे की, अवकाशात फिरणार्‍या तरंगांना पकडण्याची आणि त्यांची उकल करण्याची ताकद असणारा (महा)मानवच, हजारो वर्षांपूर्वी झाला असा दावा असलेल्या त्या महिषासूरमर्दनाच्या प्रसंगाची, यथार्थ उकल करून त्यामागचा योग्य मतितार्थ शोधून काढून, केवळ सकल विश्वाच्या भल्यासाठी, विश्वाच्या माथावर थोपून, विश्वाचे भले करू शकेल; असा विश्वास ठेवायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोह

चांगली चर्चा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/28/2016 - 18:04 नवीन
निष्कर्ष १) स्मृती इराणींचे भाषण मुद्देसूद, पुराव्यासहित, भावनिक आणि आवेशपूर्ण होतं, भाजप मधे काही जेष्ठ नेत्यानंतर त्यांचंही नाव भाषनासाठी घेतलं पाहिजे. २) स्मृती इराणी खोटं बोलत आहे, अपूर्ण माहितीवर बोलत आहेत. संसदेत त्याच्या विरोधात विरोधीपक्ष संसदेत हक्कभंग प्रस्ताव आणत आहेत. ३) हक्कभंग प्रस्ताव आणल्याने काही थोर गोष्ट होणार नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

डिबी

विवेक ठाकूर
Sun, 02/28/2016 - 19:15 नवीन
प्रश्र आवेशपूर्ण आणि भावनिक बोलण्याचा आहे का खरं बोलण्याचा आहे याचा एकदा विचार करून पाहा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/28/2016 - 19:33 नवीन
संक्षि सेठ ! ठीक आहे मुद्दा मान्य करू विषय भावनिक नाही, त्या खोट्याही बोलल्या असतील पण बोलल्या कशा ते सांगा ना ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

आहो त्यांना काय डायलॉगबाजी करायला मंत्री केलंय का ?

विवेक ठाकूर
Sun, 02/28/2016 - 20:03 नवीन
सचोटी महत्वाची का टिआरपी वाढवायला केलेली भाषणबाजी ? मग सिनेमा आणि संसद यात काय फरक राहीला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोण करत नै तसं ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/28/2016 - 20:27 नवीन
राजकारणी लोक सर्व सारखेच. मग ते कोणत्याही पक्षाचे असो आपल्याला काही पटतं काही पटतं काही पटत नाही. काही खोटार्ड़े वाटतात आणि कारण नसतांना प्रामाणिक वाटतात. प्रामाणिक वाटलेले लोक आपल्याला कधी पुन्हा खोटार्ड़े वाटतात. आपण नागरिक म्हणून कोणाच्याही मताने वाहून जाऊ नये. विठा तुम्ही तर नैच नै. आबेदा प्रवीणच्या गायकीवर तुम्ही धागा काढा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

जशी नगरी तसा राजा

विवेक ठाकूर
Sun, 02/28/2016 - 20:53 नवीन
आता यापुढे काय बोलणार डिबी ? सुजाण समजून घेतील आणि खोटयानां घरी बसवतील तर राजकारणात बदल घडेल . सगळेच सारखे म्हणून करा देशाचं वाटोळं असा दृष्टीकोन ठेवून कसं चालेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या माझ्या मताला काही किम्मत आहे का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/28/2016 - 21:03 नवीन
तुमचं माझं मत या लोकांना बदलू शकत नाही. व्यवस्थेत इराणी लोकांनी नाकारली तरी ती आपल्या समोर संसदेत असते. आपल्याला राहुल गांधी पटत नाही, आणि मोदी फेक पंतप्रधान वाटतात तरीही आपण दोघांना स्वीकारतो. बदल ना ते करतात ना बदल हे करतात आपण दगडापेक्षा वीट मऊ स्वीकारतो. आणि नेहमीच आपली फसगत होत असते आपण नागरिक खुप स्वप्नाळु असतो आणि आपल्या वाटेला असं हे सर्व येतं. कशाला आपण इतकं भावनिक व्हायचं ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

बरोबर प्राडाॅ!

बोका-ए-आझम
Sun, 02/28/2016 - 21:08 नवीन
आम्हाला इथले काही फेक आयडी पण पटत नाहीत. त्यांना चपला घालून चालू पडायला तर सांगू शकतो की नाही? पण ते परत येतात आणि आपलं नसलेलं ज्ञान झाडतात. अशांचं काय करावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डिबी,

विवेक ठाकूर
Sun, 02/28/2016 - 23:32 नवीन
नेहमीच आपली फसगत होत असते आपण नागरिक खुप स्वप्नाळु असतो आणि आपल्या वाटेला असं हे सर्व येतं. कशाला आपण इतकं भावनिक व्हायचं ?
किमान समोर असलेल्या फॅक्ट्सवरुन आपण मत बनवू शकत नसलो तर मग शिक्षणाचा काय उपयोग? आणि या रितीनं तर परिस्थिती आणखी बिघडत जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या बाबतीत तर कशाचाच काही उपयोग नाही.

