.पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
.
.
धमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
प्रणयवासनेला सिमा ना वयाची
न तो वृद्ध होतो, न ती वृद्ध होते
जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते
किती साचुदे गाळ-कचरा तळाशी
तरी धार नाहीच अवरुद्ध होते
जसा बाज गझलेस येतो मराठी
तशी मायबोलीच समृद्ध होते
कशाला ‘अभय’ काल गेलास तेथे
जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते
- गंगाधर मुटे
---------------------------------
प्रतिक्रिया
28 May 2012 - 6:40 pm | JAGOMOHANPYARE
छान
28 May 2012 - 8:09 pm | मदनबाण
छान !
28 May 2012 - 8:47 pm | पैसा
आवडली.
29 May 2012 - 12:51 pm | नगरीनिरंजन
आवडली.
31 May 2012 - 1:28 am | अर्धवटराव
कशाला ‘अभय’ काल गेलास तेथे
जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते
हे कडवे नाहि उमगले.
अर्धवटराव
31 May 2012 - 2:05 am | शिल्पा ब
मला पण नाही समजलं. बाकी कविता छान.
31 May 2012 - 8:07 am | गंगाधर मुटे
कशाला 'अभय' काल गेलास तेथे
जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते
असे वाचावे. तो तांत्रीक घोळ आहे.
31 May 2012 - 9:50 pm | अर्धवटराव
अभय कोण्या व्यक्तीला उद्देशुन म्हणताय, कि वृत्तीला? तो कुठे गेला? तिथे क्रुद्ध होण्यासारखे काय आहे?
अर्धवटराव
31 May 2012 - 9:50 pm | अर्धवटराव
अभय कोण्या व्यक्तीला उद्देशुन म्हणताय, कि वृत्तीला? तो कुठे गेला? तिथे क्रुद्ध होण्यासारखे काय आहे?
अर्धवटराव
1 Jun 2012 - 9:08 am | गंगाधर मुटे
'अभय' हे माझे कवितेत वापरावयाचे उपनाव/तखल्लुस आहे. :)
4 Jun 2012 - 9:21 pm | गंगाधर मुटे
सर्व प्रतिसादकांचे मनपूर्वक धन्यवाद. :)
मला सुरुवातीला प्रश्न पडला होता.
धमासान की घमासान
ध की घ?
घ चा ध झाला तर चालेल पण चुकून ध चा घ झाला तर निष्कारण तो ऐतिहासिक दस्तावेज तयार व्हायचा. ;)
कृपया धमासान ऐवजी घमासान असे वाचावे. :)