हिंदुहृदयसम्राटांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झालेला हा धागा
धागाकर्त्याच्या विनंतिनुसार हा धागा वाचनमात्र करण्यात येत आहे.
या तळटीपेसकट आता बंद झाला आहे. याचा अर्थ धागाकर्त्याने या धाग्यात काहीही लिहावे आणि त्याला प्रत्युत्तर देण्याची सोय बाकी असू नये अशी योजना संपादक मंडळाने करुन दिली आहे असे दिसते. या धाग्यात धागाकर्त्याने काही मौलिक वाक्ये लिहीली आहेत. उदा:
तुला डोळे आहेत का रे पावट्या?
नकली नावं पांघरून इकडे तिकडे ओकत फिरणारे कद्रू लोक तुम्ही..
लोकांना फालतू त्रास देण्याशिवाय काय करू शकणार आहात?
कुणाची दहशत कुठे आहे हे तुम्हाला कशाला सांगायला पाहिजे.
कुठेतरी ** मारली असेल शिवसैनिकांनी म्हणून इकडे बडबड करताय..
काय धडा घ्यायचा आणि काय नाही हे तू मला सांगू नकोस..
तुझी हिडीस मनोवृत्ती दिसली तेवढी बास..
आणि खराच दम असेल ना पार्श्वभागात तर सेनाभवना समोर उभे राहून पहिल्या ओळीतील शब्द बडबडून दाखव..
फुकटचा सल्ला स्वतःकडेच ठेव.
शिवसेना का वाढत नाही (आणि का वाढणार नाही) याची उत्तरे धागाकर्त्याने स्वतःच अशा भाषेद्वारे देऊन ठेवली आहेत, हे बरे झाले. पण मिसळपाव हे काही शिवसेनेचे अधिकृत मुखपत्र नाही. मग असा धागा वाचनमात्र ठेवण्याचे मूळ लेखकाला स्वातंत्र्य कुणी दिले? अशा ठाकरी भाषेला संयत भाषेतही कुणी उत्तर देऊ नये अशी सोय करण्यामागचे काय प्रयोजन आहे?
अवांतरः 'फुलोरा' मध्ये हल्ली मिसळपाववरील लेखकांचे बरेच लेख येऊ लागले आहेत. त्यामुळे मिसळपावच्या धोरणांत काही बदल झाले आहेत काय? तसे असल्यास या संकेतस्थळाचे मालक (किंवा चालक) तसा खुलासा का करत नाहीत?
ज्या धाग्याबद्दल येथे प्रश्न विचारले गेले आहेत तो मूळ धागा अप्रकाशित करण्यात आलेला आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रस्तुत कारवाईनंतर हा धागाही वाचनमात्र करण्यात आलेला आहे. - संपादक
प्रतिक्रिया
31 Jan 2011 - 4:39 am | सुनील
असभ्य भाषेतील मजकूर तसाच ठेऊन, त्याला प्रत्युत्तर देण्याची सोय काढून घेऊन, धागा वाचनमात्र करणे योग्य नाही. एकतर संपूर्ण धागाच अप्रकाशित करावा किंवा वाचनमात्र करायचाच असेल तर, असभ्य भाषेतील मजकूर काढून मग करावा.
शिवसेना का वाढत नाही (आणि का वाढणार नाही)
भविष्याबद्दल बोलत नाही पण अन्य प्रादेशिक पक्ष (उदा. तेलगू देशम) हे जितक्या झपाट्याने संबंधित राज्यात पसरले खेरीज स्वबळावर सत्ताप्राप्तीपर्यंत मजल मारू शकले, ते पाहता चाळीस वर्षांनंतरही शिवसेना ठाण्यापलीकडे फारशी पोचली नाही आणि राज्यात स्वबळावर सत्ताप्राप्ती तर कधीच करू शकली नाही, हे तिच्या नेतृत्वाचे घवघवीत अपयशच नाही का?
31 Jan 2011 - 8:33 pm | आमोद शिंदे
सहमत आहे. धागाकर्त्याने जेष्ठ मिपाकर विकास ह्यांनाही 'कुत्रा' असा उपप्रतिसात दिला होता. (तो मात्र संपादित झालेला दिसतो.) कुठल्याही राजकीय पक्षाचे नाव घेऊन 'सेनाभवनावर ये तुला दाखवतो' वगैरे भाषा करणार्यांना पब्लिक फोरमवर स्थान असू नये. फोरम्सनी शक्य तेवढे निष्पक्ष असावे.
31 Jan 2011 - 4:47 am | गुंडोपंत
शैक्षणिक क्षेत्रातील महोदयांनी कुणी सहजपणे 'अडचणीचे प्रश्न' विचारल्यावर 'तुझ्या बापाने वेळीच काढले असते तर ही वेळ आली नसते' सदृश लिखाण याच मिपावर केले आहे, हे आमच्या लक्षात आहे.
तो प्रतिसाद शैक्षणिक क्षेत्रातील महोदयांची लायकी कळण्यासाठी तसाच ठेवावा अशी विनंतीही तेथेच असेल!