बोका-ए-आझम
Mon, 02/29/2016 - 10:03 नवीन
तुम्ही फक्त साक्षर आहात, सुशिक्षित नाही.स्वाभिमानी तर त्याहून नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

संक्षि सेठ ! ठीक आहे मुद्दा

श्रीगुरुजी
Sun, 02/28/2016 - 21:18 नवीन
संक्षि सेठ ! ठीक आहे मुद्दा मान्य करू विषय भावनिक नाही, त्या खोट्याही बोलल्या असतील पण बोलल्या कशा ते सांगा ना ?
त्यांच्या ४९ मिनिटांच्या भाषणातील अनेक मुद्द्यांपैकी नक्की कोणते व नक्की किती मुद्दे खोटे होते या विचारणेवर अजून योग्य उत्तर आलेले नाही. संपूर्ण ४९ मिनिटांचे भाषण खोटे होते का, त्यात कणभरही खर्‍याचा अंश नव्हता का यावर काहीही उत्तर नाही. त्याऐवजी "इराणी भाषणात फेकंफाक करीत होत्या", "त्या भाषणात खोटे बोलल्या", "बाईंचं भाषण म्हणजे दामटून खोटं बोलण्याचा वस्तुपाठ आहे. " असे सरसकटीकरण केले गेले. अर्थात काही आयडींकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ

नाखु
Mon, 02/29/2016 - 09:00 नवीन
सुहास म्हात्रे सर धन्यवाद. तुमच्या धाग्याने काही आय्डी (पुनरुजीवीत प़क्षी लिहिते झाले) हे चांगले झाले. मुद्देसूद चर्चेचे दिवस सरले असे वाटताना ही काळ्या ढ्गाची सोनेरी किनार आवडली. गंमत म्हणजे मुंबईतल्या सेना पराक्रमाविषयी कायदेशीरका धागा निघाला नाही.
  • Log in or register to post comments

@

प्रदीप साळुंखे
Mon, 02/29/2016 - 11:37 नवीन
अरे रे रे काय कशाला कीस पाडत बसताय एवढा सगळेजण तुम्ही. नेते सुखात अन् समर्थक दुखात
  • Log in or register to post comments

असत्यमेव जयते!

विवेक ठाकूर
Mon, 02/29/2016 - 12:50 नवीन
महाराष्ट्र टाइम्सचा हा आजचा अग्रलेख वाचनीय आहे. तो बाईंच्या भाषणामागच्या विदारक वस्तुस्थितीचं यथार्थ वर्णन करतो. सदर लेख मिपावरच्या माथेफिरुंच्या आकलनाच्या आवाक्या बाहेर आहे, पण सुज्ञ आणि विचार करु शकणार्‍यांना परिस्थिती नक्की काय आहे याची निश्चित कल्पना येईल.
  • Log in or register to post comments

ऑ

चेक आणि मेट
Mon, 02/29/2016 - 14:56 नवीन
सदर लेख मिपावरच्या माथेफिरुंच्या आकलनाच्या आवाक्या बाहेर आहे,
काय सांगता हा लेख तुमच्या आवाक्याबाहेर आहे? मला पटत नाही ब्वा!
पण सुज्ञ आणि विचार करु शकणार्‍यांना परिस्थिती नक्की काय आहे याची निश्चित कल्पना येईल.
प्रस्थापितांविरूद्ध लिहण्याची वर्तपानपत्रांची जुनीच खोड आहे ती! मग प्रस्थापित कोणीही असू दे काँग्रेस किंवा भाजप,त्यांना काही फरक पडत नाही,त्यांना त्यांच्या पेप्राचा खप महत्वाचा. सूज्ञ आणि विचार करणारे फार कमी आहेत हो!! नाहितर परत काँग्रेसच निवडून आली असती. काय म्हणता?
बोलबच्चनांच्या भूलथापांना जनता बळी पडते
अगदी खरं आहे,काँग्रेसच्या 50 वर्षाच्या राजवटीतही जनता कायम भूलथापांना बळी पडत होती. काय करणार ना?सूज्ञ आणि विचारी लोकांची कमतरता दुसरं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा