तुला पत्र लिहिताना
'काय' लिहावं
असा प्रश्न कधी पडला नाही
आणि 'किती' लिहावं
याचं भान कधी राहिलं नाही
आज मात्र
नेहमीपेक्षा वेगळंच घडलंय......
अजून कागदावर
एकही अक्षर
उमटलं नाहीये हे......
पानभर लिहून झाल्यावर
लक्षात आलंय
...आणि तू हे न लिहीलेलं पत्र
पोहोचलं म्हणालीस?
------------------------------------------------------------------------
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
24 Jul 2012 - 10:58 am | संजय क्षीरसागर
एकही अक्षर
उमटलं नाहीये हे......
पानभर लिहून झाल्यावर?
पण, मंदार या ओळी आवडल्या :
तुला पत्र लिहिताना
'काय' लिहावं
असा प्रश्न कधी पडला नाही
आणि 'किती' लिहावं
याचं भान कधी राहिलं नाही
सुरेख!