शिक्षणाचा दर्जा का वाढत नाही (आणि का वाढणार नाही) याची उत्तरे त्यांनी स्वतःच अशा भाषेद्वारे देऊन ठेवली आहेत, हे बरे झाले.
तेंव्हा मौलिक वाक्ये असलेल्या भाषेविषयी कुणाची लायकी काय याची जाणीव आहेच.
31 Jan 2011 - 5:30 am | शुचि
कोण शिक्षणक्षेत्रात आहे नाही त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं? ही अवांतर माहीती या धाग्यावर सर्वांना कशाकरता पुरवली जाते आहे?
संपादकांना विनंती हा प्रतिसाद उडवावा कारण उगीच व्यक्तीगत माहीती पुरवत आहे ज्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
31 Jan 2011 - 11:29 am | सन्जोप राव
मॉरल पुलिसिंगच्या भानगडीत आपले उघडे पडलेले पितळ अशा वड्याचे तेल वांग्यावर काढण्याच्या प्रयत्नाने झाकले जाणार नाही, गुंडोपंत. हरकत नाही.प्रयत्न सुरु ठेवा.
याच धर्तीवरचे आणखी दोन प्रतिसाद अपेक्षित आहेत. ते आले की 'तीन तिगाडा, काम बिगाडा' झाले!
31 Jan 2011 - 5:01 am | यकु
महाराष्ट्रातील एक काळ गाजवलेल्या/आजही तेवढी क्षमता असणार्या माणसाच्या वाढदिवसाच्या धाग्यावरच तुम्हाला
एकाच आठवड्यात 'ढाण्या वाघा' चा ढक चिक ढाक चिक वाढदिवस आणि पंडीतजींचे देहावसान हे बघून 'बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार'
ही गरळ का टाकावी वाटली तेवढे सांगा.
वरील ओळीतून काय सूचित करू ईच्छिता? बाळासाहेब जगावेत की मरावेत याबद्दलची मळमळ बोलून दाखवायला तुम्हाला त्यांच्या वाढदिवसाचाच धागा सापडला?
त्या धाग्यावर, धागाकर्ता म्हणून मी हे सुरूवातीलाच म्हटले होते-
प्रेषक यशवंत एकनाथ दि. रवी, 23/01/2011 - 15:39.
कृपया वरचे लिखाण फक्त बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक मराठी ई-कम्युनिटीम्हणून शुभेच्छा देण्यासाठी केले आहे. निश्चितच, "बाळासाहेब" नावाच्या करिष्म्याबद्दल आपापली मते मांडता येतील.
पण राजकीय मुद्द्यांवरील चर्चा काथ्याकुटात वेगळा धागा काढून केल्यास ते सुयोग्य होईल.
हे फक्त धागाकर्ता म्हणून सांगावे वाटले.. बाकी चालू द्या..
तुम्हाला बाळासाहेबांबद्दल इतर मुद्यांवर चर्चा करायची होती तर तेव्हाच असा वेगळा धागा तुम्ही काढू शकला असता.
आणि वर पुन्हा तुम्ही मला फुकट सल्ला दिलाय, धडा घ्यायला सांगितलेत -
धागा काढणार्यांने काहीही गृहीत धरु नये, आपल्या श्रद्धास्थानांवर सगळेच बेलभंडारा उधळतील असे नाही, काही लोक इतके भाबडे नसतात, इतका धडा जरी घेतला तरी पुष्कळ झाले!
तुम्हाला मी माझा सल्लागार नेमल्याचे मला तरी आठवत नाही.
तिथला तुमचा प्रतिसाद-
गदिमांच्या शब्दांत
एकाच आठवड्यात 'ढाण्या वाघा' चा ढक चिक ढाक चिक वाढदिवस आणि पंडीतजींचे देहावसान हे बघून 'बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार' हे चपखल शब्द आठवले.
बाकी चालू द्या.
अवांतरः धागा काढणार्यांने काहीही गृहीत धरु नये, आपल्या श्रद्धास्थानांवर सगळेच बेलभंडारा उधळतील असे नाही, काही लोक इतके भाबडे नसतात, इतका धडा जरी घेतला तरी पुष्कळ झाले!
बाकी चालू द्या.
सन्जोप राव
शिवसेना का वाढत नाही हे संबंधित निर्णय घेणार्यांना जाऊन सांगा. शिवसैनिक नसलेला बाळासाहेबांचा एक चाहता म्हणून मी धागा काढला होता; कार्यकर्ता म्हणून नव्हे. कुठल्या कुठे संबंध जोडू नका.
31 Jan 2011 - 11:38 am | llपुण्याचे पेशवेll
शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धास्थानांवर धुरळा उडला की जो तो आक्रमक होतच असतो. शेवटी सगळी माणसेच, त्यांचेही पाय मातीचेच आहेत हे जाणून आम्ही न मागताच त्यांना माफी देऊन टाकतो.
31 Jan 2011 - 11:51 am | यकु
धन्यवाद पुपे!
31 Jan 2011 - 11:25 am | सन्जोप राव
कृपया वरचे लिखाण फक्त बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक मराठी ई-कम्युनिटीम्हणून शुभेच्छा देण्यासाठी केले आहे. निश्चितच, "बाळासाहेब" नावाच्या करिष्म्याबद्दल आपापली मते मांडता येतील.
