सगळेच संपून गेलेले असते
ती धडपड ...
जागरणे ....
धावपळ ...
धडधडणे ....!!
नि उरतो फक्त एक न मिटणारा आवंढा
आई गेली नि फक्त उरले निव्वळ अश्रू
न कळत ....न जुमानणारे ...!
सगळे बधीर ..!!
ते क्षण ….
ते वातावरण ....
सगळे सुन्न... अबोल ...
अश्रू फक्त सोबत ...कधीपण ...!
एका नंतर दुसर्याचे
घनघोर टाहो....
जशी एकाला जांभइ आली की दुसर्यालापण
नियंत्रणाच्या बाहेरचे हे सर्द क्षण ..
सगळे एकत्र
शांत अबोल ध्यान लावून
निर्वात पोकळीतले
मिट्ट अबोल क्षण ...!!
खिडकीवरची चिमणी उगाचच चिवचिवत
दुखाची जाणीव ओढून घेत असते
दहा फुटावरून उडणारा कावळा
त्याचा आवाज घसा बसल्या सारखा
दुरून डोंगराच्या पल्याडून येत असावा असे वाटत राहते
मन बधीर....!.... तन बधीर ..!!
नि मध्येच एखादी धून ....
सळकण सूर्याची कोवळी तिरीप .......
नदीमध्ये अस्थी विसर्जनाची वेळ
पाण्याच्या स्पर्शाने दुख विसर्जित होत असते
नकळत एखादी धून
मन फुलवू लागते .......!!
आईचे दुख नकळत हरवत असते
ह्या प्रौढ वयात ...!!
प्रतिक्रिया
11 Mar 2011 - 9:05 am | आत्मशून्य
का ?
11 Mar 2011 - 12:36 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
तुफान... सुन्न झालो वाचुन...
11 Mar 2011 - 4:24 pm | पियुशा
बर्याच दिवसानि लिहिलित कविता
सुरेख ! :)
11 Mar 2011 - 4:53 pm | sneharani
मस्त कविता!
11 Mar 2011 - 11:00 pm | चाल क बि.एन
खोल हुंदक्यांची जानीव होते का ?