संध्याकाळचे सात-साडेसातला कुकरची शिट्टी होऊ लागली, की
तिच्या सूऊऊऊ आवाजाच्यानंतर ,कधी आधी
"चंदनाची चोळी अंग अंग जाळी... बाई ठिपक्यांची.. ठिपक्यांची.."
असा तालामुरातला खडा आवाजान गाणारा बेवडा ऐकू यायचा.
घरासमोरच्या मुख्य हमरस्ता कायम वाहता असतो.फाटक्या शर्टमधला तो मळका दारूडा झिंगत रस्त्याहून धीमेपणाने घरी जायचा .
बर नुसता झिंगायचा नाही तर वरच्या पट्टीत गात चालायचा. "चंदनाची चोळी अंगजाळी, बाई ठिपक्यांची हे त्याचे विशेष गाणं होत.
"बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची ..."
हे तो इतकं अप्रतिम गायचा. वरच्या आवाजात बाई ठिपक्यांची गात हळू हळू आवाज करत, बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची.. म्हणत सूर लावायचा.दारूड्याला हेच गाणं का गावं वाटतं.कोण्या बाईने त्याला नादावलं,आणि तो दारूडा झाला असेल का?? परत प्रश्न पडायचा.
ज्यांनी पहिल्यांदा हे ऐकलं ते बाहेर डोकावून पाहत. पण आता त्याची सवय झाली होती, तो झिंगत गात रस्त्यावरून जायचा तेव्हा त्याच्या तालात घरातच माना डोलायच्या.वाटायचं,काय भारी आवाज जरा नशीबवान असता तर याने मैफिली जमवल्या असत्या.बेवडा नाही केवड्याच्या सुंगधासारखा दरवळला असता.
त्याचं दुसरं गाण असायचं..
" जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर"
त्यात तो" जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर "
हे अगदी बेंबीच्या देठापासून वरच्या पट्टीत गायचा.
"जैसे ज्याचे कर्म?"
बेवड्याला नक्की स्वतःचे तरी कर्म समजत आहे का? मूळात व कर्म ,त्याचे फळ उमगल? जर हो तर का तो दारु पित असावा?
पण दारूड्याला ईश्वर नक्की मान्य असणार??
पांढरपेशा मला प्रश्न पडायचे?
आता दारूडा दिसत नाही, म्हणजेच ऐकू येत नाही. कुठल्या प्रवासात गेला काय माहिती?..
-भक्ती
प्रतिक्रिया
1 Jul 2025 - 9:40 pm | कर्नलतपस्वी
तळीरामांचा सूर्योदय होतो.
मुक्तक आवडले.
2 Jul 2025 - 7:27 am | विवेकपटाईत
गोष्ट आवडली. तळीराम डोळ्यांसमोर उभा राहिला.
2 Jul 2025 - 11:09 am | Bhakti
दोघांच्या प्रतिसादात उल्लेखल्यामुळे तळीराम आठवला...
एकच प्याला मराठी नाटकामुळे अजरामर झालेला तळीराम!
2 Jul 2025 - 11:46 am | गवि
तळीराम हा विनोदाचा विषय आहे. लेख सुंदर आहे. लेखात जो उल्लेख केला आहे की खुद्द मद्यपि व्यक्तीला ते कळत नसेल का? तर याचे उत्तर हेच की मद्यपाश हा एक गंभीर आजार आहे. तळीराम वगैरे विनोद ठीकच पण त्यात अनेकदा हा विचार नसतो. आणि तो आजार दुर्धर आहे. रुग्णाला मदत करणे किंवा वाचवणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याची बिकट अवस्था होऊ शकते. म्हणून कोणी ते करायला जात नाही.
2 Jul 2025 - 12:15 pm | Bhakti
होय, मैत्रीणाचे मावसभाऊ अशाच व्यसनापायी अकाली वारले.ती सांगायची कोणी कोणीच काही करू शकत नव्हते.केवळ वाताहत पाहणे हेच उरले.वंशच संपला.
2 Jul 2025 - 3:28 pm | श्वेता व्यास
चांगला लेख, फक्त ते शीर्षक जेव्हा जेव्हा डोळ्याखालून जातंय तेव्हा सुनील दारुडा वाचलं जातंय माझ्याने :D
2 Jul 2025 - 4:31 pm | Bhakti
हा हा,सुनील पाहतोय/वाचतोय हं ;)
आधी मी बेवडा असं शीर्षक दिलं होतं ,हा हिंदी शब्द आहे ना पण!
2 Jul 2025 - 6:37 pm | श्वेता व्यास
हा हा,
होय, आधीच सध्या हिंदी-मराठी वाद जोरदार चालू आहेत :)