भातुकलीचा रंगलेला संपला ग डाव
आता तुला गाठायचा आहे तुझा गाव
आवर सारे तुझे तुझ्या सोबती घेऊन जा
आठवणी तुझ्या इथे तेवढ्या ठेवून जा
तुला पुन्हा मांडायचा आहे नवा खेळ
तुझ्या माझ्या सोबतीची संपली ग वेळ
विसर सखे ओळखीच्या जुन्या वाटा सार्या
हृदयाशी बांधलेल्या सोड जुन्या दोर्या
हरवुदे सोबतीने गुंफलेली माळ
हरवुदे वाट आडवळणी खट्याळ
खुणावती तुला तुझ्या नशिबाच्या रेघा
तुला-मला जोडणारा तोड आता धागा
नको सखे निरोपाचे उगा अश्रू ढाळू
जायचीच निसटून हातातली वाळू
सोसायचा तुझ्या-माझ्या नात्याला दुरावा
जायचे जरी तुला ग सखे तुझ्या गावा...
राहीन मी तुझ्या उरामध्ये ग दाटून
कधी तुझ्या डोळ्यातून येईन बरसून .....
-अदिती शरद जोशी
प्रतिक्रिया
28 Apr 2014 - 8:56 am | मिसळलेला काव्यप्रेमी
छान!
28 Apr 2014 - 3:08 pm | अत्रुप्त आत्मा
ठीक!
29 Apr 2014 - 5:47 pm | शुचि
फारच सुंदर!! एका जोडीदाराचा जीवनप्रवास संपताना अशाच काही भावना सहचराच्या होत असाव्यात :(
29 Apr 2014 - 10:29 pm | मनीषा
सुंदर
2 May 2014 - 2:29 pm | वेल्लाभट
सुरेख! नि:शब्द.