सोनेरी पानं उगीच का होतात सोनेरी ?
हिरवाईचे दिवस जपतात ते कितीतरी
अखेर गळतात.. एक दिवस ते ही
स्वागत पडुन नव्याचे करतात
तरुणाई चे जल्लोषात आगमन मग
करते फुटलेले नवे कोंब मुसमुसलेले
वळते अखेर त्यांचे ही वय एक दिवस
अटळ सत्यच ते सांगुन जातात
सोनेरी झाले म्हणून नव्याची नाही अवहेलना
अवमानात नाही कुठलीच प्रेरणा
उन-पावसाचे वाचलेच संपुर्ण पुस्तक
न बोलता बरेच काही सांगुन जातात
ती सोनेरी पानं.
प्रतिक्रिया
5 Mar 2011 - 12:59 pm | आत्मशून्य
कवीता.
5 Mar 2011 - 5:11 pm | नरेशकुमार
छान आहे कविता.
5 Mar 2011 - 5:19 pm | विनायक बेलापुरे
छान आहे कविता.
+१