पण राजकीय मुद्द्यांवरील चर्चा काथ्याकुटात वेगळा धागा काढून केल्यास ते सुयोग्य होईल.
हे फक्त धागाकर्ता म्हणून सांगावे वाटले.. बाकी चालू द्या..
म्हणजे जर माझ्याशी सहमत असाल तरच इथे प्रतिसाद द्या, नाहीतर चालू लागा. अशी हुकुमशाही संकेतस्थाळांवर चालत नाही. त्यासाठी आपापले ब्लॉग चालवावेत.
ही गरळ का टाकावी वाटली तेवढे सांगा.
वरील ओळीतून काय सूचित करू ईच्छिता? बाळासाहेब जगावेत की मरावेत याबद्दलची मळमळ बोलून दाखवायला तुम्हाला त्यांच्या वाढदिवसाचाच धागा सापडला?
पुन्हा तेच. मूळ लेखन इतकेच धागाकर्त्याच्या हातात असते. कुणी कुठे आणि कसला प्रतिसाद द्यावा यावर त्याचा काही (रिमोट) कंट्रोल असत नाही. इथे असे लिहा, इथे लिहू नका, हीच ती शिवसेनट गुर्मी. तरी बरे, आपण 'तुम्हाला बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार' हे का आठवले? हे आठवण्यासाठी शिवसेनेची परवानगी घेतली होती का?' असे प्रश्न विचारले नाहीत!
चला, त्या निमित्ताने मूळ धागालेखक तू, पावट्या, हिडीस, पार्श्वभाग, बडबडणे, ** मारणे या भाषेतून 'तुम्ही' पर्यंत आला. हेही नसे थोडके. हे मवाळपणाचे धोरण स्वीकारायला शिवसेनेने परवानगी दिली का पण?
31 Jan 2011 - 11:45 am | यकु
छान विनोद!
कुणी कुठे आणि कसला प्रतिसाद द्यावा यावर त्याचा काही (रिमोट) कंट्रोल असत नाही
असं तुम्हाला वाटतंय तसंच मलाही वाटत असेल की नाही?
31 Jan 2011 - 11:39 am | टारझन
जंगल जंगल बात चली है पता चला है .. उलुलुलुलुलु ... अरे चड्डी पहन के फुल खिला है फुल खिला है ..
एक परिंदा बडा शरमिंदा ... भागा नंगा ... अरे सोच रहा है बाहर आखीर क्यु निकला है .. .
अरे चड्डी पहन के फुल खिला है फुल खिला है ..
जंगल जंगल पता चला है चड्डी पहन के फुल खिला है ..
जंगल जंगल पता चला है चड्डी पहन के फुल खिला है ..
अवांतर : सन्जोप रावांचे मानसिक छळ करणार्या मंडळातल्या पोरा पोरींचा णिधेश :)
- बगिरा
31 Jan 2011 - 11:53 am | Nile
फोरम वर जाहीर धागे काढणं म्हणजे पब्लिकमध्ये नागडं होण्यासारखं आहे. आता झालात नागडे तर मग इतर लोक आमच्याकडे बघतात म्हणुन तक्रार करणारे मुर्खच.
इथे प्रतिक्रीया देउ नका, इथे नाक खुपसु नका म्हणणार्यांनी आपल्या घरात राहुन बायका पोरांसमोर जग कसे वाईट आहे याचे प्रवचन करत बसावे, फोरमवर येउन रडारडी करु नये असे आमचे प्रांजळ मत आहे.
31 Jan 2011 - 1:35 pm | आजानुकर्ण
पूर्णपणे सहमत
31 Jan 2011 - 12:14 pm | मी_ओंकार
बाकी काही बोलत नाही. पण हा धागा ज्या उद्देशाने काढला आहे त्यावर अजून काहीच भाष्य नाही.
याचा अर्थ धागाकर्त्याने या धाग्यात काहीही लिहावे आणि त्याला प्रत्युत्तर देण्याची सोय बाकी असू नये अशी योजना संपादक मंडळाने करुन दिली आहे असे दिसते.
मिसळपाव हे काही शिवसेनेचे अधिकृत मुखपत्र नाही. मग असा धागा वाचनमात्र ठेवण्याचे मूळ लेखकाला स्वातंत्र्य कुणी दिले? अशा ठाकरी भाषेला संयत भाषेतही कुणी उत्तर देऊ नये अशी सोय करण्यामागचे काय प्रयोजन आहे?
हे प्रश्न गंभीर आहेत. मिपावर असा प्रकार घडावा याचा विषाद वाटला.
- ओंकार.
31 Jan 2011 - 7:44 pm | प्रकाश घाटपांडे
यानिमित्त झेंडाची आठवण झाली.
मुद्दा लोकशाही ने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशाप्रकारे व्यक्त करावे हा खरच गहन प्रश्न आहे.
31 Jan 2011 - 10:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रावसाहेबांची कोण मुस्कटदाबी करतोय रे....!!!!
-दिलीप बिरुटे