अशाच एका सांजवेळी
भेट व्हावी आपुली अवेळी
एकांत असावा तेव्हा तेथे
नसावे कोणी अवतीभवती
परतणार्या पक्षांचीही
दाटी नसावी अवतीभवती
काळोखातही लख्ख दिसावा
चेहरा तुझा चन्द्रकोरीसारखा
पापण्यांची उघड-झाप असावी
जणु चमचमणार्या तारका
गार वार्याची झुळुक येईल
उब घ्यावीशी तुला वाटेल
हातांचा ऊबदार स्पर्श अन्
उश्वासांची साथ भेटेल
मुकी जरी तु उभी असलीस
पैंजण सारे बोलुन जातात
चांदण्यात फिरावयास मग
पाऊले अलगद चालु लागतात
जरी शांतता असली चहुकडे
गाणे मनी गुणगुणत असते
तालावरती पावलांच्या
सतार मनी छेडत असते
निरोपाचा क्षण येतो जेव्हा
वाट सापडु नये असे वाटते
मी हसण्याचा प्रयत्न करतो
पाणी तुझ्या डोळ्यात दाटते
--- कवि म.ना.दे.
प्रतिक्रिया
24 Dec 2013 - 8:42 pm | जेपी
छान कविता .
25 Dec 2013 - 5:14 pm | पंडित मयुरेश ना...
आपण जन्माला घातलेल्या मुलाला जेव्हा कोणी चांगल म्हणत तेव्हा खुप बर वाटत.
कवितेचही अगदी तसच आहे.
25 Dec 2013 - 7:19 pm | विवेकपटाईत
मस्त कविता आवडली