मनमोहन असताना सगळ काही ठीक आहे
सत्ताधार्यांना सोनियाचा दिन, जनता मागते भीक आहे.
कॉमनवेल्थ घोटाळा करुन कलमाडी सध्या घरी आहेत.
पॄथ्वी राजाच राज्य सध्या टोळ लुटण्यात मग्न आहे.
प्रणव आता राष्ट्रपती होतील अशी आता आशा आहे.
पाऊस पडला तरी पैकाविना शेती कशी ? शेतकरी राजा निराश आहे.
नव नविन कर घेण्यात सरकार घेते आघाडी आहे.
सोयी सुविद्या पुरविण्यात ह्यांची नेहमीच पिछाडी आहे.
सरकार म्हणावे कसे? हा तर देश लुटण्याचा लुटारुंचा खेळ आहे.
आता थांबवा हे सगळ कारण झोपलेली जनता जाग व्हायची वेळ आली आहे.
झोपलेली जनता जाग व्हायची वेळ आली आहे.
प्रतिक्रिया
19 Jun 2012 - 1:36 pm | कवटी
विचार आहेत ठिक, पण मिटर साफ गंडलं आहे.
19 Jun 2012 - 3:25 pm | शैलेन्द्र
साहेब, नय्य जम्या.. "हुश्य....., झाली एकदाची" या टाइपची कविता..
19 Jun 2012 - 3:28 pm | निश
शैलेन्द्र साहेब, आक्षेप एकदम मान्य.