वास्तवाला स्विकारुन , स्वप्नांना खोटं म्हणावं लागतं
दुःख ठेऊन मनात , जगासमोर हसावं लागतं
कधी कधी ,
स्वतःला विसरून , मनाविरुद्ध वागावं लागतं
अपेक्षांचं ओझं , डोक्यावरतीच असतं
वाईट काळातच , खरं जग दिसतं
तरी दुर्लक्ष करून , सारं विसरावं लागतं
कधी कधी ,
ओळख असून सुद्धा , अनोळखी बनावं लागतं
पंख असूनसुद्धा , जमिनीवरच घरटे
मोकळे ते आकाश , पाहण्यासाठीच उरते
कुवत असलीतरी , पिंजऱ्यातच राहावं लागतं
कधी कधी ,
परिस्थितीपुढेसुद्धा , नतमस्तक व्हावं लागतं
देती साऱ्या जगा , ते अल्पायुषी झाले
देता देता सारे , जरा घाईत मरून गेले
चांगलं देण्यासाठी , अपमानाने भरावं लागतं
कधी कधी ,
अमर होण्यासाठी , क्षणोक्षणी मरावं लागतं
सारं दिसूनसुद्धा , तोंड मुकं होई
भीतीपोटी कधी , दृष्टीसुद्धा जाई
पेटलेल्या मनाला , शांत करावं लागतं
कधी कधी ,
आगीलाही त्या , पाण्यात शिरावं लागतं
संधीकडे कडे कधी , डोळे बघत असतात
व्याकूळतेने फक्त , एक क्षण मागत असतात
संधी मिळत नाही , तरी आशेत राहावं लागतं
कधी कधी ,
इच्छा नसतानाही , हात बांधून जगावं लागतं
तडजोडींशीच मग , जिव्हाळा वाटू लागे
संकटांची मालिका घेऊन , नियती येई मागे
जिंकता जिंकता कधी , उगाचच हरावं लागतं
कधी कधी ,
पूर्ण संपूनही , थोडसं तरी उरावं लागतं
- अभिषेक पांचाळ
प्रतिक्रिया
6 Apr 2016 - 11:28 pm | चांदणे संदीप
होई-जाई, झाले-गेले, असतात, लागे-लागतं.... यात कुठेतरी कवितेचा आत्मा गुंडाळत जाऊन न सुटणारा, धाग्याचा गुंता होऊ पाहतोय.
जरा शब्द/ओळी कमी करून अजून प्रभावी करता येते का बघा. चांगलच लिहिता अभिषेकराव!
Sandy
6 Apr 2016 - 11:43 pm | अभिषेक पांचाळ
Kk..thanx
6 Apr 2016 - 11:43 pm | अभिषेक पांचाळ
नक्की प्रयत्न करेन