1) देवाला मी सांगितले
आणू नको कुणावरही ही वेळ.....
मांडू नको आयुष्याचा
तू पुन्हा असा खेळ......
2) मी करतो साजरा उत्सव
माझ्या हृदयातील दु:खाचा.....
मी तर जगेल कसबसा
प्रश्न आहे तुझ्या जीवनाचा.......
3) आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......
4) तेव्हा सागर किनारी साक्षीने
तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू
तो चंद्र ढगात लपता........
5) जर जायचेच होते आयुष्यातून
तर जीवनात का आलिस....
राख भरली स रांगोळीत
आणि रंग घेऊन गेलिस.......
6) सगळे काही संपवले मी
पण त्याआधी तूच संपवले होते.....
मनातले ओठांवर आलेच नाही
तू सारे काही लपवले होते........
7) एकही दिवस जात नव्हता
प्रिये, तुझ्या चुंबनाशिवाय.....
विसरलीस लिहाले होते पत्रात
"तू मला आयुष्यभरासाठी हवाय".......
प्रतिक्रिया
5 Feb 2009 - 11:53 am | दशानन
ती व मी !
:)
छान !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
5 Feb 2009 - 11:57 am | मदनबाण
आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......
क्या बात है....
तुमचा पण तू मात्र चा पहिला भाग पण छान होता..
मदनबाण.....
:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
5 Feb 2009 - 12:09 pm | sanjubaba
आभारी आहे.....मदनबाण प्रतिसादाबद्दल. हा पामराचा फक्त एक प्रयत्न.....
आपला,
प्रेमभंगी संजूबाबा
5 Feb 2009 - 12:27 pm | मदनबाण
प्रेम भंग झाले तरी
कधीच खचायचे नसते...
गोड आठवणींच्या
आधारानेच आयुष्य जगायचे असते...
मदनबाण.....
:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
5 Feb 2009 - 12:28 pm | शेखर
सुंदर कविता व सुंदर प्रतिसाद
5 Feb 2009 - 12:48 pm | दशानन
मदण्य़ा !
जिओ !!
क्या बात है !!
लै भारी !
मस्तच !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !