झाडूने स्वच्छ केला
कचरा कमळ फुलांचा
स्वच्छता अभियानाचा
राजा तोच ठरला.
फ्रीची वीज
फ्रीचे पाणी.
रात्र अंधारी
घाघर रिकामी.
(मी जिथे राहतो त्या गल्लीत पाणी येत नाही, पुढील ५ वर्षे पाणी येण्याची संभावना ही नाही- कारण पाणी देण्याचा वादा केलेला नाही -२.५० कोटीच्या दिल्लीत १ कोटी लोकांच्या घरी पाणी येत नाही, अर्थातच पाणी मिळाले तरी लोकांच्या घरी पोहचवता येणार नाही या साठी जवळपास पूर्ण यंत्रणा दुरुस्त करावी लागेल किंवा नवीन यंत्रणा उभारावी लागेल अंदाचे दहा बारा हजार कोटी खर्च येईल. जिथे दिल्ली जल बोर्ड ला हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान दरवर्षी होती तिथे हे नुकसान आणखीन वाढणार तात्पर्य एवढेच - पाण्यासाठी टेंकर वर निर्भर राहावे लागणार).
प्रतिक्रिया
15 Mar 2015 - 9:59 pm | ज्योति अळवणी
अरेरे