विषादाने मन ओतप्रोत भरलेलं
असताना, अंगावर येणारी झुळूक,
तुझं आस्त्तित्व जाणवून देणारी..
तुझं सुंदर हिरवंगार,
रूप पाहून
मळभाने दूर सरावंच!
निराशा झटकण्यासाठी,
नव्या जोमाने लढण्यासाठी,
चैतन्याला जिवंत ठेवण्यासाठी,
खरं तर-
जगण्याचंच बळ मिळवण्यासाठी,
पुन्हा तुझाच आधार,
तुझीच गरज...!
कधी कधी मग आपसूकच मिळतं उत्तर-
का तुझ्या इतकी जवळ आहे ते..
फक्त,
तू प्रलय घडवून आणू नकोस...!
प्रतिक्रिया
1 Jun 2012 - 12:06 pm | अमृत
पण ती उरलेली पत्रं कुठं दिसत नाहीत. नाही म्हणजे पत्रांचा स्टॉक(अस्तित्व :-)) संपला असेल तर कळवा पाठवून देतो. पण असं मधुनच मालिका तोडणं काही बरं नाही. आशा आहे भावना पोचल्या असतील.
अमृत
1 Jun 2012 - 12:38 pm | वेणू
अमृतजी,
केलाय भाग तिसरा पोस्ट, आभारी आहे.
3 Jun 2012 - 11:38 pm | रघु सावंत
वेणू तुला नक्की काय सांगायच होतं ते सांग. रघू