आला सोसाट्याचा वारा
गेले छ्प्पर ऊडुन।
मातीच्या चार भिंती
गेल्या पाण्यात बुडून॥
गोठ्यातील जनावरे
गेली जलप्रवासाला।
शेत जमिनही त्याची
तिचा पिकपात झाला॥
आली सरकारी फौज
गेली पहाणी करुन।
झालेले नुकसान
म्हणे देऊया भरुन॥
पूर्ण झाले वर्ष एक
नाही मदत पोह्चली।
सावकाराच्या कर्जापाई
त्याची कंबर खचली॥
झाला कर्जाचा डोंगर
चिंता मनाला वाटली।
खचले आत्मबळ त्याचे
"फाशी" झाडाला घेतली॥
प्रतिक्रिया
3 Apr 2013 - 3:40 pm | नानबा
वाचून चर्रर्रर्रर्रर्रर्र झालं मनात.
3 Apr 2013 - 6:32 pm | पक पक पक
वाचुन मन सुन्न झाले... .....
3 Apr 2013 - 6:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवितेतील आशय उत्तमपणे कवितेत उतरला आहे. पण शीर्षक काही पटलं नाही. म्हणजे माझ्या कवितेत शेतकरी आत्महत्त्या करतो हे वाचा अशा हेतूचे शीर्षक वाटले.
पुढील कवितेसाठी शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
4 Apr 2013 - 11:02 am | Bhagwanta Wayal
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार !!!
4 Apr 2013 - 11:50 am | यशोधरा
ह्म्म..
4 Apr 2013 - 12:08 pm | अत्रुप्त आत्मा
:(
4 Apr 2013 - 12:57 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सुन्न!!