पाणावलेल्या डोळ्यांमधुनी
काय निखळले अश्रू होऊनी
सुरुवात जाहली सांडायला
काय भावना होत्या त्या,
त्या, का नाही टिपल्या पापण्यांनी
रूळली अधरांवरती काही,
काही ओघळली गाली
काय मोल त्या आसवांना ,
ते तर फक्त खारट पाणी
असो विरह कि सुखाची मिठी
एकसारखे थेंब मग
ओळखावी कशी चव
वेगवेगळ्या भावनांची कोणी.....
- प्रणया
प्रतिक्रिया
14 Apr 2019 - 6:38 am | प्रचेतस
उत्तम
19 Apr 2019 - 4:55 pm | चौथा कोनाडा
.
सुरेख !
आवडली कविता.
19 Apr 2019 - 6:28 pm | प्रणया
धन्यवाद